logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दणक्याने 2 तासात अपघातग्रस्त रस्त्याची दुरुस्ती ! ........ अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे जीवघेणा खड्डा बुजला! .... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दणक्याने 2 तासात अपघातग्रस्त रस्त्याची दुरुस्ती ! .... अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे जीवघेणा खड्डा बुजला! ..... मोर्शी : मोर्शी विधानसभा मतदारसंघातील मोर्शी वरूड राष्ट्रीय महामार्गावरील हजारो नागरिकांना जखमी करून अनेकांचे बळी घेणारा मायवाडी येथील पुलाजवळ रस्ता दबल्यामुळे निर्माण झालेला जीवघेणा खड्डा अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या 2 तासांच्या आत दुरुस्त करण्यात आला. या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली होती. दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांची या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असताना रस्ता दबून मोठे खड्डे निर्माण झाल्याने अपघातांची मालिका सुरू होती. विशेष म्हणजे, या ठिकाणी अनेक वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागला असून अनेक नागरिक मृत्यूमुखी पडून काही किरकोळ व गंभीर जखमी झाले होते. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी अधिक धोका निर्माण होत होता. राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या मार्गावर अशी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊनही संबंधित विभागाकडून तात्काळ दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. दरम्यान, या गंभीर समस्येकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश प्रकाशराव वाळके यांनी लक्ष वेधले. त्यांनी घटनास्थळी भेट देत रस्त्याची पाहणी केली व नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासन तात्काळ खडबडून जागे झाले. संबंधित यंत्रणेने त्वरित कर्मचारी व यंत्रसामग्री घटनास्थळी पाठवून अवघ्या 2 तासांच्या आत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण केली. खड्डा बुजवून डांबरीकरण करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत बोलताना रुपेश वाळके म्हणाले की, “जनतेच्या जीवाशी खेळ करणारा कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. प्रशासनाने वेळेत काम केले नाही तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.” या तात्काळ कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व रुपेश वाळके यांच्या पाठपुराव्याचे कौतुक केले आहे. प्रशासनाने अशाच प्रकारे जनतेच्या प्रश्नांकडे तत्परतेने लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

5 hrs ago
user_Pravin Zolekar Jounarlist
Pravin Zolekar Jounarlist
Photographer अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
5 hrs ago
0859338c-f154-4b55-944f-6fa1d9386578

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दणक्याने 2 तासात अपघातग्रस्त रस्त्याची दुरुस्ती ! ........ अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे जीवघेणा खड्डा बुजला! .... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दणक्याने 2 तासात अपघातग्रस्त रस्त्याची दुरुस्ती ! .... अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे जीवघेणा खड्डा बुजला! ..... मोर्शी : मोर्शी विधानसभा मतदारसंघातील मोर्शी वरूड राष्ट्रीय महामार्गावरील हजारो नागरिकांना जखमी करून अनेकांचे बळी घेणारा मायवाडी येथील पुलाजवळ रस्ता दबल्यामुळे निर्माण झालेला जीवघेणा खड्डा अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या 2 तासांच्या आत दुरुस्त करण्यात आला. या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली होती. दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांची या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असताना रस्ता दबून

0ac5eeb4-8704-4d58-984c-19ee0435c609

मोठे खड्डे निर्माण झाल्याने अपघातांची मालिका सुरू होती. विशेष म्हणजे, या ठिकाणी अनेक वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागला असून अनेक नागरिक मृत्यूमुखी पडून काही किरकोळ व गंभीर जखमी झाले होते. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी अधिक धोका निर्माण होत होता. राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या मार्गावर अशी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊनही संबंधित विभागाकडून तात्काळ दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. दरम्यान, या गंभीर समस्येकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश प्रकाशराव वाळके यांनी लक्ष वेधले. त्यांनी घटनास्थळी भेट देत रस्त्याची पाहणी केली व नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आक्रमक

be831d2d-8698-45ce-bd1f-8d26a2429de3

पवित्र्यानंतर प्रशासन तात्काळ खडबडून जागे झाले. संबंधित यंत्रणेने त्वरित कर्मचारी व यंत्रसामग्री घटनास्थळी पाठवून अवघ्या 2 तासांच्या आत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण केली. खड्डा बुजवून डांबरीकरण करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत बोलताना रुपेश वाळके म्हणाले की, “जनतेच्या जीवाशी खेळ करणारा कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. प्रशासनाने वेळेत काम केले नाही तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.” या तात्काळ कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व रुपेश वाळके यांच्या पाठपुराव्याचे कौतुक केले आहे. प्रशासनाने अशाच प्रकारे जनतेच्या प्रश्नांकडे तत्परतेने लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्रामध्ये एका जीआरमुळे ५०% दिव्यांग बांधव मानधनापासून वंचित झाले आहेत. यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी राज्य सरकारला कठोर इशारा दिला आहे.
    1
    महाराष्ट्रामध्ये एका जीआरमुळे ५०% दिव्यांग बांधव मानधनापासून वंचित झाले आहेत. यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी राज्य सरकारला कठोर इशारा दिला आहे.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Pratik
    1
    Post by Pratik
    user_Pratik
    Pratik
    वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • वर्धा शहरातील रस्त्यावर गटार तुंबल्याने गलिच्छ पाणी सर्वत्र पसरले आहे. यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे.
    1
    वर्धा शहरातील रस्त्यावर गटार तुंबल्याने गलिच्छ पाणी सर्वत्र पसरले आहे. यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे.
    user_Suraj
    Suraj
    वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये २ ते ९ मे दरम्यान धम्म बालसंस्कार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराच्या समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांनी धम्म शांतता रॅली काढली.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये २ ते ९ मे दरम्यान धम्म बालसंस्कार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराच्या समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांनी धम्म शांतता रॅली काढली.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    18 hrs ago
  • श्री गजानन महाराज संस्थानने शेगाव मंदिर परिसरात मोबाईल वापरास पूर्ण बंदी लागू केली आहे. मंदिर परिसरातील वाढती गर्दी आणि गोंधळामुळे मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल तात्काळ जप्त केला जाईल, असा कडक इशारा संस्थानने दिला आहे.
    1
    श्री गजानन महाराज संस्थानने शेगाव मंदिर परिसरात मोबाईल वापरास पूर्ण बंदी लागू केली आहे. मंदिर परिसरातील वाढती गर्दी आणि गोंधळामुळे मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल तात्काळ जप्त केला जाईल, असा कडक इशारा संस्थानने दिला आहे.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    13 hrs ago
  • समुद्रपूर तालुक्यातील दोन गावांमध्ये कालव्यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही समस्या कायम असून, नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. प्रशासनाकडे बजेट नसल्याचे कारण दिले जात असले तरी, शेतकऱ्यांनी मासेमारी लिलावाच्या पैशातून उत्खनन करण्याचा पर्याय सुचवला आहे.
    1
    समुद्रपूर तालुक्यातील दोन गावांमध्ये कालव्यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही समस्या कायम असून, नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. प्रशासनाकडे बजेट नसल्याचे कारण दिले जात असले तरी, शेतकऱ्यांनी मासेमारी लिलावाच्या पैशातून उत्खनन करण्याचा पर्याय सुचवला आहे.
    user_RK Mishra
    RK Mishra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • अमरावती शहरात उघडकीस आलेल्या एका घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
    1
    अमरावती शहरात उघडकीस आलेल्या एका घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.