Shuru
Apke Nagar Ki App…
Indias No 1 Sports Digital News Sports Plus Daily News of India
SATISH BHALERAO
Indias No 1 Sports Digital News Sports Plus Daily News of India
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कुही- लिटल स्टार कॉन्व्हेंट वेलतूर येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी किसान क्लब चे जिल्हा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आकाश भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी सामाजिक क्रांतीची प्रेरणा म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले होत असे सांगितले.1
- Post by Pitam Parjapati2
- महा बीड़ी झंडा महोत्सव 10 मार्च से 16 मार्च तक चलने वाला है, और इन 7 दिनों तक #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #bihar #Aurai #AkashPriyadarshi #mela1
- "जीते जी रक्तदान और मरने के बाद नेत्रदान" - डॉ. हेमकृष्ण कापगते साकोलीत नेत्र व आरोग्य शिबीरात २०५ जणांची तपासणी • १०० जणांची शस्त्रक्रियेला निवड • १२५ चष्मे वाटप • साकोली : "जीते जी रक्तदान और मरने के बाद नेत्रदान" याप्रमाणे प्रत्येक जणांनी हे कार्य राबविले तर जखमी रूग्णांना रक्त मिळून जीवनदान आणि नेत्रहीनांना दृष्टी मिळेल" असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांनी केले. ते ( मंगळ. १० मार्च ) ला जागतिक महिला दिनानिमित्त तसेच स्व. आत्माराम पटले व स्व. मुरलीधर गजापुरे यांच्या स्मरणार्थ आणि महात्मे नेत्र पेढी नागपूर, भंडारा जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान, श्याम बहुउद्देशीय शिक्षण संस्था साकोली, जिजामाता पतसंस्था साकोली व डॉ. हेडगेवार सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने "डोळ्यांची तपासणी व आरोग्य शिबीर" उद्घाटनप्रसंगी बोलत होते. शिबीरात २०५ जणांची तपासणी, १०० जणांची शस्त्रक्रियेला निवड तर १२५ जणांना चष्मे वाटप करण्यात आले. या नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबीराला अतिथी शरद गुप्ता, नगराध्यक्ष देवश्री कापगते, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, प्रशांत गुप्ता, किशोर गुप्ता, मालती लांजेवार, संस्था सचिव ॲड. मनिष कापगते, देवनाथ रहांगडाले, रंजना मस्के आदी उपस्थित होते. शिबिरात महात्मे नेत्र पेढी नागपूरचे डॉ. अरविंद डोंगरवार, डॉ. विश्वजीत निकम, अथर्व भोंदले, ऐश्वर्या कडवे, आस्था बन्सोड, रितू सेलोटे या चमूने नेत्र आरोग्य सेवा दिली. येथे एकुण १०० जणांची मोतिबिंदू शस्त्रक्रियासाठी नागपूरला निवड करण्यात आली. त्यासाठी पहिली ५० जणांची चमू १६ मार्चला व दुसरी ५० जणांची चमू १८ मार्चला नागपूरला रवाना होणार आहेत. या शिबिरात एकुण २०५ जणांनी नोंदणी करून आरोग्य शिबीराचा लाभ घेतला आणि १२५ जणांना चष्मे वाटप करण्यात आले. शिबिरात संचालन ॲड. मनिष कापगते यांनी केले. याप्रसंगी स्व. शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार, शकुंतला कापगते, विवेक कापगते, मोरेश्वर गहाणे, प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख आशिष चेडगे, राजू कापगते, युवराज गहाणे, अंगराज समरीत, अस्मिता पुरामकर, मधूकर नगरकर, भागवत लांजेवार, आशिष सैलोकर, सुमन शेंडे आदींनी स्वागत तथा आयोजनात विशेष सहकार्य केले.4
- वाघोली शेत शिवारात खळबळ; कॅनलमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह धामणगांव रेल्वे तालुक्यातील वाघोली शेत शिवार परिसरात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी कॅनलमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन वेगवेगळ्या गावचे तरुण मिळालेल्या माहितीनुसार, मृत आढळलेले दोन्ही तरुण आजूबाजूच्या परिसरातीलच आहेत. पहिल्या मृताची ओळख दिनेश दिवाकर मारकाम (वय ३४, रा. जळगाव मंगरूळ) अशी पटली आहे, तर दुसरा मृतदेह धीरज मातरे (रा. ढाकुलगाव) या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही मृतदेह वाघोली शिवारातील कॅनलमध्ये काही अंतरावर आढळून आले. पोलीस पथक घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गिरीश तातोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये हवालदार सागर कदम, अतुल पाटील, नवनाथ खेडकर, हरिहर वैद्य आणि पोलीस कॉन्स्टेबल मयूर धावक यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवले आहेत. या दोन्ही तरुणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा घातपात आहे की अपघात? याचा अधिक तपास दत्तापूर पोलीस करत आहेत. एकाच दिवशी दोन मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे व चर्चेचे वातावरण पसरले आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे *💥वाघोली शेत शिवारात खळबळ; कॅनलमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह* *💥दोन वेगवेगळ्या ठिकाणी कॅनलमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली* *💥सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे*1
- चंद्रपूर : राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले .1
- विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्यातील शासकीय नोकर भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शुल्क कमी करण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. शासकीय नोकर भरती प्रक्रियेत वाढलेल्या शुल्काच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क किमान ५० टक्के कमी करण्याची गरज व्यक्त केली. तसेच समाजातील सर्व घटकांतील गरीब विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रवेशासाठी समान संधी मिळावी यासाठी शुल्क सवलत आणि इतर आर्थिक सहाय्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. परीक्षा केंद्रांपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ३०० ते ३५० किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने बस व रेल्वे प्रवासात सवलत देण्याचा विचार करावा, अशी मागणीही आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासाठी ‘एक्झाम सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ उपक्रम राबवण्याची सूचना करत CSR निधीचा वापर गरीब विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी करावा, असे त्यांनी सांगितले. राज्यातील सव्वा दोन लाख रिक्त पदांची भरती प्रक्रिया लांबणीवर पडणे आणि किचकट प्रक्रिया याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षांचे पाच वर्षांचे पूर्वनियोजित वेळापत्रक तयार करावे, अशी मागणी त्यांनी केली असून यावर मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इतर राज्ये व केंद्र सरकारच्या परीक्षा प्रक्रियेचा अभ्यास करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.1
- ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल... चूक नेमकी कोणाची?? भंडारा : शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. नंतर भांडणाचे रूपांतरभंडारा येथील 11वर्ष हाणामारीत झाले. रागाच्या भरात एका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने फलकावर काहीतरी अभद्र वाक्य लिहिली. शिक्षकांनी ती वाचताच पालकांना बोलवण्याचे फर्मान सोडले. त्यानंतर मात्र विद्यार्थ्याला धडकी भरली. यावर मार्ग विचारण्यासाठी विद्यार्थ्याने 'एआय'ला काय करायचे असे विचारले असता 'एआय'ने त्याला चुकीची कबुली देण्यास सांगितले. मात्र आपण चूक कबूल केली तर बाबा मारतील जब भीतीने या अल्पवयीन विद्यार्थ्याने दुसरा मार्ग शोधला. त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. विद्यार्थ्याने भीतीपोटी अपहरणाचा असा बनाव रचल्याचे उघड होताच पालकही चकित झाले. मात्र या प्रकारामुळे मोबाईलचा अतिवापर आणि विद्यार्थ्यांचा एकलकोंडेपणा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. पालकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीचे