logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात युवकांनी भव्य निदर्शने केली. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची तीव्र मागणी केली. आंदोलनादरम्यान "विद्यार्थ्यांना न्याय द्या", "शिक्षण वाचवा, भविष्य वाचवा" आणि "NEET परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा" अशा घोषणा देत युवकांनी आपला संताप व्यक्त केला. निदर्शनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व संबंधित मंत्रालयाला पाठवण्यासाठी निवेदन देण्यात आले. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वरोऱ्यातील हे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने पार पडले.

8 hrs ago
user_Disha News
Disha News
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
8 hrs ago

NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात युवकांनी भव्य निदर्शने केली. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची तीव्र मागणी केली. आंदोलनादरम्यान "विद्यार्थ्यांना न्याय द्या", "शिक्षण वाचवा, भविष्य वाचवा" आणि "NEET परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा" अशा घोषणा देत युवकांनी आपला संताप व्यक्त केला. निदर्शनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व संबंधित मंत्रालयाला पाठवण्यासाठी निवेदन देण्यात आले. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वरोऱ्यातील हे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने पार पडले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात युवकांनी भव्य निदर्शने केली. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची तीव्र मागणी केली. आंदोलनादरम्यान "विद्यार्थ्यांना न्याय द्या", "शिक्षण वाचवा, भविष्य वाचवा" आणि "NEET परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा" अशा घोषणा देत युवकांनी आपला संताप व्यक्त केला. निदर्शनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व संबंधित मंत्रालयाला पाठवण्यासाठी निवेदन देण्यात आले. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वरोऱ्यातील हे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने पार पडले.
    1
    NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात युवकांनी भव्य निदर्शने केली. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची तीव्र मागणी केली.

आंदोलनादरम्यान "विद्यार्थ्यांना न्याय द्या", "शिक्षण वाचवा, भविष्य वाचवा" आणि "NEET परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा" अशा घोषणा देत युवकांनी आपला संताप व्यक्त केला. निदर्शनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व संबंधित मंत्रालयाला पाठवण्यासाठी निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वरोऱ्यातील हे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने पार पडले.
    user_Disha News
    Disha News
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • चंद्रपूर जिल्ह्यातील घुघुस आणि लगतच्या परिसराला लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीच्या प्रदूषणाचा मोठा फटका बसला आहे. कंपनीच्या विषारी रसायनांमुळे वर्धा नदीचे पाणी गंभीररीत्या प्रदूषित झाले असून उसगाव परिसरातील तब्बल १०० एकर शेतजमिनीतील पिके जळून खाक झाली आहेत. याप्रकरणी कारखान्याची पर्यावरण मंजुरी रद्द करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. संजीवनी पर्यावरण संस्था आणि बाधित शेतकऱ्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. कंपनीवर कडक कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देत त्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आत्मदहनाची परवानगी मागितली आहे.
    1
    चंद्रपूर जिल्ह्यातील घुघुस आणि लगतच्या परिसराला लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीच्या प्रदूषणाचा मोठा फटका बसला आहे. कंपनीच्या विषारी रसायनांमुळे वर्धा नदीचे पाणी गंभीररीत्या प्रदूषित झाले असून उसगाव परिसरातील तब्बल १०० एकर शेतजमिनीतील पिके जळून खाक झाली आहेत.

याप्रकरणी कारखान्याची पर्यावरण मंजुरी रद्द करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. संजीवनी पर्यावरण संस्था आणि बाधित शेतकऱ्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. कंपनीवर कडक कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देत त्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आत्मदहनाची परवानगी मागितली आहे.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • वणी शहरात कावडे हॉस्पिटलच्या रूपाने आधुनिक आरोग्यसेवेला एक नवी दिशा मिळाली आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून वणीतील आरोग्य सेवेच्या क्षेत्रात आधुनिक वैद्यकीय सुविधांचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
    1
    वणी शहरात कावडे हॉस्पिटलच्या रूपाने आधुनिक आरोग्यसेवेला एक नवी दिशा मिळाली आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून वणीतील आरोग्य सेवेच्या क्षेत्रात आधुनिक वैद्यकीय सुविधांचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    4 hrs ago
  • वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी आणि NEET पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत महात्मा गांधी पुतळ्याजवळ तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान NEET पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
    1
    वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी आणि NEET पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत महात्मा गांधी पुतळ्याजवळ तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान NEET पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • आहारात फायबरचे प्रमाण कमी असणे हे मधुमेह (साखर), पोटाच्या समस्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा डॉ. मेहर अब्बास यांनी दिला आहे. योग्य सल्ल्यानेच निरोगी आयुष्याची सुरुवात होते, त्यामुळे प्रत्येकाने आजपासूनच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. डॉ. मेहर अब्बास यांच्या माध्यमातून विविध आरोग्य समस्यांवर योग्य आणि सुरक्षित समाधान मिळवता येऊ शकते. यामध्ये हृदयविकार, मधुमेह, किडनीचे विकार, लिव्हरचे आजार तसेच फुफ्फुसाचे विकार (दमा आणि टीबी) यांसारख्या आजारांचा समावेश आहे. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्यासाठी +91 9125734374 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    आहारात फायबरचे प्रमाण कमी असणे हे मधुमेह (साखर), पोटाच्या समस्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा डॉ. मेहर अब्बास यांनी दिला आहे. योग्य सल्ल्यानेच निरोगी आयुष्याची सुरुवात होते, त्यामुळे प्रत्येकाने आजपासूनच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

