सामाजिक बांधिलकीचा जागर जागवत भूमीहीन गरिबांना घरासाठी जमीन देऊन स्व.अंकुश तात्या जरे यांना अनोखी आदरांजली सामाजिक बांधिलकीचा जागर जागवत भूमीहीन गरिबांना घरासाठी जमीन देऊन स्व.अंकुश तात्या जरे यांना अनोखी आदरांजली खवासपूर येथे १५ भूमीहीन कुटुंबांना घरकुलासाठी दिली मोफत जमीन सांगोला ; तालुका प्रतिनिधी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असणाऱ्या खवासपूर ता. सांगोला येथील वसंत आप्पा जरे यांचे बंधू स्व. अंकुश तात्या जरे यांच्या प्रथम पुण्यतिथी दिवशी खवासपूर ता सांगोला येथील १५ भूमीहीन कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची १५ गुंठे जमीन देऊन स्वर्गीय अंकुश तात्या जरे यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. रविवार दि १९ एप्रिल रोजी खवसपूर ता सांगोला येथे स्वर्गीय अंकुश तात्या जरे यांना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, सभापती पुनम इंगवले, युवा नेते ॲड दिग्विजय पाटील यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली. राज्य सरकारकडून सध्या ज्या गरिबांना राहण्यासाठी घर नाही त्यांना घरकुल योजना सुरू आहे. परंतु, घर बांधण्यासाठी अशा गोरगरीब लोकांना स्वतःची जमीन नसल्याने अनेकांचे घर बांधण्याची स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. खवासपूर ता सांगोला येथील अशाच १५ भूमीहीन कुटुंबांची गरज लक्षात घेऊन वसंत आप्पा जरे यांनी स्व. अंकुश तात्या जरे या आपल्या बंधूंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून स्वतःच्या मालकीची १५ गुंठे जमीन गोरगरीब लोकांना देण्याचा निर्धार केला या जमिनी त्यांच्या नावावर करून या जागेवर गावातील भूमीहीन लोक आपले घर बांधणार आहेत वसंत आप्पा जरे यांच्या या अनोख्या संकल्पामुळे या कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. त्याचबरोबर या १५ कुटुंबासह ज्या गोरगरीब कुटुंबांना घरकुल मंजूर झाले आहे. परंतु, त्यांना घरकुल बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन नाही अशा आणखी काही कुटुंबांना आपण आपल्या मालकीची जमीन देणार असल्याचे यावेळी ज्येष्ठ नेते वसंत आप्पा जरे यांनी स्पष्ट केले. चौकट ; १) वसंत आप्पा आणि स्व. अंकुश तात्या म्हणजे साक्षात राम लक्ष्मण आज जमिनीच्या कारणावरून सख्ख्या भावात वाद आणि भांडण झाल्याचे प्रकार आपण सर्रास पाहतो. परंतु, आपल्या भावाच्या निधनानंतर त्यांच्या प्रथम पुण्यतिथीचे औचित्य साधून आपल्या स्वतःच्या मालकीची जमीन गरिबांना घरकुल बांधण्यासाठी देणारा वसंत आप्पा जरे यांच्यासारखा भाऊ मिळणे आज खूप मोठी गोष्ट आहे. आपण राम लक्ष्मण फक्त रामायणात वाचत किंवा ऐकत आलो आहे आज प्रत्यक्षात आपल्याला स्व अंकुश तात्या आणि वसंत आप्पांच्या रूपाने राम आणि लक्ष्मणाची जोडी पहायला मिळाली हे आपले सद्भाग्य..! दिपकआबा साळुंखे पाटील, माजी आमदार
सामाजिक बांधिलकीचा जागर जागवत भूमीहीन गरिबांना घरासाठी जमीन देऊन स्व.अंकुश तात्या जरे यांना अनोखी आदरांजली सामाजिक बांधिलकीचा जागर जागवत भूमीहीन गरिबांना घरासाठी जमीन देऊन स्व.अंकुश तात्या जरे यांना अनोखी आदरांजली खवासपूर येथे १५ भूमीहीन कुटुंबांना घरकुलासाठी दिली मोफत जमीन सांगोला ; तालुका प्रतिनिधी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असणाऱ्या खवासपूर ता. सांगोला येथील वसंत आप्पा जरे यांचे बंधू स्व. अंकुश तात्या जरे यांच्या प्रथम पुण्यतिथी दिवशी खवासपूर ता सांगोला येथील १५ भूमीहीन कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची १५ गुंठे जमीन देऊन स्वर्गीय अंकुश तात्या जरे यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. रविवार दि १९ एप्रिल रोजी खवसपूर ता सांगोला येथे स्वर्गीय अंकुश तात्या जरे यांना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, सभापती पुनम इंगवले, युवा नेते ॲड दिग्विजय पाटील यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली. राज्य सरकारकडून सध्या ज्या गरिबांना राहण्यासाठी घर नाही त्यांना घरकुल योजना सुरू आहे. परंतु, घर बांधण्यासाठी अशा गोरगरीब लोकांना स्वतःची जमीन नसल्याने अनेकांचे घर बांधण्याची स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. खवासपूर ता सांगोला येथील अशाच १५ भूमीहीन कुटुंबांची गरज लक्षात घेऊन वसंत आप्पा जरे यांनी स्व. अंकुश तात्या जरे या आपल्या बंधूंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून स्वतःच्या मालकीची १५ गुंठे जमीन गोरगरीब लोकांना देण्याचा निर्धार केला या जमिनी त्यांच्या नावावर करून या जागेवर गावातील भूमीहीन लोक आपले घर बांधणार आहेत वसंत आप्पा जरे यांच्या या अनोख्या संकल्पामुळे या कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. त्याचबरोबर