मंगरूळच्या सुपुत्राची UPSC मध्ये दमदार झेप... AIR 107 पटकावत तालुक्याचा वाढवला मान... अक्कलकोट तालुक्यातील मंगरूळ येथील अभिषेक कत्ते यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर 107 वा क्रमांक (AIR 107) मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धा परीक्षेचा प्रवास पूर्ण करत त्यांनी मिळवलेले हे यश तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. अभिषेक यांच्या या यशामुळे अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सामान्य कुटुंबातून पुढे येत जिद्द,सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले असून,स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.UPSC सारख्या देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत AIR 107 मिळवत अभिषेक यांनी मंगरूळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.त्यांच्या यशामुळे तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा निर्माण झाली असून,“ग्रामीण भागातूनही मोठी स्वप्नं पूर्ण होऊ शकतात,” हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. अभिषेक कत्ते यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.त्यांच्या कार्यातून समाजाला संवेदनशील,पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन मिळावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंगरूळच्या सुपुत्राची UPSC मध्ये दमदार झेप... AIR 107 पटकावत तालुक्याचा वाढवला मान... अक्कलकोट तालुक्यातील मंगरूळ येथील अभिषेक कत्ते यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर 107 वा क्रमांक (AIR 107) मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धा परीक्षेचा प्रवास पूर्ण करत त्यांनी मिळवलेले हे यश तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. अभिषेक यांच्या या यशामुळे अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सामान्य कुटुंबातून पुढे येत जिद्द,सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले असून,स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.UPSC सारख्या देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत AIR 107 मिळवत अभिषेक यांनी मंगरूळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.त्यांच्या यशामुळे तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा निर्माण झाली असून,“ग्रामीण भागातूनही मोठी स्वप्नं पूर्ण होऊ शकतात,” हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. अभिषेक कत्ते यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.त्यांच्या कार्यातून समाजाला संवेदनशील,पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन मिळावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.2
- ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७% दमदार निकाल लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- 📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात. अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू. 📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात. अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू. मृत्यू झालेला तरुण हैद्राबाद येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न1
- चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.1
- सांगली जिल्ह्यात एका महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हत्येमागचे कारण अद्याप गूढ आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.1
- प्रधानमंत्री मोदी की अपील पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया। 'जरूरत पड़ने पर ही ईंधन का इस्तेमाल करें', #pmmodi #devendrafadnavis #maharashtra #primenews83 #breakingnews #hindinews प्रधानमंत्री मोदी की अपील पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया। 'जरूरत पड़ने पर ही ईंधन का इस्तेमाल करें',1
- Post by नागनाथ ससाने1
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आंबेजोगाई रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.1