जगप्रसिद्ध अजिंठा डोंगररांगा आगीत होरपळल्या; पर्यावरणावर मोठे संकट सोयगांव प्रतिनिधी जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील डोंगररांगांमध्ये सोमवारी (दि. ९) सकाळपासून मोठ्या प्रमाणावर आग लागल्याची घटना घडली. सकाळी लागलेली ही आग दुपारपर्यंत उग्र रूप धारण करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र दुपारपर्यंत वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अजिंठा परिसरातील डोंगररांगा जैवविविधतेने समृद्ध असून येथे अनेक दुर्मिळ वनस्पती, मोठमोठे वृक्ष तसेच विविध प्रकारची वनौषधी आढळतात. या आगीमुळे जंगलातील मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा जळून खाक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही काळापासून या परिसरात अधूनमधून आग लागण्याच्या घटना घडत असल्याने जंगलातील नैसर्गिक संपत्ती धोक्यात येत आहे. स्थानिकांच्या मते, सकाळपासून आग लागलेली असताना ती हळूहळू पसरत होती आणि दुपारपर्यंत तिचे उग्र स्वरूप वाढत गेले. तरीही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे प्रयत्न न केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जंगलातील सुकलेल्या गवतामुळे आणि उष्णतेमुळे आग वेगाने पसरत असल्याचेही सांगितले जात आहे. या आगीमुळे जंगलातील मोठे वृक्ष तसेच मौल्यवान वनौषधी वनस्पती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जर अशा प्रकारे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत राहिल्या, तर भविष्यात अजिंठा परिसरातील डोंगररांगांमधील हिरवाई मोठ्या प्रमाणात नष्ट होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनी वनविभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच जंगलात नियमित गस्त, अग्निशमन यंत्रणा आणि कर्मचारी तैनात करण्याचीही आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे. अजिंठा परिसरातील उरलेली वनसंपदा जतन करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, जेणेकरून पुढील पिढ्यांनाही हा निसर्गरम्य वारसा पाहता येईल.
जगप्रसिद्ध अजिंठा डोंगररांगा आगीत होरपळल्या; पर्यावरणावर मोठे संकट सोयगांव प्रतिनिधी जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील डोंगररांगांमध्ये सोमवारी (दि. ९) सकाळपासून मोठ्या प्रमाणावर आग लागल्याची घटना घडली. सकाळी लागलेली ही आग दुपारपर्यंत उग्र रूप धारण करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र दुपारपर्यंत वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अजिंठा परिसरातील डोंगररांगा जैवविविधतेने समृद्ध असून येथे अनेक दुर्मिळ वनस्पती, मोठमोठे वृक्ष तसेच विविध प्रकारची वनौषधी आढळतात. या आगीमुळे जंगलातील मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा जळून खाक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही काळापासून या परिसरात अधूनमधून आग लागण्याच्या घटना घडत असल्याने जंगलातील नैसर्गिक संपत्ती धोक्यात येत आहे. स्थानिकांच्या मते, सकाळपासून आग लागलेली असताना ती हळूहळू पसरत होती आणि दुपारपर्यंत तिचे उग्र स्वरूप वाढत गेले.
तरीही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे प्रयत्न न केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जंगलातील सुकलेल्या गवतामुळे आणि उष्णतेमुळे आग वेगाने पसरत असल्याचेही सांगितले जात आहे. या आगीमुळे जंगलातील मोठे वृक्ष तसेच मौल्यवान वनौषधी वनस्पती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जर अशा प्रकारे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत राहिल्या, तर भविष्यात अजिंठा परिसरातील डोंगररांगांमधील हिरवाई मोठ्या प्रमाणात नष्ट होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनी वनविभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच जंगलात नियमित गस्त, अग्निशमन यंत्रणा आणि कर्मचारी तैनात करण्याचीही आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे. अजिंठा परिसरातील उरलेली वनसंपदा जतन करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, जेणेकरून पुढील पिढ्यांनाही हा निसर्गरम्य वारसा पाहता येईल.
- प्रतिनिधि.... दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.2
- गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.2
- सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..1
- आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली1
- #marathi#newsjalna#1
- स्वामी ग्रुपतर्फे सुलतानपूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा – शाहीन पटेल यांचा सन्मान”1
- छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राणाची आहुती दिली. मुघल बादशहा औरंगजेब याने धर्मांतराचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी तो ठामपणे नाकारला आणि स्वाभिमानासाठी बलिदान दिले. म्हणूनच त्यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” म्हणून ओळखले जाते. या महान योद्ध्याला आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.1
- स्टंटबाजी बेतली जीवावर: सापाच्या दंशाने ख्यातनाम सर्पमित्राचा खामगावात दुर्दैवी मृत्यू.1