logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप ​येवला: येवल्यातील कै. सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराविरोधात संतप्त ठेवीदारांनी अखेर रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे. शहर व तालुक्यातील शेकडो नागरिकांनी आपल्या कष्टाची पुंजी या पतसंस्थेत विविध मुदतींच्या ठेवींच्या रूपात गुंतवली होती. मात्र, मुदत संपूनही ठेवीदारांना त्यांची हक्काची रक्कम परत मिळत नसल्याने अनेक कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडली आहेत. ​एकीकडे हक्काच्या पैशांसाठी सर्वसामान्य ठेवीदार वणवण भटकत असताना, दुसरीकडे पतसंस्थेचे संचालक पिंटू पारख यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांची उधळण करत जंगी सोहळा साजरा करण्यात आला. या प्रकारामुळे ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले गेले असून, "सर्वसामान्यांचे कष्टाचे पैसे लाटून कसले कसले सत्कार सोहळे साजरे करता?" असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला आहे. ​या फसवणुकीविरोधात निलेश वखारे, बाळू सुराशे, बबन पाबळे, संतोष कोतवाल आणि सोना कोतवाल यांच्यासह शेकडो ठेवीदारांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. पतसंस्थेच्या या मनमानी कारभाराची चौकशी करून ठेवीदारांचे पैसे त्वरित परत मिळवून द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. ​आता या गंभीर प्रकरणी सहकार विभाग आणि पोलीस प्रशासन काय कडक पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

5 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
5 hrs ago

हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप ​येवला: येवल्यातील कै. सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराविरोधात संतप्त ठेवीदारांनी अखेर रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे. शहर व तालुक्यातील शेकडो नागरिकांनी आपल्या कष्टाची पुंजी या पतसंस्थेत विविध मुदतींच्या ठेवींच्या रूपात गुंतवली होती. मात्र, मुदत संपूनही ठेवीदारांना त्यांची हक्काची रक्कम परत मिळत नसल्याने अनेक कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडली आहेत. ​एकीकडे हक्काच्या पैशांसाठी सर्वसामान्य ठेवीदार वणवण भटकत असताना, दुसरीकडे पतसंस्थेचे संचालक पिंटू पारख यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांची उधळण करत जंगी सोहळा साजरा करण्यात आला. या प्रकारामुळे ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले गेले असून, "सर्वसामान्यांचे कष्टाचे पैसे लाटून कसले कसले सत्कार सोहळे साजरे करता?" असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला आहे. ​या फसवणुकीविरोधात निलेश वखारे, बाळू सुराशे, बबन पाबळे, संतोष कोतवाल आणि सोना कोतवाल यांच्यासह शेकडो ठेवीदारांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. पतसंस्थेच्या या मनमानी कारभाराची चौकशी करून ठेवीदारांचे पैसे त्वरित परत मिळवून द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. ​आता या गंभीर प्रकरणी सहकार विभाग आणि पोलीस प्रशासन काय कडक पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगर विमानतळ नोकरी परीक्षा रद्द? फी भरूनही परीक्षा नाही; विद्यार्थ्यांचा संताप
    1
    छत्रपती संभाजीनगर विमानतळ नोकरी परीक्षा रद्द? फी भरूनही परीक्षा नाही; विद्यार्थ्यांचा संताप
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • लाडकी बहीण'संदर्भात महत्त्वाची बातमी 'ई-केवायसीसाठी सहा महिन्याची मुदत दिलेली'
    1
    लाडकी बहीण'संदर्भात महत्त्वाची बातमी 'ई-केवायसीसाठी सहा महिन्याची मुदत दिलेली'
    user_Sandip Rathod
    Sandip Rathod
    चाळीसगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय मोर्चा: पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याकडून ५ मार्गदर्शक सूचना जाहीर
    1
    क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय मोर्चा: पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याकडून ५ मार्गदर्शक सूचना जाहीर
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • भारत उद्योग समूहाच्या वतीने गोकुळ प्रकाश गवारे यांचा सन्मान मुंडवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा. कन्नड : सामाजिक,माऊली साउंड सेवा मंडप च्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ प्रकाश गवारे यांचा भारत उद्योग समूहाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. . यावेळी भारत उद्योग समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी यांच्या हस्ते गोकुळ प्रकाश गवारे सन्मानित माऊली साउंड व सेवेच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याने इतरांनाही प्रेरणा मिळते, असे यावेळी सांगण्यात आले. सन्मान स्वीकारताना गोकुळ प्रकाश गवारे यांनी भारत उद्योग समूहाचे आभार मानले. भविष्यातही सामाजिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन प्रथम असल्याचा बहूमान मिळाला असल्यामुळे गावाचा गौरव झाला आहे अशा भावना गोकुळ गवारे यांनी व्यक्त केल्या. यावेळी भारत उद्योग समूहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. मुंडवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    1
    भारत उद्योग समूहाच्या वतीने गोकुळ प्रकाश गवारे यांचा सन्मान
मुंडवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा.
