Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती संभाजीनगर विमानतळ नोकरी परीक्षा रद्द? फी भरूनही परीक्षा नाही; विद्यार्थ्यांचा संताप
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
छत्रपती संभाजीनगर विमानतळ नोकरी परीक्षा रद्द? फी भरूनही परीक्षा नाही; विद्यार्थ्यांचा संताप
More news from महाराष्ट्र and nearby areas
- तामिळनाडूच्या टीमसोबत अभिजीत दिपके यांचा संवाद; सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा, लवकरच चेन्नईला येण्याचे आश्वासन! तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी तामिळनाडूतील आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आंदोलनाची सद्यस्थिती आणि विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अभिजीत दिपके यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करत, आंदोलकांच्या भूमिकेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरच चेन्नई येथे प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.1
- छ.संभाजीनगर-विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे. Byte : विद्यार्थी3
- ज्योती नगरातील चायनीज हॉटेल संचालक महिलेचे गंभीर आरोप; दुकान खाली करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा ज्योती नगरातील चायनीज हॉटेल संचालक महिलेचे गंभीर आरोप; दुकान खाली करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा छत्रपती संभाजीनगर : ज्योती नगर, शानूर मियाँ दर्गा रोड येथील चोपेस्टिक चायनीज हॉटेल संदर्भात एक प्रकरण समोर आले आहे. हॉटेल संचालक महिलेने आरोप केला आहे की, न्यायालयात प्रकरण सुरू असतानाही दुकान खाली करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांना कथितरित्या त्रास देण्यात येत असून धमकी आणि मारहाणीचे आरोपही त्यांनी केले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी महिलेने केली आहे. ❓ महत्त्वाचे प्रश्न न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना दुकान खाली करण्यासाठी दबाव आणला जात आहे का? महिलेने केलेल्या आरोपांची प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी होणार का? या प्रकरणात संबंधित दुसऱ्या पक्षाची भूमिका काय आहे? ⚠️ महत्त्वाची सूचना / डिस्क्लेमर या बातमीत नमूद केलेले सर्व आरोप संबंधित हॉटेल संचालक महिलेने केलेले आहेत. क्राईम रिपोर्टर या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही आणि कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही. क्राईम रिपोर्टरचा या प्रकरणाशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही. जनतेचा आवाज संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष चौकशीद्वारे न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त करणे, एवढाच आमचा उद्देश आहे. संबंधित दुसऱ्या पक्षाला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.1
- खाटू श्याम देवस्थान या ठिकाणी भाविकांची अफाट गर्दी जिल्हाभरातून आलेल्या भाविकांनी छत्रपती संभाजी नगर: येथील खाटू श्याम देवस्थान या ठिकाणी आज रविवार रोजी भाविकांनी अफाट गर्दी केली दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या या ठिकाणी जिल्हाभरातून नाहीतर महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येतात..2
- महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे अभिजित दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करून सुरक्षा हटविण्याची मागणी, *अभिजित दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस सुरक्षा हटविण्याची मागणी* *महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा* छत्रपती संभाजीनगर येथे अभिजित दिपके यांनी त्यांच्या घरी एका पोलीस अधिकारी यांचे अपमान केल्याने त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली, (CJP) कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी त्यांच्या घरी संरक्षण करत असलेले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साध्या गणवेशात असलेले PSI सुरेश सांगळे यांना मी कोणाला भेटू, कोणाला भेटू नये सांगणारे तुम्ही कोण, तुम्ही दिल्ली पोलीसांसारखे वागू नका, म्हणत अपनास्पद वागणूक देत बाहेर जाण्याचे सांगितले, अभिजित दिपके यांनी PSI यांचा अपमान केल्याबद्दल दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्या घरासमोर पोलीस प्रोटेक्शनानुसार त्यांना दिले जात असलेले संरक्षण काढून घेण्यात यावे असे निवेदन पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने दिले आहे, निवेदनात पुढे असे ही सांगितले आहे की पोलीस कर्मचारी यांना अरेरावीची भाषा करणारे अभिजित दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना कमिशनर ऑफिस समोर व पोलीस अधीक्षक कार्यालय समोर आंदोलन व चक्काजाम करण्यात येईल असे निवेदन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे जिल्हा युवक अध्यक्ष शंकर उर्फ अण्णा डरांगे यांनी दिला, *रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा*1
- हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप येवला: येवल्यातील कै. सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराविरोधात संतप्त ठेवीदारांनी अखेर रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे. शहर व तालुक्यातील शेकडो नागरिकांनी आपल्या कष्टाची पुंजी या पतसंस्थेत विविध मुदतींच्या ठेवींच्या रूपात गुंतवली होती. मात्र, मुदत संपूनही ठेवीदारांना त्यांची हक्काची रक्कम परत मिळत नसल्याने अनेक कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडली आहेत. एकीकडे हक्काच्या पैशांसाठी सर्वसामान्य ठेवीदार वणवण भटकत असताना, दुसरीकडे पतसंस्थेचे संचालक पिंटू पारख यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांची उधळण करत जंगी सोहळा साजरा करण्यात आला. या प्रकारामुळे ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले गेले असून, "सर्वसामान्यांचे कष्टाचे पैसे लाटून कसले कसले सत्कार सोहळे साजरे करता?" असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला आहे. या फसवणुकीविरोधात निलेश वखारे, बाळू सुराशे, बबन पाबळे, संतोष कोतवाल आणि सोना कोतवाल यांच्यासह शेकडो ठेवीदारांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. पतसंस्थेच्या या मनमानी कारभाराची चौकशी करून ठेवीदारांचे पैसे त्वरित परत मिळवून द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. आता या गंभीर प्रकरणी सहकार विभाग आणि पोलीस प्रशासन काय कडक पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- झालेल्या कामाचे पुन्हा टेंडर? कृष्णा पाटील डोणगावकर यांचा लासूर स्टेशन बाजार समितीवर गंभीर आरोप लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर कृष्णा पाटील डोणगावकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. झालेल्या कामाचे पुन्हा टेंडर काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकदा काम पूर्ण झाल्यानंतर त्याच कामासाठी पुन्हा निविदा काढण्याची गरज काय, असा सवाल डोणगावकर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामागे भ्रष्टाचाराचा संशय असल्याचा आरोपही त्यांनी केला. बाजार समितीच्या कारभारात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत संबंधित कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच निविदा प्रक्रियेची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आरोपांमुळे लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- पैठण येथील जायकवाडी धरण नाथसागर जलाशयाचे जलपूजन पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले, *पैठण येथील जायकवाडी धरण नाथसागर जलाशयाचे जलपूजन संपन्न* *जायकवाडीत उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करा-पालकमंत्री संजय शिरसाठ* छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरण (नाथसागर) नव्याने आलेल्या पाण्याने पुर्ण क्षमतेने भरल्याने आज पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करून नारळ अर्पण करण्यात आला, या वर्षी जिल्ह्यात आतापर्यंत समाधान कारक पाऊस पडला नाही मात्र अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नाथसागर जलाशय पुर्ण क्षमतेने भरल्याने मराठवाड्याच्या पाणीपुरवठा, शेती आणि समृद्धीसाठी नव्या आशा निर्माण झाल्या आहेत, मराठवाड्यावरील संभाव्य जलसंकट टळले आहे, धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने वापर करावा, कृषी सिंचन, उद्योग तसेच पिण्याच्या पाण्याची भविष्यात टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी जलसंपदा विभागाने जलवापराचे सुयोग्य नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आज पैठण येथे दिल्या, जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मराठवाड्यातील कृषी सिंचन, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने दिलादायक परिस्थिती निर्माण झाली असून नाथसागर परिसरात समाधानाचे वातावरण आहे, यावेळी पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते विधिवत नाथसागर जलाशयाचे जलपूजन करण्यात आले, गोदावरी नदीची साडी - चोळीने ओटी भरून श्रीफळ अर्पण करण्यात आले, जायकवाडी प्रकल्पाच्या नियंत्रण कक्ष परिसरात आयोजित या कार्यक्रमात निसर्गाने दिलेल्या जलसंपत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, याप्रसंगी महापौर समीर राजूरकर, विभागीय आयुक्त जी, श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी, उपविभागीय अधिकारी निलम बाफना, नगरसेविका हर्षदा शिरसाठ, अधिक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता गणेश हासे, उपअभियंता श्रध्दा निंबाळकर, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे,आदी उपस्थित होते, *रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा*1
- दरसवाडी डोंगरगाव कालव्यात पाणी दाखल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, दरसवाडी डोंगरगाव कालव्याला अखेर पाणी सोडण्यात आले असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे. या पाण्यामुळे पिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत. येवला तालुक्याचे भाग्यविधाते आणि माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी डोंगरगाव कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांमुळे कालव्यात पाणी दाखल होताच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.1