logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील धारडे दिगर ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. या ग्रामपंचायतीमध्ये कोणताही प्रत्यक्ष विकास झालेला नसून, सर्व विकास केवळ कागदावरच दाखवला जात आहे. या ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे प्रत्यक्षात मात्र कोणताही विकास झालेला नाही.

3 hrs ago
user_Rutik Jadhav
Rutik Jadhav
कळवण, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील धारडे दिगर ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. या ग्रामपंचायतीमध्ये कोणताही प्रत्यक्ष विकास झालेला नसून, सर्व विकास केवळ कागदावरच दाखवला जात आहे. या ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे प्रत्यक्षात मात्र कोणताही विकास झालेला नाही.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे साहेब यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
    1
    छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे साहेब यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    42 min ago
  • पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि परिसरात सलग २ दिवस पाऊस न पडल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत आहेत. विशेषतः ज्या भागात आधीच पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत, तिथे शेतकरी अधिक अडचणीत आले आहेत. आता पुन्हा पाऊस पडेल का, असा मोठा प्रश्न आणि संभ्रम शेतकरी बांधवांसमोर निर्माण झाला असून अनेक ठिकाणी सध्या अशीच बिकट परिस्थिती पाहायला मिळत आहे. या संकटकाळात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शक्य असल्यास उपलब्ध पाण्याच्या मदतीने शेतात हलके सिंचन करावे. शेतातील जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागत किंवा मल्चिंगचा वापर करावा. तसेच, पुढील पावसाचा अंदाज पाहूनच खतांचा वापर करावा. जर पाऊस अधिक दिवस लांबला, तर शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवा केंद्राचा सल्ला घ्यावा.
    1
    पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि परिसरात सलग २ दिवस पाऊस न पडल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत आहेत. विशेषतः ज्या भागात आधीच पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत, तिथे शेतकरी अधिक अडचणीत आले आहेत. आता पुन्हा पाऊस पडेल का, असा मोठा प्रश्न आणि संभ्रम शेतकरी बांधवांसमोर निर्माण झाला असून अनेक ठिकाणी सध्या अशीच बिकट परिस्थिती पाहायला मिळत आहे.

