logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्री गरुड पुराणकथा (कथा प्रवक्ते) श्री.ह.भ.प. हनुमंत महाराज शिंदे. संपर्क :9529144913.

2 hrs ago
user_Hanumant Shinde
Hanumant Shinde
Voice of people बीड, बीड, महाराष्ट्र•
2 hrs ago

श्री गरुड पुराणकथा (कथा प्रवक्ते) श्री.ह.भ.प. हनुमंत महाराज शिंदे. संपर्क :9529144913.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • श्री गरुड पुराणकथा (कथा प्रवक्ते) श्री.ह.भ.प. हनुमंत महाराज शिंदे. संपर्क :9529144913.
    1
    श्री गरुड पुराणकथा (कथा प्रवक्ते) श्री.ह.भ.प. हनुमंत महाराज शिंदे.
संपर्क :9529144913.
    user_Hanumant Shinde
    Hanumant Shinde
    Voice of people बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • --- (प्रतिनिधी) :- आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील सुपुत्र व नवी मुंबई पनवेल येथून दैनिक युवक आधारच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संपादक संतोष शिवदास आमले यांना World Cultural and Educational Organisation तर्फे ‘Honorary Doctorate Award’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळाल्याने परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर संस्था भारत सरकार मान्यताप्राप्त असून, संस्थेच्या मूल्यांकन मंडळाने संचालक व अध्यक्ष यांच्या अधिकाराने हा सन्मान जाहीर केला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे निष्ठावान, धडाडीचे व समाजाभिमुख कार्य लक्षात घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आमले यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सामान्य जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखणीने समाजप्रबोधन घडवून आणत जनजागृतीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘दैनिक युवक आधार’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, विविध वर्तमानपत्रांमध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम पाहिले आहे. सध्या ते नवी मुंबई, पनवेल येथे वास्तव्यास असून ‘दैनिक युवक आधार’चे सर्व कामकाज ते समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि जनहिताचा ध्यास स्पष्टपणे दिसून येतो. पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता समाजसेवेचे प्रभावी साधन म्हणून त्यांनी जपले आहे. या सन्मानामुळे अंभोरा गावासह आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संतोष आमले यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळत असून, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
    1
    ---
(प्रतिनिधी) :- आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील सुपुत्र व नवी मुंबई पनवेल येथून दैनिक युवक आधारच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे  संपादक संतोष शिवदास आमले यांना World Cultural and Educational Organisation तर्फे ‘Honorary Doctorate Award’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळाल्याने परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर संस्था भारत सरकार मान्यताप्राप्त असून, संस्थेच्या मूल्यांकन मंडळाने संचालक व अध्यक्ष यांच्या अधिकाराने हा सन्मान जाहीर केला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे निष्ठावान, धडाडीचे व समाजाभिमुख कार्य लक्षात घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आमले यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सामान्य जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखणीने समाजप्रबोधन घडवून आणत जनजागृतीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘दैनिक युवक आधार’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, विविध वर्तमानपत्रांमध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम पाहिले आहे. सध्या ते नवी मुंबई, पनवेल येथे वास्तव्यास असून ‘दैनिक युवक आधार’चे सर्व कामकाज ते समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि जनहिताचा ध्यास स्पष्टपणे दिसून येतो. पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता समाजसेवेचे प्रभावी साधन म्हणून त्यांनी जपले आहे. या सन्मानामुळे अंभोरा गावासह आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संतोष आमले यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळत असून, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • वडवणी प्रतिनिधी - आज दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव आंधळे, शिवाजी सानप , मंच्छिद्रनाथ झाटे, संजय आंधळे उपस्थित होते.
