logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रात आगामी रविवार, २८ जून २०२६ रोजी 'शून्य बालमृत्यूचे ध्येय आणि पोलिओमुक्त भारताचा संकल्प' सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच, शहरात 'स्टॉप डायरिया कॅम्पेन' (अतिसार नियंत्रण पंधरवडा) प्रभावीपणे राबवण्यासाठी दि.२३.०६.२०२६ रोजी मनपा स्थायी समिती बैठक कक्षात महानगरपालिकेच्या शहर कार्य बल गटाची (City Task Force) विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेऊन अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम अंतर्गत नांदेड मनपा क्षेत्रातील ० ते ५ वर्षांखालील ९२,८४५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत की ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक लस घेण्यापासून दुर्लक्षित राहणार नाही. या मोहिमेसाठी शहरात २८५ पोलिओ बुथ निश्चित करण्यात आले आहेत. प्रवासात असलेल्या किंवा दुर्गम भागात राहणाऱ्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी ६३ विशेष ट्रान्झिट पथके सज्ज करण्यात आली आहेत. मोहिमेच्या पहिल्या दिवशी (२८ जून) जे बालक बूथवर येऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी पुढील काही दिवस घरोघरी भेट देऊन १८० IPPI टीममधील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका वंचित बालकांना पोलिओचे थेंब पाजतील. तसेच, शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक, बाजारपेठा आणि मुख्य चौकांमध्ये लसीकरणासाठी १३ मोबाईल टीम स्थापित केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे, 'स्टॉप डायरिया कॅम्पेन' (अतिसार नियंत्रण) मोहिमेअंतर्गत बालकांमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊन होणारे मृत्यू रोखण्यासाठी शहरात अतिसार नियंत्रण पंधरवडा प्रभावीपणे राबवला जाईल. या मोहिमेत आशा स्वयंसेविकांमार्फत ५ वर्षांखालील मुलांच्या घराघरांमध्ये ओआरएस (ORS) पाकिटे आणि झिंक गोळ्यांचे पूर्व-नियोजित वाटप केले जाईल. शहरातील झोपडपट्ट्या, हाय-रिस्क एरिया, बांधकाम साईट्स आणि स्थलांतरित नागरिकांच्या वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून मायक्रो प्लॅन तयार करण्यात आला आहे. मनपाच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांवर, रुग्णालयांमध्ये आणि ओपीडीमध्ये 'ओआरएस-झिंक कॉर्नर्स' सुरू करण्यात येतील. तसेच, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि हात धुण्याच्या योग्य सवयींबाबत शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे. बैठकीत बोलताना महापौर सौ.कविता संतोष मुळे यांनी, पोलिओ निर्मूलनाचे यश टिकवून ठेवण्यासाठी शहरातील एकाही बालकाला लसीकरणापासून दुर्लक्षित ठेवू नये, अशी प्रशासनाने काळजी घ्यावी असे आवाहन केले. मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी स्पष्ट केले की, मुलाने नियमित लसीकरणातील सर्व पोलिओ डोस घेतले असले तरी, या राष्ट्रीय मोहिमेतील अतिरिक्त डोस देणे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि पालकांनी २८ जून रोजी आपल्या ५ वर्षांखालील प्रत्येक बालकाला जवळच्या केंद्रात नेऊन पोलिओ डोस नक्की पाजावा आणि अतिसार नियंत्रण मोहिमेला सहकार्य करून शहर बालमृत्यूमुक्त व सुदृढ बनवण्यास मदत करावी, असे आवाहन महापौर व आयुक्तांनी केले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत रिठ्ठे, सर्व वैद्यकीय अधिकारी, शिक्षणधिकारी प्रविणा मांदळे, आरोग्य निरीक्षक आणि टास्क फोर्स कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

15 hrs ago
user_Mohammad Rafikh
Mohammad Rafikh
Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
15 hrs ago
1c5b21dd-cf8f-4a89-87cb-f38066c400ba

