युवाशक्तीतून विकसित भारताची स्वप्नपूर्ती -रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांचे प्रतिपादन -विद्यापीठात जिल्हास्तरीय छात्र संसद युवाशक्तीतून विकसित भारताची स्वप्नपूर्ती -रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांचे प्रतिपादन -विद्यापीठात जिल्हास्तरीय छात्र संसद नागपूर : युवाशक्तीच्या माध्यमातून विकसित भारताची स्वप्नपूर्ती शक्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिस यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराज बाग चौक स्थित दीक्षांत सभागृहात जिल्हास्तरीय छात्र संसद शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी पार पडली. भारत सरकारचे युवा कार्य व खेळ मंत्रालय, क्षेत्रीय निदेशालय पुणे, राष्ट्रीय सेवा योजना आणि माय भारत यांच्यावतीने आयोजित छात्र संसद मध्ये डॉ. पिसे बोलत होते. माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित छात्र संसद कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे, श्री नितीन मरसकोल्हे, दिपाली विजय टेकाम, श्री. नितीन कराळे, डॉ. रेणूबाली, श्री आशिष अग्रवाल यांची उपस्थिती होती. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 'आणीबाणीची ५० वर्ष लोकशाहीसाठी शिकवण' या विषयावर नागपूर जिल्ह्यातील छात्र संसद पार पडली. नागपूर जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयाने सहभाग नोंदवून विषयासंबंधीत अनेकांनी चर्चा घडवून आणली. आणीबाणी आणि तत्कालीन परिस्थिती, आणीबाणीची उलटून गेलेली ५० वर्ष आणि त्यातील सकारात्मकता आणि नकारात्मकता, जनसामान्यावर होणारा परिणाम दुष्परिणाम तसेच भारतीय लोकशाही चांगली की वाईट, राष्ट्राला दिलेली शिकवण, भविष्यकालीन दृष्टीने घेतलेला वेध अशा अनेक पैलूंवर सहभागी विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी भविष्यकालीन उपाय योजना, नागरिकांची कर्तव्यदक्षता आणि भूमिका अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकंदरीत १०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून श्री. नितीन मरसकोल्हे, दिपाली विजय टेकाम, श्री. नितीन कराळे, डॉ. रेणूबाली, श्री. आशिष अग्रवाल यांनी काम बघितले. आयोजक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे आणि माय भारतचे नागपूर जिल्हा संचालक श्री. शेखावत यांची भूमिका महत्त्वाची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश शुक्ला यांनी केले.
युवाशक्तीतून विकसित भारताची स्वप्नपूर्ती -रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांचे प्रतिपादन -विद्यापीठात जिल्हास्तरीय छात्र संसद युवाशक्तीतून विकसित भारताची स्वप्नपूर्ती -रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांचे प्रतिपादन -विद्यापीठात जिल्हास्तरीय छात्र संसद नागपूर : युवाशक्तीच्या माध्यमातून विकसित भारताची स्वप्नपूर्ती शक्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिस यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराज बाग चौक स्थित दीक्षांत सभागृहात जिल्हास्तरीय छात्र संसद शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी पार पडली. भारत सरकारचे युवा कार्य व खेळ मंत्रालय, क्षेत्रीय निदेशालय पुणे, राष्ट्रीय सेवा योजना आणि माय भारत यांच्यावतीने आयोजित छात्र संसद मध्ये डॉ. पिसे बोलत होते. माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित छात्र संसद कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे, श्री नितीन मरसकोल्हे, दिपाली विजय टेकाम, श्री. नितीन कराळे, डॉ. रेणूबाली, श्री आशिष अग्रवाल यांची उपस्थिती होती. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 'आणीबाणीची ५० वर्ष लोकशाहीसाठी शिकवण' या विषयावर नागपूर जिल्ह्यातील छात्र संसद पार पडली. नागपूर जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयाने सहभाग नोंदवून विषयासंबंधीत अनेकांनी चर्चा घडवून आणली. आणीबाणी आणि तत्कालीन परिस्थिती, आणीबाणीची उलटून गेलेली ५० वर्ष आणि त्यातील सकारात्मकता आणि नकारात्मकता, जनसामान्यावर होणारा परिणाम दुष्परिणाम तसेच भारतीय लोकशाही चांगली की वाईट, राष्ट्राला दिलेली शिकवण, भविष्यकालीन दृष्टीने घेतलेला वेध अशा अनेक पैलूंवर सहभागी विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी भविष्यकालीन उपाय योजना, नागरिकांची कर्तव्यदक्षता आणि भूमिका अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकंदरीत १०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून श्री. नितीन मरसकोल्हे, दिपाली विजय टेकाम, श्री. नितीन कराळे, डॉ. रेणूबाली, श्री. आशिष अग्रवाल यांनी काम बघितले. आयोजक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे आणि माय भारतचे नागपूर जिल्हा संचालक श्री. शेखावत यांची भूमिका महत्त्वाची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश शुक्ला यांनी केले.
