logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

2 hrs ago
user_Harshal patil
Harshal patil
धुळे, धुळे, महाराष्ट्र•
2 hrs ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Harshal patil
    2
    Post by Harshal patil
    user_Harshal patil
    Harshal patil
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • काल विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक नेत्रदीपक क्षण अनुभवायला मिळाला. वस्ताद कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील व त्यांचे चिरंजीव नगरसेवक सुमित दादा पाटील यांनी लेझीमच्या तालात सहभाग घेतला. तो फक्त लेझीम नव्हता, तर बाबासाहेबांप्रती निस्सीम कृतज्ञता, आदर आणि आत्मीयतेची जिवंत अभिव्यक्ती होती. सर्वजण एकात्मतेची भावनेत एकरूप झाले. आप्पासाहेबांचा खांद्याला खांदा लावून घेतलेला सहभाग हा “समतेचा जिवंत अनुभव” होता. बाबासाहेबांच्या विचारांचा खरा अर्थ त्या क्षणी प्रत्येकाला जाणवला. हा अनुभव शब्दांत मावत नाही, पण आयुष्यभर लक्षात राहील ®️🅿️✍️🙏
    1
    काल विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक नेत्रदीपक क्षण अनुभवायला मिळाला. 
वस्ताद कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील व त्यांचे  चिरंजीव नगरसेवक सुमित दादा पाटील यांनी लेझीमच्या तालात सहभाग घेतला. तो फक्त लेझीम नव्हता, तर बाबासाहेबांप्रती निस्सीम कृतज्ञता, आदर आणि आत्मीयतेची जिवंत अभिव्यक्ती होती. 
सर्वजण एकात्मतेची भावनेत एकरूप झाले. आप्पासाहेबांचा खांद्याला खांदा लावून घेतलेला सहभाग हा “समतेचा जिवंत अनुभव” होता. 
बाबासाहेबांच्या विचारांचा खरा अर्थ त्या क्षणी प्रत्येकाला जाणवला. हा अनुभव शब्दांत मावत नाही, पण आयुष्यभर लक्षात राहील ®️🅿️✍️🙏
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीत जल्लोष; आमदार किशोर आप्पा पाटील यांचा खांद्यावर घेत नृत्य, कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट पाचोरा/भडगाव (प्रतिनिधी) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यात अभूतपूर्व उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम, तसेच सांस्कृतिक उपक्रमांद्वारे नागरिकांनी मोठ्या जल्लोषात जयंती साजरी केली. या मिरवणुकीत पाचोरा-भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरणात रंग भरला. विशेष म्हणजे ढोल-ताशांच्या गजरात व गाण्यांच्या तालावर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत नृत्य केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतल्यावरही त्यांनी आनंदाने डान्स करत जल्लोषात भर टाकली. त्यांचे सुपुत्र, नगरसेवक तसेच शिवसेना गटनेते यांनी देखील मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. या प्रसंगी युवकांमध्ये विशेष ऊर्जा दिसून आली असून, संपूर्ण परिसर आंबेडकरमय झाल्याचे चित्र होते. जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले. सामाजिक एकात्मता, बंधुता आणि समतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. एकूणच, यंदाची आंबेडकर जयंती पाचोरा-भडगाव तालुक्यात उत्साह, एकजूट आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
    1
    महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीत जल्लोष; आमदार किशोर आप्पा पाटील यांचा खांद्यावर घेत नृत्य, कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट
पाचोरा/भडगाव (प्रतिनिधी) :
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यात अभूतपूर्व उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम, तसेच सांस्कृतिक उपक्रमांद्वारे नागरिकांनी मोठ्या जल्लोषात जयंती साजरी केली.
या मिरवणुकीत पाचोरा-भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरणात रंग भरला. विशेष म्हणजे ढोल-ताशांच्या गजरात व गाण्यांच्या तालावर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत नृत्य केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतल्यावरही त्यांनी आनंदाने डान्स करत जल्लोषात भर टाकली.