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रात आगामी रविवार, २८ जून २०२६ रोजी 'शून्य बालमृत्यूचे ध्येय आणि पोलिओमुक्त भारताचा संकल्प' सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच, शहरात 'स्टॉप डायरिया कॅम्पेन' (अतिसार नियंत्रण पंधरवडा) प्रभावीपणे राबवण्यासाठी दि.२३.०६.२०२६ रोजी मनपा स्थायी समिती बैठक कक्षात महानगरपालिकेच्या शहर कार्य बल गटाची (City Task Force) विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेऊन अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम अंतर्गत नांदेड मनपा क्षेत्रातील ० ते ५ वर्षांखालील ९२,८४५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत की ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक लस घेण्यापासून दुर्लक्षित राहणार नाही. या मोहिमेसाठी शहरात २८५ पोलिओ बुथ निश्चित करण्यात आले आहेत. प्रवासात असलेल्या किंवा दुर्गम भागात राहणाऱ्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी ६३ विशेष ट्रान्झिट पथके सज्ज करण्यात आली आहेत. मोहिमेच्या पहिल्या दिवशी (२८ जून) जे बालक बूथवर येऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी पुढील काही दिवस घरोघरी भेट देऊन १८० IPPI टीममधील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका वंचित बालकांना पोलिओचे थेंब पाजतील. तसेच, शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक, बाजारपेठा आणि मुख्य चौकांमध्ये लसीकरणासाठी १३ मोबाईल टीम स्थापित केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे, 'स्टॉप डायरिया कॅम्पेन' (अतिसार नियंत्रण) मोहिमेअंतर्गत बालकांमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊन होणारे मृत्यू रोखण्यासाठी शहरात अतिसार नियंत्रण पंधरवडा प्रभावीपणे राबवला जाईल. या मोहिमेत आशा स्वयंसेविकांमार्फत ५ वर्षांखालील मुलांच्या घराघरांमध्ये ओआरएस (ORS) पाकिटे आणि झिंक गोळ्यांचे पूर्व-नियोजित वाटप केले जाईल. शहरातील झोपडपट्ट्या, हाय-रिस्क एरिया, बांधकाम साईट्स आणि स्थलांतरित नागरिकांच्या वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून मायक्रो प्लॅन तयार करण्यात आला आहे. मनपाच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांवर, रुग्णालयांमध्ये आणि ओपीडीमध्ये 'ओआरएस-झिंक कॉर्नर्स' सुरू करण्यात येतील. तसेच, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि हात धुण्याच्या योग्य सवयींबाबत शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे. बैठकीत बोलताना महापौर सौ.कविता संतोष मुळे यांनी, पोलिओ निर्मूलनाचे यश टिकवून ठेवण्यासाठी शहरातील एकाही बालकाला लसीकरणापासून दुर्लक्षित ठेवू नये, अशी प्रशासनाने काळजी घ्यावी असे आवाहन केले. मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी स्पष्ट केले की, मुलाने नियमित लसीकरणातील सर्व पोलिओ डोस घेतले असले तरी, या राष्ट्रीय मोहिमेतील अतिरिक्त डोस देणे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि पालकांनी २८ जून रोजी आपल्या ५ वर्षांखालील प्रत्येक बालकाला जवळच्या केंद्रात नेऊन पोलिओ डोस नक्की पाजावा आणि अतिसार नियंत्रण मोहिमेला सहकार्य करून शहर बालमृत्यूमुक्त व सुदृढ बनवण्यास मदत करावी, असे आवाहन महापौर व आयुक्तांनी केले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत रिठ्ठे, सर्व वैद्यकीय अधिकारी, शिक्षणधिकारी प्रविणा मांदळे, आरोग्य निरीक्षक आणि टास्क फोर्स कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

More news from Maharashtra and nearby areas
  • नांदेड शहरात असलेल्या 'आर्या स्टेटस' या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. हे ठिकाण गजबजलेले असून, नांदेड शहरातील नागरिकांनी आणि इतर भेट देणाऱ्यांनी या 'आर्या स्टेटस'ला एकदा नक्की भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    नांदेड शहरात असलेल्या 'आर्या स्टेटस' या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. हे ठिकाण गजबजलेले असून, नांदेड शहरातील नागरिकांनी आणि इतर भेट देणाऱ्यांनी या 'आर्या स्टेटस'ला एकदा नक्की भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची आता पुणे शहरामध्ये बदली झाली आहे. या संदर्भात अधिकृत माहिती समोर आली आहे.
