logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्री. अकादमीतर्फे JEE, NEET, NDA व MHT-CET पात्र विद्यार्थ्यांचा गौरव श्री. अकादमीतर्फे JEE, NEET, NDA व MHT-CET पात्र विद्यार्थ्यांचा गौरव नागपूर : विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी श्री अकादमी, ओमकार नगर, नागपूर च्यावतीने JEE, NEET, NDA व MHT-CET परीक्षेत यश संपादन करून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. रविवारी २३ ऑगस्ट रोजी बाकडे सेलिब्रेशन, नागपूर येथे हा कार्यक्रम मोठ्या संख्येने उत्साहात पार पडला. श्री अकादमीच्या संचालिका डॉ. जयश्री मडावी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक तयारी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री अकादमीकडून सातत्याने विविध उपक्रम राबविले जाते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गिरीश पांडव, आमदार सुधाकर कोहळे, डॉ. IPS लोहित मतानी, डॉ. भौमिक, डॉ. चौधरी, डॉ. दामयंती वाळके तसेच प्रा. माधुरीताई पालीवाल यांची उपस्थिती होती. मान्यवरांचे श्री अकादमीच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर JEE, NEET, NDA आणि MHT- CET या विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द, शिस्त आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी केवळ अभ्यासच नव्हे, तर सातत्य, वेळेचे योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि ध्येय निश्चित करून केलेली मेहनत आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे त्यांच्या पालकांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. पालकांनी आपल्या मुलांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत श्री अकादमीच्या संचालिका, शिक्षकवृंद आणि मार्गदर्शकांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीदरम्यान मिळालेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहन त्यांच्या यशासाठी उपयुक्त ठरल्याचे पालकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याबरोबरच इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली. मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असा संदेश या सत्कार सोहळ्यातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानले. श्री अकादमीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक कार्याला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

19 hrs ago
user_SATISH BHALERAO
SATISH BHALERAO
नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
19 hrs ago
f5939626-e2dc-4963-b90d-5e57b451c997

श्री. अकादमीतर्फे JEE, NEET, NDA व MHT-CET पात्र विद्यार्थ्यांचा गौरव श्री. अकादमीतर्फे JEE, NEET, NDA व MHT-CET पात्र विद्यार्थ्यांचा गौरव नागपूर : विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी श्री अकादमी, ओमकार नगर, नागपूर च्यावतीने JEE, NEET, NDA व MHT-CET परीक्षेत यश संपादन करून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. रविवारी २३ ऑगस्ट रोजी बाकडे सेलिब्रेशन, नागपूर येथे हा कार्यक्रम मोठ्या संख्येने उत्साहात पार पडला. श्री अकादमीच्या संचालिका डॉ. जयश्री मडावी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक तयारी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री अकादमीकडून सातत्याने विविध उपक्रम राबविले जाते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गिरीश पांडव, आमदार सुधाकर कोहळे, डॉ. IPS लोहित मतानी, डॉ. भौमिक, डॉ. चौधरी, डॉ. दामयंती वाळके तसेच प्रा. माधुरीताई पालीवाल यांची उपस्थिती होती. मान्यवरांचे श्री अकादमीच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर JEE, NEET, NDA आणि MHT- CET या विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द, शिस्त आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी केवळ अभ्यासच नव्हे, तर सातत्य, वेळेचे योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि ध्येय निश्चित करून केलेली मेहनत आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे त्यांच्या पालकांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. पालकांनी आपल्या मुलांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत श्री अकादमीच्या संचालिका, शिक्षकवृंद आणि मार्गदर्शकांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीदरम्यान मिळालेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहन त्यांच्या यशासाठी उपयुक्त ठरल्याचे पालकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याबरोबरच इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली. मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असा संदेश या सत्कार सोहळ्यातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानले. श्री अकादमीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक कार्याला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश ! भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश !
    1
    भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश !
भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश !
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोंविदा लीगमधून एकतेचा संदेश ! भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोंविदा लीगमधून एकतेचा संदेश !
    1
    भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोंविदा लीगमधून एकतेचा संदेश !
भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोंविदा लीगमधून एकतेचा संदेश !
