logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे लातूर शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश* *शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश* ​ २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित होत आहेत. शहीद संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर जगदाळे कुटुंब उघड्यावर पडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ मे २०२५ रोजी जगदाळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि व्यथा जाणून घेतल्यानंतर, डॉ. गोऱ्हे यांनी २७ मे २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून आसावरी जगदाळे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. ​ डॉ. गोऱ्हे यांच्या पत्राच्या अनुषंगाने १९ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे नियुक्ती लांबणीवर पडत असताना डॉ. गोऱ्हे यांनी खचून न जाता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या आणि सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला. ​ सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घातले. तांत्रिक अडचणी असूनही एका शहीद कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयाला आज यश आले असून आसावरी यांना नोकरी प्राप्त होत आहे. ​"संतोष जगदाळे यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या बलिदानाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे ही आपली संस्कृती नाही. आसावरीला नोकरी मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही जगदाळे कुटुंबाच्या भावनेशी सहमत आहोत. मात्र, आज तिला नियुक्ती मिळत असल्याचा समाधान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते केवळ राज्याचे प्रमुख नसून खऱ्या अर्थाने 'लाडक्या बहिणीचे राखणदार' आहेत." ​या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला आहे.

on 17 February
user_Sunil Gawali
Sunil Gawali
शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
on 17 February

पुणे लातूर शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश* *शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश* ​ २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित होत आहेत. शहीद संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर जगदाळे कुटुंब उघड्यावर पडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ मे २०२५ रोजी जगदाळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि व्यथा जाणून घेतल्यानंतर, डॉ. गोऱ्हे यांनी २७ मे २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून आसावरी जगदाळे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. ​ डॉ. गोऱ्हे यांच्या पत्राच्या अनुषंगाने १९ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे नियुक्ती लांबणीवर पडत असताना डॉ. गोऱ्हे यांनी खचून न जाता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या आणि सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला. ​ सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घातले. तांत्रिक अडचणी असूनही एका शहीद कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयाला आज यश आले असून आसावरी यांना नोकरी प्राप्त होत आहे. ​"संतोष जगदाळे यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या बलिदानाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे ही आपली संस्कृती नाही. आसावरीला नोकरी मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही जगदाळे कुटुंबाच्या भावनेशी सहमत आहोत. मात्र, आज तिला नियुक्ती मिळत असल्याचा समाधान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते केवळ राज्याचे प्रमुख नसून खऱ्या अर्थाने 'लाडक्या बहिणीचे राखणदार' आहेत." ​या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by GOSAVI. v. j.
    1
    Post by GOSAVI. v. j.
    user_GOSAVI. v. j.
    GOSAVI. v. j.
    Farmer Latur, Maharashtra•
    21 hrs ago
  • लातूर जिल्हा परिषदेवर उपअध्यक्ष म्हणून दयानंद सुरवसे यांची निवड - माजी मंत्री संजय बनसोडे यांची निवडी नंतर संजय बनसोडे काय म्हणाले ते पहा.
