*बदनापूरच्या एकतानगरमध्ये 'आधी रस्ता, मग ड्रेनेज'; नवीन रस्ता फोडून कोट्यवधींचा चुराडा!ड्रेनेजचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे; नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याने तीव्र संताप नगरपंचायत ला निवेदन* *बदनापूरच्या एकतानगरमध्ये 'आधी रस्ता, मग ड्रेनेज'; नवीन रस्ता फोडून कोट्यवधींचा चुराडा!ड्रेनेजचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे; नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याने तीव्र संताप नगरपंचायत ला निवेदन* बदनापूर (प्रतिनिधी):बदनापूर शहरातील वॉर्ड क्र. 12 मधील एकतानगर भागात प्रशासनाच्या अजब कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. काही दिवसांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला नवीन रस्ता ड्रेनेज लाईन टाकण्याच्या नावाखाली मधोमध फोडण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, हे ड्रेनेजचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने एकतानगरमधील नागरिकांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असून, परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. *नियोजनाचा पूर्णपणे अभाव* शासनाचा निधी आणि जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशांची उधळपट्टी कशी होते, याचे उत्तम उदाहरण एकतानगरमध्ये पाहायला मिळत आहे. जर या भागात ड्रेनेज लाईन टाकायची होती, तर आधी रस्ता का तयार करण्यात आला? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. रस्ता तयार झाल्यानंतर तो पुन्हा फोडल्यामुळे शासनाचा निधी तर वाया गेलाच, शिवाय नागरिकांच्या सोयीसाठी बनवलेला रस्ता आता डोकेदुखी ठरत आहे. *काम की थातूरमातूर? आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!* सध्या सुरू असलेले ड्रेनेजचे काम अत्यंत निकृष्ट आणि घाईघाईने उरकले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. ड्रेनेजचे पाईप व्यवस्थित न जोडणे, चेंबरचे काम कमकुवत करणे यामुळे ठिकठिकाणी पाणी गळती सुरू झाली आहे. रस्ता फोडल्यामुळे संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. *अपघातांची मालिका सुरू* रस्त्याच्या मधोमध खोदलेले खड्डे आणि पसरलेली माती यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी अंधारात अनेक दुचाकीस्वार येथे घसरून पडले असून, काहींना गंभीर दुखापतही झाली आहे. पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाला वारंवार सांगूनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. *आंदोलनाचा इशारा* या निकृष्ट कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी, दोषी ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी आणि फोडलेला रस्ता तात्काळ पूर्ववत करून देण्यात यावा, अशी मागणी एकतानगरमधील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. असे निवेदन मुख्यधिकारी नगरपंचायत कार्यालयस देण्यात आले आहे . ********************/////****/*/ चौकट लाखो रुपये खर्च करून आमच्या भागात नवीन रस्ता झाला, म्हणून आम्ही खुश होतो. पण काही दिवसांतच तो रस्ता ड्रेनेजसाठी उकरून टाकला. ड्रेनेजचे काम तर इतके घाणेरडे सुरू आहे की, उद्या हे पाणी आमच्या घरात शिरेल अशी भीती आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे." *एकतानगर मधिल त्रस्त नागरीक* ************************
*बदनापूरच्या एकतानगरमध्ये 'आधी रस्ता, मग ड्रेनेज'; नवीन रस्ता फोडून कोट्यवधींचा चुराडा!ड्रेनेजचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे; नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याने तीव्र संताप नगरपंचायत ला निवेदन* *बदनापूरच्या एकतानगरमध्ये 'आधी रस्ता, मग ड्रेनेज'; नवीन रस्ता फोडून कोट्यवधींचा चुराडा!ड्रेनेजचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे; नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याने तीव्र संताप नगरपंचायत ला निवेदन* बदनापूर (प्रतिनिधी):बदनापूर शहरातील वॉर्ड क्र. 12 मधील एकतानगर भागात प्रशासनाच्या अजब कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. काही दिवसांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला नवीन रस्ता ड्रेनेज लाईन टाकण्याच्या नावाखाली मधोमध फोडण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, हे ड्रेनेजचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने एकतानगरमधील नागरिकांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असून, परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. *नियोजनाचा पूर्णपणे अभाव* शासनाचा निधी आणि जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशांची उधळपट्टी कशी होते, याचे उत्तम
उदाहरण एकतानगरमध्ये पाहायला मिळत आहे. जर या भागात ड्रेनेज लाईन टाकायची होती, तर आधी रस्ता का तयार करण्यात आला? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. रस्ता तयार झाल्यानंतर तो पुन्हा फोडल्यामुळे शासनाचा निधी तर वाया गेलाच, शिवाय नागरिकांच्या सोयीसाठी बनवलेला रस्ता आता डोकेदुखी ठरत आहे. *काम की थातूरमातूर? आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!* सध्या सुरू असलेले ड्रेनेजचे काम अत्यंत निकृष्ट आणि घाईघाईने उरकले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. ड्रेनेजचे पाईप व्यवस्थित न जोडणे, चेंबरचे काम कमकुवत करणे यामुळे ठिकठिकाणी पाणी गळती सुरू झाली आहे. रस्ता फोडल्यामुळे संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. *अपघातांची मालिका सुरू* रस्त्याच्या मधोमध खोदलेले खड्डे आणि पसरलेली माती यामुळे वाहनचालकांना
कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी अंधारात अनेक दुचाकीस्वार येथे घसरून पडले असून, काहींना गंभीर दुखापतही झाली आहे. पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाला वारंवार सांगूनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. *आंदोलनाचा इशारा* या निकृष्ट कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी, दोषी ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी आणि फोडलेला रस्ता तात्काळ पूर्ववत करून देण्यात यावा, अशी मागणी एकतानगरमधील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. असे निवेदन मुख्यधिकारी नगरपंचायत कार्यालयस देण्यात आले आहे . ********************/////****/*/ चौकट लाखो रुपये खर्च करून आमच्या भागात नवीन रस्ता झाला, म्हणून आम्ही खुश होतो. पण काही दिवसांतच तो रस्ता ड्रेनेजसाठी उकरून टाकला. ड्रेनेजचे काम तर इतके घाणेरडे सुरू आहे की, उद्या हे पाणी आमच्या घरात शिरेल अशी भीती आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे." *एकतानगर मधिल त्रस्त नागरीक* ************************
- जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! संरक्षक भिंत नसल्याने परिसर चोरट्यांसाठी मोकळे रान; जुन्या घंटागाड्यांसह कत्तलखान्याच्या भंगाराचीही चोरी झाल्याचा आरोप — वाहन प्रमुख कटारे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे सवाल आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या आवारात महानगरपालिकेच्या जुन्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या सुरक्षेकडे महानगरपालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जुन्या वाहनांमधील स्पेअर पार्ट चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी काढून नेले जात असल्याचे दिसून येत असून, अनेक गाड्यांचे महत्त्वाचे पार्ट गायब असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे या परिसराला चोहोबाजूंनी संरक्षक भिंत नसल्याने संपूर्ण आवार खुले झाले आहे. दिवसा काही संशयित व्यक्ती या वाहनांची पाहणी करताना दिसतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी वाहनांचे स्पेअर पार्ट तसेच लोखंडी साहित्य चोरीला जात असल्याची चर्चा परिसरात आहे. अशा परिस्थितीत केवळ एक-दोन वॉचमन तैनात करून महानगरपालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे संरक्षण कसे होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.1
- चंदनझिरात मनपाची धडक कारवाई; १४ चिकन-मटन दुकाने सील, उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांचे साहित्य जप्त.. नगरसेवक अनिल तिरुखे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रश्नानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई; आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशाने कारवाई.. चंदनझिरात मनपाची धडक कारवाई; १४ चिकन-मटन दुकाने सील, उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांचे साहित्य जप्त.. नगरसेवक अनिल तिरुखे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रश्नानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई; आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशाने कारवाई..1
- आपला गणेश मंडळ जरीपुरचा राजा गणरायाचे धुमधडाक्यात आगमन1
- पहाटे तीन वाजता पाटोदा येथे मनोज जरांगे पाटील यांचे वडील भेटायला आले,1
- गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगर : गणपती बाप्पाच्या मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिला आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेली दोन सोन्याची मंगळसूत्रे, असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास शिवनेरी कॉलनी, विजयनगर परिसरातील मंगल पोपटवाड चव्हाण या महिला गणपतीची मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित महिलांची माहिती मिळवली. त्यानुसार पूजा राहुल पवार (वय २१), सुनीता दिलीप काळे (वय ३५) आणि मुस्कान राघव पवार (वय ३५), सर्व रा. ह.मु. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर, यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी महिलांनी गजानन महाराज मंदिर परिसरातून मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन सोन्याची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०८/२०२६, कलम ३०३ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिसमंडळ-२ रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त उमामहेश्वर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार मारोती गोरे, कपिल खिल्लारे, राजेंद्र शिंदे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका शिरसाठ, पूनम साळवे व पूजा लेनके यांनी केली. गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.4
