Shuru
Apke Nagar Ki App…
Gaikwad Shyamsunder
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Gaikwad Shyamsunder1
- 26 जनावरी पर शफी बिल्डर और कांग्रेस पार्टी की ओर से ब्लड डोनेशन कैम्प1
- भारतीय 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदेड येथे ध्वजारोहण सोहळा उत्साहात AR:nanded नांदेड, दि. 26 — भारतीय प्रजासत्ताकाचा 77 वा वर्धापन दिन नांदेड येथील पोलीस कवायत मैदान येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पालकमंत्री मा. अतुल सावे यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या जवानांनी पालकमंत्र्यांना मानवंदना व सलामी दिली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या परेड व इतर कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. या सोहळ्याला पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, अधिकारी-कर्मचारी तसेच विविध विभागांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री अतुल सावे यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि देशाच्या एकतेचे मूल्य अधोरेखित केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल करत असलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. पालकमंत्री अतुल सावे यांनी 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देत, राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडावी, असे आवाहन केले.4
- हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर जी महाराज यांच्या 350 व्या शहीद समागम तथा श्री गुरुगोविंद सिंग जी महाराज यांच्या गुरुता गद्दी कार्यक्रमानिमित्त श्री हुजूर साहेब सचखंड अब चल नगर गुरुद्वारा नांदेड यांच्या वतीने जुना कौठा मोदी मैदान या ठिकाणी गुरु महाराज यांचे प्रस्थान झाले असता शहरात ठीक ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या यात्रेमध्ये उपस्थित होते यावेळी हनुमान पेठ वजीराबाद धर्मशाळेच्या समोर श्री गुरु महाराज यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करताना प्रभाग क्रमांक 16 व 17 मधील नवनिर्वाचित नगरसेवक तुळजाराम यादव ,दीपक सिंग रावत ,धीरज यादव, डिंपल सिंग नवाब, सामाजिक कार्यकर्ता गोकुळ यादव तथा सर्व नगरसेवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानवतेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादुर जी महाराज यांच्या स्मरणार्थ हा भव्य दिव्य शहीदी समागम महाराष्ट्र राज्य शासन यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आला त्याच अनुषंगाने नांदेडच्या पवित्र भूमीवर या शहीदी समागमाचे तथा गुरुता गद्दी कार्यक्रम अतिशय उत्साहाने मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास देशातील व विदेशातील आणि अनेक राज्यातील सर्व क्षेत्रातील भाविक भक्त लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे स्थानिक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच स्थानिक प्रशासन व गुरुद्वारा बोर्ड यांच्या वतीने देखील या कार्यक्रमात आपली उपस्थिती राहावी याकरिता सर्व नांदेड करांना आव्हान सुद्धा करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमासंदर्भात स्थानिक नगरसेवक दीपक सिंग रावत तथा तुळजाराम यादव त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.3
- विकासाची दृष्टी आणि उच्चविद्याक्षेत व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. सोमवंशी यांना विक्रमी मताधिक्य द्या - आ. संजय बनसोडे उदगीर (एल पी उगिले) राजकारणामध्ये उच्चविद्याविभूषित आणि विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व गरजेचे असते. सामाजिक जाणीवा जपणारे वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करून, "गरीबों का मसीहा" अशी ओळख निर्माण केलेले डॉ. दीपक सोमवंशी हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी युतीचे निडेबन जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. आपल्या जिल्हा परिषद सर्कलचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व पक्षाने दिलेले आहेत. त्यामुळे आपण विक्रमी मताधिक्य देऊन या योग्य उमेदवाराला विजयी करावे. असे आवाहन उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे. डॉ. दीपक सोमवंशी यांना जिल्हा परिषद गटातून तर शिरोळ पंचायत समिती गणातून सुनिता प्रकाश राठोड आणि निडेबन पंचायत समिती गणातून विमलबाई चिखले यांना बहुमताने विजयी करावे. यासाठी आ. संजय बनसोडे यांनी निडेबन जिल्हा परिषद गटामध्ये झंजावाती दौरा केला. दौऱ्याची