Shuru
Apke Nagar Ki App…
कंत्राटदार कोण, त्यांची ओळख काय ? नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. लातूर शहरात नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनावर कारवाई करताना गंभीर अनियमितता समोर आली आहे. वाहनांना लॉक करणाऱ्या काही व्यक्तींकडे कोणतेही अधिकृत ओळखपत्र (ID कार्ड) नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही कारवाई अधिकृत आहे का, आणि महापालिकेने दिलेले टेंडर नेमके कोणाकडे आहे, यावर नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. नियमबाह्य पद्धतीने कारवाई होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकृत कंत्राटदार कोण, त्यांची ओळख काय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे आहेत का, याबाबत पारदर्शकता नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिकेने या प्रक्तात्ती तत्काल चौकशी करून
Latur 24
कंत्राटदार कोण, त्यांची ओळख काय ? नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. लातूर शहरात नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनावर कारवाई करताना गंभीर अनियमितता समोर आली आहे. वाहनांना लॉक करणाऱ्या काही व्यक्तींकडे कोणतेही अधिकृत ओळखपत्र (ID कार्ड) नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही कारवाई अधिकृत आहे का, आणि महापालिकेने दिलेले टेंडर नेमके कोणाकडे आहे, यावर नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. नियमबाह्य पद्धतीने कारवाई होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकृत कंत्राटदार कोण, त्यांची ओळख काय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे आहेत का, याबाबत पारदर्शकता नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिकेने या प्रक्तात्ती तत्काल चौकशी करून
More news from महाराष्ट्र and nearby areas
- लातूर शहरात नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनावर कारवाई करताना गंभीर अनियमितता समोर आली आहे. वाहनांना लॉक करणाऱ्या काही व्यक्तींकडे कोणतेही अधिकृत ओळखपत्र (ID कार्ड) नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही कारवाई अधिकृत आहे का, आणि महापालिकेने दिलेले टेंडर नेमके कोणाकडे आहे, यावर नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. नियमबाह्य पद्धतीने कारवाई होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकृत कंत्राटदार कोण, त्यांची ओळख काय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे आहेत का, याबाबत पारदर्शकता नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिकेने या प्रक्तात्ती तत्काल चौकशी करून1
- Post by Ramesh Mulgir1
- प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत त्यांनी संताप व्यक्त केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद ठेवावे, अशीही मागणी पुढे करण्यात आली. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.1
- अप्पर तहसील कार्यालय मागणीसाठी शेवली कडकडीत बंद आठवडी बाजारही बंद ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा1
- बळीराजाचा आक्रोश! रस्त्यावर फेकला भाजीपाला; कांदा-भाजीपाल्याला फुकट भाव राज्यात सध्या कांदा व भाजीपाल्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रचंड कष्ट करूनही उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. दरम्यान, एका संतप्त शेतकऱ्याने आपला भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींची तीव्रता अधोरेखित झाली आहे. शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जात असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही अशा प्रश्न उभा राहत आहे.1
- परभणी : अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भातील बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा. जोपर्यंत अद्यावत जनगणना होत नाही तोपर्यंत याबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वर्गीकरणासाठी कोणते सामाजिक, आर्थिक निकष, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय किंवाकोणत्या अभ्यासगटाच्या शिफारसी विचारात घेतल्या आहेत याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डी. एन. दाभाडे, रामकिशन कांबळे, नदीम इनामदार, जयप्रकाश इंगोले, एन. जी. खंदारे, रवी सोनकांबळे, सुहास पंडीत, सिध्दार्थ भराडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.1
- Post by Labour addaa.1
- धार्मिक कार्यक्रम की आर्थिक घोटाळा? वारकऱ्यांचा महाराजांवर गंभीर आरोप ! उत्सव संतांचा कुंभमेळावा वारकऱ्यांचा, लातूर मधील या धार्मिक कार्यक्रमात कोट्यावधीचा अपहार ? किशोर महाराज शिवनीकर या महाराजांने कोट्यावधी रुपये लुटले? वारकऱ्याचा आरोप, वारकरी संप्रदाय मध्ये खळबळ. लातूरच्या खंडापूर येथे दोन महिन्यापूर्वी झालेल्या उत्सव संतांचा कुंभमेळावा वारकऱ्यांचा, या अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात, देणगी स्वरूपात साडेपाच ते सहा कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आहे, दरम्यान जमा झालेल्या देणगी मधून अडीच ते तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप वारकऱ्यांनी केलाय, या कार्यक्रमामधील मुख्य असणाऱ्या किशोर महाराज शिवनीकरांनी हा पार केल्याचा आरोप वारकरी करत आहेत, मागच्या दीड महिन्यापासून हा महाराज फरार आहे, जमा झालेल्या देणगीचा हिशोब न देताच महाराज पसार झाल्याचा वारकरी सांगत आहेत, या प्रकरणाचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले आहेत लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशी वारकऱ्यांची मागणी आहे.1