प्रशासनाच्या दिरंगाईला सडेतोड उत्तर घनसावंगी तालुक्यातील मुरमा, कंडारी, खालापुरी, पिंपरखेड, कोठी, अंतरवाली टेंभी, मुद्रेगाव आणि पाडुळी या गावांमध्ये पाण्यासाठी भीषण परिस्थिती निर्माण झाली प्रशासनाच्या दिरंगाईला सडेतोड उत्तर घनसावंगी तालुक्यातील मुरमा, कंडारी, खालापुरी, पिंपरखेड, कोठी, अंतरवाली टेंभी, मुद्रेगाव आणि पाडुळी या गावांमध्ये पाण्यासाठी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. विहिरींनी तळ गाठला, कूपनलिका कोरड्या पडल्या आणि मुकी जनावरं घासापाण्यासाठी तडफडत होती. वारंवार उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. विनंत्या केल्या, अर्ज दिले; पण जेव्हा प्रशासन कुंभकर्णी झोपेत असते, तेव्हा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघर्ष हाच एकमेव मार्ग उरतो. म्हणूनच शेकडो शेतकऱ्यांसह मध्यरात्री तीर्थपुरी येथील ‘एस्केप गेट’वर धडक देत जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून नारोळा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. आता या गावांतील नागरिकांना आणि मुक्या जनावरांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे — सामान्य जनतेच्या प्रश्नांवर जेव्हा जेव्हा असंवेदनशीलता दिसेल, तेव्हा तेव्हा सतीश घाटगे पाटील याच आक्रमक भूमिकेत रस्त्यावर उतरतील! शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि मुक्या प्राण्यांच्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष कायम राहील! नारोळा #घनसावंगी #जायकवाडी #पाणीप्रश्न #शेतकरी #सतीशघाटगेपाटील
प्रशासनाच्या दिरंगाईला सडेतोड उत्तर घनसावंगी तालुक्यातील मुरमा, कंडारी, खालापुरी, पिंपरखेड, कोठी, अंतरवाली टेंभी, मुद्रेगाव आणि पाडुळी या गावांमध्ये पाण्यासाठी भीषण परिस्थिती निर्माण झाली प्रशासनाच्या दिरंगाईला सडेतोड उत्तर घनसावंगी तालुक्यातील मुरमा, कंडारी, खालापुरी, पिंपरखेड, कोठी, अंतरवाली टेंभी, मुद्रेगाव आणि पाडुळी या गावांमध्ये पाण्यासाठी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. विहिरींनी तळ गाठला, कूपनलिका कोरड्या पडल्या आणि मुकी जनावरं घासापाण्यासाठी तडफडत होती. वारंवार उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. विनंत्या केल्या, अर्ज दिले; पण जेव्हा प्रशासन कुंभकर्णी झोपेत
असते, तेव्हा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघर्ष हाच एकमेव मार्ग उरतो. म्हणूनच शेकडो शेतकऱ्यांसह मध्यरात्री तीर्थपुरी येथील ‘एस्केप गेट’वर धडक देत जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून नारोळा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. आता या गावांतील नागरिकांना आणि मुक्या जनावरांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे — सामान्य जनतेच्या प्रश्नांवर जेव्हा जेव्हा असंवेदनशीलता दिसेल, तेव्हा तेव्हा सतीश घाटगे पाटील याच आक्रमक भूमिकेत रस्त्यावर उतरतील! शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि मुक्या प्राण्यांच्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष कायम राहील! नारोळा #घनसावंगी #जायकवाडी #पाणीप्रश्न #शेतकरी #सतीशघाटगेपाटील
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे प्रवचन संपवून परत येत असताना हल्ला झाल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांनी त्यांच्यावर शाईफेक करत पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध करत, दोषींवर कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.1
- हरियाणामुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आज पश्चिम बंगालला भेट दिली. यावेळी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीला नमन करत नवीन सरकारच्या स्थापनेबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील 'विकसित भारता'च्या संकल्पात पश्चिम बंगाल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.1
- पुण्यात वाहतूक नियंत्रित करताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा संयम सुटला. त्यांनी एका ट्रक चालकावर थेट दगड उगारला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.1
- महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.1
- बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.1
- छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्र. 2 नवजीवन कॉलनीत 20 लाख रुपये निधीतून सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन झाले. यावेळी नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनी मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.2
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे की, शेतकऱ्यांची वहिवाट बंद करता येणार नाही. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे पारंपरिक वहिवाटीचे हक्क कायम राहतील.1
- महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन पुकारण्यात आले. संतप्त आंदोलकांनी शासनाचा जीआर (सरकारी अध्यादेश) जाळून आपला निषेध नोंदवला.1