हिंगोली: काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत युवा नेतृत्वाला संधी; शेख जुबेर यांची जिल्हा सरचिटणीस (महासचिव) पदी निवड हिंगोली हिंगोली: काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत युवा नेतृत्वाला संधी; शेख जुबेर यांची जिल्हा सरचिटणीस (महासचिव) पदी निवड हिंगोली: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये हिंगोलीतील तळागाळातील व धडपडणारे युवा नेतृत्व शेख जुबेर शेख युसुफ यांची हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सरचिटणीस (महासचिव) पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील युवक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. शेख जुबेर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक राहून सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. युवकांचे प्रश्न मांडणे, नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणे आणि पक्षात संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रदेश काँग्रेस कमिटीने त्यांच्यावर हिंगोली जिल्हा सरचिटणीस पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे वरिष्ठ व युवा पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन शेख जुबेर यांच्या निवडीबद्दल हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार व अभिनंदन केले. याप्रसंगी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुरेश अप्पा सराफ, विनायकराव देशमुख, शामराव जगताप, रमेश शिंदे, विशाल घुगे, वसमत तालुका अध्यक्ष ऋषिकेश देशमुख, वसमत शहराध्यक्ष शेख अलीमुद्दीन, हिंगोली शहराध्यक्ष मिलिंद उबाळे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव बंटी नागरे, चेतन उबाळे, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष पियुष सोनी यांच्यासह जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. "वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून, हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी आणि युवकांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी मी कटिबद्ध राहीन." — शेख जुबेर शेख युसुफ (जिल्हा सरचिटणीस, हिंगोली) शेख जुबेर यांच्या निवडीबद्दल संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातून, तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हिंगोली: काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत युवा नेतृत्वाला संधी; शेख जुबेर यांची जिल्हा सरचिटणीस (महासचिव) पदी निवड हिंगोली हिंगोली: काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत युवा नेतृत्वाला संधी; शेख जुबेर यांची जिल्हा सरचिटणीस (महासचिव) पदी निवड हिंगोली: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये हिंगोलीतील तळागाळातील व धडपडणारे युवा नेतृत्व शेख जुबेर शेख युसुफ यांची हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सरचिटणीस (महासचिव) पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील युवक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. शेख जुबेर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक राहून सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. युवकांचे प्रश्न मांडणे, नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणे आणि पक्षात संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रदेश काँग्रेस कमिटीने त्यांच्यावर हिंगोली जिल्हा सरचिटणीस पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे वरिष्ठ व युवा पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन शेख जुबेर यांच्या निवडीबद्दल हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार व अभिनंदन केले. याप्रसंगी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुरेश अप्पा सराफ, विनायकराव देशमुख, शामराव जगताप, रमेश शिंदे, विशाल घुगे, वसमत तालुका अध्यक्ष ऋषिकेश देशमुख, वसमत शहराध्यक्ष शेख अलीमुद्दीन, हिंगोली शहराध्यक्ष मिलिंद उबाळे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव बंटी नागरे, चेतन उबाळे, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष पियुष सोनी यांच्यासह जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. "वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून, हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी आणि युवकांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी मी कटिबद्ध राहीन." — शेख जुबेर शेख युसुफ (जिल्हा सरचिटणीस, हिंगोली) शेख जुबेर यांच्या निवडीबद्दल संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातून, तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
- हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर असून मात्र या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार आहे. आजेगाव जवळील ओड्याला मध्यरात्रीच्या सुमारास पूर आला होता तसेच विविध नदी,नाले व ओढे हे तुटुंब भरून वाहत आहेत. हिंगोली जिल्ह्यांमध्ये पाऊस थैमान घालत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.1
- उमरखेड तालुक्यात चिल्ली: मंजूर परवान्यापेक्षा अनेकपटीने गौण खनिज उत्खननाचा संशय; उच्चस्तरीय चौकशीची मागणी, ATS मोजणीसह फौजदारी कारवाईची मागणी मौजे चिल्ली, ता. उमरखेड येथील सर्वे क्र. 340/2 (क्षेत्र 0.81 हे.आर.) व लगतच्या सर्वे क्र. 340/2/1 (क्षेत्र 0.40 हे.आर.) मध्ये मंजूर परवानगीपेक्षा अनेकपटीने गौण खनिज (मुरूम/डबर) उत्खनन झाल्याचा गंभीर संशय व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते तथा 'पा. उमरखेड वार्ता'चे मुख्य संपादक शेख इरफान यांनी आज 31 जुलै 2026 रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह विविध विभागांना सविस्तर कायदेशीर तक्रार सादर केली. ही तक्रार लेखी तसेच ई-मेलद्वारे संबंधित सर्व कार्यालयांना पाठविण्यात आली आहे. तक्रारीत संबंधित जमिनीसाठी मर्यादित प्रमाणात उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात मंजूर मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाची दिशाभूल, महसुली नुकसान, पर्यावरणीय नियमांचे संभाव्य उल्लंघन आणि संगनमताने बेकायदेशीर लाभ मिळाल्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत विशेषतः लगतच्या सर्वे क्र. 340/2/1 मधील नकाशे, सीमांकन अभिलेख आणि प्रत्यक्ष उत्खननाची तुलना करून ATS (Advanced Total Station) द्वारे वैज्ञानिक मोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महसूल, खनिकर्म, वन, भूमापन आणि आवश्यक असल्यास पर्यावरण विभागाच्या संयुक्त समितीमार्फत पंचनामा करून वस्तुस्थिती निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत वनपरिक्षेत्रालगत असल्याने वन विभागाची पूर्वपरवानगी, पर्यावरणीय मंजुरी आणि इतर सर्व वैधानिक परवानग्यांची स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंजूर ब्रास आणि प्रत्यक्ष उत्खनन यांची वैज्ञानिक तुलना करून शासनाचे झालेले महसुली नुकसान निश्चित करावे तसेच रॉयल्टी, दंड आणि पर्यावरणीय नुकसानभरपाईची वसुली करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित जमिनीवरील लेआउट, एन.