नांदेड – वाजेगाव ईदगाह परिसरातील घटना : फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव येथील ईदगाह परिसरात घडलेल्या घटनेचा तपास सुरू असून, या प्रकरणात अद्याप ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस प्रशासन फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की, घटनास्थळावरून गोळा करण्यात आलेले पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतरच घटनेमागील नेमकी कारणे आणि परिस्थिती स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या घटनेची सर्व बाजूंनी तपासणी केली जात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नांदेड – वाजेगाव ईदगाह परिसरातील घटना : फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव येथील ईदगाह परिसरात घडलेल्या घटनेचा तपास सुरू असून, या प्रकरणात अद्याप ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस प्रशासन फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की, घटनास्थळावरून गोळा करण्यात आलेले पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतरच घटनेमागील नेमकी कारणे आणि परिस्थिती स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या घटनेची सर्व बाजूंनी तपासणी केली जात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
- नांदेड : आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून नांदेड शहरात आज सकाळपासून वातावरण तापलेले दिसून आले. विविध समाजघटकांच्या वतीने उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून, हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर आणि जोरदार पद्धतीने सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या देशात भाजपची सत्ता असतानाही आरक्षणाचे उपवर्गीकरण होत नसल्यामुळे संबंधित समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आंदोलनस्थळी उपोषणकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत समतोलपणे पोहोचण्यासाठी उपवर्गीकरण अत्यावश्यक आहे. मात्र, याबाबत अद्याप ठोस निर्णय होत नसल्याने त्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. या उपोषणामुळे नांदेड शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आगामी काळात या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे1
- मुखेड येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचे २५ एप्रिल रोजी भव्य अनावरण ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू मुखेड / अनिल कांबळे मुखेड तालुक्यातील वीरशैव लिंगायत समाजाच्या एकजुटीतून साकारलेल्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचे भव्य अनावरण दि. २५ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ६ वाजता करण्यात आले असून, संपूर्ण तालुक्यात या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. या स्मारकाचे अनावरण डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते होणार असून, विविध मठांतील शिवाचार्य महाराजांचे सान्निध्य या सोहळ्यास लाभणार आहे. त्यामुळे धार्मिक व सामाजिक दृष्ट्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमास तमलूरचे शिवानंद शिवाचार्य महाराज, बिचकुंदाचे सोमलिंग शिवाचार्य महाराज, हणेगावचे शंकरलिंग शिवाचार्य महाराज, देवणीचे सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, नागठाण्याचे सद्योजात शिवाचार्य महाराज, उदगीरचे डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज, बेटमोगराचे सिद्धद्याळ शिवाचार्य महाराज, मुखेडचे डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज, आलमेलचे चंद्रशेखर शिवाचार्य महाराज तसेच अहमदपूरचे राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचीही या सोहळ्यास उपस्थिती लाभणार असून, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे, लातूर लोकसभेचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, अखिल भारतीय वीरशैव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहरराव धोंडे तसेच सुप्रसिद्ध उद्योजक सुमित मोरगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने दुपारी ४ वाजता बालाजी मंदिरापासून शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. शहरातील विविध मार्गांवरून ही शोभायात्रा काढण्यात येणार असून, भाविकांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. तसेच दुपारी ३ वाजल्यापासून महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्मारकामुळे वीरशैव लिंगायत समाजाच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेला नवे अधिष्ठान मिळणार असून, हा सोहळा समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे. सध्या मुखेड शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांमार्फत नियोजनबद्ध तयारी सुरू आहे. तर जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक समितीच्या वतीने सर्व समाजबांधवांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याला यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- Post by Shuddhodhan Dhawale1
- Post by Suresh Bodke1
- अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, वाहनासह ८.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त. लातूर (एल पी उगीले) महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशांवर, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्हा पोलीस दल सतत सक्रिय असून, याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करून अवैध गुटखा वाहतूक प्रकरण उघडकीस आणले आहे. दि. २३ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक अवैध धंद्यांविरोधात गुप्त माहिती संकलन व कारवाईसाठी लातूर जिल्ह्यात पेट्रोलिंग करीत होते. सकाळी सुमारे ९:०० वा. पथकाला माहिती मिळाली की, रेनापुर फाटा ते रेणापूर गावाकडे जाणाऱ्या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH 44 G 2994) मधून प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जाणार आहे. प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. काही वेळातच नमूद वाहन घटनास्थळी येताच पोलिसांनी तत्परतेने कार थांबवून तपासणी केली. सदर कारमधून चालकास ताब्यात घेऊन त्याची ओळख अमर श्रीकांत लकडे (वय २८ वर्षे, रा. बोरवटी, ता. जि. लातूर) अशी पटली. यानंतर कारची सखोल झडती घेतली असता, वाहनामध्ये विविध प्रकारचे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. यामध्ये विमल पान मसाला, वी-१ तंबाखू, रजनीगंधा पान मसाला व रत्ना ३००० सुगंधीत तंबाखू असा एकूण अंदाजे २,३९,५८४/- रुपये किंमतीचा गुटखा साठा मिळून आला. तसेच या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिजायर कार (अंदाजे किंमत ६,००,०००/- रुपये) जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ८,३९,५८४/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी आरोपी अमर श्रीकांत लकडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत कलम ५९ प्रमाणे रेनापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास रेनापुर पोलीस करीत आहेत. सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस हवालदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मुन्ना मदने, आनंद हल्लाळे व प्रविण कोळसुरे यांनी पार पाडली.2
- Post by माधव गायकवाड1
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक २३ एप्रिल रोजी नांदेड: स्थानिक प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे नांदेडकरांना आता आपल्या प्राणांची भीती वाटू लागली आहे. वारंवार तक्रारी करूनही नाल्यांवरील झाकणे बसवली जात नसल्याने, शहरात अपघातांची मालिका सुरूच आहे. मालेगाव रोडवरील जैन मंदिराजवळ आज पुन्हा एक गाय उघड्या नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव रोड परिसरातील नाल्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून झाकणे नाहीत. आज सकाळी एक गाय या नाल्यात पडली आणि गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिक, व्यापारी, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत महापालिका प्रशासनाला आणि फायर ब्रिगेडला पाचारण केले. अथक परिश्रमानंतर या गाईला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. नागरिकांचा रोष: प्रशासन झोपले आहे का? या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. "महानगरपालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना वारंवार विनंती करूनही या नाल्यावर झाकण का बसवले जात नाही?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. यापूर्वीही याच ठिकाणी लहान मुले, वृद्ध नागरिक आणि अनेक मुकी जनावरे पडून जखमी झाली आहेत. प्रशासकीय कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह एकीकडे स्मार्ट सिटीच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे साध्या नाल्यांवरील झाकणेही बसवता येत नाहीत, यावरून प्रशासकीय अनास्था दिसून येते. नागरिकांच्या आणि मुक्या जनावरांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार थांबणार कधी? झोपलेले अधिकारी आणि कर्मचारी आतातरी जागे होणार का? अशा प्रश्नांची सरबत्ती सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे. जर भविष्यात अशा उघड्या नाल्यांमुळे एखादा मोठा अनर्थ घडला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.1
- जात-आधारित जनगणना आणि इतर मागासवर्गीयांच्या जात-आधारित जनगणनेच्या मुद्द्यावर भाजपकडून इतर मागासवर्गीयांसोबत होत असलेल्या फसवणुकीविरोधात, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीयांच्या समर्थनार्थ कठोर विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) विधेयकाच्या अंमलबजावणीच्या समर्थनार्थ आणि २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेतून (TET) सूट देण्याच्या समर्थनार्थ, देशभरात टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत असलेल्या आंदोलनाची माहिती देण्याच्या संदर्भात… देशव्यापी टप्प्याटप्प्याने होणाऱ्या हालचालींचे मुद्दे:- १. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने जात-आधारित ओबीसी जनगणना घेण्याचा निर्णय घेतला असूनही, जनगणनेच्या अधिसूचनेत ओबीसींसाठी जातीचा रकाना समाविष्ट केलेला नाही. घोषणा झाल्यानंतरही ओबीसींसाठी जातीचा रकाना वगळणे हा ओबीसींचा विश्वासघात आहे. त्यामुळे, या वर्षापासून राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी आणि जातीची माहिती समाविष्ट केली जाईल.1