- सिल्लोड मध्ये पैठणी उद्योग उभारण्यासाठी आमदार सातारांचा पुढाकार येवला येथील कापसे पैठणी फॅक्टरीला भेट; रोजगारनिर्मितीच्या संधींचा घेतला आढावा सिल्लोड (प्रतिनिधी) सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिल्लोड येथे पैठणी उद्योग सुरू करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने त्यांनी येवला, जि. नाशिक येथे कापसे फाउंडेशनच्या ‘कापसे पैठणी’ फॅक्टरीला भेट देऊन पैठणी उत्पादन प्रक्रिया, उद्योगाचे स्वरूप तसेच रोजगारनिर्मितीच्या संधींची माहिती जाणून घेतली. तसेच आमदार अब्दुल सत्तार यांनी फॅक्टरीतील विणकर कामगारांशी संवाद साधून त्यांच्या कामाची पद्धत, अडचणी तसेच रोजगाराच्या संधींबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी कापसे पैठणीचे संचालक बाळकृष्ण कापसे यांनी पैठणी उत्पादनाबाबत सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे या फॅक्टरीमध्ये दिव्यांग, निराधार, मूकबधिर तसेच विधवा महिलांना रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचे काम केले जात असल्याचे आमदार सत्तार यांनी पाहिले. या उपक्रमाचे कौतुक करताना अशा माध्यमातून गरजू महिलांना रोजगाराचा आधार मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. सिल्लोड येथील नॅशनल सहकारी सूतगिरणी येत्या काही दिवसांत सुरू होणार असून, त्यानंतर ‘कापूस ते कापड’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने पैठणी उद्योग महत्त्वाचा ठरू शकतो. सिल्लोड-सोयगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण कापसाचे उत्पादन होत असल्याने या उद्योगासाठी स्थानिक पातळीवर अनुकूल वातावरण असल्याची चर्चा यावेळी झाली. आमदार सत्तार यांनी नॅशनल सहकारी सूतगिरणीबाबतही बाळकृष्ण कापसे यांना माहिती दिली. कापसे पैठणीच्या प्रकल्पाची पाहणी करून हा उपक्रम शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून, शासनाचे सहकार्य मिळाल्यास महिला, दिव्यांग, निराधार तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिल्लोडमध्ये मोठा उपक्रम उभा राहू शकतो, असा विश्वास आमदार सत्तार यांनी व्यक्त केला. सिल्लोड येथे पैठणी उद्योग उभारण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करण्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार सत्तार यांनी येवला येथील प्रसिद्ध पंडित पैठणी दुकानालाही सदिच्छा भेट देऊन पैठणी उद्योगातील बाजारपेठ, मागणी आणि ग्राहकांच्या पसंतीबाबत माहिती घेतली. यावेळी माजी उद्योग संचालक डॉ. जे. के. जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज राठोड, सिल्लोड शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पाटील गाढे, माजी पंचायत समिती उपसभापती अजिज शेठ बागवान, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक सयाजीराव वाघ, भोकरदन चे माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ हराळ, शकील जहागिरदार, रिजवान शेख आदी उपस्थित होते.1
- मुख्यालयी वास्तव्यासाठी शिक्षकांचे आंदोलन; गुरू धानोरा शाळेतील पालकाचा बोलका व्हिडिओ चर्चेत गंगापूर : गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांनी मुख्यालयी वास्तव्यास राहण्याच्या मागणीसह विविध प्रश्नांवर आज सामूहिक रजेवर जात आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर गंगापूर तालुक्यातील गुरू धानोरा जिल्हा परिषद शाळेतील एका पालकाने केलेला व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. शिक्षक मुख्यालयी राहत नसतानाही तेथे वास्तव्यास असल्याची कागदपत्रे सादर केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात गावातील शाळा व विद्यार्थ्यांची परिस्थिती काय आहे, यावर या पालकाने व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य केले आहे. शिक्षकांच्या मुख्यालयी वास्तव्यासंदर्भातील नियम, त्याची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेमकी वस्तुस्थिती काय? पालकाच्या या बोलक्या व्हिडिओतून समोर आलेले वास्तव पाहा...1
- अग्निशमन केंद्रात शिस्तीचा बोजवारा! अधिकारी झाले कर्मचारी, कर्मचारी झाले अधिकारी; मनमानी कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कोण कधी येतो, कधी जातो याचा नियमच नाही; वर्दीचा अभाव आणि मनमानी उपस्थितीचा आरोप, सूचना दिल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चाही अग्निशमन केंद्रात शिस्तीचा बोजवारा! अधिकारी झाले कर्मचारी, कर्मचारी झाले अधिकारी; मनमानी कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कोण कधी येतो, कधी जातो याचा नियमच नाही; वर्दीचा अभाव आणि मनमानी उपस्थितीचा आरोप, सूचना दिल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चाही आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अग्निशमन केंद्रातील कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत गंभीर आरोप समोर येत आहेत. अग्निशमन दलाचे इन्चार्ज नियमितपणे वर्दीमध्ये कर्तव्य बजावताना दिसून येतात मात्र त्यांच्या अधिनस्त काही कर्मचारी वर्दीचा वापर करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अग्निशमन केंद्रातील अधिकारी झाला कर्मचारी आणि कर्मचारी झाले अधिकारी, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा असून कोणता कर्मचारी कधी येतो आणि कधी जातो, याबाबत निश्चित नियमांचे पालन होत नसल्याचे बोलले जात आहे.1