बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सांग शिरला नेमाने येथील शेतकऱ्यांना बियाण्यामुळे मोठा फटका बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील शेतकऱ्यांना बियाण्यामुळे मोठा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चुकीच्या वाणाच्या बियाण्यामुळे टरबूज पिकाचे तब्बल पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिर्ला नेमाने येथील शेतकरी किरण प्रताप चव्हाण, अनिकेत नेमाने आणि अक्षय नेमाने यांनी देऊळगाव मही येथील गणेश कृषी केंद्रातून सागर बायो प्रा. लि. कंपनीचे EXPERT वाण खरेदी केले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी प्रत्यक्षात सागर किंग प्लस हे टरबूज वाण मागितले होते. मात्र कृषी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी EXPERT वाण चांगले उत्पादन देते असे सांगून तेच बियाणे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी बियाणे खरेदी करून १० डिसेंबरला पेरणी केली. पेरणीनंतर जवळपास ९० दिवस पूर्ण झाले, मात्र टरबूज फळाचे वजन केवळ २०० ग्रॅम ते १ किलो इतकेच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सामान्यतः या कालावधीत टरबूजाचे वजन ५ ते ६ किलो पर्यंत वाढणे अपेक्षित असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी सुमारे ०.८० हेक्टर क्षेत्रावर टरबूज लागवड केली होती आणि आतापर्यंत अडीच लाख रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. या शेतीतून ३५ टन उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र पिकाची वाढ न झाल्याने संपूर्ण गुंतवणूक धोक्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी सुनील पवार, गुण नियंत्रण अधिकारी अमोल बंड आणि दत्तात्रय काळे यांनी शेतात जाऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी सांगितले की, २ मार्च रोजी तक्रार मिळाल्यानंतर शास्त्रज्ञांच्या टीमसह शेतात जाऊन पाहणी करण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून माहिती देण्यात आली असून पुढील कारवाईसाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, शेतकरी किरण चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही सागर किंग प्लस वाण मागितले होते, मात्र सागर एक्सपर्ट वाण देण्यात आले. पिकाची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर चौकशी करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सांग शिरला नेमाने येथील शेतकऱ्यांना बियाण्यामुळे मोठा फटका बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील शेतकऱ्यांना बियाण्यामुळे मोठा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चुकीच्या वाणाच्या बियाण्यामुळे टरबूज पिकाचे तब्बल पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिर्ला नेमाने येथील शेतकरी किरण प्रताप चव्हाण, अनिकेत नेमाने आणि अक्षय नेमाने यांनी देऊळगाव मही येथील गणेश कृषी केंद्रातून सागर बायो प्रा. लि. कंपनीचे EXPERT वाण खरेदी केले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी प्रत्यक्षात सागर किंग प्लस हे टरबूज वाण मागितले होते. मात्र कृषी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी EXPERT वाण चांगले उत्पादन देते असे सांगून तेच बियाणे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी बियाणे खरेदी करून १० डिसेंबरला पेरणी केली. पेरणीनंतर जवळपास ९० दिवस पूर्ण झाले, मात्र टरबूज फळाचे वजन केवळ २०० ग्रॅम ते १ किलो इतकेच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सामान्यतः या कालावधीत टरबूजाचे वजन ५ ते ६ किलो पर्यंत वाढणे अपेक्षित असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी सुमारे ०.८० हेक्टर क्षेत्रावर टरबूज लागवड केली होती आणि आतापर्यंत अडीच लाख रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. या शेतीतून ३५ टन उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र पिकाची वाढ न झाल्याने संपूर्ण गुंतवणूक धोक्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी सुनील पवार, गुण नियंत्रण अधिकारी अमोल बंड आणि दत्तात्रय काळे यांनी शेतात जाऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी सांगितले की, २ मार्च रोजी तक्रार मिळाल्यानंतर शास्त्रज्ञांच्या टीमसह शेतात जाऊन पाहणी करण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून माहिती देण्यात आली असून पुढील कारवाईसाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, शेतकरी किरण चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही सागर किंग प्लस वाण मागितले होते, मात्र सागर एक्सपर्ट वाण देण्यात आले. पिकाची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर चौकशी करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- खामगाव : शहराच्या मुख्य भागातील बर्डे कॉम्प्लेक्ससमोरील नाली चोकअप झाल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना या घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या भागातील नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे त्या पूर्णपणे तुंबल्या आहेत. परिणामी, सांडपाण्याचा निचरा होण्याऐवजी ते पाणी मुख्य रस्त्यावर साचत आहे. रस्त्यावर साचलेल्या या घाण पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.विशेषतः पादचाऱ्यांना या घाण पाण्यातून पाय तुडवत मार्ग काढावा लागत असल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.येथील व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी तक्रार केली आहे की, ही समस्या वारंवार उद्भवत असूनही नगरपालिका प्रशासनाकडून याकडे कायमस्वरूपी लक्ष दिले जात नाही.चोकअप झालेली नाली तात्काळ मोकळी करून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी आता जोर धरत आहे.नगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन या समस्येतून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.1
- परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण : आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई! (अमरावती - १५ एप्रिल २०२६) परतवाडा (अमरावती) : अल्पवयीन मुलींना सोशल मीडियावरून फसवून लैंगिक शोषण, ब्लॅकमेल आणि ३५०+ अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याच्या धक्कादायक प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर (१९ वर्षे, उर्फ आयान अहमद तनवीर) याच्या घराचा अतिक्रमित भाग आज बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आला. मुख्य घटना: अतिक्रमित बांधकाम पाडले: अचलपूर नगर परिषदेच्या बुलडोझरने घराचा लोखंडी जिना आणि पहिल्या मजल्याचा काही भाग पाडला. पूर्ण घर नव्हे, तर फक्त अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. आधी नोटीस देण्यात आली होती.38d499 भाजप आमदार उपस्थित: आमदार प्रवीण तायडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली. परिसरात मोठी पोलिस तैनाती होती.70f5d5 प्रकरणाची पार्श्वभूमी: आरोपीने व्हॉट्सअप, स्नॅपचॅट द्वारे १८०+ अल्पवयीन मुलींना “लव्ह ट्रॅप” मध्ये फसवले. मुंबई-पुणे येथे नेऊन अश्लील व्हिडिओ बनवले, ब्लॅकमेल केले आणि व्हायरल केले. आतापर्यंत ८+ बळी ओळखले गेले, शेकडो व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात. POCSO Act, IT Act, BNS 294 अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपीसह ४ जण अटक; इतरांवर तपास सुरू.334c3d प्रतिक्रिया: परतवाडा-अचलपूरमध्ये बंद पाळला गेला. मोठा जन-रोष, SIT चौकशीची मागणी. खासदार अनिल बोंडे यांनीही प्रकरण गंभीर घेतले. पोलिसांनी सांगितले: तपास सुरू असून आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. पीडित मुलींची ओळख पटवणे आणि फॉरेन्सिक तपास चालू आहे. !1
- Post by Jansagar 9 Marathi1
- सिल्लोड शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले भाषण व अनेक वर्षापासून निमित्त महापुरुषांच्या जयंती निमित्त ते भाषण करतात मात्र अनेक वर्षांचा अनुभव यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला आहे1
- अंधारीत भीमजयंतीचा उत्साह; ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन सिल्लोड (प्रतिनिधी): सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले. पुष्पहार अर्पण व अभिवादन सोहळा कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण मंडळांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी 'जय भीम'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सामाजिक सलोख्याचे दर्शन यावेळी बोलताना मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. "केवळ उत्सव म्हणून नव्हे, तर बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल," असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.3
- संत नगरी शेगाव तापले! ४१°C च्या उकाड्याने नागरिक हैराण शेगाव (प्रतिनिधी): संत नगरी शेगावमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाने तब्बल ४० ते ४१ अंश सेल्सियस गाठल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रखर उन्हामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास ओस पडलेले दिसत असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळले आहे. दुपारच्या वेळेत सूर्याची कडक किरणे अंगावर झोंबत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्ग विशेष त्रस्त झाला आहे. बाजार मार्केट,चौक-चौकात, तसेच शेगांव -खामगांव रोड नेहमीची वर्दळ कमी झाली असून,हॉटेल,कापडं मार्केट,चौपाटी स्टॊल,व्यावसायिक यांना उकाड्याचा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि हलका आहार घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संत नगरीत उन्हाचा कहर सुरूच; पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता!1
- Post by Swal Jansamannyaca ...1
- मका विक्रीसाठी आणला, पण बाजाराबाहेरच थांबला शेतकऱ्यांचा संताप उसळला1
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीत जल्लोष; आमदार किशोर आप्पा पाटील यांचा खांद्यावर घेत नृत्य, कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट पाचोरा/भडगाव (प्रतिनिधी) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यात अभूतपूर्व उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम, तसेच सांस्कृतिक उपक्रमांद्वारे नागरिकांनी मोठ्या जल्लोषात जयंती साजरी केली. या मिरवणुकीत पाचोरा-भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरणात रंग भरला. विशेष म्हणजे ढोल-ताशांच्या गजरात व गाण्यांच्या तालावर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत नृत्य केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतल्यावरही त्यांनी आनंदाने डान्स करत जल्लोषात भर टाकली. त्यांचे सुपुत्र, नगरसेवक तसेच शिवसेना गटनेते यांनी देखील मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. या प्रसंगी युवकांमध्ये विशेष ऊर्जा दिसून आली असून, संपूर्ण परिसर आंबेडकरमय झाल्याचे चित्र होते. जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले. सामाजिक एकात्मता, बंधुता आणि समतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. एकूणच, यंदाची आंबेडकर जयंती पाचोरा-भडगाव तालुक्यात उत्साह, एकजूट आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.1