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • वर्धापन दिन जिवनधारा प्रौढ मतिमंदांची निवासी औद्योगिक कर्मशाळा व पुनर्वसन केंद्र, नागपूर येथील विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला. अपना रिॲलिटीसच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळा उत्साहात नागपूर l प्रतिनिधी : अपना रिॲलिटीस प्रायवेट लिमिटेडच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत हा वर्धापन दिन जिवनधारा प्रौढ मतिमंदांची निवासी औद्योगिक कर्मशाळा व पुनर्वसन केंद्र, नागपूर येथील विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मुलांसाठी विशेष जादूच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रौढ मतिमंद विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात निशा फाउंडेशनच्या वतीने प्रौढ मतिमंद विद्यार्थी तसेच लहान मुलांना स्वेटर आणि विविध उपयोगी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक जाणीव आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. हा विशेष सोहळा सायंकाळी ४ वाजता श्री राजलक्ष्मी सभागृह, आशीर्वाद नगर, म्हाळगीनगर चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या. वर्धापन दिनाचा आनंद सामाजिक बांधिलकीसोबत साजरा करत अपना रिॲलिटीस ने समाजातील विशेष गरजा असलेल्या व्यक्ती व मुलांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला.
    4
    वर्धापन दिन जिवनधारा प्रौढ मतिमंदांची निवासी औद्योगिक कर्मशाळा व पुनर्वसन केंद्र, नागपूर येथील विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला.
अपना रिॲलिटीसच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळा उत्साहात
नागपूर l प्रतिनिधी : अपना रिॲलिटीस प्रायवेट लिमिटेडच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत हा वर्धापन दिन जिवनधारा प्रौढ मतिमंदांची निवासी औद्योगिक कर्मशाळा व पुनर्वसन केंद्र, नागपूर येथील विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित मुलांसाठी विशेष जादूच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रौढ मतिमंद विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमात निशा फाउंडेशनच्या वतीने प्रौढ मतिमंद विद्यार्थी तसेच लहान मुलांना स्वेटर आणि विविध उपयोगी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक जाणीव आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
हा विशेष सोहळा सायंकाळी ४ वाजता श्री राजलक्ष्मी सभागृह, आशीर्वाद नगर, म्हाळगीनगर चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या.
वर्धापन दिनाचा आनंद सामाजिक बांधिलकीसोबत साजरा करत अपना रिॲलिटीस ने समाजातील विशेष गरजा असलेल्या व्यक्ती व मुलांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला.
    user_Ashok Mate
    Ashok Mate
    Sports Coach नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे shuru ॲप (उमरेड ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची  अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ),  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद )  सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण )  निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    1
    भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे
shuru ॲप (उमरेड )
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष 
सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच
गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची 
अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद
मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या
सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ),  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद )  सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद  ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण )  निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर
सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • कुही तालुका कृषी कार्यालयात लाखांचा भ्रष्टाचार? शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली बोगस बिलांचा सुळसुळाट! ​कुही तालुका कृषी कार्यालयात लाखांचा भ्रष्टाचार? शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली बोगस बिलांचा सुळसुळाट! ​कुही (विशेष प्रतिनिधी): कुही तालुका कृषी कार्यालयाकडून सन २०२५-२०२६ या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वित्तीय अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. कागदोपत्री शिबिरे दाखवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा संशय शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. ​काय आहे प्रकरण? तालुका कृषी कार्यालयामार्फत कुही तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक शिबिरासाठी जेवणाचा खर्च ₹४,८०० (आलूभात, कढी, जिलेबी) आणि प्रत्येकी ₹८,८२३ किमतीच्या साहित्य किटचे वाटप केल्याचे दाखवले गेले आहे. या किटमध्ये फ्लॅक्स बॅनर (₹५०८), माहिती पुस्तिका (₹९५), बॉलपेन (₹१०), फोल्डर फाईल (₹३८), नोटपॅड (₹५९), मार्कर पेन (₹२३), रजिस्टर (₹६५) आणि स्केच पेन (₹२३) यांचा समावेश असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. ​कागदोपत्री दाखवलेला खर्च आणि गावांची यादी: ​वग: १२ शिबिरे – जेवण खर्च ₹५७,६०० ​अडम: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​नवरगाव: ४ शिबिरे ​खुर्षेपार: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​सिल्ली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​आवरमारा: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​चिखली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​विरखंडी: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​वेळगाव: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​गोन्हा: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​मांगली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​पारडी: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​कऱ्हाडला: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​या सर्व गावांमध्ये प्रत्येक शिबिरासाठी ₹८,८२३ चे साहित्य वाटप केल्याचे दाखवून लाखो रुपयांची उचल करण्यात आली आहे. ​बोगस वाहतूक बिलांचाही प्रकार! एवढेच नव्हे तर 'पानी फाउंडेशन'च्या कामासाठी वडेगाव (काळे) ते कुही आणि सोनपुरी ते कुही या मार्गावर 'कृषी ताई' महिलांना मॅटाडोरने आणले असताना, त्याच्याऐवजी बसचे जास्त भाडे दाखवून बोगस बिले उचलण्यात आल्याचेही समोर आले आहे. ​शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन: शासनाचा आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा कृषी अधिकारी अशा प्रकारे लाटत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात कुही तालुक्यातील शेतकरी बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. ​या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी लवकरच तालुका कृषी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी आणि युवकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (मोर्चीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.) ​– संजय अतकरी, PTN न्यूज, कुही.