या संकटकाळात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शक्य असल्यास उपलब्ध पाण्याच्या मदतीने शेतात हलके सिंचन करावे. शेतातील जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागत किंवा मल्चिंगचा वापर करावा. तसेच, पुढील पावसाचा अंदाज पाहूनच खतांचा वापर करावा. जर पाऊस अधिक दिवस लांबला, तर शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवा केंद्राचा सल्ला घ्यावा.
    user_Rohit karpat
    Rohit karpat
    विक्रमगड, पालघर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित चोरी प्रकरण आणि धर्माच्या नावावर झालेल्या कथित लुटीच्या निषेधार्थ १२ जुलै २०२६ रोजी डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणातील दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवेदन सादर करताना पोलीस ठाण्यातील एपीआय अनिल शिनकर, एपीआय प्रशांत मोरे, हवालदार सोनार, हवालदार गीते आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या योग्य सहकार्याबद्दल अमित म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्याचे आभार मानले. पोलिसांकडून हा अर्ज पुढील आवश्यक कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांनी "रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम" अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. त्यानंतर रीतसर निवेदन सादर करून दोषींवर त्वरित व कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली।
    2
    ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित चोरी प्रकरण आणि धर्माच्या नावावर झालेल्या कथित लुटीच्या निषेधार्थ १२ जुलै २०२६ रोजी डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणातील दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनादरम्यान डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवेदन सादर करताना पोलीस ठाण्यातील एपीआय अनिल शिनकर, एपीआय प्रशांत मोरे, हवालदार सोनार, हवालदार गीते आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या योग्य सहकार्याबद्दल अमित म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्याचे आभार मानले. पोलिसांकडून हा अर्ज पुढील आवश्यक कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांनी "रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम" अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. त्यानंतर रीतसर निवेदन सादर करून दोषींवर त्वरित व कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली।
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचे रहिवासी, 'जनलक्ष्य न्यूज'चे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना सामाजिक, पत्रकारिता आणि जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार - २०२६" प्रदान करण्यात आला आहे. यशवंत सेना महाराष्ट्र राज्य आणि जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले. प्रमोद बारी यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    1
    पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचे रहिवासी, 'जनलक्ष्य न्यूज'चे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना सामाजिक, पत्रकारिता आणि जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार - २०२६" प्रदान करण्यात आला आहे. यशवंत सेना महाराष्ट्र राज्य आणि जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले. प्रमोद बारी यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    10 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये एका डॉनच्या घरात प्रचंड मोठी रक्कम सापडली आहे. या घरात मिळालेली रक्कम एवढी अफाट आहे की पोलिसांना ती मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. पोलीस ५ मशीनच्या साहाय्याने या सापडलेल्या रकमेची मोजणी करत होते.
    1
    छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये एका डॉनच्या घरात प्रचंड मोठी रक्कम सापडली आहे. या घरात मिळालेली रक्कम एवढी अफाट आहे की पोलिसांना ती मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. पोलीस ५ मशीनच्या साहाय्याने या सापडलेल्या रकमेची मोजणी करत होते.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • नाशिकच्या सातपूर परिसरातील गाजलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२ च्या पथकाने पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथून अटक केली आहे. राकेश आबालाल सोनार (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, अंबड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. गुन्हेशाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तो दिघी येथील चोहोली फाटा परिसरात असल्याचे शोधून काढले व तिथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत गुन्हा कबूल केल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही घटना २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती. 'गोल्ड मॅन' म्हणून ओळखले जाणारे फिर्यादी चारचाकी वाहनातून घरी जात असताना तिघा अज्ञातांनी त्यांना अडवले होते. आरोपींनी जबरदस्तीने वाहनात प्रवेश करून धारदार चाकूचा धाक दाखवत फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला होता, मात्र राकेश सोनार तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देत होता. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह डॉ. समाधान हिरे, यशवंत बेडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.
    3
    नाशिकच्या सातपूर परिसरातील गाजलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२ च्या पथकाने पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथून अटक केली आहे. राकेश आबालाल सोनार (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, अंबड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. गुन्हेशाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तो दिघी येथील चोहोली फाटा परिसरात असल्याचे शोधून काढले व तिथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत गुन्हा कबूल केल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही घटना २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती. 'गोल्ड मॅन' म्हणून ओळखले जाणारे फिर्यादी चारचाकी वाहनातून घरी जात असताना तिघा अज्ञातांनी त्यांना अडवले होते. आरोपींनी जबरदस्तीने वाहनात प्रवेश करून धारदार चाकूचा धाक दाखवत फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला होता, मात्र राकेश सोनार तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देत होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह डॉ. समाधान हिरे, यशवंत बेडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. येथे थेट 'हल्लाबोल' आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. येथे थेट 'हल्लाबोल' आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • लाभ क्षेत्राचा दाखला मिळण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ थांबवून त्यांना त्वरित दाखले देण्यात यावेत, अन्यथा प्रकाशा पाटबंधारे उपविभागासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहादाचे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिला आहे. सध्या शेतकऱ्यांना लाभ क्षेत्राचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर सुमारे २५ दिवस ते महिनाभर ताटकळत राहावे लागत आहे. शेतकऱ्यांची ही ससेहोलपट थांबवण्यासाठी अभिजीत पाटील यांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना निवेदन दिले होते. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू झाली असली तरी प्रकाशा बॅरेज उपविभागीय कार्यालयातून अद्यापही शेतकऱ्यांना दाखले मिळत नसल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर, नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी १० जुलै २०२६ रोजी प्रकाशा येथील बॅरेज कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना तात्काळ दाखले वितरीत करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली असून तसे न झाल्यास या ठिकाणी लवकरच पुढचे आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
    1
    लाभ क्षेत्राचा दाखला मिळण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी धावपळ थांबवून त्यांना त्वरित दाखले देण्यात यावेत, अन्यथा प्रकाशा पाटबंधारे उपविभागासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहादाचे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिला आहे. सध्या शेतकऱ्यांना लाभ क्षेत्राचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर सुमारे २५ दिवस ते महिनाभर ताटकळत राहावे लागत आहे. शेतकऱ्यांची ही ससेहोलपट थांबवण्यासाठी अभिजीत पाटील यांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना निवेदन दिले होते. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू झाली असली तरी प्रकाशा बॅरेज उपविभागीय कार्यालयातून अद्यापही शेतकऱ्यांना दाखले मिळत नसल्याचे समोर आले आहे.