    1
    वडवणी प्रतिनिधी - आज दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव आंधळे, शिवाजी सानप , मंच्छिद्रनाथ झाटे, संजय आंधळे उपस्थित होते.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    12 hrs ago
  • Post by Dr krishna karade
    1
    Post by Dr krishna karade
    user_Dr krishna karade
    Dr krishna karade
    वाशी, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • राजपूत वाडीत खळबळीनंतर महावितरणचे स्पष्टीकरण; बिघाड दुरुस्त, परिस्थिती नियंत्रणात जालना शहरातील राजपूत वाडी परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या ‘लाव्हा सदृश’ पदार्थ बाहेर येण्याच्या रहस्यमय घटनेचा अखेर उलगडा झाला असून ही घटना विद्युत गळतीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास विद्युत खांबाजवळील जमिनीतून गरम व चिकट पदार्थ बाहेर येताना दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. काहींनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहून त्याचे व्हिडिओही चित्रीत केले. तत्काळ महावितरण विभागाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या महावितरणच्या पथकाने तपास सुरू केला असता, ११ केव्ही सॅटेलाइट फीडरचा कंडक्टर खराब पिन इन्सुलेटरमुळे V-क्रॉस आर्म आणि RSJ पोलच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे विद्युतप्रवाह थेट जमिनीत गेल्याने (इलेक्ट्रोक्यूशन) तीव्र उष्णता निर्माण झाली. परिसरातील खडकाळ जमिनीमुळे या उष्णतेचा परिणाम म्हणून जमिनीतील खडक वितळून ‘लाव्हा सदृश’ स्वरूपात बाहेर येताना दिसले. त्यामुळे हा प्रकार नैसर्गिक नसून तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेत सुमारे दुपारी ४.४५ वाजेपर्यंत बिघाड दूर केला. त्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून सध्या परिसरातील परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अशा घटना आढळल्यास तात्काळ संबंधित विभागाला माहिती देण्याचे सांगितले आहे.
    1
    राजपूत वाडीत खळबळीनंतर महावितरणचे स्पष्टीकरण; बिघाड दुरुस्त, परिस्थिती नियंत्रणात
जालना शहरातील राजपूत वाडी परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या ‘लाव्हा सदृश’ पदार्थ बाहेर येण्याच्या रहस्यमय घटनेचा अखेर उलगडा झाला असून ही घटना विद्युत गळतीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास विद्युत खांबाजवळील जमिनीतून गरम व चिकट पदार्थ बाहेर येताना दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. काहींनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहून त्याचे व्हिडिओही चित्रीत केले. तत्काळ महावितरण विभागाला माहिती देण्यात आली.
घटनास्थळी दाखल झालेल्या महावितरणच्या पथकाने तपास सुरू केला असता, ११ केव्ही सॅटेलाइट फीडरचा कंडक्टर खराब पिन इन्सुलेटरमुळे V-क्रॉस आर्म आणि RSJ पोलच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे विद्युतप्रवाह थेट जमिनीत गेल्याने (इलेक्ट्रोक्यूशन) तीव्र उष्णता निर्माण झाली.
परिसरातील खडकाळ जमिनीमुळे या उष्णतेचा परिणाम म्हणून जमिनीतील खडक वितळून ‘लाव्हा सदृश’ स्वरूपात बाहेर येताना दिसले. त्यामुळे हा प्रकार नैसर्गिक नसून तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेत सुमारे दुपारी ४.४५ वाजेपर्यंत बिघाड दूर केला. त्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून सध्या परिसरातील परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अशा घटना आढळल्यास तात्काळ संबंधित विभागाला माहिती देण्याचे सांगितले आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    31 min ago
  • प्रतिनिधी जालना सेवा, समर्पण, आणि संघटन तत्वावर काम करत पक्ष अधिक मजबूत करण्याचे काम आमदार बबनराव लोणीकर यांचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार उत्कृष्ट काम करत आहे आमदार बबनराव लोणीकर आजच्या डिजिटल युगात पक्ष प्रशिक्षण महत्वाचे भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे भाजपाचा इतिहास हा संघर्षाचा महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे केंद्र व राज्याच्या योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त* किशोर आबा पवार भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा प्रवास “काल, आज आणि उद्या” या विषयावर माजी मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांनी अत्यंत सखोल मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना प्रेरित केले. ते परतूर येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते या वेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचा “काल” म्हणजे संघर्ष, त्याग आणि तत्त्वनिष्ठ राजकारणाचा कालखंड होता. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या “अंत्योदय” या विचारधारेवर चालत पक्षाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतला. त्या काळात पंडित दीनदयाल उपाध्याय शामाप्रसाद मुखर्जी यांचा जय संघ पासून सुरू झालेला प्रवास तदनंतर अटल बिहारी वाजपेयी , लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी प्रमोद जी महाजन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जनता पक्षाची पायाभरणी मजबूत केली. “आज”च्या काळात भाजप हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे, असे त्यांनी नमूद केले. राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार उत्कृष्ट काम करत असल्याचे सांगतानाच केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याचेही त्यांनी सांगितले. “उद्या”बाबत बोलताना लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. डिजिटल युगात पक्षाचा विस्तार करताना युवकांना मोठ्या प्रमाणात जोडणे, तसेच गावपातळीपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. जागतिक सद्य परिस्थितीवर भाष्य करताना बबनराव लोणीकर यांनी इराण-अमेरिका तणावाबाबतही आपले मत व्यक्त केले. त्यांनी स्पष्ट केले की इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा भारताच्या अंतर्गत परिस्थितीवर थेट परिणाम पुणे शक्य नसून जागतिक पातळीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय नीतीमुळे संपूर्ण जगप्रभात झाले आहे त्यामुळे या युद्धाचा कुठलाच परिणाम भारतावर होणार नसल्याचे ते म्हणाले पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण सध्या सक्षम व संतुलित असल्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय घडामोडींना तोंड देण्याची क्षमता देशात आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच भारताने नेहमीच शांतता आणि संवादाच्या मार्गाला प्राधान्य दिले असून, युद्धापेक्षा सहकार्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जागतिक स्तरावरील संघर्ष हे तात्पुरते असतात, मात्र देशांतर्गत विकास आणि स्थिरता अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. ऊर्जा, व्यापार आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये भारताने पर्यायी व्यवस्था उभी केली असल्यामुळे कोणत्याही तणावाचा कुठलाही परिणाम होणार नाही, भारतातील प्रगतीचा वेग कायम राहणार असून जागतिक संकटांचा त्यावर फारसा परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाची अंतर्गत शक्ती, युवा वर्ग आणि मजबूत नेतृत्व ही भारताची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारत स्थिर आणि सुरक्षित राहील, असा निष्कर्ष त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देत मोठा दिलासा दिला असून, शेतकऱ्यांना वीज माफी दिल्यामुळे ही मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला असल्याचे सांगतानाच विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील सरकार मोठ्या प्रमाणात काम करीत असल्याचे सांगितले त्याचा परिणाम म्हणून आपल्या भागामध्ये 300 गावाचे वॉटर ग्रीड, शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग, 14 तेहतीस के व्ही उपकेंद्र आपण उभारू शकलो असे सांगतानाच परतुर मतदारसंघातील जवळपास 42000 हजार घरकुल लाभार्थ्यांना आपण लाभ देऊ शकलो, मतदार संघातील तीनशे गावांमध्ये रस्ते बांधू शकलो, दलित वस्ती धनगर वस्ती, यासह तीनशेच्या आसपास सभा मंडपी आपण बांधू शकलो असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांनी पहिल्या सत्रामध्ये भाजपा कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षणा ची आवश्यकता व महत्त्व या विषयावर भाष्य करताना यांनी आपल्या भाषणात सांगितले की, केवळ पक्षाशी निष्ठा असून चालत नाही, तर कार्यकर्त्यांना विचारसरणी, संघटन पद्धती आणि आधुनिक राजकारणातील बदल यांचे ज्ञान असणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका स्पष्टपणे समजते आणि ते जनतेसमोर प्रभावीपणे मांडता येते, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया, संवाद कौशल्य आणि माहितीचे अचूक सादरीकरण ही कार्यकर्त्यांची मोठी ताकद बनली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने अद्ययावत राहून तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. तसेच निवडणूक व्यवस्थापन, बूथ पातळीवरील कामकाज, मतदारांशी संवाद आणि संघटन विस्तार या सर्व बाबींमध्ये प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका असते, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षित कार्यकर्ता हा पक्षाचा खरा आधारस्तंभ असतो आणि त्याच्यामुळेच पक्ष गावपातळीपर्यंत मजबूत होतो, असेही त्यांनी सांगितले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते आवश्यक असल्याचे अधोरेखित केले यावेळी जालना महानगरचे जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांनी यावेळी बोलताना यावेळी त्यांनी सांगितले की, भारतीय जनसंघ हा पक्ष राष्ट्रहित, संस्कृती आणि तत्त्वनिष्ठ राजकारण यासाठी ओळखला जात होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी निष्ठा आणि समर्पणाच्या बळावर पक्षाची मजबूत