परिणाम आता मुलांच्या मानसिकतेवर होऊ लागले आहेत. नोकरीसाठी दिवसभर घराबाहेर राहणारे, पैसा कमावण्याच्या स्पर्धेत धावणारे आई-वडील आणि घरात एकाकी पडलेली मुले. घरात या मुलांशी संवाद साधण्यासाठी कोणीही नसल्याने ती एकलकोंडी होतात. त्यांच्या मनात अनेक प्रश्नांचे कुतूहल असते, मात्र त्यांच्या प्रश्नांना योग्य दिशा देणार कोणीही नसतं. हळूहळू मोबाईल सारखे यंत्र त्यांचे सवंगडी होतात. मुले मोबाईलच्या आहारी गेल्याची ओरड केली जाते मात्र त्याला जबाबदार कोण ? याचा विचार होताना दिसत नाही. मोबाईल आणि चित्रपटांच्या आहारी जाऊन सिनेमातल्या कथानकाप्रमाणे कथा रचू लागतात. सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील अकरा वर्षीय विद्यार्थ्याने केवळ शिक्षक आणि पालकांच्या भीतीने स्वतःच्या अपहरणाचा ड्रामा रचला. हा प्रकार उघडकीस येताच चर्चेला उधाण आले आहे. "११ वर्षाचा एक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी स्कूल बसची वाट पाहत उभा होता. तोच एका व्यक्तीने तिथे येऊन त्याच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि चाकूच्या धाकावर त्या विद्यार्थ्याचे अपहरण केले. ट्रॅव्हल्समधून उतरलेल्या एका व्यक्तीने या विद्यार्थ्याच्या नाकावर रुमाल ठेवताच तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला नागपूरच्या दिशेने नेत असताना उमरेडच्या पुढे त्याच्या परिचित असलेल्या एका मंदिराजवळ गाडी थांबताच त्याला अचानक शुद्ध आली, त्याने आरडाओरडा करताच अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर विद्यार्थ्यांने घरी आईला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. थोड्याच वेळात जवळच राहत असलेले त्याचे मामा तेथे पोहोचले आणि ते त्याला सुखरूप घरी घेऊन आले. " ही सारी आपबीती एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याने रडत रडत त्याच्या पालकांसमोर बोलून दाखवली. त्याचे बोलणे ऐकून आईचेही डोळे पाणावले आणि लेक सुखरूप घरी परतल्याचे समाधानही तिच्या डोळ्यात तरळू लागले. पालकांनी त्याला याबाबत आणखीन विचारणा करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले मात्र त्यात असे काहीही घडल्याचे निष्पन्न झाले नाही त्यामुळे पालकांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. विद्यार्थ्याला याबाबत आणखी प्रश्न विचारून त्याच्याकडून सत्य वदविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्याचा खोटेपणा फार काळ टिकू शकला नाही. व त्याने ढसाढसा रडत रडत आपण अपहरणाचा बनाव रचला असल्याचे पालकांसमोर कबूल केले. शाळेतील शिक्षकांच्या आणि पालकांकडून आपल्याला शिक्षा होईल किंवा मार बसेल या भीतीने आपण हा सर्व प्रकार केल्याचे त्याने सांगितले. घडलेला सर्व प्रकार थक्क करून देणारा असला तरी यात नेमकी चूक कोणाची हा प्रश्न उपस्थित होतो. अकरा वर्षाच्या एखाद्या मुलाने युट्युबवर बघून असा बनाव करणे, तेही अत्यंत शुल्लक कारणासाठी. त्या चिमुकल्याच्या मनात असलेली भीती आणि एकटेपणा तर या सर्वांना जबाबदार नाही ? पालकांनी मुलांना वेळ देणे, त्यांना समजून घेणे आणि त्यांच्या एकटेपणाला दूर करणे ही जाता काळाची गरज असल्याचे पुन्हा एकदा या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. अन्यथा मोबाईलच्या आहारी गेलेले हे चिमुकले पब्जी आणि कोरियन गेम सारख्या ऑनलाइन गेमिंगचे बळी पडतील. मुलांनी केलेल्या कृतीसाठी त्यांना दोष देत बसण्यापेक्षा पालकांनी वेळेचं सावध होणे आता गरजेचे आहे.1
- चंद्रपूर - लोहारडोंगरी खाणीची परवानगी रद्द व्हावी याकरिता इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला महिलांनी पाठिंबा देत सरकारला जागे करण्यासाठी आज थाळी नाद आंदोलन केले. बंडू धोतरे यांच्या आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या उद्याच्या भविष्यासाठी बंडू धोतरे लढत असून नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यावा...1