ए., बांधकाम अथवा इतर कोणत्याही विकासकामास परवानगी देऊ नये, तसेच तपासात बेकायदेशीर उत्खनन, शासनाची दिशाभूल, खोटी माहिती, महसुली फसवणूक किंवा बनावट अभिलेखांचा वापर आढळल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित यंत्रसामग्री, वाहने आणि गौण खनिज जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये आणखी एक महत्त्वाची मागणी करण्यात आली असून, या प्रकरणावर प्रत्येक विभागाने केलेली सर्व कार्यवाही, नोटिसा, पंचनामे, ATS मोजणी अहवाल, संयुक्त तपासणी अहवाल, वन विभाग, खनिकर्म विभाग, महसूल विभाग, भूमापन विभाग यांचे अहवाल, अंतिम आदेश तसेच विभागांदरम्यान झालेला संपूर्ण पत्रव्यवहार अर्जदारास लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीच्या प्रती प्रधान मुख्य वनसंरक्षक, नगर रचना विभाग यवतमाळ, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी, उपभूमी अभिलेख कार्यालय उमरखेड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, जिल्हा सर्वेक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी आणि गटविकास अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या असून, त्यांच्या स्तरावर करण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यवाहीच्या प्रमाणित प्रती अर्जदारास देण्याची विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित विभाग आता कोणती भूमिका घेतात आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.4
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथे समाधान शिबिर; दिवंगत नेते अजितदादा पवार यांना अभिवादन लोहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमित्त लोहा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित समाधान शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच स्थानिक प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे निर्देश दिले. तसेच नागरिकांनीही आपल्या समस्या मांडून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले.1
- डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! फसवणूक डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! 📞 जर कोणी स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा इतर सरकारी अधिकारी सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर तुम्हाला "डिजिटल अटक" झाल्याचे सांगत असेल, तर तो नक्कीच सायबर फसवणुकीचा प्रयत्न आहे. ⚠️ लक्षात ठेवा: ✅ कोणताही सरकारी अधिकारी फोनवरून अटक करत नाही. ✅ OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक तपशील कधीही शेअर करू नका. ✅ घाबरून पैसे ट्रान्सफर करू नका. ✅ संशयास्पद कॉल त्वरित बंद करा. ✅ सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा वर तक्रार नोंदवा. 🛡️ सतर्क नागरिकच सायबर गुन्हेगारांवर सर्वात मोठे शस्त्र आहेत. माहितीपूर्ण राहा, सुरक्षित राहा! #DigitalArrest #CyberFraud #CyberCrime #CyberSafety #NandedPolice #MaharashtraPolice #StopCyberFraud #OnlineSafety #CyberAwareness #Dial1930 #CyberCrimeHelpline #ThinkBeforeYouTrust #StayAlert #SafeDigitalIndia #ALMBharat #NNLMarathi1
- लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज1
- गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती माहूरगड प्रतिनिधी: धनंजय आराध्ये श्रीक्षेत्र माहूरगड येथील पवित्र श्री दत्तात्रेय शिखर संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी दत्तशिखरावर दर्शनासाठी अलोट गर्दी केली. पावसाकडे दुर्लक्ष करून भाविकांनी गुरुदर्शन व गुरुपूजनाचा लाभ घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तात्रेय शिखर संस्थानाचे श्री श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज (गुरु मधुसूदन भारती) यांच्या शुभहस्ते पहाटे श्री दत्तात्रेय महाराजांचा वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परिसरातील सर्व देवतांचे पूजन, समाधीपूजन तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. या धार्मिक विधींचे पुरोहित्य विलासराव जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले. यानंतर श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज गादीवर विराजमान झाले. पोथीवाचन, गुरुपूजन, आशीर्वचन आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित संत-महंत, महापुरुष तसेच हजारो भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतले. पावसाच्या सरींनीही या पवित्र सोहळ्याची शोभा अधिक खुलविली. या सोहळ्यास वासुदेव भारती महाराज, परमेश्वर भारती, धनराज भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, चिरंजीव भारती, हरिहर भारती, वामन भारती, सुभाष भारती, शिलानंद भारती, सुजान भारती, माधवगिरी महाराज, गजराज भारती, नितेश भारती, अक्षयगिरी यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे व्यवस्थापक जी. एन. नाईक, अश्विन माने, विश्वस्त मंडळ तसेच सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुपूजनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या अखेरीस "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त", "देवदत्त श्री दत्तात्रय महाराज की जय" या जयघोषांनी संपूर्ण दत्तशिखर परिसर दुमदुमून गेला. भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला हा गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.1
- मुलावा में आदिवासी महिला का कुरहाड़ी से हुआ खून पोफाली पुलिस ने आरोपी को किया गिरफ्तार उमरखेड़ के मुलावा गांव में चर्चा है कि शक की वजह से एक आदिवासी महिला का कुरहाड़ी से हुआ खून पोफाली पुलिस ने पंचनामा कर 1 आरोपी को किया गिरफ्तार पोफाली पुलिस कि सराहनीय कामगिरी1