मध्यपूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी-निर्यातदारांना दिलासा जेएनपीएत अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ मध्यपूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी-निर्यातदारांना दिलासा जेएनपीएत अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ; शीतगृह वीज जोडणी शुल्कात ८०% सवलत मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी तसेच निर्यातदारांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) बंदरात अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यात कंटेनरवरील साठवण किंवा थांबा कालावधीचे शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. या निर्णयानुसार शीतगृह कंटेनरच्या विद्युत जोडणी शुल्कात तब्बल ८० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच नवीन जहाज उपलब्ध होईपर्यंत निर्यात मालाची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी बंदरात आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे काही निर्यात जहाजांच्या हालचालींवर परिणाम झाला असून त्याचा फटका फळे व भाजीपाला निर्यातदारांना बसण्याची शक्यता होती. यामुळे मोठ्या प्रमाणात माल बंदरात अडकून राहण्याची समस्या निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शेतकरी व निर्यातदारांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जेएनपीए प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या उपाययोजनांमुळे राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी तसेच निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही मंत्री रावल यांनी सांगितले.
मध्यपूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी-निर्यातदारांना दिलासा जेएनपीएत अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ मध्यपूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी-निर्यातदारांना दिलासा जेएनपीएत अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ; शीतगृह वीज जोडणी शुल्कात ८०% सवलत मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी तसेच निर्यातदारांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) बंदरात अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यात कंटेनरवरील साठवण किंवा थांबा कालावधीचे शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. या निर्णयानुसार शीतगृह कंटेनरच्या विद्युत जोडणी शुल्कात तब्बल ८० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच नवीन जहाज उपलब्ध होईपर्यंत निर्यात मालाची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी बंदरात आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे काही निर्यात जहाजांच्या हालचालींवर परिणाम झाला असून त्याचा फटका फळे व भाजीपाला निर्यातदारांना बसण्याची शक्यता होती. यामुळे मोठ्या प्रमाणात माल बंदरात अडकून राहण्याची समस्या निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शेतकरी व निर्यातदारांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जेएनपीए प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या उपाययोजनांमुळे राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी तसेच निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही मंत्री रावल यांनी सांगितले.
- महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार हिकमत उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिकमत दादा उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी प्रादेशिक असमतोल दूर करण्याची जोरदार मागणी केली. घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे अधोरेखित केले. नदीजोड प्रकल्पांतर्गत वैतरणा व उल्हास खोऱ्यातील वाढीव पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. मात्र असे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत स्थानिक लघु सिंचन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “२५-३० वर्षांपूर्वी उभारलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (KT Weirs) आज जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे चांगला पाऊस पडूनही पाणी साठत नाही. या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून जायकवाडी धरणातून वाहून जाणारे पाणी अडवले, तर परिसरातील ३० ते ३५ गावांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो,” असे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हतवन प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. रस्त्यांच्या विषयावर बोलताना आमदार हिकमत दादा उढाण यांनी मुंबईसारख्या शहरांना माेठ्या प्रमाणात निधी तर ग्रामीण भागासाठी तुलनेने कमी निधी मिळत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ महामार्ग यांसारखे मोठे प्रकल्प महत्त्वाचे असले तरी ग्रामीण भागातील ओडीआर (ODR) व एमडीआर (MDR) रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी भरीव निधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंट काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले; मात्र यासाठी करण्यात आलेली साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडताना आमदार उढाण यांनी साखर कारखान्यांवरील २५ किलोमीटर हवाई अंतराच्या नियमावर जोरदार टीका केली. “जगात असा कोणताही उद्योग नसेल जिथे नवीन युनिट सुरू करण्यासाठी इतके कडक निर्बंध असतील. या नियमामुळे ज्या भागात ऊस उत्पादन जास्त आहे, त्या ठिकाणी नवीन कारखाने उभे राहू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांची कोंडी होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा २५ किमीचा नियम रद्द करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच ऊस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्यांवरील काटामारी रोखण्यासाठी सरकारने डिजिटल काटे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार हिकमत दादा उढाण यांनी मांडलेल्या या मुद्द्यांमुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाडा आणि ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्नांवर सभागृहात व्यापक चर्चा झाली1
- कस्तुरबा गांधी मुलींच्या वस्तीग्रह जालना येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला1
- इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं1
- भोकरदन शहरातील फुलेनगर येथे दिलीप मामा पगारे, शुभम पगारे,सागर पगारे यांच्या गृहप्रवेश सोहळा आणि सान्वी शुभम पगारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🎂💐देताना माजी नगरसेवक दीपक भाऊ बोर्डे, मिथुन पगारे, किरण वाघमारे,पत्रकार कमलकिशोर जोगदंडे आदी.1
- यादरम्यान ६० किलोमीटर मध्ये शिरपूर आणि खलघाट (सेंदवा) असे दोन टोल आहेत. या महामार्गावरील हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी परिवहन विभागाने 26 लाखाचा निधी मंजूर केलेला होता. अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलने करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज शिरपूर फर्स्टच्या वतींने अनोखे आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील खड्ड्यामध्ये बसून '२६ लाखाच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा' करून निषेध नोंदवला. यानंतर परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, धम्मदीप मोरे, हंसराज चौधरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.1
- विलास बारहाते मानवत : येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही पालकांच्या सहभागातून ८ मार्च २०२६ रोजी सकाळी सहा वाजता ११ एसटी बसने निघाले जवळपास ५०० विद्यार्थी सहावी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी या सहली मध्ये होते. प्रथम लोणार येथील जगप्रसिद्ध उल्काजन्य लोणार सरोवर पाहिले. हे पर्यटकांसह अभ्यासकांसाठी एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे. ५० हजार वर्षांपूर्वीच्या या खऱ्या पाण्याच्या विवराच्या सभोवताली ऐतिहासिक मंदिरे व अद्वितीय जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालतेय. येथील १२ व्या शतकातील प्राचीन मंदिरे, जसे की कमळजा माता मंदिर, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहवयास मिळतोय. लोणार सरोवर हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील आघाती सरोवर आहे. जे भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे. या तलावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि अनेक पक्षी पाहायला मिळतात. नंतर खामगाव येथील नामांकित कंपनीचा बिस्किट कारखाना पाहिला. कश्या प्रकारे बिस्किटे निर्माण करतात हे पाहिल्यानंतर सर्वांना बिस्किट पुडे देण्यात आले. हा प्रकल्प स्थानिक रोजगार निर्मितीत मोलाची भूमिका बजावतो असं कामगारासोबत चर्चा केल्यानंतर समजलंय. त्यानंतर ही सहल शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी गेली. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. १९ व्या शतकात प्रकट झालेल्या महाराजांचे हे समाधी स्थळ असून, येथील संस्थानाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भक्तांसाठी सेवाभावी आहे. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर मोफत महाप्रसाद वाटप केला जातोय. मंदिर परिसराच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांचे अत्यंत आकर्षक संगमरवरी समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज संस्थान हे भारतातील सर्वात मोठे आणि शिस्तप्रिय ट्रस्टपैकी एक आहे. जे सामाजिक व आध्यात्मिक कार्य करते. दर्शन व प्रसाद घेतल्या नंतर सहल मानवत च्या दिशेने वाटचाल करत शाळेत रात्री उशिरा दिड च्या सुमारास सुखद सहलीचा अनुभव घेत पोहोचली.1
- खुलताबाद-पळसवाडी जवळ धावत्या एसटी बसला आग; ४८ प्रवाशांचा थरार, सर्वजण बचावले1
- महिला दिनानिमित्त जालन्यात वीर सावरकर चौक येथील मुस्कान ज्यूस सेंटरचे गोड उपक्रम; 500 ग्लास ज्यूसचे मोफत वाटप..1