    1
    नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची आता पुणे शहरामध्ये बदली झाली आहे. या संदर्भात अधिकृत माहिती समोर आली आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आपले मत मांडले आहे. त्यांच्या प्रतिक्रियानुसार, उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले आहे की, विकासाला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी सत्तापक्षाच्या उमेदवारांनाच पसंती द्यावी.
    1
    मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आपले मत मांडले आहे. त्यांच्या प्रतिक्रियानुसार, उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले आहे की, विकासाला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी सत्तापक्षाच्या उमेदवारांनाच पसंती द्यावी.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    11 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता, ज्यांच्या कुटुंबीयांना ही आर्थिक मदत दिली जात आहे.
    1
    परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता, ज्यांच्या कुटुंबीयांना ही आर्थिक मदत दिली जात आहे.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथे सोमवार, २२ जून रोजी श्री संत तुकामाई यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे तीस ते पस्तीस हजार भाविक दाखल झाले होते, ज्यांनी मोठ्या भक्तीभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. येहळेगाव तुकाराम हे हिंगोली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, येथे संत तुकामाई यांचे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी शंभर फूट बांधकाम करून भव्य दिव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. पुण्यतिथीनिमित्त सलग आठ दिवस मोठ्या भक्तीभावाने पारायणे करण्यात आली, ज्यात आठव्या दिवशीही मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते. 'तुकामाई पारायण मंडळ येहळेगाव' आणि 'परभणी पारायण मंडळ' यांनी सामुदायिक पारायण करून आरती केली. या वेळी संतोष जाधव, विजय बाट, अविनाश जाधव, तुकाराम काळे, माणिकराव नांगरे, बबन नांगरे, परमेश्वर बाट, येहळेगाव तुकामाई पारायण महिला मंडळ तसेच परभणी येथील संजय गुरु, मिलिंदराव कुलकर्णी, नरेंद्र शुक्ल, गोपाळ कान्हेकर, संजय पाठक, प्रेमकुमार जोशी, दत्तात्रय अंबेकर, मानवतकर आणि धनंजय बोरवडकर यांनीही पारायण करून आरती केली. यावर्षी महाप्रसादासाठी शिरा, पुरी आणि मिश्रित भाजी तयार करण्यात आली होती, येथील मिश्रित भाजीला विशेष महत्त्व आहे. येहळेगाव तुकाराम येथील मंदिर परिसर तसेच जवळच असलेल्या मरडगाव येथे तब्बल पाच ते सात एकर जमिनीवर भाविकांनी पंगती धरून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. एकूण तीस ते पस्तीस हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
    1
    कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथे सोमवार, २२ जून रोजी श्री संत तुकामाई यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे तीस ते पस्तीस हजार भाविक दाखल झाले होते, ज्यांनी मोठ्या भक्तीभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला.

येहळेगाव तुकाराम हे हिंगोली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, येथे संत तुकामाई यांचे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी शंभर फूट बांधकाम करून भव्य दिव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. पुण्यतिथीनिमित्त सलग आठ दिवस मोठ्या भक्तीभावाने पारायणे करण्यात आली, ज्यात आठव्या दिवशीही मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते.

'तुकामाई पारायण मंडळ येहळेगाव' आणि 'परभणी पारायण मंडळ' यांनी सामुदायिक पारायण करून आरती केली. या वेळी संतोष जाधव, विजय बाट, अविनाश जाधव, तुकाराम काळे, माणिकराव नांगरे, बबन नांगरे, परमेश्वर बाट, येहळेगाव तुकामाई पारायण महिला मंडळ तसेच परभणी येथील संजय गुरु, मिलिंदराव कुलकर्णी, नरेंद्र शुक्ल, गोपाळ कान्हेकर, संजय पाठक, प्रेमकुमार जोशी, दत्तात्रय अंबेकर, मानवतकर आणि धनंजय बोरवडकर यांनीही पारायण करून आरती केली.

