Shuru
Apke Nagar Ki App…
Hiring Job Title : योग प्रशिक्षक Company / Shop : श्री समर्थ निसर्गोपचार व ध्यान साधना केंद्र Job Field : प्रशिक्षण Salary Offered : 10000 Locality : डोंबिवली Job Type : Part Time Required Work Experience : Fresher आपल्या निसर्गोपचार केंद्रात योगा प्रशिक्षक(महिला) यांची आवश्यकता असून तात्काळ भरती करण्यात येत आहे. हे काम कमिशन वर देण्यात येईल.
आपले मानवाधिकार
Hiring Job Title : योग प्रशिक्षक Company / Shop : श्री समर्थ निसर्गोपचार व ध्यान साधना केंद्र Job Field : प्रशिक्षण Salary Offered : 10000 Locality : डोंबिवली Job Type : Part Time Required Work Experience : Fresher आपल्या निसर्गोपचार केंद्रात योगा प्रशिक्षक(महिला) यांची आवश्यकता असून तात्काळ भरती करण्यात येत आहे. हे काम कमिशन वर देण्यात येईल.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. भिवंडी-वाडा महामार्गालगत मेट ग्रामपंचायत हद्दीतील 'रंगतरंग कमर्शियल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने नैसर्गिक पाण्याचा नाला अडवून त्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या अडथळ्यामुळे अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला आणि पुराचे पाणी विरुद्ध दिशेने शेतांमध्ये शिरल्याने परिसरातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी बालकृष्ण धोंडू घोडविंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही नैसर्गिक नाला अडविल्याबाबत वाडा तहसील कार्यालयात लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून संबंधित कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. आता घोडविंदेपाडा येथील शेतकरी सुनील घोडविंदे, भरत परशुराम घोडविंदे, किरण घोडविंदे, पंडित घोडविंदे आणि बालकृष्ण घोडविंदे यांनी शासनाने तात्काळ शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी संबंधित कंपनीची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नैसर्गिक जलवाहिन्या मोकळ्या कराव्यात, अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.4
- पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि परिसरात सलग २ दिवस पाऊस न पडल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत आहेत. विशेषतः ज्या भागात आधीच पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत, तिथे शेतकरी अधिक अडचणीत आले आहेत. आता पुन्हा पाऊस पडेल का, असा मोठा प्रश्न आणि संभ्रम शेतकरी बांधवांसमोर निर्माण झाला असून अनेक ठिकाणी सध्या अशीच बिकट परिस्थिती पाहायला मिळत आहे. या संकटकाळात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शक्य असल्यास उपलब्ध पाण्याच्या मदतीने शेतात हलके सिंचन करावे. शेतातील जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागत किंवा मल्चिंगचा वापर करावा. तसेच, पुढील पावसाचा अंदाज पाहूनच खतांचा वापर करावा. जर पाऊस अधिक दिवस लांबला, तर शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवा केंद्राचा सल्ला घ्यावा.1
- पालघर तालुक्यातील कुडण गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी अनिल मोरेश्वर म्हात्रे आणि कल्पेश अशोक म्हात्रे यांच्या शेतातील सुमारे ८०० ते ९०० केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून आंबा, फणस, शेवगा आणि नारळ या फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची दखल घेत तारापूर विभागाचे (पालघर) सहाय्यक कृषी अधिकारी योगेश साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल ठाकूर यांनीही नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. मात्र, गावाचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि इतर स्थानिक सदस्यांनी अजूनही घटनास्थळी भेट दिलेली नाही, अशी तीव्र नाराजी आणि तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.1
- ठाण्यातील मुंब्रा येथील अग्निशमन कार्यालयामध्ये पत्त्यांची मैफिल रंगल्याचा प्रकार समोर आला आहे. थेट शासकीय कार्यालयातच अशा प्रकारे पत्त्यांचा डाव रंगात आल्यामुळे, "आता यावर जाब कोण देणार?" असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड, ठाणे महानगरपालिका, ठाणे पोलीस आयुक्तालय, तौहीद शेख, रिदा रशीद, अनिस कुरेशी, कुमैल मर्चंट आणि मुख्यमंत्री कार्यालयाला (CMO Maharashtra) टॅग करून थेट जाब विचारण्यात आला आहे.1
- ठाण्याच्या मुंब्रा येथील अग्निशमन दलाचा एक संतापजनक कारनामा समोर आला आहे. येथील कर्मचारी सर्व गांभीर्य सोडून अत्यंत बेजबाबदार आणि निष्काळजीपणे चक्क पत्ते खेळताना दिसून आले आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा हा अत्यंत निष्काळजीपणा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.1
- पॉडकास्टर नदीम मेमन यांनी एक नवीन पाऊल टाकत ठाण्यामध्ये 'हाय स्ट्रीट क्रिएटर स्टुडिओ'चे उद्घाटन केले आहे.1
- महाराष्ट्रातील एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून खूप पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडर पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. हे थक्क करणारे दृश्य समोर आल्यानंतर, एवढ्या मोठ्या संख्येने सिलेंडर पाण्यात वाहून जाण्यामागचे नेमके काय कारण असू शकते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.1
- कल्याण तालुक्यातील खडवली येथून शनिवार संध्याकाळी पडघाकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बसला अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. बस खडवली बसस्थानकापासून अवघ्या एक-दोन मिनिटांच्या अंतरावर पोहोचली असताना, बसमधून धूर आणि आग निघत असल्याचे बाहेरील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याबाबात बस चालक आणि प्रवाशांना सावध केले. माहिती मिळताच चालकाने प्रसंगावधान राखत बस लगेच थांबवली आणि बसमधील सर्व प्रवाशांना त्वरित सुरक्षितपणे बाहेर काढले. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते, मात्र सर्वांना वेळेत बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.1