पायाभरणी केली. त्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष केला. त्या संघर्षातूनच पुढे भारतीय जनता पार्टी उदयास आली आणि राष्ट्रहिताच्या विचारांना अधिक व्यापक स्वरूप मिळाले. भास्करराव दानवे यांनी नमूद केले की, भाजपा ही केवळ राजकीय पक्ष नसून एक विचारधारा आहे, आज भाजपा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या नव्या शिखराकडे वाटचाल करत आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाचा इतिहास, विचारधारा आणि संघर्ष जाणून घेतल्यास त्यांच्यात काम करण्याची प्रेरणा अधिक वाढते, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक कार्यकर्त्याने जनसंघापासून भाजपा पर्यंतचा प्रवास समजून घेत पक्षवृद्धीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. मा जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार यांनी पोखरा योजना (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) विषयी माहिती देताना सांगितले की, ही योजना शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती टिकवण्यासाठी मोठा आधार देत आहे. जलसंधारण, मृदसंवर्धन आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळत असून, यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले पुढे बोलताना त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना चा उल्लेख करत गरीबांना स्वतःचे घर मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचे सांगितले राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना त्यांनी महालक्ष्मी योजना, शेतकरी सन्मान योजना तसेच विविध पाणीपुरवठा, रस्ते व पायाभूत सुविधा विकासाच्या योजनांचा उल्लेख केला. यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा सह भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे, महानगराध्यक्ष भास्करराव दानवे, माजी आमदार विलासराव देशमुख, युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षीताई पवार जालनाच्या महापौर वंदना मगरे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार,, भगवान मोरे अंकुशराव आवचार गणेश राव खवणे सतीश निर्वळ ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव नितीन राठोड शत्रुघ्न कणसे, विक्रम उफाड ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव, गजानन देशमुख, परतूरच्या नगराध्यक्ष प्रियंका राक्षे, मंठा नगराध्यक्ष वंदना बोराडे रमेश भापकर संपत टकले, शहाजी राक्षे वैजनाथ बोराडे पंजाबराव बोराडे दीपक बोराडे विलास घोडके आनंद जाधव, प्रवीण सातोनकर , दिलीप जोशी दया काटे दिलीप पवार पोपटराव खंदारे, संभाजी घनवट माऊली कोंडके अमोल मोरे अग्रवाल प्रकाश चव्हाण सावता काळे, दत्तात्रय काकडे विकास पालवे अजय अवचार शिवाजी जाधव संभाजी वारे तुकाराम सोळंके रवी सोळंके नागेश घारे , राहुल बाहेकर विनोद राठोड प्रदीप ढवळे दिगंबर मुजमुले भगवान आरडे बंडू मानवतकर, मधुकर मोरे संदीप बाहेकर, अमोल जोशी नसरुल्ला काकड आशिक कच्ची बबलू सातपुते , उमेश सोळंके जयश्री पवार रमेश थोरात, अर्जुन राठोड नितीन सरकटे नवनाथ खंदारे रामकिसन बोडके दत्ता खराबे सिद्धेश्वर केकान डॉ स्वप्निल मंत्री , सिद्धेश्वरला आणि अजित पोरवाल गणेश चव्हाण किरण अंभोरे राजाभाऊ खराबे कृष्णा आरगडे यांच्यासह मोठ्या संख्येने या दोन दिवशीय निवासी शिबिरासाठी उपस्थित आहेत
    4
    प्रतिनिधी जालना 
सेवा, समर्पण, आणि संघटन तत्वावर काम करत पक्ष अधिक मजबूत करण्याचे काम आमदार बबनराव लोणीकर यांचे आवाहन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार उत्कृष्ट काम करत आहे आमदार बबनराव लोणीकर
आजच्या डिजिटल युगात पक्ष प्रशिक्षण महत्वाचे
भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे भाजपाचा इतिहास हा संघर्षाचा
महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे केंद्र व राज्याच्या योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त*
किशोर आबा पवार
भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा प्रवास “काल, आज आणि उद्या” या विषयावर माजी मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांनी अत्यंत सखोल मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना प्रेरित केले.
ते परतूर येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते
या वेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचा “काल” म्हणजे संघर्ष, त्याग आणि तत्त्वनिष्ठ राजकारणाचा कालखंड होता. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या “अंत्योदय” या विचारधारेवर चालत पक्षाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतला. त्या काळात पंडित दीनदयाल उपाध्याय शामाप्रसाद मुखर्जी यांचा  जय संघ पासून सुरू झालेला प्रवास  तदनंतर अटल बिहारी वाजपेयी , लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी प्रमोद जी महाजन  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जनता पक्षाची पायाभरणी मजबूत केली.