यावर्षी महाप्रसादासाठी शिरा, पुरी आणि मिश्रित भाजी तयार करण्यात आली होती, येथील मिश्रित भाजीला विशेष महत्त्व आहे. येहळेगाव तुकाराम येथील मंदिर परिसर तसेच जवळच असलेल्या मरडगाव येथे तब्बल पाच ते सात एकर जमिनीवर भाविकांनी पंगती धरून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. एकूण तीस ते पस्तीस हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • बिटरगाव (बु) पोलीस स्टेशन बीटमध्ये खुलेआम देशी, विदेशी, बिअर आणि बनावट हातभट्टी दारू दुकाने लावून विकली जात आहेत, तसेच वरळी मटका आणि ५२ पत्त्यांचा जुगार बिनधोकपणे सुरू आहे. गावात पोलीस स्टेशन असूनही बिटरगाव (बु) मध्ये अनेक देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने आणि चार वरळी मटका दुकाने सुरू आहेत. याशिवाय पिंपळगाव (वन), जेवली, येकंबा (वन), मोरचंडी, मुरली, आकोली आणि करंजी या गावांमध्येही असेच अवैध धंदे सुरू आहेत. बिटरगावातील बस स्टॉपला लागून दारू आणि वरळी मटका दुकाने, बिटरगाव ते जेवली रोडला लागून देशी-विदेशी विक्री दुकाने, रसवंतीच्या नावाखाली दारू दुकाने आणि कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून देशी-विदेशी दारू दुकाने आहेत. इतकेच नाही तर बिटरगाव ते मन्याळी रोडला लागून नरडे, पापड, उकडलेली अंडी आणि आलू भजेच्या दुकानातही देशी व विदेशी दारू खुलेआम विकली जात आहे. या अवैध धंद्यांमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होऊन मुले-बाळे भीक मागायला लागली आहेत. तरुण पिढी आणि विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असल्याने भावी पिढी बरबाद होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वरळी मटका, ५२ पत्त्याचा जुगार आणि दारू विक्रेत्यांची दादागिरी वाढली असून, तक्रार करणाऱ्या महिलांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रारी देतात, मात्र बीट जमादार साहेब महिलांच्या समाधानासाठी दारू विक्रेत्यांवर थातूर-मातूर कारवाई करून मोकळे होतात आणि पुन्हा दारू विक्रेते जोमाने धंदे सुरू करतात. असा सिलसिला बिटरगाव पोलीस स्टेशनचा सुरू असल्याने महिलांनी कोणाकडे न्याय मागावा, हा गंभीर प्रश्न आंदोलन करणाऱ्या शेकडो महिलांना पडला आहे. आंदोलनकर्त्या महिलांनी स्पष्ट शब्दात आरोप केला आहे की, हे सर्व माहीत असूनही बीट अमलदार साहेब कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन स्वतःचा खिसा गरम करत आहेत आणि आमचे संसार देशोधडीला लावत आहेत. मागील तीन महिन्यांपूर्वीही अवैध धंदे बंद करा अशी मागणी करत महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला होता आणि लेखी तक्रार दिली होती. त्यावेळी स्वतः ठाणेदार शिंदे साहेबांनी एका महिन्यात सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्या महिलांना दिले होते. परंतु, अजूनही ती दुकाने बंद झालेली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज, २२ जून २०२६, सोमवार रोजी ३०० हून अधिक महिलांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रार दिली आहे. बीट जमादार साहेबांच्या आशीर्वादाने बिटरगाव (बु) बीटमधील अवैध धंदे सात दिवसांच्या आत बंद झाले नाहीत, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्या संतप्त महिलांनी दिला आहे.