सुरुवात तोंडचिर येथून झाली. तोंडचिर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, उमेदवार डॉ. दीपक सोमवंशी, सुनिता राठोड यांच्यासह परिसरातील सरपंच, चेअरमन इत्यादी उपस्थित होते. पुढे बोलताना आ. संजय बनसोडे म्हणाले की, उदगीर विधानसभा मतदारसंघाने मला विक्रमी मताधिक्य देऊन विजयी केले आहे. ज्या पद्धतीने माझ्यावर प्रेम दाखवलात, त्याच पद्धतीने माझे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांनाही बहुमताने विजयी करावे, असे आवाहन केले. उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या जनतेला विश्वासात घेऊन विकासाची कामे केली आहेत. ज्यामध्ये प्राधान्याने ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाई होऊ नये म्हणून जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. तसेच जिल्ह्यात फक्त उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये 600 कोटी रुपये खर्चून वाटर ग्रिड ही योजना आणली आहे. त्यासोबतच आता रस्त्याचे जाळे देखील विणले जात आहे. राज्य मार्ग आणि राष्ट्रीय मार्ग बनवले जात आहेत. लवकरच उदगीर ते देगलूर हा 800 कोटी रुपये खर्चाचा रस्ता देखील बनवला जाणार आहे. उदगीर मध्ये प्रशासकीय इमारती तयार आहेत, उद्या जिल्हा झाल्यानंतर या इमारतीमध्ये वेगवेगळी कार्यालय स्थापन करता येऊ शकतील. अशी पूर्ण सुविधा पण आजच तयार करून ठेवली आहे. अशा पद्धतीने आपल्या मतदारसंघातही आता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजनेच्या माध्यमातून विकास कामांना गती आणता येईल. रस्ते दुरुस्त करता येतील, आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एक तज्ञ डॉ. सोमवंशी हे आपल्यासोबत आहेत. सोशल इंजिनिअरिंग करून सर्व समाजाला न्याय देण्याची त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे. देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद ही महायुतीच्या हातात आली तर विकासाला गती मिळू शकेल. मी केवळ आश्वासने देऊन बसणारा माणूस नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवणारा माणूस आहे. गेल्या पन्नास वर्षा पासून उदगीरचा विकास प्रलंबित होता. तो पूर्ण बॅकलॉग भरून काढला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी होती, आम्ही आश्वासन दिले होते. आणि आज ते पूर्ण केले आहे. सामाजिक एकोपा जपत असताना मराठा भवनासाठी 15 कोटी रुपये दिले, आज शेल्हाळ रोडवर भव्य असे मराठा भवन चे बांधकाम सुरू आहे. वीरशैव लिंगायत भवन ही भव्य दिव्य अशा पद्धतीने उभारले आहे. हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला आहे. आता जागा उपलब्ध झाल्याबरोबर सेवालाल भवन उभा राहील, यासोबतच शादी खाना, बौद्ध विहार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा, अण्णाभाऊ साठे स्मारक, यासोबतच हावगीस्वामी मठ, रेणुकाचार्य भवन, शंकर लिंग मठ, किल्ले उदगीर या ठिकाणी दुरुस्तीसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. आणि किल्ल्याचे वैभव वाढवले आहे. रस्त्याचे जाळे पूर्ण तयार झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध होता यावे म्हणून जास्तीत जास्त सिंचनावर भर देण्यात आला आहे. याच गतीने आणखी विकास कामे होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी च्या अधिकृत उमेदवारांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही याप्रसंगी संजय बनसोडे यांनी केले आहे. या प्रचार सभेचे प्रास्ताविक तोंडचिर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुदर्शन पाटील यांनी केले. प्रकाश राठोड, डॉ. दीपक सोमवंशी आणि माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी देखील डॉ. दीपक सोमवंशी, सुनिता राठोड, विमलताई चिखले यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.2
- घोटा देवी येथे 26 जानेवारी व प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊं वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला1
- 📍निलंगा : शेतकऱ्यांचें, शेत रस्त्याचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, आशा वर्कर चे प्रश्न, ग्रामीण आरोग्य शि निगडी त असलेले प्रश्न असे अनेक प्रश्न आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मार्गी लावले आहेत आणि जे राहिले तेही आपली जिल्हा परिषद आल्यानंतर लाऊ, आपलं सरकार सक्षम सरकार आहे सरकार च्या सर्व योजना समाजातील शेवट च्या घटका परियंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू - माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर1
- Post by Gaikwad Shyamsunder1