त्यांचे सुपुत्र, नगरसेवक तसेच शिवसेना गटनेते यांनी देखील मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. या प्रसंगी युवकांमध्ये विशेष ऊर्जा दिसून आली असून, संपूर्ण परिसर आंबेडकरमय झाल्याचे चित्र होते.
जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले. सामाजिक एकात्मता, बंधुता आणि समतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
एकूणच, यंदाची आंबेडकर जयंती पाचोरा-भडगाव तालुक्यात उत्साह, एकजूट आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    13 hrs ago
  • Post by अरबाज शेख
    1
    Post by अरबाज शेख
    user_अरबाज शेख
    अरबाज शेख
    Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • न्याय मिळाला नाही, शेवटी एसडीओ कार्यालयात विष प्राशन! ५ आदिवासी शेतकऱ्यांचा हृदयद्रावक आत्महत्येचा प्रयत्न राजुरा (चंद्रपूर), एप्रिल २०२६ : १५ वर्षांपासून न्यायासाठी भटकणाऱ्या पाच आदिवासी शेतकऱ्यांनी आज दुपारी राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडवून गेली आहे. कुसुंबी (कोरपना तालुका) गावातील कोलाम आदिवासी समाजातील पाच शेतकऱ्यांनी माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक)च्या चुनखडी खाणीसाठी दिलेल्या आपल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलले. गेल्या १५ वर्षांपासून वारंवार निवेदने, आंदोलने आणि पाठपुरावा करूनही प्रशासन आणि कंपनीकडून कोणतीही सकारात्मक कारवाई झाली नाही, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे. घटना कशी घडली? दुपारी सुमारे १.३० वाजता हे पाचही शेतकरी उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांच्या कार्यालयात आपल्या मागण्या घेऊन गेले होते. न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी थेट कार्यालयातच विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनात एकच खळबळ उडाली. राजुरा पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. शेतकरी कोण आहेत? हे सर्व कोलाम आदिवासी कुटुंबातील शेतकरी आहेत. त्यांच्या जमिनी माणिकगड सिमेंट कंपनीने खाणीच्या उद्देशाने घेतल्या होत्या. कंपनीने प्रारंभी काही मोबदला दिला, मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो अपुरा आणि अपुरा होता. उर्वरित मोबदला किंवा जमीन परत मिळण्याची मागणी ते १५ वर्षे करत आहेत. प्रशासनाची भूमिका घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी शेतकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली असून, त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीकडूनही याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. ही घटना आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन हक्क, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि मोबदल्याच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधते. “न्याय मिळाला नाही तर शेवटी विष प्यावे लागते,” अशी भावना व्यक्त करणारी ही घटना महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रलंबित प्रश्नांची दुखरी आठवण करून देते. अधिक अपडेटसाठी : शेतकऱ्यांची प्रकृती स्थिर होत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. प्रशासन लवकरात लवकर न्याय देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. (ही बातमी विविध वृत्तस्रोतांवरून संकलित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रकृती आणि प्रशासकीय कारवाईबाबत अधिक माहिती येत राहील.)
    1
    न्याय मिळाला नाही, शेवटी एसडीओ कार्यालयात विष प्राशन!
५ आदिवासी शेतकऱ्यांचा हृदयद्रावक आत्महत्येचा प्रयत्न
राजुरा (चंद्रपूर), एप्रिल २०२६ : १५ वर्षांपासून न्यायासाठी भटकणाऱ्या पाच आदिवासी शेतकऱ्यांनी आज दुपारी राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडवून गेली आहे.
कुसुंबी (कोरपना तालुका) गावातील कोलाम आदिवासी समाजातील पाच शेतकऱ्यांनी माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक)च्या चुनखडी खाणीसाठी दिलेल्या आपल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलले. गेल्या १५ वर्षांपासून वारंवार निवेदने, आंदोलने आणि पाठपुरावा करूनही प्रशासन आणि कंपनीकडून कोणतीही सकारात्मक कारवाई झाली नाही, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे.
घटना कशी घडली?