    3
    बिटरगाव (बु) पोलीस स्टेशन बीटमध्ये खुलेआम देशी, विदेशी, बिअर आणि बनावट हातभट्टी दारू दुकाने लावून विकली जात आहेत, तसेच वरळी मटका आणि ५२ पत्त्यांचा जुगार बिनधोकपणे सुरू आहे. गावात पोलीस स्टेशन असूनही बिटरगाव (बु) मध्ये अनेक देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने आणि चार वरळी मटका दुकाने सुरू आहेत. याशिवाय पिंपळगाव (वन), जेवली, येकंबा (वन), मोरचंडी, मुरली, आकोली आणि करंजी या गावांमध्येही असेच अवैध धंदे सुरू आहेत. बिटरगावातील बस स्टॉपला लागून दारू आणि वरळी मटका दुकाने, बिटरगाव ते जेवली रोडला लागून देशी-विदेशी विक्री दुकाने, रसवंतीच्या नावाखाली दारू दुकाने आणि कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून देशी-विदेशी दारू दुकाने आहेत. इतकेच नाही तर बिटरगाव ते मन्याळी रोडला लागून नरडे, पापड, उकडलेली अंडी आणि आलू भजेच्या दुकानातही देशी व विदेशी दारू खुलेआम विकली जात आहे.

या अवैध धंद्यांमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होऊन मुले-बाळे भीक मागायला लागली आहेत. तरुण पिढी आणि विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असल्याने भावी पिढी बरबाद होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वरळी मटका, ५२ पत्त्याचा जुगार आणि दारू विक्रेत्यांची दादागिरी वाढली असून, तक्रार करणाऱ्या महिलांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रारी देतात, मात्र बीट जमादार साहेब महिलांच्या समाधानासाठी दारू विक्रेत्यांवर थातूर-मातूर कारवाई करून मोकळे होतात आणि पुन्हा दारू विक्रेते जोमाने धंदे सुरू करतात. असा सिलसिला बिटरगाव पोलीस स्टेशनचा सुरू असल्याने महिलांनी कोणाकडे न्याय मागावा, हा गंभीर प्रश्न आंदोलन करणाऱ्या शेकडो महिलांना पडला आहे. आंदोलनकर्त्या महिलांनी स्पष्ट शब्दात आरोप केला आहे की, हे सर्व माहीत असूनही बीट अमलदार साहेब कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन स्वतःचा खिसा गरम करत आहेत आणि आमचे संसार देशोधडीला लावत आहेत.

मागील तीन महिन्यांपूर्वीही अवैध धंदे बंद करा अशी मागणी करत महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला होता आणि लेखी तक्रार दिली होती. त्यावेळी स्वतः ठाणेदार शिंदे साहेबांनी एका महिन्यात सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्या महिलांना दिले होते. परंतु, अजूनही ती दुकाने बंद झालेली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज, २२ जून २०२६, सोमवार रोजी ३०० हून अधिक महिलांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रार दिली आहे. बीट जमादार साहेबांच्या आशीर्वादाने बिटरगाव (बु) बीटमधील अवैध धंदे सात दिवसांच्या आत बंद झाले नाहीत, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्या संतप्त महिलांनी दिला आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मदनुर येथील श्री बालाजी मंदिरात राजस्थानी समाजातर्फे महेश नवमीचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राजस्थानी समाजातील महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती, ज्यामुळे कार्यक्रमाला आणखीनच उत्साह लाभला.
    1
    मदनुर येथील श्री बालाजी मंदिरात राजस्थानी समाजातर्फे महेश नवमीचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राजस्थानी समाजातील महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती, ज्यामुळे कार्यक्रमाला आणखीनच उत्साह लाभला.
    user_SANDEEP
    SANDEEP
    TV News Anchor देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी कारेगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिरंगा ध्वज पदयात्रा काढण्यात आली.
    1
    अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी कारेगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिरंगा ध्वज पदयात्रा काढण्यात आली.
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house Nanded, Maharashtra•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.