क्षयरोग निर्मूलनासह आरोग्य सेवांमध्ये चांदोरी आरोग्य केंद्राचे काम आदर्शवत – डॉ. रघुराम राव. नाशिक, दि. १४ सप्टेंबर २०२६ : क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी संशयित रुग्णांचे वेळेत निदान, आवश्यक तपासण्या, योग्य उपचार तसेच उपचाराधीन रुग्णांचे नियमित निरीक्षण या बाबींवर चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रभावीपणे कार्यवाही करण्यात येत आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच माता व बाल आरोग्य, लसीकरण तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीतही चांदोरी आरोग्य केंद्राचे काम उल्लेखनीय असून ते इतर आरोग्य संस्थांसाठी आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. रघुराम राव यांनी काढले. क्षयरोग शंभर दिवस अभियानाच्या पाहणीच्या अनुषंगाने डॉ. रघुराम राव यांनी चांदोरी (ता. निफाड क्षयरोग निर्मूलनासह आरोग्य सेवांमध्ये चांदोरी आरोग्य केंद्राचे काम आदर्शवत – डॉ. रघुराम राव. नाशिक, दि. १४ सप्टेंबर २०२६ : क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी संशयित रुग्णांचे वेळेत निदान, आवश्यक तपासण्या, योग्य उपचार तसेच उपचाराधीन रुग्णांचे नियमित निरीक्षण या बाबींवर चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रभावीपणे कार्यवाही करण्यात येत आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच माता व बाल आरोग्य, लसीकरण तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीतही चांदोरी आरोग्य केंद्राचे काम उल्लेखनीय असून ते इतर आरोग्य संस्थांसाठी आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. रघुराम राव यांनी काढले. क्षयरोग शंभर दिवस अभियानाच्या पाहणीच्या अनुषंगाने डॉ. रघुराम राव यांनी चांदोरी (ता. निफाड) येथील आरोग्य केंद्रास भेट देऊन विविध आरोग्य सेवांची सविस्तर पाहणी केली. यावेळी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. अशोक रणदिवे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल प्रमुख उपस्थित होते. यावेळी आरोग्य केंद्रातील क्षयरोग निर्मूलनासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेताना डॉ. रघुराम राव यांनी संशयित क्षयरुग्णांचा शोध, त्यांची आवश्यक तपासणी, थुंकी नमुना संकलन, एक्स-रे तपासणी, निदान झालेल्या रुग्णांना नियमित व योग्य उपचार उपलब्ध करून देणे, तसेच उपचारादरम्यान रुग्णांच्या नोंदी अद्ययावत ठेवणे या बाबींची माहिती घेतली. क्षयरोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी ‘लवकर निदान – योग्य उपचार – नियमित उपचार – रुग्णांचे सातत्यपूर्ण निरीक्षण’ या बाबींना विशेष महत्त्व असून चांदोरी आरोग्य केंद्रामार्फत या सर्व बाबींची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. क्षयरोग शंभर दिवस अभियानाचा प्रमुख उद्देश क्षयरोगाच्या संशयित रुग्णांचा लवकर शोध घेऊन त्यांचे निदान व उपचार वेळेत सुरू करणे हा आहे. या अनुषंगाने आरोग्य कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करणे, लक्षणे असलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी प्रोत्साहित करणे, आवश्यक नमुने संकलित करणे तसेच गरजेनुसार एक्स-रे व इतर तपासण्या करून रुग्णांना उपचाराच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे. चांदोरी आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या सर्व बाबींमध्ये सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे डॉ. राव यांनी कौतुकाने नमूद केले. माता व बाल आरोग्य सेवांबाबतही चांदोरी आरोग्य केंद्राचे काम समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थात्मक प्रसुतीला प्रोत्साहन देणे, गर्भवती मातांची नियमित तपासणी, प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतरच्या सेवा, नवजात बालकांची आवश्यक काळजी तसेच बालकांचे वेळेत व पूर्ण लसीकरण याबाबत आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत असलेल्या कामाची त्यांनी माहिती घेतली. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करताना स्थानिक पातळीवरील आरोग्य कर्मचारी घेत असलेले परिश्रम महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी सहसंचालक डॉ. अशोक रणदिवे यांनीही चांदोरी आरोग्य केंद्राच्या कामकाजाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या जवळच्या आरोग्य संस्थेत उपलब्ध करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असून, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये स्थानिक पातळीवर केले जाणारे सातत्यपूर्ण प्रयत्न हे आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचे ठरतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांनी चांदोरी आरोग्य केंद्राच्या कामकाजाची माहिती देताना क्षयरोग निर्मूलन अभियानासह माता व बाल आरोग्य, लसीकरण, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, नियमित आरोग्य सेवा आणि नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती याबाबत आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. क्षयरोगाचे लवकर निदान होऊन बाधित रुग्णांवर वेळेत उपचार सुरू होणे आणि उपचार पूर्ण होईपर्यंत रुग्णांचा नियमित पाठपुरावा होणे यासाठी आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजीत कोशिरे यांनी तालुक्यातील आरोग्य सेवांचा आढावा सादर केला. तसेच डॉ. इरेश पाटील व डॉ. प्रगती आहेर यांनी चांदोरी आरोग्य केंद्रातील विविध आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिली. पाहणीदरम्यान आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा, तपासणी व्यवस्था, औषध उपलब्धता, रुग्ण नोंदी, क्षयरोग संशयित रुग्णांच्या तपासण्या, थुंकी नमुना संकलन व तपासणी प्रक्रिया, एक्स-रे संदर्भातील कार्यवाही तसेच उपचाराधीन रुग्णांच्या नोंदींची पाहणी करण्यात आली. आरोग्य संस्थेतील उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर करून नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचीही माहिती घेण्यात आली. क्षयरोग निर्मूलन हे केवळ आरोग्य विभागाचे उद्दिष्ट नसून त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. दीर्घकाळ खोकला, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, ताप येणे, भूक मंदावणे यांसारखी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा आणि आवश्यक तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. क्षयरोगाचे वेळेत निदान आणि पूर्ण उपचार केल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तपासणी व उपचार घेणे आवश्यक आहे. चांदोरी आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्षयरोग निर्मूलनासह विविध आरोग्य सेवांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेले कौतुक हे संपूर्ण आरोग्य यंत्रणेसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांनी अशाच पद्धतीने सातत्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण काम करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांनी केले. यावेळी प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेंद्र गिलबिले, औषध निर्माण अधिकारी आकाश जानराव, आरोग्य सहाय्यक प्रितेश राऊत, दीपक आहिरे, सहाय्यिका संगीता गोसावी, कनिष्ठ सहाय्यक उमेश आमले यांच्यासह आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. — जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक
क्षयरोग निर्मूलनासह आरोग्य सेवांमध्ये चांदोरी आरोग्य केंद्राचे काम आदर्शवत – डॉ. रघुराम राव. नाशिक, दि. १४ सप्टेंबर २०२६ : क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी संशयित रुग्णांचे वेळेत निदान, आवश्यक तपासण्या, योग्य उपचार तसेच उपचाराधीन रुग्णांचे नियमित निरीक्षण या बाबींवर चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रभावीपणे कार्यवाही करण्यात येत आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच माता व बाल आरोग्य, लसीकरण तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीतही चांदोरी आरोग्य केंद्राचे काम उल्लेखनीय असून ते इतर आरोग्य संस्थांसाठी आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. रघुराम राव यांनी काढले. क्षयरोग शंभर दिवस अभियानाच्या पाहणीच्या अनुषंगाने डॉ. रघुराम राव यांनी चांदोरी (ता. निफाड क्षयरोग निर्मूलनासह आरोग्य सेवांमध्ये चांदोरी आरोग्य केंद्राचे काम आदर्शवत – डॉ. रघुराम राव. नाशिक, दि. १४ सप्टेंबर २०२६ : क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी संशयित रुग्णांचे वेळेत निदान, आवश्यक तपासण्या, योग्य उपचार तसेच उपचाराधीन रुग्णांचे नियमित निरीक्षण या बाबींवर चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रभावीपणे कार्यवाही करण्यात येत आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच माता व बाल आरोग्य, लसीकरण तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीतही चांदोरी आरोग्य केंद्राचे काम उल्लेखनीय असून ते इतर आरोग्य संस्थांसाठी आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. रघुराम राव यांनी काढले. क्षयरोग शंभर दिवस अभियानाच्या पाहणीच्या अनुषंगाने डॉ. रघुराम राव यांनी चांदोरी (ता. निफाड) येथील आरोग्य केंद्रास भेट देऊन विविध आरोग्य सेवांची सविस्तर पाहणी केली. यावेळी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. अशोक