कोसमटोला येथे विकासाची वानवा: रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ग्रामस्थ त्रस्त नमस्कार सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या कोसमटोला येथील नागरिकांची बिकट परिस्थिती; प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप कोसमटोला (स्थानिक वृत्त): ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक २ मधील कोसमटोला गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः गावातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाचे चालढकल धोरण यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांचा संताप: गावातील नागरिक धनराज सिताराम बोपचे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी चौरागडे पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून एक लाखाचा निधी देऊन कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. त्यानंतर आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची मागणी केली. परंतु, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे." गावात सांडपाण्याची योग्य सोय नसल्याने पाणी रस्त्यावर साचते, ज्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधीची कमतरता किंवा इतर कारणांमुळे यावर कोणताही ठोस उपाय काढण्यात आलेला नाही. माजी सरपंचांची प्रतिक्रिया: या संदर्भात बोलताना कोसमटोलाचे माजी सरपंच सुनील चंद्रकुमार खोब्रागडे यांनी सांगितले की, "२०२१ मध्ये निवडणुका पार पडल्या आणि आमचा कार्यकाळ संपला. आमच्या काळात एमआरजीएस (MRGS) अंतर्गत खडीकरण व सिमेंट रस्त्यांची अनेक कामे मंजूर झाली होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून एमआरजीएसच्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे आणि मस्टर न निघाल्यामुळे गावातील सर्व रस्त्यांची कामे आणि पर्यायाने गावाचा विकास पूर्णपणे थांबला आहे." त्यांनी पुढे सांगितले की, दलित वस्तीसह इतर भागांमधील रस्ते अत्यंत खराब असून, चिखल, खड्डे आणि दूषित वातावरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात किंवा इतर वेळी चिखलातून वाट काढत येणे, गाड्या-घोड्या आणणे आणि गर्भवती महिला किंवा लहान मुलांना उपचारासाठी रुग्णालयात नेणे अत्यंतिक कठीण झाले आहे. अनेकदा मुख्य रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर वाहने उभी करून चिखलातून चालत घरी जावे लागते. ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती: कोसमटोला येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला तीव्र शब्दांत आवाहन केले आहे की, गावातील रस्त्यांची ही दयनीय अवस्था लवकरात लवकर लक्षात घेऊन, तसेच रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत आणि गावकऱ्यांना या नरकयातनेतून मुक्त करावे.
कोसमटोला येथे विकासाची वानवा: रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ग्रामस्थ त्रस्त नमस्कार सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या कोसमटोला येथील नागरिकांची बिकट परिस्थिती; प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप कोसमटोला (स्थानिक वृत्त): ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक २ मधील कोसमटोला गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः गावातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाचे चालढकल धोरण यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांचा संताप: गावातील नागरिक धनराज सिताराम बोपचे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी चौरागडे पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून एक लाखाचा निधी देऊन कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. त्यानंतर आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची मागणी केली. परंतु, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे." गावात सांडपाण्याची योग्य सोय नसल्याने पाणी रस्त्यावर साचते, ज्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधीची कमतरता किंवा इतर कारणांमुळे यावर कोणताही ठोस उपाय काढण्यात आलेला नाही. माजी सरपंचांची प्रतिक्रिया: या संदर्भात बोलताना कोसमटोलाचे माजी सरपंच सुनील चंद्रकुमार खोब्रागडे यांनी सांगितले की, "२०२१ मध्ये निवडणुका पार पडल्या आणि आमचा कार्यकाळ संपला. आमच्या काळात एमआरजीएस (MRGS) अंतर्गत खडीकरण व सिमेंट रस्त्यांची अनेक कामे मंजूर झाली होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून एमआरजीएसच्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे आणि मस्टर न निघाल्यामुळे गावातील सर्व रस्त्यांची कामे आणि पर्यायाने गावाचा विकास पूर्णपणे थांबला आहे." त्यांनी पुढे सांगितले की, दलित वस्तीसह इतर भागांमधील रस्ते अत्यंत खराब असून, चिखल, खड्डे आणि दूषित वातावरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात किंवा इतर वेळी चिखलातून वाट काढत येणे, गाड्या-घोड्या आणणे आणि गर्भवती महिला किंवा लहान मुलांना उपचारासाठी रुग्णालयात नेणे अत्यंतिक कठीण झाले आहे. अनेकदा मुख्य रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर वाहने उभी करून चिखलातून चालत घरी जावे लागते. ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती: कोसमटोला येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला तीव्र शब्दांत आवाहन केले आहे की, गावातील रस्त्यांची ही दयनीय अवस्था लवकरात लवकर लक्षात घेऊन, तसेच रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत आणि गावकऱ्यांना या नरकयातनेतून मुक्त करावे.