    1
    कुही तालुका कृषी कार्यालयात लाखांचा भ्रष्टाचार? शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली बोगस बिलांचा सुळसुळाट!
​कुही तालुका कृषी कार्यालयात लाखांचा भ्रष्टाचार? शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली बोगस बिलांचा सुळसुळाट!
​कुही (विशेष प्रतिनिधी):
कुही तालुका कृषी कार्यालयाकडून सन २०२५-२०२६ या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वित्तीय अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. कागदोपत्री शिबिरे दाखवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा संशय शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
​काय आहे प्रकरण?
तालुका कृषी कार्यालयामार्फत कुही तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक शिबिरासाठी जेवणाचा खर्च ₹४,८०० (आलूभात, कढी, जिलेबी) आणि प्रत्येकी ₹८,८२३ किमतीच्या साहित्य किटचे वाटप केल्याचे दाखवले गेले आहे. या किटमध्ये फ्लॅक्स बॅनर (₹५०८), माहिती पुस्तिका (₹९५), बॉलपेन (₹१०), फोल्डर फाईल (₹३८), नोटपॅड (₹५९), मार्कर पेन (₹२३), रजिस्टर (₹६५) आणि स्केच पेन (₹२३) यांचा समावेश असल्याचे कागदोपत्री नमूद आहे.
​कागदोपत्री दाखवलेला खर्च आणि गावांची यादी:
​वग: १२ शिबिरे – जेवण खर्च ₹५७,६००
​अडम: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२००
​नवरगाव: ४ शिबिरे
​खुर्षेपार: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२००
​सिल्ली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२००
​आवरमारा: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२००
​चिखली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२००
​विरखंडी: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२००
​वेळगाव: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२००
​गोन्हा: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२००
​मांगली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२००
​पारडी: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२००
​कऱ्हाडला: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२००
​या सर्व गावांमध्ये प्रत्येक शिबिरासाठी ₹८,८२३ चे साहित्य वाटप केल्याचे दाखवून लाखो रुपयांची उचल करण्यात आली आहे.
​बोगस वाहतूक बिलांचाही प्रकार!
एवढेच नव्हे तर 'पानी फाउंडेशन'च्या कामासाठी वडेगाव (काळे) ते कुही आणि सोनपुरी ते कुही या मार्गावर 'कृषी ताई' महिलांना मॅटाडोरने आणले असताना, त्याच्याऐवजी बसचे जास्त भाडे दाखवून बोगस बिले उचलण्यात आल्याचेही समोर आले आहे.
​शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन:
शासनाचा आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा कृषी अधिकारी अशा प्रकारे लाटत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात कुही तालुक्यातील शेतकरी बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.
​या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी लवकरच तालुका कृषी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी आणि युवकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (मोर्चीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.)
​– संजय अतकरी, PTN न्यूज, कुही.