डॉ. मेहर अब्बास यांच्या माध्यमातून विविध आरोग्य समस्यांवर योग्य आणि सुरक्षित समाधान मिळवता येऊ शकते. यामध्ये हृदयविकार, मधुमेह, किडनीचे विकार, लिव्हरचे आजार तसेच फुफ्फुसाचे विकार (दमा आणि टीबी) यांसारख्या आजारांचा समावेश आहे. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्यासाठी +91 9125734374 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    17 hrs ago
  • भिवापूर आणि उमरेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व तालुका वतीने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासाला आणि शेवटच्या माणसाच्या कल्याणाला प्राधान्य दिले; जनतेशी जोडलेली त्यांची नाळ, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, विकासाविषयीची दूरदृष्टी आणि कार्यकर्त्यांवरील निस्सीम प्रेम यामुळे लाखो लोकांच्या हृदयात त्यांनी कायमचे स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नागपूर माजी जिल्हाध्यक्ष राजुभाऊ राऊत, नगर पंचायत उपाध्यक्ष रुचित पंजलवार, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक नाजिम बेग, तालुका अध्यक्ष अशोक गोंगल, युवा नेते पवन राऊत, डॉ. राहुल राऊत, तभाने, दिनेश बडनाग, अर्जुन ठाकरे, रोहित खेटमाली यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    भिवापूर आणि उमरेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व तालुका वतीने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासाला आणि शेवटच्या माणसाच्या कल्याणाला प्राधान्य दिले; जनतेशी जोडलेली त्यांची नाळ, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, विकासाविषयीची दूरदृष्टी आणि कार्यकर्त्यांवरील निस्सीम प्रेम यामुळे लाखो लोकांच्या हृदयात त्यांनी कायमचे स्थान निर्माण केले आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नागपूर माजी जिल्हाध्यक्ष राजुभाऊ राऊत, नगर पंचायत उपाध्यक्ष रुचित पंजलवार, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक नाजिम बेग, तालुका अध्यक्ष अशोक गोंगल, युवा नेते पवन राऊत, डॉ. राहुल राऊत, तभाने, दिनेश बडनाग, अर्जुन ठाकरे, रोहित खेटमाली यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • माजी आमदार सुधीर पारवे यांच्या उमरेड मतदारसंघातील विविध गावांमध्ये १० हजार झाडे लावण्याच्या संकल्पनेतून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक २ जुना धान्यगंज येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सुधीर पारवे फाउंडेशन, लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्था (भिवापूर) आणि भारतीय जनता पार्टी उमरेड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन व हरित भविष्याचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. हा वृक्षारोपण कार्यक्रम “एक पेड, माँ के नाम” या संकल्पनेखाली पार पडला. या अभियानाअंतर्गत वड, पिंपळ, कडूनिंब, आवळा, जांभूळ, करंजी आणि उंबर यांसारख्या विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष व गटनेते सतीश चौधरी, आरोग्य व स्वच्छता विभाग सभापती वैष्णवी लाडेकर, शिक्षण सभापती वैशालीताई राजेश बांदरे, नगरसेवक प्रणय मधुकर मेश्राम, महामंत्री राकेश नौकरकर, महामंत्री गिरीश लेंडे, अमितजी लाडेकर, तुषारजी ढोरे, विशालजी बेले, बालाजी मुंगले, राजूजी वाघमारे, निखिलजी नकाते, संजयजी नखाते, विश्लेष चकोले आणि हिमांशू बहादुरे यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    माजी आमदार सुधीर पारवे यांच्या उमरेड मतदारसंघातील विविध गावांमध्ये १० हजार झाडे लावण्याच्या संकल्पनेतून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक २ जुना धान्यगंज येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सुधीर पारवे फाउंडेशन, लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्था (भिवापूर) आणि भारतीय जनता पार्टी उमरेड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन व हरित भविष्याचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

हा वृक्षारोपण कार्यक्रम “एक पेड, माँ के नाम” या संकल्पनेखाली पार पडला. या अभियानाअंतर्गत वड, पिंपळ, कडूनिंब, आवळा, जांभूळ, करंजी आणि उंबर यांसारख्या विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.

या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष व गटनेते सतीश चौधरी, आरोग्य व स्वच्छता विभाग सभापती वैष्णवी लाडेकर, शिक्षण सभापती वैशालीताई राजेश बांदरे, नगरसेवक प्रणय मधुकर मेश्राम, महामंत्री राकेश नौकरकर, महामंत्री गिरीश लेंडे, अमितजी लाडेकर, तुषारजी ढोरे, विशालजी बेले, बालाजी मुंगले, राजूजी वाघमारे, निखिलजी नकाते, संजयजी नखाते, विश्लेष चकोले आणि हिमांशू बहादुरे यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Nisha Jambhule
    Nisha Jambhule
    भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • यवतमाळच्या वणी येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या तीव्र निषेधार्थ AISF च्या वतीने भर पावसात पुकारण्यात आलेले आंदोलन यशस्वी ठरले आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या या कारवाईच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आणि भर पावसातही आक्रमक पवित्रा घेत कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पार पाडले.
    1
    यवतमाळच्या वणी येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या तीव्र निषेधार्थ AISF च्या वतीने भर पावसात पुकारण्यात आलेले आंदोलन यशस्वी ठरले आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या या कारवाईच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आणि भर पावसातही आक्रमक पवित्रा घेत कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पार पाडले.
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.