दुपारी सुमारे १.३० वाजता हे पाचही शेतकरी उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांच्या कार्यालयात आपल्या मागण्या घेऊन गेले होते. न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी थेट कार्यालयातच विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनात एकच खळबळ उडाली. राजुरा पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
शेतकरी कोण आहेत?
हे सर्व कोलाम आदिवासी कुटुंबातील शेतकरी आहेत.
त्यांच्या जमिनी माणिकगड सिमेंट कंपनीने खाणीच्या उद्देशाने घेतल्या होत्या.
कंपनीने प्रारंभी काही मोबदला दिला, मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो अपुरा आणि अपुरा होता. उर्वरित मोबदला किंवा जमीन परत मिळण्याची मागणी ते १५ वर्षे करत आहेत.
प्रशासनाची भूमिका
घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी शेतकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली असून, त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीकडूनही याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
ही घटना आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन हक्क, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि मोबदल्याच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधते. “न्याय मिळाला नाही तर शेवटी विष प्यावे लागते,” अशी भावना व्यक्त करणारी ही घटना महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रलंबित प्रश्नांची दुखरी आठवण करून देते.
अधिक अपडेटसाठी : शेतकऱ्यांची प्रकृती स्थिर होत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. प्रशासन लवकरात लवकर न्याय देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
(ही बातमी विविध वृत्तस्रोतांवरून संकलित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रकृती आणि प्रशासकीय कारवाईबाबत अधिक माहिती येत राहील.)
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच
    1
    घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच
    user_Aai Lonche
    Aai Lonche
    Salesperson Aurangabad, Maharashtra•
    4 hrs ago
  • येवल्याजवळ भीषण अपघात; डॉक्टर महिलेच्या प्रसंगावधामुळे दोघांचे प्राण वाचले नाशिक-संभाजीनगर महामार्गावर गवंडगाव शिवारात मालवाहू ट्रक आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या एका महिला डॉक्टरने दाखवलेल्या देवदूतकीमुळे दोन जखमींचे प्राण वाचले आहेत. ​सुरेश भाऊराव शिंदे (रा. सोयगाव, मालेगाव) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गवंडगाव फाट्याजवळ ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारमधील प्रवासी अडकून पडले होते. ​डॉक्टरांच्या 'सीपीआर'ने दिले जीवदान अपघात झाला त्याच वेळी नाशिकच्या प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. दिपाली चंद्रशेखर क्षत्रिय या त्या मार्गावरून जात होत्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. दोन जखमींची प्रकृती अत्यंत खालावलेली असताना डॉ.दिपाली क्षत्रिय यांनी त्यांना जागेवरच सीपीआर (CPR) दिला. त्यांच्या या तातडीच्या उपचारामुळे दोघांचे प्राण वाचले असून त्यांना पुढील उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ​या घटनेची नोंद येवला तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. दिपाली चंद्रशेखर क्षत्रिय यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    1
    येवल्याजवळ भीषण अपघात; डॉक्टर महिलेच्या प्रसंगावधामुळे दोघांचे प्राण वाचले
नाशिक-संभाजीनगर महामार्गावर गवंडगाव शिवारात मालवाहू ट्रक आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या एका महिला डॉक्टरने दाखवलेल्या देवदूतकीमुळे दोन जखमींचे प्राण वाचले आहेत.
​सुरेश भाऊराव शिंदे (रा. सोयगाव, मालेगाव) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गवंडगाव फाट्याजवळ ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारमधील प्रवासी अडकून पडले होते.