    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Local News Reporter कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • पिपंळगाव मा येथील वार्ड 3 मध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय गंभीर अवस्था पिपंळगाव मा येथील वार्ड न 3 मध्ये नागरिकांना येण्या ज्याण्याचा रस्था अतिशय गंभीर अवस्थेत असल्या मुळे नागरिक अतिशय संस्तप्त झाले तरी त्यांना लवकरात लवकर ग्रामपंचायत ने जाण्या योग्य रस्ता करून द्यावा गावा मध्ये अनेक विकास कामा करिता दरवर्षी निधी येतो तर तो कुठे खर्च केला जातो असे आवश्यक असलेले काम जर होत नसेल
    1
    पिपंळगाव मा येथील वार्ड 3 मध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय गंभीर अवस्था 
पिपंळगाव मा येथील वार्ड न 3 मध्ये नागरिकांना येण्या ज्याण्याचा रस्था अतिशय गंभीर अवस्थेत असल्या मुळे नागरिक अतिशय संस्तप्त झाले तरी त्यांना लवकरात लवकर ग्रामपंचायत ने जाण्या योग्य रस्ता करून द्यावा गावा मध्ये अनेक विकास कामा करिता दरवर्षी निधी येतो तर तो कुठे खर्च केला जातो असे आवश्यक असलेले काम जर होत नसेल
    user_Naresh prabhakar harne
    Naresh prabhakar harne
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    24 min ago
  • लॉटरी पद्धत बंद करून मागेल त्याला बोअरवेल- नामदार आशिष जयस्वाल लॉटरी पद्धत बंद करून राज्य शासनाने मागेल त्याला बोरवेल देण्याचा निर्णय घेतला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी २६ ऑगस्ट रोजी दिली आहे.ते रामटेक तालुक्यातील कट्टा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात बोलत होते.रामटेक विधानसभा क्षेत्रात १०,५१७ घरे आदिवासी विकास योजनेतून आपण मंजूर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
    1
    लॉटरी पद्धत बंद करून मागेल त्याला बोअरवेल- नामदार आशिष जयस्वाल 

लॉटरी पद्धत बंद करून राज्य शासनाने मागेल त्याला बोरवेल देण्याचा निर्णय घेतला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी २६ ऑगस्ट रोजी दिली आहे.ते रामटेक तालुक्यातील कट्टा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात बोलत होते.रामटेक विधानसभा क्षेत्रात १०,५१७ घरे आदिवासी विकास योजनेतून आपण मंजूर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
    user_Umesh Fulbel
    Umesh Fulbel
    रामटेक, नागपूर, महाराष्ट्र•
    47 min ago
  • पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर माध्यम प्रतिनिधियों से नागपुर शहर पुलिस का संवाद नागपुर, 25 अगस्त 2026 : नागपुर शहर पुलिस दल की ओर से पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में 25 अगस्त को माध्यम प्रतिनिधियों के लिए पत्रकार वार्ता का आयोजन किया गया। इस अवसर पर नागपुर शहर की कानून-व्यवस्था, नागरिकों की सुरक्षा तथा पुलिस विभाग द्वारा संचालित विभिन्न अभियानों और उपक्रमों के संबंध में माध्यम प्रतिनिधियों के साथ विस्तृत संवाद किया गया। पत्रकारों द्वारा विभिन्न विषयों को लेकर उठाए गए मुद्दों पर भी चर्चा की गई। नागरिकों की सुरक्षा को सर्वोच्च प्राथमिकता देते हुए पुलिस विभाग द्वारा किए जा रहे विभिन्न उपायों, कार्यप्रणाली तथा जनसंपर्क से जुड़े उपक्रमों की जानकारी इस दौरान दी गई। पुलिस प्रशासन और माध्यम प्रतिनिधियों के बीच प्रभावी संवाद से नागरिकों तक सटीक एवं अधिकृत जानकारी पहुंचाने में महत्वपूर्ण सहायता मिलती है। नागरिकों की सुरक्षा के साथ-साथ पारदर्शी, प्रभावी और उत्तरदायी संवाद बनाए रखने के लिए नागपुर शहर पुलिस सदैव प्रतिबद्ध है, यह बात पत्रकार वार्ता के दौरान रेखांकित की गई।
    1
    पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर
पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर
माध्यम प्रतिनिधियों से नागपुर शहर पुलिस का संवाद 
नागपुर, 25 अगस्त 2026 : नागपुर शहर पुलिस दल की ओर से पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में 25 अगस्त को माध्यम प्रतिनिधियों के लिए पत्रकार वार्ता का आयोजन किया गया।
इस अवसर पर नागपुर शहर की कानून-व्यवस्था, नागरिकों की सुरक्षा तथा पुलिस विभाग द्वारा संचालित विभिन्न अभियानों और उपक्रमों के संबंध में माध्यम प्रतिनिधियों के साथ विस्तृत संवाद किया गया। पत्रकारों द्वारा विभिन्न विषयों को लेकर उठाए गए मुद्दों पर भी चर्चा की गई।
नागरिकों की सुरक्षा को सर्वोच्च प्राथमिकता देते हुए पुलिस विभाग द्वारा किए जा रहे विभिन्न उपायों, कार्यप्रणाली तथा जनसंपर्क से जुड़े उपक्रमों की जानकारी इस दौरान दी गई।
पुलिस प्रशासन और माध्यम प्रतिनिधियों के बीच प्रभावी संवाद से नागरिकों तक सटीक एवं अधिकृत जानकारी पहुंचाने में महत्वपूर्ण सहायता मिलती है। नागरिकों की सुरक्षा के साथ-साथ पारदर्शी, प्रभावी और उत्तरदायी संवाद बनाए रखने के लिए नागपुर शहर पुलिस सदैव प्रतिबद्ध है, यह बात पत्रकार वार्ता के दौरान रेखांकित की गई।
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.