Shuru
Apke Nagar Ki App…
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत जनता दरबार संपन्न झाला आहे.
Raghunath Aghao
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत जनता दरबार संपन्न झाला आहे.
- कर्जत लाईव्हकर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र🤝10 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील टोलनाका लोकलसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.1
- दिल्लीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र निषेध नोंदवला. जयस्तंभ चौकात वातावरण तापल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.1
- राज्यातील नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली असून, त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन अनुदानात वाढ करण्याचे संकेत मिळाले आहेत. यासंदर्भात किसान सभेच्या शिष्टमंडळाने कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे आणि महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत प्रोत्साहन अनुदानासोबतच पिक विमा, देवस्थान व गायरान जमीन तसेच घराच्या तळजमिनीच्या विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी माहिती दिली की, सरकारने या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय शासनाकडून अधिकृतपणे जाहीर होणे अद्याप बाकी आहे.1
- पावसाच्या जोरदार हजेरीमुळे सोयाबीनचे पीक चांगलेच बहरले आहे. पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्ग पूर्णपणे सुखावला आहे.1
- दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनेचा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.1
- दिल्ली येथील तालकटोरा इंटरनॅशनल स्टेडियमवर २३ आणि २४ जुलै रोजी होणाऱ्या स्टेअर्स युथ गेम्स राष्ट्रीय कराटे स्पर्धा २०२५-२६ साठी जालना जिल्ह्यातील १५ गुणवान कराटेपटू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे, या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या टीम मॅनेजरपदी जालन्याचे सेन्साई रूपेंद्र गोपाल पारचा यांची नियुक्ती झाली असून हा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. महाराष्ट्र संघात स्थान मिळवणाऱ्या जालना जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये कु. निवांशी नवीनकुमार वलकट्टी (नारायणा ई-टेक्नो स्कूल), कु. अनुष्का किशोर म्हेत्रे (नवयुवक गणेश माध्यमिक विद्यालय), कु. तन्वी नितीन खरटमल (राजश्री शाहू इंग्लिश स्कूल), कु. आरुषी नवीनकुमार वलकट्टी (नारायणा ई-टेक्नो स्कूल), कु. वैष्णवी बाबासाहेब लोखंडे (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल), कु. आकांक्षा शंकर चिल्का (श्री म. स्था. जैन विद्यालय), कु. वैष्णवी संतोष लुटे (राष्ट्रीय हिंदी विद्यालय इंग्लिश मीडियम), कु. दिव्यता अजितराज कोठारी (श्री म. स्था. जैन इंग्लिश स्कूल), कु. लावण्या किशोर गुडला (जे.ई.एस. कॉलेज), कु. पूर्वा सुजित माने (श्रीमती इंदिरा गांधी कॉलेज, रामनगर), ऋषिकेश गणेश श्रीराम (नारायणा ई-टेक्नो स्कूल), यशवर्धन शंकर चिल्का (श्री म. स्था. जैन इंग्लिश स्कूल), नयन धनराज गोमतीवाले (जे.ई.एस. कॉलेज), शेलमॉन योहान गुडेकर (जे.ई.एस. कॉलेज) आणि ओंकार गुट्टे (जे.ई.एस. कॉलेज) यांचा समावेश आहे. या सर्वांना जालना जिल्ह्याचे चीफ को-ऑर्डिनेटर सेन्साई रूपेंद्र पारचा तसेच प्रशिक्षक सेन्साई अमन पारचा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल स्टेअर्स जालना जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक शेळके, उपाध्यक्ष गणेश श्रीराम, उपाध्यक्ष प्रशांत पेम्बरती, उपमहापौर राजेश राऊत, नगरसेवक महावीर ढक्का, राहुल मांडोत, संजय भगत, रितेश अग्रवाल, विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. राष्ट्रीय स्तरावर जालन्याच्या या खेळाडूंकडून सुवर्णपदकांसह उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात असून यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.1
- रामावर आमचीच मालकी आहे असा टेंभा मिरवणाऱ्यांना सत्य कडू वाटते, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.1
- जंतरमंतर येथे झालेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात तसेच तेथील दडपशाहीविरोधात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या ठिकाणी घडलेल्या अन्यायकारक घटनांचा आणि दडपशाहीच्या धोरणाचा तीव्र शब्दांत धिक्कार करत या संपूर्ण प्रकाराचा जोरदार विरोध नोंदवला जात आहे.1
- कागदावरच लोकशाही उरली असून प्रत्यक्षात मात्र रस्त्यावर उघडपणे दडपशाही सुरू आहे. कोणाकडूनही काही प्रश्न विचारला गेला की त्याला थेट देशद्रोही ठरवले जात असल्याची तीव्र संतापजनक टीका करण्यात आली आहे. लोकशाहीचा केवळ देखावा उरला असून सत्ता वा व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी दडपशाहीचा वापर केला जात असल्याचा थेट आरोप यातून करण्यात आला आहे.1