कन्नड : सामाजिक,माऊली साउंड सेवा मंडप च्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ प्रकाश गवारे यांचा भारत उद्योग समूहाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
.  यावेळी भारत उद्योग समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी यांच्या हस्ते गोकुळ प्रकाश गवारे सन्मानित माऊली साउंड व सेवेच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याने इतरांनाही प्रेरणा मिळते, असे यावेळी सांगण्यात आले.
सन्मान स्वीकारताना गोकुळ प्रकाश गवारे यांनी भारत उद्योग समूहाचे आभार मानले. भविष्यातही सामाजिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन प्रथम 
असल्याचा बहूमान मिळाला असल्यामुळे गावाचा गौरव झाला आहे 
अशा भावना गोकुळ गवारे यांनी व्यक्त केल्या.
यावेळी भारत उद्योग समूहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.
मुंडवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    user_Sandip Aaling
    Sandip Aaling
    Agricultural Product Wholesaler कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • सराड आश्रम शाळेच्या भिंतींना यापूर्वी ३.९ रिस्टर स्केलच्या धक्क्याने भेगा पडल्या सुरगाणा तालुक्यातील सराड आश्रम शाळेच्या भिंतींना यापूर्वी ३.९ रिस्टर स्केलच्या धक्क्याने भेगा पडल्या होत्या. आज ४.३ तिव्रतेचा झालेल्या भूकंपाचे हादरे बसल्यावर आश्रम शाळेतील विद्यार्थी भयभीत होऊन बाहेर मोकळ्या जागेत आले. सुरगाणा शहरासह तालुक्याच्या विविध भागात १०:०१ मिनिटांनी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. हा धक्का १८ ते २० सेकंदाचा होता.आज पर्यंत बसलेल्या हादरे पेक्षा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का जाणवला. घरातून लोकं बाहेर भयभीत होऊन बाहेर निघाले. घरात मांडणीवर असलेली भांडी खाली पडली.तर पावसाळ्यात घरावरील पत्र्यावर ठेवलेले दगड खाली अंगणात पडले. जोराचा आवाज आल्याने नागरिक घराबाहेर पळत सुटले.पिंपळसोंड, वांगण, दुधवळ, सुभाषनगर, जामूनपाडा, चापापाडा, मोठीघोडी, पालविहीर, अंबाडदहाड, कुकूडमुंडा, पळसन, प्रतापगड, खोबळा, माणी, गणेशनगर, खोकरी, मांजरपाडा, घागबारी, बोरगाव, रोटी, चिखली, राहुडे आदीसह तालुक्यातील सर्वच गावात हा धक्का बसला.नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे.अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. एरव्ही ग्रामीण भागात दहा वाजेपर्यंत सामसूम असते मात्र भूकंपाचे धक्के बसल्याने चर्चेला उधाण आले होते.
    1
    सराड आश्रम शाळेच्या भिंतींना यापूर्वी ३.९ रिस्टर स्केलच्या धक्क्याने भेगा पडल्या
सुरगाणा तालुक्यातील सराड आश्रम शाळेच्या भिंतींना यापूर्वी ३.९ रिस्टर स्केलच्या धक्क्याने भेगा पडल्या होत्या. आज ४.३ तिव्रतेचा  झालेल्या भूकंपाचे हादरे बसल्यावर आश्रम शाळेतील विद्यार्थी भयभीत होऊन बाहेर मोकळ्या जागेत आले. 
सुरगाणा शहरासह तालुक्याच्या विविध भागात 
१०:०१ मिनिटांनी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. हा धक्का १८ ते २० सेकंदाचा होता.आज पर्यंत बसलेल्या हादरे पेक्षा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का जाणवला. घरातून लोकं बाहेर भयभीत होऊन बाहेर निघाले.
घरात मांडणीवर असलेली भांडी खाली पडली.तर पावसाळ्यात घरावरील पत्र्यावर ठेवलेले दगड खाली अंगणात पडले. 