    1
    लातूर जिल्हा परिषदेवर उपअध्यक्ष म्हणून दयानंद सुरवसे यांची निवड - माजी मंत्री संजय बनसोडे
यांची  निवडी नंतर संजय बनसोडे काय म्हणाले ते पहा.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    23 hrs ago
  • Post by MAHARAJ TRAVELS NILANGA
    1
    Post by MAHARAJ TRAVELS NILANGA
    user_MAHARAJ TRAVELS NILANGA
    MAHARAJ TRAVELS NILANGA
    निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by परळी वार्ता
    1
    Post by परळी वार्ता
    user_परळी वार्ता
    परळी वार्ता
    Newspaper publisher परळी, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • महावितरण विभागाच्या तक्रारीवर कारवाईचा अभाव; माहिती विचारल्यावर महावितरण कर्मचाऱ्यांची अरेरावी? उदगीर (प्रतिनिधी) नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी वीज ही अत्यंत महत्त्वाची सुविधा मानली जाते. वीजपुरवठा किंवा लाईट संदर्भातील समस्या निर्माण झाल्यास नागरिक संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवून त्यावर तातडीने कारवाई होण्याची अपेक्षा करतात. मात्र तक्रार दाखल करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार उदगीर येथे समोर आल्याची माहिती मिळत आहे. ‘जनता की आवाज’चे पत्रकार असलेले अर्जदार अब्दुल नासेर बासीद काजी यांचा आरोप मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर शहरातील औरंगपुरा परिसरातील रहिवासी अब्दुल नासेर बासीद काजी यांनी परिसरातील लाईट संदर्भातील समस्येबाबत दिनांक 13 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली होती. संबंधित समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्यामुळे यावर तातडीने कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र तक्रार दाखल करूनही अनेक दिवस उलटून गेले तरी संबंधित समस्येवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही समजते. दरम्यान, तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी अर्जदार अब्दुल नासेर बासीद काजी, जे स्वतः “जनता की आवाज” या माध्यमाशी संबंधित पत्रकार आहेत, त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तक्रारीवर कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती विचारली. मात्र माहिती देण्याऐवजी तेथे उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी पत्रकारांशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहिती विचारल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी “अरे–राव” अशा अवमानकारक भाषेत संवाद साधत उद्धटपणे वागणूक दिल्याचे सांगितले जात आहे. पत्रकारांनी केवळ नागरिकांच्या समस्येचा पाठपुरावा करण्यासाठी आणि तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारले असताना अशी वागणूक मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
    4
    महावितरण विभागाच्या तक्रारीवर कारवाईचा अभाव; माहिती विचारल्यावर महावितरण कर्मचाऱ्यांची अरेरावी?
उदगीर (प्रतिनिधी) नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी वीज ही अत्यंत महत्त्वाची सुविधा मानली जाते. वीजपुरवठा किंवा लाईट संदर्भातील समस्या निर्माण झाल्यास नागरिक संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवून त्यावर तातडीने कारवाई होण्याची अपेक्षा करतात. मात्र तक्रार दाखल करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार उदगीर येथे समोर आल्याची माहिती मिळत आहे.
‘जनता की आवाज’चे पत्रकार असलेले अर्जदार अब्दुल नासेर बासीद काजी यांचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर शहरातील औरंगपुरा परिसरातील रहिवासी अब्दुल नासेर बासीद काजी यांनी परिसरातील लाईट संदर्भातील समस्येबाबत दिनांक 13 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली होती. संबंधित समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्यामुळे यावर तातडीने कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
मात्र तक्रार दाखल करूनही अनेक दिवस उलटून गेले तरी संबंधित समस्येवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही समजते.
दरम्यान, तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी अर्जदार अब्दुल नासेर बासीद काजी, जे स्वतः “जनता की आवाज” या माध्यमाशी संबंधित पत्रकार आहेत, त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तक्रारीवर कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती विचारली. मात्र माहिती देण्याऐवजी तेथे उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी पत्रकारांशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माहिती विचारल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी “अरे–राव” अशा अवमानकारक भाषेत संवाद साधत उद्धटपणे वागणूक दिल्याचे सांगितले जात आहे. पत्रकारांनी केवळ नागरिकांच्या समस्येचा पाठपुरावा करण्यासाठी आणि तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारले असताना अशी वागणूक मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    1 day ago
  • Post by Saudagar Gaikwad
    1
    Post by Saudagar Gaikwad
    user_Saudagar Gaikwad
    Saudagar Gaikwad
    तुळजापूर, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • #maxparbhani #BabajaniDurrani #JunaidKhan Babajani Durrani Junaid Khan Durrani
    1
    #maxparbhani 
#BabajaniDurrani 
#JunaidKhan
Babajani Durrani 
Junaid Khan Durrani
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by MAHARAJ TRAVELS NILANGA
    1
    Post by MAHARAJ TRAVELS NILANGA
    user_MAHARAJ TRAVELS NILANGA
    MAHARAJ TRAVELS NILANGA
    निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.