जरंडी हादरले : ८० वर्षीय महिलेवर अत्याचार प्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीस अटक जरंडी हादरले : ८० वर्षीय महिलेवर अत्याचार प्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीस अटक सोयगाव : तालुक्यातील जरंडी येथे ८० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५४ वर्षीय व्यक्तीस अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिला घरात एकटी असताना आरोपीने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेत अटक केली. या घटनेमुळे जरंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सोयगाव पोलीस करत आहेत
जरंडी हादरले : ८० वर्षीय महिलेवर अत्याचार प्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीस अटक जरंडी हादरले : ८० वर्षीय महिलेवर अत्याचार प्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीस अटक सोयगाव : तालुक्यातील जरंडी येथे ८० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५४ वर्षीय व्यक्तीस अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिला घरात एकटी असताना आरोपीने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेत अटक केली. या घटनेमुळे जरंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सोयगाव पोलीस करत आहेत
- सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.1
- संरक्षण जाळी तोडून खोलीत घुसला बिबट्या; वनविभागाने घटनास्थळी भेट देत केला पंचनामा सोयगाव प्रतिनिधी दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील डाभा परिसरात बिबट्याने हल्ला करून शेतकरी महिलेच्या शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. डाभा येथील शेतकरी कमलबाई रमेश रगड यांची शेती देऊळगाव – सावळदबारा रस्त्यालगत, गट क्रमांक ८२ मध्ये आहे. येथे शेळीपालनासाठी टीन पत्र्यांची खोली बांधून परिसराला संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) रात्री वन्य प्राणी बिबट्याने संरक्षण जाळी तोडून आत प्रवेश केला आणि ४ बकऱ्या व २ बोकड असे एकूण ६ शेळ्यांना ठार केले. या खोलीमध्ये पार्टिशन जाळी असल्यामुळे इतर काही शेळ्या वाचल्या असल्या तरी या घटनेमुळे शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी तत्काळ अजिंठा वन विभागाला दिल्यानंतर सावळदबारा बीटचे अधिकारी प्रवीण गवळी, वनसेवक युसुफ पठाण तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील कार्यालयीन कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कमलबाई रमेश रगड यांना या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.1
- Post by Kishor k Patil Patil2
- रिपोर्टर मुजीब शेख1
- #jalna#marathinews#1
- भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत1
- या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी आमदार Bacchu Kadu यांना फोन करून संवाद साधल्याचे दिसत आहे. या संभाषणात शिंदे यांनी बच्चू कडू यांना सांगितले की, “तुमच्या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली,” अशी दखल त्यांनी घेतल्याचे व्हिडिओमध्ये ऐकायला मिळते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. दरम्यान हा फोन कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.1
- #marathi#news#jalna#1