“आज”च्या काळात भाजप हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे, असे त्यांनी नमूद केले. राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार उत्कृष्ट काम करत असल्याचे सांगतानाच केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
“उद्या”बाबत बोलताना लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. डिजिटल युगात पक्षाचा विस्तार करताना युवकांना मोठ्या प्रमाणात जोडणे, तसेच गावपातळीपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जागतिक सद्य परिस्थितीवर भाष्य करताना बबनराव लोणीकर यांनी इराण-अमेरिका तणावाबाबतही आपले मत व्यक्त केले.
त्यांनी स्पष्ट केले की इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा भारताच्या अंतर्गत परिस्थितीवर थेट परिणाम पुणे शक्य नसून जागतिक पातळीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय नीतीमुळे संपूर्ण जगप्रभात झाले आहे  त्यामुळे या युद्धाचा कुठलाच परिणाम भारतावर होणार नसल्याचे ते म्हणाले
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की
भारताची अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण सध्या सक्षम व संतुलित असल्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय घडामोडींना तोंड देण्याची क्षमता देशात आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच भारताने नेहमीच शांतता आणि संवादाच्या मार्गाला प्राधान्य दिले असून, युद्धापेक्षा सहकार्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जागतिक स्तरावरील संघर्ष हे तात्पुरते असतात, मात्र देशांतर्गत विकास आणि स्थिरता अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऊर्जा, व्यापार आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये भारताने पर्यायी व्यवस्था उभी केली असल्यामुळे कोणत्याही तणावाचा कुठलाही  परिणाम होणार नाही, 
भारतातील प्रगतीचा वेग कायम राहणार असून जागतिक संकटांचा त्यावर फारसा परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशाची अंतर्गत शक्ती, युवा वर्ग आणि मजबूत नेतृत्व ही भारताची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
यामुळे इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारत स्थिर आणि सुरक्षित राहील, असा निष्कर्ष त्यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देत मोठा दिलासा दिला असून, शेतकऱ्यांना वीज माफी दिल्यामुळे ही मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला असल्याचे सांगतानाच विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील सरकार मोठ्या प्रमाणात काम करीत असल्याचे सांगितले त्याचा परिणाम म्हणून आपल्या भागामध्ये 300 गावाचे वॉटर ग्रीड, शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग, 14 तेहतीस के व्ही उपकेंद्र आपण उभारू शकलो असे सांगतानाच परतुर मतदारसंघातील जवळपास 42000 हजार घरकुल लाभार्थ्यांना आपण लाभ देऊ शकलो, मतदार संघातील तीनशे गावांमध्ये रस्ते बांधू शकलो, दलित वस्ती धनगर वस्ती, यासह तीनशेच्या आसपास सभा मंडपी आपण बांधू शकलो असल्याचे त्यांनी सांगितले 
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांनी पहिल्या सत्रामध्ये भाजपा कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षणा ची आवश्यकता व महत्त्व या विषयावर भाष्य करताना
यांनी आपल्या भाषणात सांगितले की, केवळ पक्षाशी निष्ठा असून चालत नाही, तर कार्यकर्त्यांना विचारसरणी, संघटन पद्धती आणि आधुनिक राजकारणातील बदल यांचे ज्ञान असणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका स्पष्टपणे समजते आणि ते जनतेसमोर प्रभावीपणे मांडता येते, असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया, संवाद कौशल्य आणि माहितीचे अचूक सादरीकरण ही कार्यकर्त्यांची मोठी ताकद बनली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने अद्ययावत राहून तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.
तसेच निवडणूक व्यवस्थापन, बूथ पातळीवरील कामकाज, मतदारांशी संवाद आणि संघटन विस्तार या सर्व बाबींमध्ये प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका असते, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षित कार्यकर्ता हा पक्षाचा खरा आधारस्तंभ असतो आणि त्याच्यामुळेच पक्ष गावपातळीपर्यंत मजबूत होतो, असेही त्यांनी सांगितले.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते आवश्यक असल्याचे अधोरेखित केले
यावेळी जालना महानगरचे जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांनी यावेळी बोलताना 
यावेळी त्यांनी सांगितले की, भारतीय जनसंघ हा पक्ष राष्ट्रहित, संस्कृती आणि तत्त्वनिष्ठ राजकारण यासाठी ओळखला जात होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी निष्ठा आणि समर्पणाच्या बळावर पक्षाची मजबूत पायाभरणी केली.
