वाघोली शेत शिवारात खळबळ; कॅनलमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह वाघोली शेत शिवारात खळबळ; कॅनलमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह धामणगांव रेल्वे तालुक्यातील वाघोली शेत शिवार परिसरात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी कॅनलमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन वेगवेगळ्या गावचे तरुण मिळालेल्या माहितीनुसार, मृत आढळलेले दोन्ही तरुण आजूबाजूच्या परिसरातीलच आहेत. पहिल्या मृताची ओळख दिनेश दिवाकर मारकाम (वय ३४, रा. जळगाव मंगरूळ) अशी पटली आहे, तर दुसरा मृतदेह धीरज मातरे (रा. ढाकुलगाव) या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही मृतदेह वाघोली शिवारातील कॅनलमध्ये काही अंतरावर आढळून आले. पोलीस पथक घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गिरीश तातोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये हवालदार सागर कदम, अतुल पाटील, नवनाथ खेडकर, हरिहर वैद्य आणि पोलीस कॉन्स्टेबल मयूर धावक यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवले आहेत. या दोन्ही तरुणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा घातपात आहे की अपघात? याचा अधिक तपास दत्तापूर पोलीस करत आहेत. एकाच दिवशी दोन मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे व चर्चेचे वातावरण पसरले आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे *💥वाघोली शेत शिवारात खळबळ; कॅनलमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह* *💥दोन वेगवेगळ्या ठिकाणी कॅनलमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली* *💥सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे*
वाघोली शेत शिवारात खळबळ; कॅनलमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह वाघोली शेत शिवारात खळबळ; कॅनलमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह धामणगांव रेल्वे तालुक्यातील वाघोली शेत शिवार परिसरात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी कॅनलमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन वेगवेगळ्या गावचे तरुण मिळालेल्या माहितीनुसार, मृत आढळलेले दोन्ही तरुण आजूबाजूच्या परिसरातीलच आहेत. पहिल्या मृताची ओळख दिनेश दिवाकर मारकाम (वय ३४, रा. जळगाव मंगरूळ) अशी पटली आहे, तर दुसरा मृतदेह धीरज मातरे (रा. ढाकुलगाव) या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही मृतदेह वाघोली शिवारातील कॅनलमध्ये काही अंतरावर आढळून आले. पोलीस पथक घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गिरीश तातोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये हवालदार सागर कदम, अतुल पाटील, नवनाथ खेडकर, हरिहर वैद्य आणि पोलीस कॉन्स्टेबल मयूर धावक यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवले आहेत. या दोन्ही तरुणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा घातपात आहे की अपघात? याचा अधिक तपास दत्तापूर पोलीस करत आहेत. एकाच दिवशी दोन मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे व चर्चेचे वातावरण पसरले आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे *💥वाघोली शेत शिवारात खळबळ; कॅनलमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह* *💥दोन वेगवेगळ्या ठिकाणी कॅनलमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली* *💥सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे*
- नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे अक्का यांची वार्डात फिरून स्वच्छतेची पाहणी; कर्मचाऱ्यांना दिल्या कडक सूचना प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे : धामणगांव शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावे या उद्देशाने नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे (अक्का) यांनी सकाळी विविध वार्डांमध्ये प्रत्यक्ष फिरून स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील नाल्या, कचरा शौचालय व्यवस्थापन तसेच स्वच्छतेसंदर्भातील विविध बाबींची तपासणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सकाळच्या वेळेत नगराध्यक्षांनी वार्डांमध्ये फेरफटका मारत नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील नाल्यांची स्वच्छता, रस्त्यावरील कचरा तसेच स्वच्छता कामांच्या अंमलबजावणीची त्यांनी बारकाईने पाहणी केली. काही ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेला कचरा आणि स्वच्छतेच्या इतर बाबी लक्षात घेऊन त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वार्ड परिसरात नागरिकांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. शहरात स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार येऊ नये, यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नियमितपणे आणि जबाबदारीने काम करावे, तसेच नाल्या व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता वेळोवेळी करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे यांनी यावेळी नागरिकांनाही स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. घरातील कचरा रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये टाकू नये, तो डस्टबिनमध्ये जमा करून नगरपरिषदेच्या घंटागाडीतच द्यावा. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. स्वच्छ आणि निरोगी शहर घडवण्यासाठी सर्वांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. नगराध्यक्ष स्वतः सकाळी वार्डांमध्ये फिरून स्वच्छतेची पाहणी करत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असून धामणगांव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वासही नगराध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला.1