याच पार्श्वभूमीवर, नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी १० जुलै २०२६ रोजी प्रकाशा येथील बॅरेज कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना तात्काळ दाखले वितरीत करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली असून तसे न झाल्यास या ठिकाणी लवकरच पुढचे आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात रात्रीच्या जेवणानंतर ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहमीच्या वेळेनुसार सायंकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान वसतिगृहातील २१७ हून अधिक विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण केले, ज्यामध्ये स्वयंपाकी शाम बिहारी याने शेवगाची भाजी, भात आणि पोळ्या दिल्या होत्या. जेवण सुरू करताच विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि वसतिगृहात प्रचंड धावपळ उडाली. बाधित विद्यार्थ्यांना तातडीने शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत बाधित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी देविदास बाशिंगे, पार्थ धीवरे, आदित्य सूर्यवंशी, पंकज सिताराम कुवर, पारदिप आणि मनोहर भैया पान पाटील या सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारांसाठी शहरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर रवी सुकलाल बैसाणे, कीर्ती राज सखाराम घोडेसर, मोहित महेंद्र बैसाणे, रोशन सुरेश शिंदे, आदित्य अंबालाल सूर्यवंशी, दिनेश योगेश मोहिते, पंकज सिताराम कुवर, प्रदीप सूर्यवंशी, शंकर सिताराम कुवर, चेतन महिरे, धनेश विनोद सोनवणे, चंद्रकांत रवींद्र सोनवणे, मयूर रणशिंगे, सागर रणशिंगे, धम्मवीर रतिलाल घोडास आणि रोशन शिंदे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व विद्यार्थी मोहिदा शिवारातील अनुसूचित जाती व नव बौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १० वी दरम्यान शिक्षण घेत असून ते नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी करून आक्रोश केला. पालकांनी मुख्याध्यापक रोहिदास वळवी आणि वॉर्डन कपिल सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, असा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी सांगितले की, वसतिगृहात नेहमीच निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते आणि याबाबत तक्रार केल्यास विद्यार्थ्यांना दमदाटी केली जाते. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी दीपक गिरासे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, नगरसेवक मुनेश जगदेव, आमदारांचे स्वीय सहायक हेमराज पवार आणि वैद्यकीय पथकातील डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. राकेश पाटील व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेऊन उपचार सुरू केले. या दुर्घटनेमुळे वसतिगृह प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
    4
    शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात रात्रीच्या जेवणानंतर ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहमीच्या वेळेनुसार सायंकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान वसतिगृहातील २१७ हून अधिक विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण केले, ज्यामध्ये स्वयंपाकी शाम बिहारी याने शेवगाची भाजी, भात आणि पोळ्या दिल्या होत्या. जेवण सुरू करताच विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि वसतिगृहात प्रचंड धावपळ उडाली. बाधित विद्यार्थ्यांना तातडीने शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

या घटनेत बाधित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी देविदास बाशिंगे, पार्थ धीवरे, आदित्य सूर्यवंशी, पंकज सिताराम कुवर, पारदिप आणि मनोहर भैया पान पाटील या सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारांसाठी शहरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर रवी सुकलाल बैसाणे, कीर्ती राज सखाराम घोडेसर, मोहित महेंद्र बैसाणे, रोशन सुरेश शिंदे, आदित्य अंबालाल सूर्यवंशी, दिनेश योगेश मोहिते, पंकज सिताराम कुवर, प्रदीप सूर्यवंशी, शंकर सिताराम कुवर, चेतन महिरे, धनेश विनोद सोनवणे, चंद्रकांत रवींद्र सोनवणे, मयूर रणशिंगे, सागर रणशिंगे, धम्मवीर रतिलाल घोडास आणि रोशन शिंदे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व विद्यार्थी मोहिदा शिवारातील अनुसूचित जाती व नव बौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १० वी दरम्यान शिक्षण घेत असून ते नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील रहिवासी आहेत.

घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी करून आक्रोश केला. पालकांनी मुख्याध्यापक रोहिदास वळवी आणि वॉर्डन कपिल सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, असा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी सांगितले की, वसतिगृहात नेहमीच निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते आणि याबाबत तक्रार केल्यास विद्यार्थ्यांना दमदाटी केली जाते. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी दीपक गिरासे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, नगरसेवक मुनेश जगदेव, आमदारांचे स्वीय सहायक हेमराज पवार आणि वैद्यकीय पथकातील डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. राकेश पाटील व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेऊन उपचार सुरू केले. या दुर्घटनेमुळे वसतिगृह प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.