प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून पारंपरिक कारागिरांनाआधुनिक तंत्रज्ञानासह आर्थिक पाठबळ देणारी योजना - पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून पारंपरिक कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानासह आर्थिक पाठबळ देणारी योजना :पालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबार, दि. 17 सप्टेंबर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू केलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही पारंपरिक कारागिरांच्या हाताला काम आणि त्यांच्या कामाला सन्मान देणारी योजना आहे. कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्यविकास तसेच आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात आज सेवा संकल्प अभियानातंर्गत पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा तसेच सन्मान सोहळा झाला. यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिलीप काकडे, एसबीआयचे महाव्यवस्थापक सुहास कोतकर, जिल्हा अग्रणी बॅकेचे महाव्यस्थापक नंदनकुमार पैठणकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक दिनेश पाटील, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संदीप बोरसे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रुपेश पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून पारंपरिक व्यवसाय करणारे कारागीर आपल्या कौशल्यातून विविध वस्तू तयार करीत आहेत. त्यांच्या पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 60 हजार 946 कारागिरांनी नोंदणी केली आहे. मागील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने त्यापैकी 3 हजार 537 कारागिरांना विश्वकर्मा ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. तसेच 2 हजार 596 कारागिरांनी कौशल्य पडताळणी पूर्ण केली असून, त्यापैकी 1 हजार 52 कारागिरांना टूलकिटचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 638 लाभार्थ्यांना प्रथम स्तरावरील 1 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी 498 कारागिरांना कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा उद्देश केवळ आर्थिक मदत करणे एवढा नसून, देशातील पारंपरिक कला व कौशल्य जिवंत ठेवणे आणि तरुणांना स्वयंरोजगाराकडे वळविणे हा आहे. कारागिरांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून स्वतःचा उद्योग उभारावा आणि इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. सेठी म्हणाल्या की, विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी संस्थात्मक यंत्रणा उभारण्यात येईल. लाभार्थ्यांची संख्या, कर्ज वितरण, कर्जाची परतफेड तसेच लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा नियमित आढावा घेण्यासाठी महिन्यातून एकदा आढावा घेण्यात येईल. बँकांनी लाभार्थ्यांच्या कर्जासंदर्भातील प्रकरणास मंजुरी द्यावी. लाभार्थ्यांना कर्ज किंवा योजनेच्या लाभाबाबत कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व्हॉट्सॲपद्वारे नोंदविण्यात यावी. आगामी काळात जिल्हास्तरावर स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.सेठी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अग्रणी बॅकेचे श्री.पैठणकर, स्टेट बॅकेचे महाव्यवस्थाक श्री. कोतकर यांनी यावेळी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सेठी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना टुलकिट वाटप तसेच बॅक कर्ज मंजूरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री पाटील यांनी केले.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून पारंपरिक कारागिरांनाआधुनिक तंत्रज्ञानासह आर्थिक पाठबळ देणारी योजना - पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून पारंपरिक कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानासह आर्थिक पाठबळ देणारी योजना :पालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबार, दि. 17 सप्टेंबर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू केलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही पारंपरिक कारागिरांच्या हाताला काम आणि त्यांच्या कामाला सन्मान देणारी योजना आहे. कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्यविकास तसेच आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात आज सेवा संकल्प अभियानातंर्गत पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा तसेच सन्मान सोहळा झाला. यावेळी पालकमंत्री
श्री. मुश्रीफ दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिलीप काकडे, एसबीआयचे महाव्यवस्थापक सुहास कोतकर, जिल्हा अग्रणी बॅकेचे महाव्यस्थापक नंदनकुमार पैठणकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक दिनेश पाटील, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संदीप बोरसे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रुपेश पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून पारंपरिक व्यवसाय करणारे कारागीर आपल्या कौशल्यातून विविध वस्तू तयार करीत आहेत. त्यांच्या पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 60 हजार 946 कारागिरांनी नोंदणी केली आहे. मागील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने त्यापैकी 3 हजार 537 कारागिरांना विश्वकर्मा ओळखपत्र व प्रमाणपत्र