- Post by JKV NEWS 241
- देवळी (जि. वर्धा) : परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीचा पर्दाफाश केल्याच्या कारणावरून एका पत्रकारावर व त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना देवळी येथे घडली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे पत्रकार शंकर अंबादास केवदे (रा. देवळी, जि. वर्धा) यांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीबाबत बातमी प्रसारित केली होती. तसेच या संदर्भात संबंधित पोलिसांसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सोशल मीडियावर प्रसारित केली होती. सदर बाबीची माहिती संबंधित व्यक्तींना मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार शंकर केवदे यांना घरातून बोलावून घेतले व त्यांनीच ती रेकॉर्डिंग त्यांना ऐकवली. त्यानंतर “तू आमच्या विरोधात तक्रार का करतोस” या कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर तसेच त्यांच्या पत्नीवर एकत्रितपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून घटनेदरम्यान आरोपींकडे शस्त्र असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे : रामदास डायरे विशाल पारिसे (देवळी)श्रावण डाहे (रा. निंबोली) सदर सर्व व्यक्ती बेकायदेशीर दारू विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत असून परिसरात त्यांच्या दादागिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ भारतीय दंड संहिता कलम 115 व 352 अंतर्गत गुन्हा नोंद केल्याचे समजते. मात्र घटनेचे स्वरूप गंभीर असताना अधिक कठोर व संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पत्रकार शंकर केवदे यांच्या पत्नीचा मेडिकल रिपोर्ट (MLC) देण्यात न आल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. — शंकर अंबादास केवदे पत्रकार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशन रा. देवळी, जि. वर्धा मोबाईल : 70584167432
- Post by स्मिता तलेय1
- Post by Amravati News Update1
- दारव्हा तालुक्यातील लाखखिंड परिसरात एका शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन विभागाने बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू मोहीम सकाळी ११. ०० वाजता सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाखखिंड येथील शेतकरी रमेश जाधव यांचे तीवरी रोडलगत शेत आहे. सोमवारी रात्री पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास रमेश जाधव शेतात गेले असता विहिरीमध्ये बिबट्या पडलेला दिसून आला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गावातील नागरिकांना माहिती दिली. काही वेळातच ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, घटनेची माहिती दारव्हा वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष रेस्क्यू मोहीम सुर राबविण्यात आली.वन विभागाकडून बिबट्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चऱ्हाटे यांनी सांगितले.1
- वर्ध्याच्या रामनगरात महिलेचे मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावले; घटना सीसीटीव्हीत कैद हिंगणघाटः वर्धा वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गिरीपेठ परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना काल सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अत्यंत चलाखीने पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून क्षणार्धात पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे दुचाकीवरून परिसरात आले होते. काही अंतरावर दुचाकी थांबवून मागे बसलेला चोरटा खाली उतरला आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या जवळ गेला. पाहता क्षणी त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि तिथेच उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून दोघांनीही धूम ठोकली. या संपूर्ण घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संबंधित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात बाईकस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.1
- वाघोली शेत शिवारात खळबळ; कॅनलमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह धामणगांव रेल्वे तालुक्यातील वाघोली शेत शिवार परिसरात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी कॅनलमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन वेगवेगळ्या गावचे तरुण मिळालेल्या माहितीनुसार, मृत आढळलेले दोन्ही तरुण आजूबाजूच्या परिसरातीलच आहेत. पहिल्या मृताची ओळख दिनेश दिवाकर मारकाम (वय ३४, रा. जळगाव मंगरूळ) अशी पटली आहे, तर दुसरा मृतदेह धीरज मातरे (रा. ढाकुलगाव) या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही मृतदेह वाघोली शिवारातील कॅनलमध्ये काही अंतरावर आढळून आले. पोलीस पथक घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गिरीश तातोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये हवालदार सागर कदम, अतुल पाटील, नवनाथ खेडकर, हरिहर वैद्य आणि पोलीस कॉन्स्टेबल मयूर धावक यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवले आहेत. या दोन्ही तरुणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा घातपात आहे की अपघात? याचा अधिक तपास दत्तापूर पोलीस करत आहेत. एकाच दिवशी दोन मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे व चर्चेचे वातावरण पसरले आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे *💥वाघोली शेत शिवारात खळबळ; कॅनलमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह* *💥दोन वेगवेगळ्या ठिकाणी कॅनलमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली* *💥सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे*1