आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यावर भाजप आक्रमक; कारवाईची मागणी खुलताबाद : गंगापूर येथे १५ सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांच्याबद्दल काही शिक्षकांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून अपशब्द व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत खुलताबाद पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. घटनेचे उपलब्ध व्हिडिओ, ऑडिओ तसेच इतर पुरावे तपासून संबंधित व्यक्तींची ओळख पटवावी व त्यांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. चौकशीअंती आरोपात तथ्य आढळल्यास लागू कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सामाजिक वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपनगअध्यक्ष नवनाथ बारगळ दिनेश अंभोरे, शहराध्यक्ष परसराम बारगळ, सुरेश मरकड, उमेश आवारे सतीश दांडेकर, अमोल गवळी, भाऊसाहेब बारगळ, दत्ता मालोदे ,राहुल हजारे अरुण अधाने, शंकर अंभोरे सय्यद अझहर आदी उपस्थित होते.
आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यावर भाजप आक्रमक; कारवाईची मागणी खुलताबाद : गंगापूर येथे १५ सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांच्याबद्दल काही शिक्षकांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून अपशब्द व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी
केली आहे. याबाबत खुलताबाद पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. घटनेचे उपलब्ध व्हिडिओ, ऑडिओ तसेच इतर पुरावे तपासून संबंधित व्यक्तींची ओळख पटवावी व त्यांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. चौकशीअंती आरोपात तथ्य आढळल्यास लागू कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सामाजिक वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता
असल्याने पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपनगअध्यक्ष नवनाथ बारगळ दिनेश अंभोरे, शहराध्यक्ष परसराम बारगळ, सुरेश मरकड, उमेश आवारे सतीश दांडेकर, अमोल गवळी, भाऊसाहेब बारगळ, दत्ता मालोदे ,राहुल हजारे अरुण अधाने, शंकर अंभोरे सय्यद अझहर आदी उपस्थित होते.
- पाटोदा येथील विठ्ठल-रुक्मिणी मठात गुरु-महंतांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती चिंताजनक बनली आहे, तब्येत खालावत असल्याने गुरु-महंतांनी आग्रह केला. डॉक्टरांच्या सल्ल्याने पाटलांना एक सलाईन लावण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.1
- आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यावर भाजप आक्रमक; कारवाईची मागणी खुलताबाद : गंगापूर येथे १५ सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांच्याबद्दल काही शिक्षकांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून अपशब्द व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत खुलताबाद पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. घटनेचे उपलब्ध व्हिडिओ, ऑडिओ तसेच इतर पुरावे तपासून संबंधित व्यक्तींची ओळख पटवावी व त्यांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. चौकशीअंती आरोपात तथ्य आढळल्यास लागू कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सामाजिक वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपनगअध्यक्ष नवनाथ बारगळ दिनेश अंभोरे, शहराध्यक्ष परसराम बारगळ, सुरेश मरकड, उमेश आवारे सतीश दांडेकर, अमोल गवळी, भाऊसाहेब बारगळ, दत्ता मालोदे ,राहुल हजारे अरुण अधाने, शंकर अंभोरे सय्यद अझहर आदी उपस्थित होते.3
- आपला गणेश मंडळ जरीपुरचा राजा गणरायाचे धुमधडाक्यात आगमन1
- गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगर : गणपती बाप्पाच्या मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिला आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेली दोन सोन्याची मंगळसूत्रे, असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास शिवनेरी कॉलनी, विजयनगर परिसरातील मंगल पोपटवाड चव्हाण या महिला गणपतीची मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित महिलांची माहिती मिळवली. त्यानुसार पूजा राहुल पवार (वय २१), सुनीता दिलीप काळे (वय ३५) आणि मुस्कान राघव पवार (वय ३५), सर्व रा. ह.मु. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर, यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी महिलांनी गजानन महाराज मंदिर परिसरातून मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन सोन्याची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०८/२०२६, कलम ३०३ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिसमंडळ-२ रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त उमामहेश्वर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार मारोती गोरे, कपिल खिल्लारे, राजेंद्र शिंदे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका शिरसाठ, पूनम साळवे व पूजा लेनके यांनी केली. गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.4
- सिल्लोड मध्ये पैठणी उद्योग उभारण्यासाठी आमदार सातारांचा पुढाकार येवला येथील कापसे पैठणी फॅक्टरीला भेट; रोजगारनिर्मितीच्या संधींचा घेतला आढावा सिल्लोड (प्रतिनिधी) सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिल्लोड येथे पैठणी उद्योग सुरू करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने त्यांनी येवला, जि. नाशिक येथे कापसे फाउंडेशनच्या ‘कापसे पैठणी’ फॅक्टरीला भेट देऊन पैठणी उत्पादन प्रक्रिया, उद्योगाचे स्वरूप तसेच रोजगारनिर्मितीच्या संधींची माहिती जाणून घेतली. तसेच आमदार अब्दुल सत्तार यांनी फॅक्टरीतील विणकर कामगारांशी संवाद साधून त्यांच्या कामाची पद्धत, अडचणी तसेच रोजगाराच्या संधींबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी कापसे पैठणीचे संचालक बाळकृष्ण कापसे यांनी पैठणी उत्पादनाबाबत सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे या फॅक्टरीमध्ये दिव्यांग, निराधार, मूकबधिर तसेच विधवा महिलांना रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचे काम केले जात असल्याचे आमदार सत्तार यांनी पाहिले. या उपक्रमाचे कौतुक करताना अशा माध्यमातून गरजू महिलांना रोजगाराचा आधार मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. सिल्लोड येथील नॅशनल सहकारी सूतगिरणी येत्या काही दिवसांत सुरू होणार असून, त्यानंतर ‘कापूस ते कापड’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने पैठणी उद्योग महत्त्वाचा ठरू शकतो. सिल्लोड-सोयगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण कापसाचे उत्पादन होत असल्याने या उद्योगासाठी स्थानिक पातळीवर अनुकूल वातावरण असल्याची चर्चा यावेळी झाली. आमदार सत्तार यांनी नॅशनल सहकारी सूतगिरणीबाबतही बाळकृष्ण कापसे यांना माहिती दिली. कापसे पैठणीच्या प्रकल्पाची पाहणी करून हा उपक्रम शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून, शासनाचे सहकार्य मिळाल्यास महिला, दिव्यांग, निराधार तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिल्लोडमध्ये मोठा उपक्रम उभा राहू शकतो, असा विश्वास आमदार सत्तार यांनी व्यक्त केला. सिल्लोड येथे पैठणी उद्योग उभारण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करण्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार सत्तार यांनी येवला येथील प्रसिद्ध पंडित पैठणी दुकानालाही सदिच्छा भेट देऊन पैठणी उद्योगातील बाजारपेठ, मागणी आणि ग्राहकांच्या पसंतीबाबत माहिती घेतली. यावेळी माजी उद्योग संचालक डॉ. जे. के. जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज राठोड, सिल्लोड शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पाटील गाढे, माजी पंचायत समिती उपसभापती अजिज शेठ बागवान, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक सयाजीराव वाघ, भोकरदन चे माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ हराळ, शकील जहागिरदार, रिजवान शेख आदी उपस्थित होते.1
- जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, ठाकरेंची आमदार अंबादास दानवे लाईव्ह1
- प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!1
- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेचा ट्रक पलटी; पोती लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड! यवतमाळ-कळंब रोडवर साखरेने भरलेला ट्रक पलटी झाला. अपघातानंतर ट्रकमधील साखरेची पोती रस्त्यावर विखुरली. मात्र, अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी काही नागरिकांनी साखरेची पोती उचलून नेण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांच्या या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.1