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- वन वणव्याशी लढणाऱ्या स्थायी अस्थायी कर्मचारी अधिकारी यांच्या सन्मानासाठी... भिवापूरमध्ये पेटणार संघर्षाची मशाल! नागपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर/ भिवापूर: (दि १२) जंगल वाचवताना आपण आपले प्राण तळहातावर घेऊन वणव्याशी झुंज देतो, पण दुर्दैवाने वन प्रशासन आपल्या सुरक्षेकडे आणि हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यवतमाळच्या हिवरी येथील वनपाल विजय शिंगणजुडे यांची हृदयद्रावक घटना प्रशासकीय निष्काळजीपणाचा पुरावा आहे. वणवा विझवताना आधुनिक सुरक्षा साधने (Safety Kits) नसणे, प्रशासकीय छळ आणि अस्थायी कर्मचाऱ्यांचे मागील 6-7 महिन्यांपासून रखडलेले वेतन यांमुळे वन कर्मचारी अधिकारी यांचा संयम सुटत चालला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, 'महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना' तर्फे भिवापूरच्या भूमीत या धडक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ॥ सभेचे निमंत्रक व प्रमुख उपस्थिती ॥ प्रमुख पाहुणे: *मा. राजु दादा पारवे* (माजी आमदार तथा लोकनेते) * मार्गदर्शक: *मा. सचिन गायकवाड भारतीय* (संस्थापक अध्यक्ष व 12991+ वनसेवकांचे प्रतिनिधी) सभेचे मुख्य विषय (एजेंडा): 1.सुरक्षा साधने (Safety Kits): वणवा विझवताना 'फांद्या' सोडून आधुनिक उपकरणे व सुरक्षा किट्स तात्काळ मिळवण्याबाबतचा ठराव. 2 वेतन मुक्ती लढा: अस्थायी कर्मचारी यांचे मागील 6-7 महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ मिळवण्यासाठी प्रशासनावर दबाव. 3.अन्यायाविरुद्ध दाद: काही अधिकाऱ्यांकडून होणारी कर्मचाऱ्यांची छळवणूक व अन्यायाचे निवारण. 4.संघटन शक्ती: 'दक्षता सेने'ची भव्य सभासद नोंदणी व पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करणे. सभेचा तपशील: दिनांक: 14 March 2026 (शनिवार) वेळ: सकाळी 10:00 वाजता (ठिक) स्थळ: भिवापूर, जि. नागपूर. "आज नाही लढलो, तर कधीच जिंकणार नाही!" आपल्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी सर्व स्थायी व कार्यरत अस्थायी कर्मचाऱ्यांनी व तांत्रिक कारणाने बंद झालेले सर्व सहकारी, तसेच वनविभागातील वर्ग 2 ते वर्ग 4 च्या सर्व बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे.1
- Post by Ammar haider (ezaan)1
- वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.1