​डॉक्टरांच्या 'सीपीआर'ने दिले जीवदान
अपघात झाला त्याच वेळी नाशिकच्या प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. दिपाली चंद्रशेखर क्षत्रिय या त्या मार्गावरून जात होत्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. दोन जखमींची प्रकृती अत्यंत खालावलेली असताना डॉ.दिपाली क्षत्रिय यांनी त्यांना जागेवरच सीपीआर (CPR) दिला. त्यांच्या या तातडीच्या उपचारामुळे दोघांचे प्राण वाचले असून त्यांना पुढील उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
​या घटनेची नोंद येवला तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. दिपाली चंद्रशेखर क्षत्रिय यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण : आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई! (अमरावती - १५ एप्रिल २०२६) परतवाडा (अमरावती) : अल्पवयीन मुलींना सोशल मीडियावरून फसवून लैंगिक शोषण, ब्लॅकमेल आणि ३५०+ अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याच्या धक्कादायक प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर (१९ वर्षे, उर्फ आयान अहमद तनवीर) याच्या घराचा अतिक्रमित भाग आज बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आला. मुख्य घटना: अतिक्रमित बांधकाम पाडले: अचलपूर नगर परिषदेच्या बुलडोझरने घराचा लोखंडी जिना आणि पहिल्या मजल्याचा काही भाग पाडला. पूर्ण घर नव्हे, तर फक्त अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. आधी नोटीस देण्यात आली होती.38d499 भाजप आमदार उपस्थित: आमदार प्रवीण तायडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली. परिसरात मोठी पोलिस तैनाती होती.70f5d5 प्रकरणाची पार्श्वभूमी: आरोपीने व्हॉट्सअप, स्नॅपचॅट द्वारे १८०+ अल्पवयीन मुलींना “लव्ह ट्रॅप” मध्ये फसवले. मुंबई-पुणे येथे नेऊन अश्लील व्हिडिओ बनवले, ब्लॅकमेल केले आणि व्हायरल केले. आतापर्यंत ८+ बळी ओळखले गेले, शेकडो व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात. POCSO Act, IT Act, BNS 294 अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपीसह ४ जण अटक; इतरांवर तपास सुरू.334c3d प्रतिक्रिया: परतवाडा-अचलपूरमध्ये बंद पाळला गेला. मोठा जन-रोष, SIT चौकशीची मागणी. खासदार अनिल बोंडे यांनीही प्रकरण गंभीर घेतले. पोलिसांनी सांगितले: तपास सुरू असून आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. पीडित मुलींची ओळख पटवणे आणि फॉरेन्सिक तपास चालू आहे. !
    1
    परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण : आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई!
(अमरावती - १५ एप्रिल २०२६)
परतवाडा (अमरावती) : अल्पवयीन मुलींना सोशल मीडियावरून फसवून लैंगिक शोषण, ब्लॅकमेल आणि ३५०+ अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याच्या धक्कादायक प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर (१९ वर्षे, उर्फ आयान अहमद तनवीर) याच्या घराचा अतिक्रमित भाग आज बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आला.
मुख्य घटना:
अतिक्रमित बांधकाम पाडले: अचलपूर नगर परिषदेच्या बुलडोझरने घराचा लोखंडी जिना आणि पहिल्या मजल्याचा काही भाग पाडला. पूर्ण घर नव्हे, तर फक्त अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. आधी नोटीस देण्यात आली होती.38d499
भाजप आमदार उपस्थित: आमदार प्रवीण तायडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली. परिसरात मोठी पोलिस तैनाती होती.70f5d5
प्रकरणाची पार्श्वभूमी:
आरोपीने व्हॉट्सअप, स्नॅपचॅट द्वारे १८०+ अल्पवयीन मुलींना “लव्ह ट्रॅप” मध्ये फसवले.
मुंबई-पुणे येथे नेऊन अश्लील व्हिडिओ बनवले, ब्लॅकमेल केले आणि व्हायरल केले.
आतापर्यंत ८+ बळी ओळखले गेले, शेकडो व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात.
POCSO Act, IT Act, BNS 294 अंतर्गत गुन्हा दाखल.
आरोपीसह ४ जण अटक; इतरांवर तपास सुरू.334c3d
प्रतिक्रिया:
परतवाडा-अचलपूरमध्ये बंद पाळला गेला.
मोठा जन-रोष, SIT चौकशीची मागणी.
खासदार अनिल बोंडे यांनीही प्रकरण गंभीर घेतले.
पोलिसांनी सांगितले: तपास सुरू असून आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. पीडित मुलींची ओळख पटवणे आणि फॉरेन्सिक तपास चालू आहे.
!
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.