logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

‘विकृत, विक्षिप्त’ म्हणविलेल्या आरोपांवरून सारिका चंद्रकांत नागरे यांच्या विरोधात जनशक्ती एकवटली शिरूर : स्वतःला समाजसेविका म्हणून पुढे करणाऱ्या सारिका चंद्रकांत नागरे यांच्या कथित कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या विरोधात जनशक्ती एकवटत असल्याचे चित्र आहे. नागरे यांच्या संदर्भात विविध आरोप व तक्रारी पुढे येत असून, या सर्व बाबींची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. समाजसेवेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार होत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याची सत्यता अधिकृत चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारींची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नागरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. ‘समाजसेवेच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको; सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे,’ अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2 hrs ago
user_Rajendra kulthe
Rajendra kulthe
Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago

‘विकृत, विक्षिप्त’ म्हणविलेल्या आरोपांवरून सारिका चंद्रकांत नागरे यांच्या विरोधात जनशक्ती एकवटली शिरूर : स्वतःला समाजसेविका म्हणून पुढे करणाऱ्या सारिका चंद्रकांत नागरे यांच्या कथित कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या विरोधात जनशक्ती एकवटत असल्याचे चित्र आहे. नागरे यांच्या संदर्भात विविध आरोप व तक्रारी पुढे येत असून, या सर्व बाबींची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. समाजसेवेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार होत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याची सत्यता अधिकृत चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारींची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नागरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. ‘समाजसेवेच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको; सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे,’ अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या टोळीवर MCOCA अंतर्गत कारवाई; ११ आरोपी अटकेत शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पांढी, वय २४ वर्षे, रा. वाघोली, ता. शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या टोळीवर MCOCA अंतर्गत कारवाई; ११ आरोपी अटकेत शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पांढी, वय २४ वर्षे, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे आणि त्याच्या गुन्हेगारी टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतील ११ आरोपींवर MCOCA अंतर्गत कारवाईस मंजुरी देण्यात आली आहे. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०९/२०२६ नुसार दिनांक १ जून २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे, भारतीय हत्यार कायदा १९५९ तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेमका प्रकार काय? १ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता, शिरूर तालुक्यातील सारडवाडी येथील करडे घाट परिसरातील राजस्थान ढाब्याजवळ ही घटना घडली. फिर्यादी व त्याचा मित्र टोयोटा कारमधून शिरूरकडे जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून वाहनाला धडक दिल्याचे तसेच त्यानंतर फिर्यादीला धमकावून हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले. या घटनेत फिर्यादीच्या मित्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, तर फिर्यादीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे नमूद आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात टोळीचे गुन्हेगारी कृत्य उघड गुन्ह्याच्या तपासादरम्यान इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पांढी, सनी संजय यादव आणि त्यांच्या गुन्हेगारी टोळीचा सहभाग समोर आला. तपासात टोळीतील एकूण ११ आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यापैकी १० आरोपींना शोधून अटक करण्यात आली आहे. एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या टोळीविरोधात यापूर्वीही संघटित पद्धतीने गुन्हे केल्याचे पोलिस तपासात आढळून आले. टोळीमार्फत बेकायदेशीर गर्दी जमवणे, शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे, खंडणीसाठी धमकावणे, जीवघेणे हल्ले करणे आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे कागदपत्रात नमूद आहे. कोल्हापूर परिक्षेत्राकडून MCOCA मंजुरी टोळीच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालून परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिरूर पोलिसांनी MCOCA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता. या प्रस्तावाची कागदपत्रे व गुन्ह्यांची पडताळणी केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर मा. रंजनकुमार शर्मा साओ यांनी MCOCA कायद्यान्वये कलमांची वाढ करण्यास सक्षम प्राधिकारी म्हणून मंजुरी दिली. त्यानंतर पुढील तपासाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक महेश डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व शिरूर विभागातील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शिरूर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला असून, गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
    1
    शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या टोळीवर MCOCA अंतर्गत कारवाई; ११ आरोपी अटकेत
शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पांढी, वय २४ वर्षे, रा. वाघोली, ता.
शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या टोळीवर MCOCA अंतर्गत कारवाई; ११ आरोपी अटकेत
शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पांढी, वय २४ वर्षे, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे आणि त्याच्या गुन्हेगारी टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतील ११ आरोपींवर MCOCA अंतर्गत कारवाईस मंजुरी देण्यात आली आहे.
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०९/२०२६ नुसार दिनांक १ जून २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे, भारतीय हत्यार कायदा १९५९ तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नेमका प्रकार काय?
१ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता, शिरूर तालुक्यातील सारडवाडी येथील करडे घाट परिसरातील राजस्थान ढाब्याजवळ ही घटना घडली. फिर्यादी व त्याचा मित्र टोयोटा कारमधून शिरूरकडे जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून वाहनाला धडक दिल्याचे तसेच त्यानंतर फिर्यादीला धमकावून हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले.
या घटनेत फिर्यादीच्या मित्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, तर फिर्यादीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे नमूद आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासात टोळीचे गुन्हेगारी कृत्य उघड
गुन्ह्याच्या तपासादरम्यान इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पांढी, सनी संजय यादव आणि त्यांच्या गुन्हेगारी टोळीचा सहभाग समोर आला. तपासात टोळीतील एकूण ११ आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यापैकी १० आरोपींना शोधून अटक करण्यात आली आहे. एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या टोळीविरोधात यापूर्वीही संघटित पद्धतीने गुन्हे केल्याचे पोलिस तपासात आढळून आले. टोळीमार्फत बेकायदेशीर गर्दी जमवणे, शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे, खंडणीसाठी धमकावणे, जीवघेणे हल्ले करणे आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे कागदपत्रात नमूद आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राकडून MCOCA मंजुरी
टोळीच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालून परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिरूर पोलिसांनी MCOCA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता.
या प्रस्तावाची कागदपत्रे व गुन्ह्यांची पडताळणी केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर मा. रंजनकुमार शर्मा साओ यांनी MCOCA कायद्यान्वये कलमांची वाढ करण्यास सक्षम प्राधिकारी म्हणून मंजुरी दिली. त्यानंतर पुढील तपासाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक महेश डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व शिरूर विभागातील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे शिरूर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला असून, गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
    user_पत्रकार . शाबान शाह
    पत्रकार . शाबान शाह
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ‘विकृत, विक्षिप्त’ म्हणविलेल्या आरोपांवरून सारिका चंद्रकांत नागरे यांच्या विरोधात जनशक्ती एकवटली शिरूर : स्वतःला समाजसेविका म्हणून पुढे करणाऱ्या सारिका चंद्रकांत नागरे यांच्या कथित कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या विरोधात जनशक्ती एकवटत असल्याचे चित्र आहे. नागरे यांच्या संदर्भात विविध आरोप व तक्रारी पुढे येत असून, या सर्व बाबींची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. समाजसेवेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार होत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याची सत्यता अधिकृत चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारींची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नागरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. ‘समाजसेवेच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको; सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे,’ अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    ‘विकृत, विक्षिप्त’ म्हणविलेल्या आरोपांवरून सारिका चंद्रकांत नागरे यांच्या विरोधात जनशक्ती एकवटली

शिरूर : स्वतःला समाजसेविका म्हणून पुढे करणाऱ्या सारिका चंद्रकांत नागरे यांच्या कथित कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या विरोधात जनशक्ती एकवटत असल्याचे चित्र आहे. नागरे यांच्या संदर्भात विविध आरोप व तक्रारी पुढे येत असून, या सर्व बाबींची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
समाजसेवेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार होत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याची सत्यता अधिकृत चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारींची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
‘समाजसेवेच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको; सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे,’ अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Rajendra kulthe
    Rajendra kulthe
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लिंबेवाडीत विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार? दलित वस्तीतील नागरिकांचा गंभीर आरोप; कारवाईची मागणी
    1
    लिंबेवाडीत विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार? दलित वस्तीतील नागरिकांचा गंभीर आरोप; कारवाईची मागणी
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    24 min ago
  • जिजाऊ लेकी आक्रमक मराठा छत्रपती महाराष्ट्र विरोधी टकले सेनेचे पदाधिकारी यांना रक्षाबंधनावर एक डजन बांगड्या लिपस्टिक भेट महाराष्ट्र : मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ’च्या काही पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या पदाधिकाऱ्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असून, छत्रपती जिजाऊसाहेबांच्या लेकींच्या विरोधात तसेच महाराष्ट्राच्या हिताविरोधात काम केले जात असल्याचा दावा ‘मराठ्यांच्या लेक शिवशंभू कन्या’च्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक नकाशा हटविण्याच्या कथित प्रयत्नांसंदर्भात संबंधितांनी राजस्थानमध्ये जाऊन बैठक घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या बैठकीमागे महाराष्ट्रविरोधी कटकारस्थान असल्याचा दावा आरोपकर्त्यांनी केला आहे. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपतींच्या वंशजांची बदनामी करण्याचे काम संबंधितांकडून होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या गटाला ‘टकले सेना’ असे संबोधून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, या कथित बैठकांसाठी किंवा अन्य कारणांसाठी ५० कोटी रुपये मिळाल्याची शंकाही आरोपकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, या आर्थिक व्यवहाराबाबत कोणतेही अधिकृत पुरावे किंवा स्वतंत्र पुष्टी सध्या समोर आलेली नाही. या सर्व आरोपांबाबत संबंधित संघटनेची अधिकृत भूमिका अथवा स्पष्टीकरण उपलब्ध झाल्यास तेही प्रसिद्ध केले जाणे आवश्यक आहे. आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे गरजेचे असून, ऐतिहासिक वारसा आणि मराठा समाजाशी संबंधित संवेदनशील विषय असल्याने वस्तुनिष्ठ तथ्यांच्या आधारेच पुढील भूमिका निश्चित करण्याची गरज व्यक्त होत आहे.