- कोसमटोला येथे विकासाची वानवा: रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ग्रामस्थ त्रस्त नमस्कार सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या कोसमटोला येथील नागरिकांची बिकट परिस्थिती; प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप कोसमटोला (स्थानिक वृत्त): ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक २ मधील कोसमटोला गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः गावातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाचे चालढकल धोरण यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांचा संताप: गावातील नागरिक धनराज सिताराम बोपचे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी चौरागडे पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून एक लाखाचा निधी देऊन कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. त्यानंतर आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची मागणी केली. परंतु, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे." गावात सांडपाण्याची योग्य सोय नसल्याने पाणी रस्त्यावर साचते, ज्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधीची कमतरता किंवा इतर कारणांमुळे यावर कोणताही ठोस उपाय काढण्यात आलेला नाही. माजी सरपंचांची प्रतिक्रिया: या संदर्भात बोलताना कोसमटोलाचे माजी सरपंच सुनील चंद्रकुमार खोब्रागडे यांनी सांगितले की, "२०२१ मध्ये निवडणुका पार पडल्या आणि आमचा कार्यकाळ संपला. आमच्या काळात एमआरजीएस (MRGS) अंतर्गत खडीकरण व सिमेंट रस्त्यांची अनेक कामे मंजूर झाली होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून एमआरजीएसच्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे आणि मस्टर न निघाल्यामुळे गावातील सर्व रस्त्यांची कामे आणि पर्यायाने गावाचा विकास पूर्णपणे थांबला आहे." त्यांनी पुढे सांगितले की, दलित वस्तीसह इतर भागांमधील रस्ते अत्यंत खराब असून, चिखल, खड्डे आणि दूषित वातावरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात किंवा इतर वेळी चिखलातून वाट काढत येणे, गाड्या-घोड्या आणणे आणि गर्भवती महिला किंवा लहान मुलांना उपचारासाठी रुग्णालयात नेणे अत्यंतिक कठीण झाले आहे. अनेकदा मुख्य रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर वाहने उभी करून चिखलातून चालत घरी जावे लागते. ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती: कोसमटोला येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला तीव्र शब्दांत आवाहन केले आहे की, गावातील रस्त्यांची ही दयनीय अवस्था लवकरात लवकर लक्षात घेऊन, तसेच रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत आणि गावकऱ्यांना या नरकयातनेतून मुक्त करावे.1
- ईद ए मिलाद च्या मुस्लिम सणाच्या दिवशी आज साकोली शहरात मुस्लिम बांधवानी काढली रॅली आज मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद च्या सनाच्या दिवशी आज साकोली शहरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवानी रॅली काढून हा सण साजरा केला. शहरातील सर्व मुस्लिम समाज आज उपस्तित होता. कुठलीही हानी होणार नाही या करिता पोलीस प्रशासन सुद्धा उपस्थित बंदोबसतात होता.1
- गोंदिया - अर्जुनी/मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन,पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी; गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन अर्जुनी/मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन,पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी,गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन अर्जुनी मोरगाव - पत्रकारांची सुरक्षा आणि निर्भीड पत्रकारितेच्या अधिकारासाठी गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी पत्रकार धीरज कसारे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. कारंजा, जिल्हा वर्धा येथील दैनिक महासागरचे प्रतिनिधी पत्रकार धीरज कसारे यांच्यासोबत कथित मारहाण, धमकी तसेच दबाव आणण्याच्या प्रयत्नाच्या घटनेचा निषेध करत संघटनेने दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.प्राप्त माहितीनुसार, पत्रकार धीरज कसारे यांनी कारंजा तालुका परिसरातील भेसळखोरी आणि नागरिकांच्या जीविताशी कथित खेळ केला जात असल्यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संबंधितांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे तसेच पत्रकाराला कथितरीत्या धमकी देण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे.या प्रकरणी अर्जुनी मोरगाव तालुका व्हॉईस ऑफ मीडिया कमिटी आणि जिल्हा कमिटीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, पोलीस ठाण्याच्या परिसरातच पत्रकार कसारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्यांना कथितरीत्या जबरदस्तीने वाहनात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. एखाद्या पत्रकाराने वृत्त प्रकाशित केल्यामुळे पोलीस ठाण्यासारख्या सार्वजनिक आणि संवेदनशील परिसरातच धमकी किंवा दबावाला सामोरे जावे लागणे, ही स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेसाठी गंभीर चिंतेची बाब आहे.