कारचालकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कारचालकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) कारचालकास रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. ९ एप्रिल २०२६ रोजी रात्री पद्मा हॉटेल ते शिवदत्त पेट्रोलपंप दरम्यान, देवळाई चौकाजवळ दोन मोटारसायकलींवरून आलेल्या सहा जणांच्या टोळीने सुदामराव आबासाहेब शिंदे (वय ६७, रा. हातडी, ता. घनसांवगी, जि. जालना) यांना अडवून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील सुमारे पाच तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी १० एप्रिल रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात आली. १५ एप्रिल रोजी बीड बायपास परिसरात सापळा रचून रोहित रविंद्र काळे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर सूरज रविंद्र काळे व ऋषिकेश गणेश उदावंत यांनाही अटक करण्यात आली. आरोपींनी लुटलेली सोन्याची चैन विकून पैसे वाटून घेतल्याचे उघड झाले. त्यापैकी काही पैशांतून बुलेट मोटारसायकल खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचा तुकडा, गुन्ह्यात वापरलेली यामाहा एफझेड मोटारसायकल, मोबाईल फोन असा एकूण सुमारे ४.२६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी चिकलठाणा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह व उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारचालकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कारचालकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) कारचालकास रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. ९ एप्रिल २०२६ रोजी रात्री पद्मा हॉटेल ते शिवदत्त पेट्रोलपंप दरम्यान, देवळाई चौकाजवळ दोन मोटारसायकलींवरून आलेल्या सहा जणांच्या टोळीने सुदामराव आबासाहेब शिंदे (वय ६७, रा. हातडी, ता. घनसांवगी, जि. जालना) यांना अडवून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील सुमारे पाच तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी १० एप्रिल रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात आली. १५ एप्रिल रोजी बीड बायपास परिसरात सापळा रचून रोहित रविंद्र काळे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर सूरज रविंद्र काळे व ऋषिकेश गणेश उदावंत यांनाही अटक करण्यात आली. आरोपींनी लुटलेली सोन्याची चैन विकून पैसे वाटून घेतल्याचे उघड झाले. त्यापैकी काही पैशांतून बुलेट मोटारसायकल खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचा तुकडा, गुन्ह्यात वापरलेली यामाहा एफझेड मोटारसायकल, मोबाईल फोन असा एकूण सुमारे ४.२६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी चिकलठाणा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह व उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
- "उष्माघाताने फळविक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यात हळहळ" शासनाने तात्काळ मदत करावी पाचोरा काँग्रेसची मागणी पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंद नथ्थु भोई (वय 32) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोई हे दररोजप्रमाणे चौकात काकडी विक्री करत होते. सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवसभर उन्हात काम करताना त्यांनी डोक्यावर कोणतेही संरक्षण (टोपी, अंगावर कापड) घेतले नव्हते. परिणामी त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच, आनंद भोई हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही सोमवंशी यांनी केली आहे. मयताच्या पश्चात विधवा आई, पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.1
- राजकीय भूकंप! बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश ⚡ मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत Bacchu Kadu यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा ‘गेमचेंजर’ मानला जात आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांनी “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी आणि विकासाच्या कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांचे स्वागत करत “त्यांच्या येण्याने पक्ष अधिक बळकट होईल,” असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, अपंग आणि वंचित घटकांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या निर्णयावर जोरदार टीका केली असून “ही केवळ सत्तेसाठीची राजकीय चाल आहे,” असा आरोप केला आहे. मात्र शिंदे गटाने या प्रवेशाचे स्वागत करत “राजकारणात नवे समीकरण तयार होईल,” असा दावा केला आहे. 👉 या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे1
- Post by Mushraf Tadvi1
- 🗒️ विषय: डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींपैकी शरद कळस्कर यांना आज मुंबई उच्च न्यायालय जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान, अधिवक्ता शुभदा खोत, अधिवक्ता सिद्धविद्या, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच अन्य अधिवक्त्यांनी प्रभावी बाजू मांडत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.1
- तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया1
- धुळे जिल्ह्यातील निजामपूर (ता. साक्री) पोलिसांनी अपहरण प्रकरणात मोठी कारवाई करत मुख्य संशयितासह अन्य दोन जणांना गोव्यातून अटक केली आहे. या कारवाईत पीडित अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.1
- छत्रपती संभाजी नगर मधील पीर बाजार ते शान दर्गा रोडवरील अतिक्रमणे काढणे सुरू केले तसेच भाजीवाली बाई पुतळे जवळी अतिक्रमणे पाठवण्यात सुरू आहे मनपाची थेट कारवाई सुरू नागरिकांना रोजचा ट्रॅफिकचा कंटाळा दूर होणार रोड दुरुस्ती करणे व रोड मोठा करणे सुरू मनपाचा पुढील उद्दिष्टे व अतिक्रमणे हटवणे सुरू आहे तेथील रहिवाशांना दिलासा मिळणार वाहनांची गर्दी होणार नाही या अनुषंगाने रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे सुरू आहे4
- Post by Mushraf Tadvi1