या १५ कुटुंबासह ज्या गोरगरीब कुटुंबांना घरकुल मंजूर झाले आहे. परंतु, त्यांना घरकुल बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन नाही अशा आणखी काही कुटुंबांना आपण आपल्या मालकीची जमीन देणार असल्याचे यावेळी ज्येष्ठ नेते वसंत आप्पा जरे यांनी स्पष्ट केले. चौकट ; १) वसंत आप्पा आणि स्व. अंकुश तात्या म्हणजे साक्षात राम लक्ष्मण आज जमिनीच्या कारणावरून सख्ख्या भावात वाद आणि भांडण झाल्याचे प्रकार आपण सर्रास पाहतो. परंतु, आपल्या भावाच्या निधनानंतर त्यांच्या प्रथम पुण्यतिथीचे औचित्य साधून आपल्या स्वतःच्या मालकीची जमीन गरिबांना घरकुल बांधण्यासाठी देणारा वसंत आप्पा जरे यांच्यासारखा भाऊ मिळणे आज खूप मोठी गोष्ट आहे. आपण राम लक्ष्मण फक्त रामायणात वाचत किंवा ऐकत आलो आहे आज प्रत्यक्षात आपल्याला स्व अंकुश तात्या आणि वसंत आप्पांच्या रूपाने राम आणि लक्ष्मणाची जोडी पहायला मिळाली हे आपले सद्भाग्य..! दिपकआबा साळुंखे पाटील, माजी आमदार
- Post by Digital media.1
- BT News शी बोलताना जय पवारांनी प्रचारात गाव भेटीत लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस ते बोलताना दादाच्या आठवणी व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आवाहन करण्यात आले.1
- जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन तरुण मंडळ आयोजित भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,या शिबिरात तब्बल 61 तरुणांनी सहभाग नोंदवत त्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले,कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली,रक्तसंकलनासाठी सोलापूर येथील सिद्धेश्वर ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते आणि त्यांचा विशेष सहकार्य या शिबिरास लाभला, मंडळाच्या वतीने सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला, ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन तरुण मंडळाने पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते आणि पहिल्याच वेळी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,या विधायक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.याप्रसंगी ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- अजितदादांच्या स्टाईलमध्येच युवा नेते जय पवारांनी सोडवला शाळेचा प्रश्न..! बारामती मतदारसंघात गावभेट दौऱ्यावर असताना युवा नेते जय अजितदादा पवार यांनी भिकोबा नगर येथील एका शाळेला भेट दिली. शाळेच्या अगदी शेजारी महावितरणच्या विद्युत लाईनचे खांब असल्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचा धोका निर्माण झाला होता. कमी खर्चात कंटेनरच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या शाळेसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत होती. याबाबत शाळेच्या प्राचार्यांनी जय पवार यांच्याकडे समस्या मांडताच त्यांनी तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जय पवार यांनी शाळेच्या कंटेनरमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच अनाथ मुलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.1
- कोल्हापुरात भीषण दुर्घटना! भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जुने घर जेसीबीने पाडत असताना भिंत अचानक कोसळली आणि त्या ठिकाणाहून जात असलेल्या प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार आणि विद्यार्थिनी वैष्णवी भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत ललीता भोसले गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे.1
- Shiv Jayanti 2026 Kolhapur Shiv Jayanti Shivaji Maharaj Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Jayanti Celebration Kolhapur Festival Maharashtra Festivalकोल्हापुरात शिवजयंतीचा जल्लोष | छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2026s Shivaji Maharaj Status Shivaji Maharaj Video Shiv Jayanti Kolhapur 2026 Maharashtra Culture Dhol Tasha Pathak Shiv Jayanti Utsav Kolhapur News Shivaji Maharaj Jayanti Celebration1
- विक्रम शिंदे /भोर दि.20तालुक्याच्या भाटघर धरण क्षेत्रातील पसुरे मधील टोंगेवाडी येथे पुणे येथील आदिनाथ भक्तामर हीलिंग सेंटरच्या वतीने नागरिकांना आरोग्यहितकारक थंडगार पाण्यासाठी माठ मोफत वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे गौरव मुनोत,सुरेशनाना धुमाळ,दत्तात्रेयदादा धुमाळ,संतोष धुमाळ,मनोज धुमाळ तसेच महिला भगिनी,युवक उपस्थित होते. प्रति कुटुंब एक असे माठ वितरित करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी व महिलांनी माठ मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.1
- Post by मन्सूर शेख1