रणदिवे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल प्रमुख उपस्थित होते. यावेळी आरोग्य केंद्रातील क्षयरोग निर्मूलनासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेताना डॉ. रघुराम राव यांनी संशयित क्षयरुग्णांचा शोध, त्यांची आवश्यक तपासणी, थुंकी नमुना संकलन, एक्स-रे तपासणी, निदान झालेल्या रुग्णांना नियमित व योग्य उपचार उपलब्ध करून देणे, तसेच उपचारादरम्यान रुग्णांच्या नोंदी अद्ययावत ठेवणे या बाबींची माहिती घेतली. क्षयरोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी ‘लवकर निदान – योग्य उपचार – नियमित उपचार – रुग्णांचे सातत्यपूर्ण निरीक्षण’ या बाबींना विशेष महत्त्व असून चांदोरी आरोग्य केंद्रामार्फत या सर्व बाबींची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. क्षयरोग शंभर दिवस अभियानाचा प्रमुख उद्देश क्षयरोगाच्या संशयित रुग्णांचा लवकर शोध घेऊन त्यांचे निदान व उपचार वेळेत सुरू करणे हा आहे. या अनुषंगाने आरोग्य कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करणे, लक्षणे असलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी प्रोत्साहित करणे, आवश्यक नमुने संकलित करणे तसेच गरजेनुसार एक्स-रे व इतर तपासण्या करून रुग्णांना उपचाराच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे. चांदोरी आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या सर्व बाबींमध्ये सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे डॉ. राव यांनी कौतुकाने नमूद केले. माता व बाल आरोग्य सेवांबाबतही चांदोरी आरोग्य केंद्राचे काम समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थात्मक प्रसुतीला प्रोत्साहन देणे, गर्भवती मातांची नियमित तपासणी, प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतरच्या सेवा, नवजात बालकांची आवश्यक काळजी तसेच बालकांचे वेळेत व पूर्ण लसीकरण याबाबत आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत असलेल्या कामाची त्यांनी माहिती घेतली. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करताना स्थानिक पातळीवरील आरोग्य कर्मचारी घेत असलेले परिश्रम महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी सहसंचालक डॉ. अशोक रणदिवे यांनीही चांदोरी आरोग्य केंद्राच्या कामकाजाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या जवळच्या आरोग्य संस्थेत उपलब्ध करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असून, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये स्थानिक पातळीवर केले जाणारे सातत्यपूर्ण प्रयत्न हे आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचे ठरतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांनी चांदोरी आरोग्य केंद्राच्या कामकाजाची माहिती देताना क्षयरोग निर्मूलन अभियानासह माता व बाल आरोग्य, लसीकरण, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, नियमित आरोग्य सेवा आणि नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती याबाबत आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. क्षयरोगाचे लवकर निदान होऊन बाधित रुग्णांवर वेळेत उपचार सुरू होणे आणि उपचार पूर्ण होईपर्यंत रुग्णांचा नियमित पाठपुरावा होणे यासाठी आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजीत कोशिरे यांनी तालुक्यातील आरोग्य सेवांचा आढावा सादर केला. तसेच डॉ. इरेश पाटील व डॉ. प्रगती आहेर यांनी चांदोरी आरोग्य केंद्रातील विविध आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिली. पाहणीदरम्यान आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा, तपासणी व्यवस्था, औषध उपलब्धता, रुग्ण नोंदी, क्षयरोग संशयित रुग्णांच्या तपासण्या, थुंकी नमुना संकलन व तपासणी प्रक्रिया, एक्स-रे संदर्भातील कार्यवाही तसेच उपचाराधीन रुग्णांच्या नोंदींची पाहणी करण्यात आली. आरोग्य संस्थेतील उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर करून नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचीही माहिती घेण्यात आली. क्षयरोग निर्मूलन हे केवळ आरोग्य विभागाचे उद्दिष्ट नसून त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. दीर्घकाळ खोकला, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, ताप येणे, भूक मंदावणे यांसारखी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा आणि आवश्यक तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. क्षयरोगाचे वेळेत निदान आणि पूर्ण उपचार केल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तपासणी व उपचार घेणे आवश्यक आहे. चांदोरी आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्षयरोग निर्मूलनासह विविध