जोराचा आवाज आल्याने नागरिक घराबाहेर पळत सुटले.पिंपळसोंड, वांगण, दुधवळ, सुभाषनगर, जामूनपाडा, चापापाडा, मोठीघोडी, पालविहीर, अंबाडदहाड, कुकूडमुंडा, पळसन, प्रतापगड, खोबळा, माणी, गणेशनगर, खोकरी, मांजरपाडा, घागबारी, बोरगाव, रोटी, चिखली, राहुडे   आदीसह तालुक्यातील सर्वच गावात हा धक्का बसला.नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे.अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. एरव्ही ग्रामीण भागात दहा वाजेपर्यंत सामसूम असते मात्र भूकंपाचे धक्के बसल्याने चर्चेला उधाण आले होते.
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक शहरात भव्य मिरवणूक आयोजन जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकच्या पंचवटी परिसरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि इतिहासाची ओळख या माध्यमातून करून देण्यात आली. मिरवणुकीत भगवान वीर एकलव्य, क्रांतिवीर बिरसा मुंडा तसेच आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या विविध महापुरुषांचे चित्ररथ सहभागी करण्यात आले होते. महापुरुषांच्या जीवनकार्याचा आणि संघर्षाचा संदेश देणाऱ्या या चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीदरम्यान आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला, संस्कृती आणि वारशाचे दर्शन घडले. भगवान वीर एकलव्य यांची निष्ठा, समर्पण आणि ध्येयाप्रती असलेली बांधिलकी तसेच क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरोधात उभारलेला संघर्ष आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या भव्य मिरवणुकीत स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर, आदिवासी समाजबांधव, युवक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीमुळे पंचवटी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आदिवासी संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
    1
    जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक शहरात भव्य मिरवणूक  आयोजन 
जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकच्या पंचवटी परिसरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि इतिहासाची ओळख या माध्यमातून करून देण्यात आली.
मिरवणुकीत भगवान वीर एकलव्य, क्रांतिवीर बिरसा मुंडा तसेच आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या विविध महापुरुषांचे चित्ररथ सहभागी करण्यात आले होते. महापुरुषांच्या जीवनकार्याचा आणि संघर्षाचा संदेश देणाऱ्या या चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीदरम्यान आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला, संस्कृती आणि वारशाचे दर्शन घडले.
भगवान वीर एकलव्य यांची निष्ठा, समर्पण आणि ध्येयाप्रती असलेली बांधिलकी तसेच क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरोधात उभारलेला संघर्ष आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या भव्य मिरवणुकीत स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर, आदिवासी समाजबांधव, युवक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीमुळे पंचवटी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आदिवासी संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं! नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सरळमार्गे व्हावी, हा आपला हक्क आहे. या हक्कासाठी मैदानात उतरून लढणाऱ्या, आजच्या चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानतो. काल रात्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्याशी संपर्क साधला, आताही सिन्नर येथे आंदोलनस्थळी असताना मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी फोन केला असता आपण 3 प्रमुख मागण्या लावून धरल्या :- 📌 ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देता 60 दिवसांत अंतिम अहवाल आला पाहिजे. 📌 समितीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता, फक्त नफा तोट्याचे गणित न मांडता जनभावनेचा विचार केला पाहिजे. 📌 समितीने तालुक्या-तालुक्यात आणि गावागावात येऊन, जनसुनवाई / ग्रामसभा घेऊन जनभावना समजून घेतली पाहिजे. या तीनही मागण्या आम्हाला प्रशासनाकडून लेखी हव्यात, अशी ठाम भूमिका आपण यावेळी घेतली आहे. यावर मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही तर जनभावना सरकारपर्यंत पोहोचावी, यासाठी आहे. पण, "जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं!" हा आमचा सरकारला स्पष्ट इशारा आहे
    1
    जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं!
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सरळमार्गे व्हावी, हा आपला हक्क आहे. या हक्कासाठी मैदानात उतरून लढणाऱ्या, आजच्या चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानतो. काल रात्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्याशी संपर्क साधला, आताही सिन्नर येथे आंदोलनस्थळी असताना मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी फोन केला असता आपण 3 प्रमुख मागण्या लावून धरल्या :-
📌  ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देता 60 दिवसांत अंतिम अहवाल आला पाहिजे.
📌 समितीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता, फक्त नफा तोट्याचे गणित न मांडता जनभावनेचा विचार केला पाहिजे.