त्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष केला. त्या संघर्षातूनच पुढे भारतीय जनता पार्टी उदयास आली आणि राष्ट्रहिताच्या विचारांना अधिक व्यापक स्वरूप मिळाले.
भास्करराव दानवे यांनी नमूद केले की, भाजपा ही केवळ राजकीय पक्ष नसून एक विचारधारा आहे,
आज भाजपा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या नव्या शिखराकडे वाटचाल करत आहे.
कार्यकर्त्यांनी पक्षाचा इतिहास, विचारधारा आणि संघर्ष जाणून घेतल्यास त्यांच्यात काम करण्याची प्रेरणा अधिक वाढते, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक कार्यकर्त्याने जनसंघापासून भाजपा पर्यंतचा प्रवास समजून घेत पक्षवृद्धीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मा जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार यांनी पोखरा योजना (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) विषयी माहिती देताना सांगितले की, ही योजना शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती टिकवण्यासाठी मोठा आधार देत आहे. जलसंधारण, मृदसंवर्धन आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळत असून, यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले
पुढे बोलताना त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना चा उल्लेख करत गरीबांना स्वतःचे घर मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचे सांगितले
राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना त्यांनी महालक्ष्मी योजना, शेतकरी सन्मान योजना तसेच विविध पाणीपुरवठा, रस्ते व पायाभूत सुविधा विकासाच्या योजनांचा उल्लेख केला.
यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा सह भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे, महानगराध्यक्ष भास्करराव दानवे, माजी आमदार विलासराव देशमुख, युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षीताई पवार जालनाच्या महापौर वंदना मगरे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार,, भगवान मोरे अंकुशराव आवचार गणेश राव खवणे सतीश निर्वळ ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव नितीन राठोड  शत्रुघ्न कणसे, विक्रम उफाड ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव, गजानन देशमुख, परतूरच्या नगराध्यक्ष प्रियंका राक्षे, मंठा नगराध्यक्ष वंदना बोराडे रमेश भापकर संपत टकले, शहाजी राक्षे वैजनाथ बोराडे पंजाबराव बोराडे दीपक बोराडे विलास घोडके आनंद जाधव, प्रवीण सातोनकर , दिलीप जोशी दया काटे दिलीप पवार पोपटराव खंदारे, संभाजी घनवट माऊली कोंडके अमोल मोरे अग्रवाल प्रकाश चव्हाण सावता काळे, दत्तात्रय काकडे विकास पालवे अजय अवचार शिवाजी जाधव संभाजी वारे तुकाराम सोळंके रवी सोळंके नागेश घारे , राहुल बाहेकर विनोद राठोड प्रदीप ढवळे दिगंबर मुजमुले भगवान आरडे बंडू मानवतकर, मधुकर मोरे संदीप बाहेकर, अमोल जोशी  नसरुल्ला काकड आशिक कच्ची बबलू सातपुते , उमेश सोळंके जयश्री पवार रमेश थोरात, अर्जुन राठोड नितीन सरकटे नवनाथ खंदारे रामकिसन बोडके दत्ता खराबे सिद्धेश्वर केकान डॉ स्वप्निल मंत्री , सिद्धेश्वरला आणि अजित  पोरवाल गणेश चव्हाण किरण अंभोरे राजाभाऊ खराबे कृष्णा आरगडे यांच्यासह मोठ्या संख्येने या दोन दिवशीय निवासी शिबिरासाठी उपस्थित आहेत
    user_Sudarshan Raut
    Sudarshan Raut
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Vijay Meher
    1
    Post by Vijay Meher
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Voice of people परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • एकाच अखंड हरिनाम सप्ताहातील दोन कीर्तनकारांची वेगवेगळ्या स्टाईलने एन्ट्री तुम्हाला कोणती आवडली हे नक्की कमेंट करून सांगा.
    1
    एकाच अखंड हरिनाम सप्ताहातील दोन कीर्तनकारांची वेगवेगळ्या स्टाईलने एन्ट्री तुम्हाला कोणती आवडली हे नक्की कमेंट करून सांगा.
    user_Hanumant Shinde
    Hanumant Shinde
    Voice of people बीड, बीड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.