    1
    जिजाऊ लेकी आक्रमक मराठा छत्रपती महाराष्ट्र विरोधी टकले सेनेचे पदाधिकारी यांना रक्षाबंधनावर एक डजन बांगड्या लिपस्टिक भेट
महाराष्ट्र : मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ’च्या काही पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या पदाधिकाऱ्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असून, छत्रपती जिजाऊसाहेबांच्या लेकींच्या विरोधात तसेच महाराष्ट्राच्या हिताविरोधात काम केले जात असल्याचा दावा ‘मराठ्यांच्या लेक शिवशंभू कन्या’च्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक नकाशा हटविण्याच्या कथित प्रयत्नांसंदर्भात संबंधितांनी राजस्थानमध्ये जाऊन बैठक घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या बैठकीमागे महाराष्ट्रविरोधी कटकारस्थान असल्याचा दावा आरोपकर्त्यांनी केला आहे.
याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपतींच्या वंशजांची बदनामी करण्याचे काम संबंधितांकडून होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या गटाला ‘टकले सेना’ असे संबोधून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
दरम्यान, या कथित बैठकांसाठी किंवा अन्य कारणांसाठी ५० कोटी रुपये मिळाल्याची शंकाही आरोपकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, या आर्थिक व्यवहाराबाबत कोणतेही अधिकृत पुरावे किंवा स्वतंत्र पुष्टी सध्या समोर आलेली नाही.
या सर्व आरोपांबाबत संबंधित संघटनेची अधिकृत भूमिका अथवा स्पष्टीकरण उपलब्ध झाल्यास तेही प्रसिद्ध केले जाणे आवश्यक आहे. आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे गरजेचे असून, ऐतिहासिक वारसा आणि मराठा समाजाशी संबंधित संवेदनशील विषय असल्याने वस्तुनिष्ठ तथ्यांच्या आधारेच पुढील भूमिका निश्चित करण्याची गरज व्यक्त होत आहे.
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    36 min ago
  • Nepal Flash Floods ।नदीचा रौद्रावतार! 105 भारतीयांसह 384 पर्यटक संपर्काबाहेर; नेमकं काय घडलं? Nepal Flash Floods ।नदीचा रौद्रावतार! 105 भारतीयांसह 384 पर्यटक संपर्काबाहेर; नेमकं काय घडलं? watch full video
    1
    Nepal Flash Floods ।नदीचा रौद्रावतार! 105 भारतीयांसह 384 पर्यटक संपर्काबाहेर; नेमकं काय घडलं?


Nepal Flash Floods ।नदीचा रौद्रावतार! 105 भारतीयांसह 384 पर्यटक संपर्काबाहेर; नेमकं काय घडलं?