📌 समितीने तालुक्या-तालुक्यात आणि गावागावात येऊन, जनसुनवाई / ग्रामसभा घेऊन जनभावना समजून घेतली पाहिजे.
या तीनही मागण्या आम्हाला प्रशासनाकडून लेखी हव्यात, अशी ठाम भूमिका आपण यावेळी घेतली आहे. यावर मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही तर जनभावना सरकारपर्यंत पोहोचावी, यासाठी आहे. 
पण, "जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं!" हा आमचा सरकारला स्पष्ट इशारा आहे
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • रोहिलागड दुमदुमले बैलगाडा शर्यतीच्या थराराने; अक्षय पाटील आणि अखिल पठाण यांच्या गाड्यांची बाजी!
    1
    रोहिलागड दुमदुमले बैलगाडा शर्यतीच्या थराराने; अक्षय पाटील आणि अखिल पठाण यांच्या गाड्यांची बाजी!
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • रेल्वे हॉस्पिटल परिसरात उदमांजराची पिल्ले आढळली सर्पमित्र व अनुसया कमल फाउंडेशनच्या तत्परतेने पिल्लांना जीवदान; वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन मनमाड : प्रतिनिधी मनमाड येथील रेल्वे हॉस्पिटल परिसरात उदमांजराची लहान पिल्ले आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पिल्लांना वेळेत सुरक्षित ताब्यात घेऊन त्यांची काळजी घेण्यात आली. रेल्वे हॉस्पिटलच्या शेजारी काही पिल्ले आढळून आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र विजू भाऊ उगले यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच उगले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी पिल्लांजवळ त्यांची आई आढळून आली नाही. पिल्ले उपाशी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अनुसया कमल फाउंडेशनच्या च्या सहकार्याने पिल्लांना आवश्यक खाद्य देण्यात आले. सध्या त्यांना सुरक्षित ठिकाणी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती वन विभागाचे वनपाल सय्यद यांना देण्यात आली आहे. पिल्लांची आवश्यक काळजी घेतल्यानंतर वन विभागाशी समन्वय साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. उदमांजर हा सिवेट कुळातील वन्यजीव असून, त्याला अनेकदा मांजर समजण्याचा गैरसमज होतो. अशा प्रकारची वन्यजीवांची पिल्ले आढळल्यास नागरिकांनी त्यांना स्वतःहून घरी नेऊ नये अथवा त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये. तातडीने वन विभाग किंवा अधिकृत प्राणी बचाव पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या बचावकार्यात सर्पमित्र विजू भाऊ उगले, अनुसया कमल फाउंडेशनची आणि वन विभाग यांच्या समन्वयामुळे पिल्लांना सुरक्षितता मिळाली.
    1
    रेल्वे हॉस्पिटल परिसरात उदमांजराची पिल्ले आढळली

सर्पमित्र व अनुसया कमल फाउंडेशनच्या तत्परतेने पिल्लांना जीवदान; वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन

मनमाड : प्रतिनिधी
मनमाड येथील रेल्वे हॉस्पिटल परिसरात उदमांजराची  लहान पिल्ले आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पिल्लांना वेळेत सुरक्षित ताब्यात घेऊन त्यांची काळजी घेण्यात आली.
रेल्वे हॉस्पिटलच्या शेजारी काही पिल्ले आढळून आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र विजू भाऊ उगले यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच उगले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी पिल्लांजवळ त्यांची आई आढळून आली नाही. पिल्ले उपाशी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर अनुसया कमल फाउंडेशनच्या च्या सहकार्याने पिल्लांना आवश्यक खाद्य देण्यात आले. सध्या त्यांना सुरक्षित ठिकाणी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती वन विभागाचे वनपाल सय्यद  यांना देण्यात आली आहे. पिल्लांची आवश्यक काळजी घेतल्यानंतर वन विभागाशी समन्वय साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
उदमांजर हा सिवेट कुळातील वन्यजीव असून, त्याला अनेकदा मांजर समजण्याचा गैरसमज होतो. अशा प्रकारची वन्यजीवांची पिल्ले आढळल्यास नागरिकांनी त्यांना स्वतःहून घरी नेऊ नये अथवा त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये. तातडीने वन विभाग किंवा अधिकृत प्राणी बचाव पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या बचावकार्यात सर्पमित्र विजू भाऊ उगले, अनुसया कमल फाउंडेशनची  आणि वन विभाग यांच्या समन्वयामुळे पिल्लांना सुरक्षितता मिळाली.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.