आरोग्य सेवांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेले कौतुक हे संपूर्ण आरोग्य यंत्रणेसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांनी अशाच पद्धतीने सातत्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण काम करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांनी केले. यावेळी प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेंद्र गिलबिले, औषध निर्माण अधिकारी आकाश जानराव, आरोग्य सहाय्यक प्रितेश राऊत, दीपक आहिरे, सहाय्यिका संगीता गोसावी, कनिष्ठ सहाय्यक उमेश आमले यांच्यासह आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. — जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक
- आईच्या आरोग्यासाठी १२ ज्योतिर्लिंग धावती यात्रा करणाऱ्या मोनूचे त्र्यंबकेश्वर मध्ये उत्स्फूर्त स्वागत त्र्यंबकेश्वर :- आपल्या आईच्या उत्तम आरोग्यासाठी नवस करत देशातील १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प केलेला बिहारमधील धावपटू मोनू सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. मोनूने आतापर्यंत पायांनी तब्बल ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला असून, त्याने आतापर्यंत ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले आहे. आपल्या या प्रेरणादायी प्रवासादरम्यान मोनूचे आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. त्यावेळी त्याचे उत्स्फूर्त आणि जोरदार स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास मोरे आणि योगेश महाले यांनी मोनूचे स्वागत करून त्याच्या या अनोख्या संकल्पाला शुभेच्छा दिल्या. यानंतर मोनूने Sapkal Knowledge Hub येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी देशभरात विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेले विविध प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता तसेच MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या यावरही त्याने भाष्य केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोनूने मेहनत, सातत्य आणि ध्येयावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचेही यावेळी व्यक्त करण्यात आले. मोनूचा हा प्रवास केवळ धार्मिक यात्रा नसून आईच्या आरोग्यासाठी केलेला संकल्प, श्रद्धा, जिद्द, शारीरिक क्षमता आणि देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे. महाराष्ट्रात मोनू चर्चेचा विषय आईच्या आरोग्यासाठी नवस करून १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन निघालेला बिहारचा मोनू सध्या महाराष्ट्रात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास आणि ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करून त्याची ही प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे.1
- ऋषिपंचमी निमित्ताने आज मार्कंडेश्वर पर्वतावरती महिला भाविकांची मोठी गर्दी ऋषिपंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर ती महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती - पुराणात सांगितले आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी ज्या शेतात बैलाने शेतीमध्ये राबलेले किंवा बैलाच्या साह्याने केलेली शेती त्याच्यातून निघालेले उत्पन्न हे ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांना खाता येत नाही त्या दिवशी सुवासिनी महिला व इतर महिला या सकाळी उठल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करून आल्यानंतर त्या महिला ज्या ठिकाणी ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात . सप्तऋषीपैकी नाशिक जिल्ह्यात करंजी येथे कर्दम ऋषी मार्कंडेश्वर पर्वतावर ती मार्कंड ऋषी त्रंबकेश्वर येथे गौतम ऋषी व मनमाड जवळ अगस्ती ऋषी हे असून या ठिकाणी आज कृषी पंचमी निमित्ताने महिलांनी मोठी गर्दी केली होती . मार्कंडेश्वर पर्वतावरती दर्शनासाठी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व नगर येथील महिला भाविक ह्या दर्शनासाठी आल्या होत्या . यावेळेस कळवण पोलीस स्टेशन व दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ही ठेवला होता .1
