सोयगाव पंचायत समितीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा...... सोयगाव पंचायत समितीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा सोयगाव : (दि. १ मे २०२६) महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६६ वा वर्धापन दिन सोयगाव पंचायत समितीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शुक्रवारी सकाळी ७:०५ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंचायत समितीचे सभापती उत्तम महारू चव्हाण यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यापूर्वी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत सेवालाल महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केले. कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये गटविकास अधिकारी (वर्ग-१) संतोष भालेराव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेंद्रसिंग कुमारसिंग पाटील, सहाय्यक प्रशासन अधिकारी आनंद गणपतराव पैठणे तसेच प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी उपसभापती व पंचायत समिती सदस्य अशोक दौड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सभापती उत्तम महारू चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास व विकासाचा आढावा घेत राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. प्रशासनातील पारदर्शकता, लोकाभिमुख कामकाज आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. राष्ट्रप्रेमाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्र दिनाचा हा सोहळा सोयगाव परिसरात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण करणारा ठरला.
सोयगाव पंचायत समितीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा...... सोयगाव पंचायत समितीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा सोयगाव : (दि. १ मे २०२६) महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६६ वा वर्धापन दिन सोयगाव पंचायत समितीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शुक्रवारी सकाळी ७:०५ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंचायत समितीचे सभापती उत्तम महारू चव्हाण यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यापूर्वी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत सेवालाल महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केले. कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये गटविकास अधिकारी (वर्ग-१) संतोष भालेराव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेंद्रसिंग कुमारसिंग पाटील, सहाय्यक प्रशासन अधिकारी आनंद गणपतराव पैठणे तसेच प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी उपसभापती व पंचायत समिती सदस्य अशोक दौड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सभापती उत्तम महारू चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास व विकासाचा आढावा घेत राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. प्रशासनातील पारदर्शकता, लोकाभिमुख कामकाज आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. राष्ट्रप्रेमाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्र दिनाचा हा सोहळा सोयगाव परिसरात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण करणारा ठरला.
- Post by Mushraf Tadvi1
- "उष्माघाताने फळविक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यात हळहळ" शासनाने तात्काळ मदत करावी पाचोरा काँग्रेसची मागणी पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंद नथ्थु भोई (वय 32) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोई हे दररोजप्रमाणे चौकात काकडी विक्री करत होते. सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवसभर उन्हात काम करताना त्यांनी डोक्यावर कोणतेही संरक्षण (टोपी, अंगावर कापड) घेतले नव्हते. परिणामी त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच, आनंद भोई हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही सोमवंशी यांनी केली आहे. मयताच्या पश्चात विधवा आई, पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.1
- Post by AQS NEWS1
- तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया1
- मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...1
- बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.1
- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते. यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले. अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.1
- Post by Mushraf Tadvi1