या घटनेबाबत गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे. हे निवेदन गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे. संघटनेने मागणी केली आहे की, या प्रकरणातील संबंधित आरोपींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच घटनेची सत्यता समोर आणून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकार धीरज कसारे यांना आवश्यक सुरक्षा प्रदान करण्यात यावी. व्हॉईस ऑफ मीडियाचे स्पष्ट म्हणणे आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा प्रहरी आहे. जनहिताचे प्रश्न समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारांना धमकी, दबाव अथवा हिंसाचाराला सामोरे जावे लागणे, हे लोकशाही व्यवस्थेसाठी गंभीर आव्हान आहे. त्यामुळे पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि अशा प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. आता या निवेदनानंतर प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते आणि आरोपांच्या चौकशीत कोणती तथ्ये समोर येतात, याकडे पत्रकारिता क्षेत्रासह नागरिकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा कमिटी / अर्जुनी मोरगाव तालुका कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते : जिल्हाध्यक्ष – रामलाल शहारे जिल्हा सचिव – अरुण वाय. बन्नाटे जिल्हा उपाध्यक्ष – सूर्यभान ठलाल जिल्हा ग्रामीण अध्यक्ष – दिगंबर नंदेश्वर अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष – बिंबिसार शहारे तालुका उपाध्यक्ष – गुनाजी शहारे तालुका सचिव – सुरेश जीभकाटे तालुका संघटक – चेतन समरित तालुका कोषाध्यक्ष – प्रशांत ऊके सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.1
- लॉटरी पद्धत बंद करून मागेल त्याला बोअरवेल- नामदार आशिष जयस्वाल लॉटरी पद्धत बंद करून राज्य शासनाने मागेल त्याला बोरवेल देण्याचा निर्णय घेतला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी २६ ऑगस्ट रोजी दिली आहे.ते रामटेक तालुक्यातील कट्टा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात बोलत होते.रामटेक विधानसभा क्षेत्रात १०,५१७ घरे आदिवासी विकास योजनेतून आपण मंजूर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.1
- साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा* स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले. कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. *प्रतिक्रीया* कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. -राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही. #SalwaCrime #KuhiPolice #SuperstitionNews #MaharashtraNews #NagpurNews विषयानुरूप हॅशटॅग (मराठी): #अंधश्रद्धा #साळवा #कुही #अघोरीपूजा #भानामती #स्मशानभूमी #महाराष्ट्रबातम्या #जादूटोणाविरोधीकायदा विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी): #BlackMagicNews #StopSuperstition #CrimeUpdate #PoliceInvestigation #LocalNews1
- भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड भिवापुर- (प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे, सचीव- राजेश जांभुळे, सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे, जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप राऊत, सदस्य - शरद मिरे, अमर मोकाशी, जितेंद्र धोटे, राम वाघमारे, हर्षल राऊत, निशा जांभुळे, सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.1
- कामठीकरांसाठी मोठी खुशखबर! थकीत मालमत्ता करावरील 50% शास्ती माफ कामठी : नगर परिषद कामठी क्षेत्रातील थकीत मालमत्ता करधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये तब्बल 50 टक्के माफी देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर नगर परिषद कामठी हद्दीतील थकीत मालमत्ता करासाठी ही 50 टक्के शास्ती माफी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार 31 मार्च 2025 पर्यंत थकीत असलेल्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत थकीत कराची रक्कम अदा केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नगर परिषद कामठीच्या अभिलेखानुसार शहरामध्ये तब्बल 18 हजार 825 मालमत्ता असून, चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची एकूण मागणी सुमारे 11 कोटी 26 लाख रुपये आहे. कर वसुली वाढविणे आणि नागरिकांना दिलासा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने सर्व मालमत्ताधारकांना आपली थकीत कराची रक्कम तात्काळ भरून 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. म्हणजेच कामठीकरांनो… थकीत मालमत्ता कर भरण्याची हीच योग्य संधी! 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्या आणि आपला कराचा बोजा कमी करा! कामठी : नगर परिषद कामठी क्षेत्रातील थकीत मालमत्ता करधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये तब्बल 50 टक्के माफी देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर नगर परिषद कामठी हद्दीतील थकीत मालमत्ता करासाठी ही 50 टक्के शास्ती माफी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार 31 मार्च 2025 पर्यंत थकीत असलेल्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत थकीत कराची रक्कम अदा केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नगर परिषद कामठीच्या अभिलेखानुसार शहरामध्ये तब्बल 18 हजार 825 मालमत्ता असून, चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची एकूण मागणी सुमारे 11 कोटी 26 लाख रुपये आहे. कर वसुली वाढविणे आणि नागरिकांना दिलासा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने सर्व मालमत्ताधारकांना आपली थकीत कराची रक्कम तात्काळ भरून 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. म्हणजेच कामठीकरांनो… थकीत मालमत्ता कर भरण्याची हीच योग्य संधी! 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्या आणि आपला कराचा बोजा कमी करा!1
- भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे shuru ॲप (उमरेड ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ), सचीव- राजेश जांभुळे, सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद ) सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण ) निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.1