- लाडगाव–हट्टी रस्ता ‘मरणाच्या दारात’; फरशी पुलाची अवस्था ‘आज मरू की उद्या?’ जीवघेण्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा कशासाठी? लाडगाव–हट्टी रस्ता ‘मरणाच्या दारात’; फरशी पुलाची अवस्था ‘आज मरू की उद्या?’ जीवघेण्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा कशासाठी? प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल सुरगाणा तालुक्यातील लाडगाव–हट्टी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या मार्गावरील फरशी पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. पुलाची झालेली झीज पाहता हा पूल ‘आज मरू की उद्या?’ अशा अवस्थेत पोहोचला असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, फरशी पुलाचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असून, पुलावरून पाणी वाहत असताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गाचा वापर परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारक मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र रस्त्याची आणि पुलाची अवस्था पाहता प्रशासन एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून फरशी पुलाची दुरुस्ती अथवा आवश्यक ठिकाणी नव्याने बांधकाम करावे, तसेच रस्त्याची कायमस्वरूपी डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.1
- येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले. श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- कुडूस नाका अतिक्रमणमुक्तीसाठी संघर्ष समिती आक्रमक; विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथील अतिक्रमण आणि रस्त्याच्या प्रश्नावर आता ५२ गाव अतिक्रमणमुक्त बाजारपेठ संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ५२ गाव अतिक्रमणमुक्त बाजारपेठ संघर्ष समितीच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. कुडूस नाका परिसरातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या ४५ मीटर मार्किंगप्रमाणे खुला करण्यात यावा, ही समितीची प्रमुख मागणी आहे. यासोबतच कुडूस येथे नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच कुडूस येथील ब्रिटिशकालीन धर्मशाळा सार्वजनिक वापरासाठी खुली करण्यात यावी, अशी मागणी संघर्ष समितीने प्रशासनाकडे केली आहे. कुडूस नाका परिसरातील अतिक्रमण, रस्त्याची रुंदी, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेचा वापर यासंदर्भातील अनेक मुद्दे निवेदनातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहेत. दरम्यान, या मागण्यांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक आणि ठोस निर्णय घेण्यात आला नाही, तर कुडूस नाका येथे संघर्ष समितीच्या माध्यमातून भव्य जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन कुडूस नाका परिसरातील प्रश्नांवर काय भूमिका घेते, याकडे ५२ गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. कुडूस नाका अतिक्रमणमुक्त होणार का? ४५ मीटर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार का? आणि संघर्ष समितीच्या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.2
- NASHIK : गॅस सिलिंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक. चोरीच्या सिलिंडर टाक्यांसह तब्बल 1 लाख 56 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१ कडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या टाक्यांसह तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. NASHIK : गॅस सिलिंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक. चोरीच्या सिलिंडर टाक्यांसह तब्बल 1 लाख 56 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१ कडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या टाक्यांसह तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..1
- इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए1
- मोतीवाला कॉलेजच्या पाठीमागील हनुमान नगर परिसरात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू मोतीवाला कॉलेजच्या पाठीमागील हनुमान नगर परिसरात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कमळाबाई अनाजी वळवी (६५) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात त्यांच्या मुलावरच संशयाची सुई असून, गंगापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा संशय आहे. सकाळी परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची कार्यवाही केली. या प्रकरणात मुलगा तानाजी अनाजी वळवी (४०) याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. घटना घडली त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली दरम्यान, कमळाबाई वळवी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यांच्यावर हल्ला झाला होता का, तसेच या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास गंगापूर पोलीस करीत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुलावरच आईच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने या घटनेने हनुमान नगर परिसरात खळबळ उडाली असून, सून आणि मुलाच्या झालेल्या वादा नंतरच ही घटना घडल्याचे देखील बोलले जात आहे दरम्यान पोलिसांच्या तपासानंतर या संशयास्पद मृत्यूमागचे नेमके सत्य समोर येणार आहे.4