वितरित करण्यात आले आहे. तसेच 2 हजार 596 कारागिरांनी कौशल्य पडताळणी पूर्ण केली असून, त्यापैकी 1 हजार 52 कारागिरांना टूलकिटचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 638 लाभार्थ्यांना प्रथम स्तरावरील 1 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी 498 कारागिरांना कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा उद्देश केवळ आर्थिक मदत करणे एवढा नसून, देशातील पारंपरिक कला व कौशल्य जिवंत ठेवणे आणि तरुणांना स्वयंरोजगाराकडे वळविणे हा आहे. कारागिरांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून स्वतःचा उद्योग उभारावा आणि इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. सेठी म्हणाल्या की, विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी संस्थात्मक यंत्रणा उभारण्यात येईल. लाभार्थ्यांची संख्या, कर्ज वितरण, कर्जाची परतफेड
तसेच लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा नियमित आढावा घेण्यासाठी महिन्यातून एकदा आढावा घेण्यात येईल. बँकांनी लाभार्थ्यांच्या कर्जासंदर्भातील प्रकरणास मंजुरी द्यावी. लाभार्थ्यांना कर्ज किंवा योजनेच्या लाभाबाबत कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व्हॉट्सॲपद्वारे नोंदविण्यात यावी. आगामी काळात जिल्हास्तरावर स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.सेठी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अग्रणी बॅकेचे श्री.पैठणकर, स्टेट बॅकेचे महाव्यवस्थाक श्री. कोतकर यांनी यावेळी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सेठी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना टुलकिट वाटप तसेच बॅक कर्ज मंजूरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री पाटील यांनी केले.
- तळोदा शहरात गणेश मंडळाकडून स्काऊट पथकाकडून निर्माल्य संकलन; कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनोखा उपक्रम. तळोदा शहरात गणेश मंडळाकडून स्काऊट पथकाकडून निर्माल्य संकलन ...... तळोदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनोखा उपक्रम.... अध्यापक शिक्षण मंडळ धुळे नंदुरबार संस्थेचे अध्यक्ष सौ मंगलाताई महाजन व संस्थेचे आधारस्तंभ कॉलेज ट्रस्टचे संचालक अरुणकुमार महाजन यांच्या प्रेरणेतून येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाई साहेब गो.हू. महाजन व शिवराम लक्ष्मण माळी कनिष्ठ महाविद्यालयातील स्काऊट पथकाने शहर व परिसरातील श्री ची स्थापना केलेल्या विविध मंडळांना भेट देऊन निर्माल्य संकलनाच्या उपक्रम राबविण्यात आला स्काऊट शिक्षक संकेत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शहर व परिसरातील विविध मंडळांना भेट देऊन निर्माल्य संकलन केले श्रीच्या उत्सवात निर्माल्या मुळे विहीर, नदी,तलाव यांचे पाणी दूषित होऊ नये त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला तसेच संकलित केलेले निर्मल्य गांडूळ खत निर्मितीसाठी गांडूळ प्रकल्प केंद्राला सुपूर्द करण्यात आले हा उपक्रम बाबत शाळेचे प्राचार्य डॉ. अमरदीप महाजन व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ .सौ. शितल महाजन उपमुख्याध्यापक सुनील सूर्यवंशी पर्यवेक्षक ए आर सूर्यवंशी व पी.आर.वळवी यांनी कौतुक केले आहे. तसेच अशी उपक्रम राबवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले आहे.1
- Dhule Crime News | धुळ्यात सण-उत्सवाच्या तोंडावर मोठा शस्त्रसाठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई... A large cache of weapons seized in Dhule ahead of festivals; Major action by the local crime branch - सण-उत्सवाच्या तोंडावर धुळे पोलिसांची मोठी कारवाई! दोंडाईचा-शहादा रोडवर १० तलवारींचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. हा साठा गुजरातमधून आणल्याचे समोर आले असून ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहा सविस्तर बातमी. - #DhuleNews #DhuleCrime #DhuleLCBAction #MaharashtraPolice #DhuleBreaking1
- धुळे : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांसह विविध तालुक्यांमध्ये महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज दि. १५ सप्टेंबर रोजी निवेदने देण्यात आली. त्याच अनुषंगाने धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. हे निवेदन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री. संजय बागडे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. “कोरडा दुष्काळ जाहीर करा”, “शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या”, “शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करा” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने सातत्याने ओढ दिल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाऊस न झाल्यामुळे अनेक भागांतील खरीप पिके करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र पिकांचे उत्पादनच धोक्यात आल्याने कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्व शासकीय सवलती लागू करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खरीप पिकांच्या नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्याबरोबरच आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे तसेच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क तसेच स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाअभावी तलाव, विहिरी आणि अन्य जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा तसेच जनावरांसाठी चारा छावण्यांचे पूर्वनियोजन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम होत असताना त्याच दिवशी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे येथे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक, उपाध्यक्ष नंदू अहिरराव, महानगर अध्यक्ष भूषण बागुल, धुळे तालुकाध्यक्ष नितीन जाधव, कैलास देसले, दिनकर जाधव, अमर फरताडे, नाना शिरसाठ, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.1
- पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या आवारात अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या वीज वायरिंगची तोडफोड करून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मुख्याध्यापक कार्यालयाच्या कुलूपाची व भिंतीचीही तोडफोड करण्यात आल्याने शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पेठ पोलिस ठाण्यात दि. १५ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासोबतच शासकीय दस्तऐवज व साहित्याच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शालेय परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानेही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.1
- *चांदवड येथे ऋषिपंचमी उत्साहात साजरी; चंद्रेश्वर महादेव व सप्तर्षींच्या दर्शनासाठी महिलांची अलोट गर्दी!* अँकर :पवित्र भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषिपंचमीचे औचित्य साधून चांदवड येथील ऐतिहासिक व नयनरम्य श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज महिला भाविकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पावन भूमीत भल्या पहाटेपासूनच महिलांनी सप्तर्षींच्या पूजनासाठी आणि भगवान चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ऋषिपंचमी हा दिवस भारतीय संस्कृतीत कृतज्ञता, आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा मानला जातो. वर्षभरात नकळत घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मानवी जीवनाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला या दिवशी कठोर व्रत पाळतात. कंदमुळे, अळूची पाने आणि पिकांचे सात्विक अन्न ग्रहण करून, आघाड्याच्या वनस्पतिने दंतधावण करत नदी किंवा कुंडावर स्नान करून हे व्रत पूर्ण केले जाते. चांदवड येथील चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज सकाळी श्री सप्तर्षींची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यानंतर परिसर "हर हर महादेव" आणि ऋषीमुनींच्या जयघोषाने दुमदुमून गेला. शिस्तबद्ध रांगेत उभ्या राहून महिलांनी प्रथम सप्तर्षींचे दर्शन घेत मनोभावे पूजन केले आणि त्यानंतर चंद्रेश्वर महादेवाला जलाभिषेक करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना केली. भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या या वातावरणात प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर ऋषीमुनींबद्दलची श्रद्धा आणि व्रत पूर्ण केल्याचे आत्मिक समाधान स्पष्ट दिसत होते. ज्ञानाची परंपरा जपणारा आणि ऋषीमुनींच्या त्यागाचे स्मरण करून देणारा हा पावन सण चांदवडकरांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात साजरा केला.1
- धुले में तलवारों के साथ 2 आरोपी गिरफ्तार, 10 तलवारें और 5.30 लाख का मुद्देमाल जब्त1
- ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣 ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣1
- अक्कलकुवा ग्रामीण रस्त्यांची दुरुस्तीची मागणी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नागेशकुमार पाडवी यांचे सीईओंना निवेदन अक्कलकुवा तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था.. रस्त्यांची दुरुस्ती करत सुधारणा करण्यात यावी अशी मागणी.. भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नागेशकुमार पाडवी यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन... अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असुन, जागोजागी वळणाच्या भागात मोठ मोठे खड्डे पडले असल्याने, त्यांची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेशकुमार पाडवी यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असुन, रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असुन, रस्त्याच्या वळणाच्या भागात देखील खड्डे पडले असल्याने त्या खड्ड्यात वाहने आदळुन अपघात होण्याची शक्यता असल्याने, संबंधित अधिकारी ग्रामीण भागातील रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी तसेच वाण्याविहीर, जुनी वाण्याविहीर या रस्त्यांची दुरावस्था तालुक्यात रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. या रस्त्यांची सुधारणा व्हावी अशी मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेशकुमार पाडवी यांनी मागणी केली आहे.1