watch full video
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    1 hr ago
  • खालुंब्रे गावात गुटख्याची खुलेआम विक्री? पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
    1
    खालुंब्रे गावात गुटख्याची खुलेआम विक्री? पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जगाला टेक्नॉलॉजी देणारी हिंजवडी मूलभूत सुविधांसाठी त्रस्त; IT अभियंते उतरणार रस्त्यावर..! हिंजवडी पुणे : चाकण MIDCतील लघुउद्योजकांच्या आंदोलनानंतर आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत मूलभूत सुविधांचा अभाव, वाहतूक कोंडी, खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे. याच प्रश्नांवर येत्या 6 सप्टेंबरला आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. हिंजवडी... देशाच्या आयटी क्षेत्राची ओळख बनलेलं पुण्याचं महत्त्वाचं केंद्र... हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या आयटी हबमध्ये दररोज लाखो कर्मचारी कामासाठी येतात... मात्र कार्यालयात पोहोचण्याआधीच त्यांना रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय. कुठे तासन्‌तास वाहतूक कोंडी... कुठे रस्त्यांवर जीवघेणे खड्डे... तर कुठे अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अपघातांचा धोका... याच समस्यांमुळे आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांचा संयम सुटला आहें. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, वारंवार प्रशासनाकडे तक्रारी आणि पाठपुरावा करूनही समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. गेल्या दीड वर्षात रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांमुळे 37 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांकडून केला जातोय. एकीकडे हिंजवडीत सुमारे 800 कंपन्या आणि लाखो आयटी अभियंते मोठ्या प्रमाणावर कर भरतात... मात्र त्या तुलनेत मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे, चाकण MIDCतील 20 लघुउद्योजकांनी कंपन्या बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकार आणि प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या. मग हिंजवडीतील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागणार का? हा सवाल आता आयटी अभियंते उपस्थित करत आहेत. हिंजवडी सोडून कंपन्या आणि कर्मचारी जाण्याची वेळ आल्यानंतर सरकार जागं होणार का..? की त्याआधीच या समस्यांवर तोडगा काढला जाणार? याच मागण्यांसाठी येत्या 6 सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जगाला टेक्नॉलॉजी देणाऱ्या हिंजवडीला मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय... त्यामुळे प्रश्न फक्त वाहतूक कोंडीचा नाही... प्रश्न आहे—हिंजवडीसारख्या जागतिक दर्जाच्या आयटी हबच्या पायाभूत सुविधांचा! आता आयटी अभियंत्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तरी प्रशासन जागं होणार का..? #Hinjewadi #HinjewadiITPark #Pune #PuneNews #ITEngineers #ITEmployees #HinjewadiNews #PuneTraffic #HinjewadiTraffic #RoadProblems #Potholes #Infrastructure #ITPark #Protest #Andolan #6September #MaharashtraNews #PuneUpdates #TheNayakNews #न्यूज #हिंजवडी #पुणे #आंदोलन
    1
    जगाला टेक्नॉलॉजी देणारी हिंजवडी मूलभूत सुविधांसाठी त्रस्त; IT अभियंते उतरणार रस्त्यावर..!
हिंजवडी पुणे :
चाकण MIDCतील लघुउद्योजकांच्या आंदोलनानंतर आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत मूलभूत सुविधांचा अभाव, वाहतूक कोंडी, खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे. याच प्रश्नांवर येत्या 6 सप्टेंबरला आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
हिंजवडी... देशाच्या आयटी क्षेत्राची ओळख बनलेलं पुण्याचं महत्त्वाचं केंद्र...
हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या आयटी हबमध्ये दररोज लाखो कर्मचारी कामासाठी येतात... मात्र कार्यालयात पोहोचण्याआधीच त्यांना रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय.
कुठे तासन्‌तास वाहतूक कोंडी...
कुठे रस्त्यांवर जीवघेणे खड्डे...
तर कुठे अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अपघातांचा धोका...
याच समस्यांमुळे आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांचा संयम सुटला आहें.
आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, वारंवार प्रशासनाकडे तक्रारी आणि पाठपुरावा करूनही समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.
गेल्या दीड वर्षात रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांमुळे 37 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांकडून केला जातोय.
एकीकडे हिंजवडीत सुमारे 800 कंपन्या आणि लाखो आयटी अभियंते मोठ्या प्रमाणावर कर भरतात... मात्र त्या तुलनेत मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
विशेष म्हणजे, चाकण MIDCतील 20 लघुउद्योजकांनी कंपन्या बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकार आणि प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या.
मग हिंजवडीतील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागणार का?
हा सवाल आता आयटी अभियंते उपस्थित करत आहेत.
हिंजवडी सोडून कंपन्या आणि कर्मचारी जाण्याची वेळ आल्यानंतर सरकार जागं होणार का..?
की त्याआधीच या समस्यांवर तोडगा काढला जाणार?
याच मागण्यांसाठी येत्या 6 सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जगाला टेक्नॉलॉजी देणाऱ्या हिंजवडीला मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय...
त्यामुळे प्रश्न फक्त वाहतूक कोंडीचा नाही...
प्रश्न आहे—हिंजवडीसारख्या जागतिक दर्जाच्या आयटी हबच्या पायाभूत सुविधांचा!
आता आयटी अभियंत्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तरी प्रशासन जागं होणार का..?
#Hinjewadi #HinjewadiITPark #Pune #PuneNews #ITEngineers #ITEmployees #HinjewadiNews #PuneTraffic #HinjewadiTraffic #RoadProblems #Potholes #Infrastructure #ITPark #Protest #Andolan #6September #MaharashtraNews #PuneUpdates #TheNayakNews #न्यूज #हिंजवडी #पुणे #आंदोलन
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले. या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
    4
    निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी
निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले.
अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले.
या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
    user_Rajendra kulthe
    Rajendra kulthe
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.