Shuru
Apke Nagar Ki App…
वन्य प्राण्यानी करुण दाखविले प्रत्यक्षीक..
Digital media.
वन्य प्राण्यानी करुण दाखविले प्रत्यक्षीक..
- Digital media.माढा, सोलापूर, महाराष्ट्र💐20 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Digital media.1
- तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य व छायाचित्रकार सतीश पवार यांना माजी राष्ट्रपती भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित1
- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे तालुका सांगोला येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- Post by Sachin fakirchand Pathare1
- 🛑 *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन* भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे तसेच जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आयुष्यभर आचरणात आणण्याचे आवाहन केले. “डॉ. बाबासाहेबांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता जन्मापासून शेवटपर्यंत आचरणात आणले पाहिजेत. संविधान जपण्याचा संकल्प करणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे,” असे त्या म्हणाल्या. खासदार प्रणिती शिंदे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या की, देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आले असून सत्ताधारी भाजपकडून त्याचा वारंवार अपमान होत आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली नाही; मात्र आता देशासाठी लढण्याची वेळ आली आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी जात-पात, धर्म बाजूला ठेवून संघटित संघर्ष करणे आवश्यक आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, संसद व विधिमंडळात ३३ टक्के महिला आरक्षणाची तरतूद असलेले महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे मंजूर झाले आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारने ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिला आरक्षण लागू केले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, महिला आरक्षण विधेयक काँग्रेसच्या पाठिंब्याने २०२३ मध्येच मंजूर झाले असताना सत्ताधाऱ्यांना ३० महिन्यांनंतर जाग आली असून, पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात येत आहे. तसेच, महिला आरक्षणाची अंमलबजावणी मतदारसंघ पुनर्रचना (डी-लिमिटेशन) शी जोडण्यावर त्यांनी आक्षेप घेतला. मतदारसंघ पुनर्रचना करण्यापूर्वी जनगणना होणे आवश्यक आहे. मात्र केंद्र सरकार असंवैधानिक पद्धतीने निर्णय घेत आहे. हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप वारंवार लोकशाही आणि संविधानाचा अपमान करतात. महत्त्वाच्या विधेयकांपूर्वी देशभर चर्चा व्हायला हवी. संवाद हीच लोकशाहीची खरी ताकद आहे; मात्र सध्याचे सरकार एकतर्फी निर्णय घेत आहे. संवादाची परंपरा नष्ट होत असून हे लोकशाही संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार जिवंत आहेत आणि ते जपणारे लोक व काँग्रेस पक्ष अस्तित्वात आहे, तोपर्यंत लोकशाही व संविधानावर कुठलाही आघात होऊ देणार नाही, असा निर्धार खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, माजी महापौर सुशिलाताई अबुटे, संजय हेमगड्डी, अरिफ शेख, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी नगरसेवक प्रवीण दादा निकाळजे, शिवा बाटलीवाला, प्रा. भोजराज पवार, प्रदेश सचिव श्रीशैल रणधिरे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, हनुमंतू सायबोळु, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, बाबुराव म्हेत्रे, दक्षिण तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अँड. मयूर खरात, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, रामसिंग आंबेवाले, बसवराज म्हेत्रे, राजन कामत, सिद्राम सलवदे सर, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, रुस्तुम कंपली, लखन गायकवाड, सागर उबाळे, अँड. शुभम माने, अयाज आळंद, भीमराव शिंदे, नूरअहमद नलवार, माजी महिला अध्यक्ष सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, अँड करीमुनिसा बागवान, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, संध्या काळे, मुमताज तांबोळी, कोंडणताई काकडे, संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, सलिमा शेख, पूजा चव्हाण, छाया हिरवटे, चंद्रकला निजमल्लू, अनिता भालेराव, द्रोपदी शिवशरण, सचिन पवार, महेंद्र शिंदे, यल्लाप्पा बुगले, नारायण पावटे, राजेश झंपले, गंगाधर शिंदे, शंकर म्यागेरी, मोहसीन फुलारी, दशरथ सामल, अभिलाष अच्युगटला, सचिन सुरवसे, आमिर पाटील, अभेज दर्जी, दत्तात्रय गजभार, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- बारामती पोट निवडणुकीच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला..1
- ------- पाटोदा(प्रतिनिधी):- १३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बीड बसस्थानकात गंभीर अनियमितता समोर येत असून ‘अजब-गजब’ कारभाराची चर्चा रंगली आहे. भव्यदिव्य इमारतीच्या दर्शनी भागातच जिल्हा वाहतूक शाखेची खोली, झाडाला बांधलेले व थकबाकी असलेले विद्युत मीटर, तसेच पिण्याच्या पाण्याची (RO) ठप्प व्यवस्था आणि सशुल्क शौचालयातील गैरसोयींमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच जिल्हा वाहतूक शाखेची छोटी खोली उभारण्यात आल्याने इमारतीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मुळे बसस्थानकाच्या सौंदर्यावर परिणाम होत असून प्रवाशांच्या हालचालींनाही अडथळा निर्माण होत आहे. ही शाखा तत्काळ योग्य ठिकाणी स्थलांतरित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, बसस्थानक परिसरात झाडाला बांधलेल्या विद्युत मीटरमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम काळात कंत्राटदाराने घेतलेले हे मीटर आज ही उघड्यावर लटकलेल्या अवस्थेत असून त्यावर तब्बल ३७ हजार रुपयांची थकबाकी आहे. उघड्यावर पडलेले फ्युज आणि वायरिंग प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. तरी ही संबंधितांवर कारवाई न झाल्याने महावितरणच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या शिवाय, प्रवाशांसाठी असलेली पिण्याच्या पाण्याची (RO) सुविधा ठप्प असून ती केवळ शोभेची वस्तू ठरली आहे. सशुल्क शौचालयाची अवस्था देखील अत्यंत दयनीय असून दुर्गंधी, अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांकडून होणारे गैरवर्तन यामुळे प्रवाशांची मानसिक कुचंबणा होत आहे. एकीकडे सर्व सुविधा सुरळीत असल्याचा दावा विभाग नियंत्रक (राज्य परिवहन, बीड) अनुजा दुसाने यांनी केला असला तरी प्रत्यक्ष स्थिती मात्र पूर्णतः विपरीत असल्याचे दिसून येते. संबंधित प्रकरणात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप ही होत आहे. या सर्व बाबींवर तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाय योजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, बीड यांच्या कडे केली आहे.1
- Post by Sachin fakirchand Pathare1