कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी हुज्जत घालत महिला डॉक्टर डॉ. सृष्टी बाविस्कर यांच्यासह इतर डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. या धक्कादायक घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह विविध सामाजिक आणि राजकीय स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत असून डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या हल्ल्यामुळे पीडित महिला डॉक्टर डॉ. सृष्टी बाविस्कर यांना गंभीर मानसिक धक्का बसला असून त्या अद्याप कामावर रुजू झालेल्या नाहीत. घटनेनंतर त्या अजूनही झोपेतून दचकून जागी होतात आणि 'ते आम्हाला मारतात' असे ओरडतात, अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेची सेवा करण्याऐवजी डॉक्टरांवर हात उचलणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगत त्यांनी रुग्णालयातील सुरक्षारक्षकांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. तसेच आरोपी रमेश म्हात्रे हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्यांना अटक होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन आणि पोलिसांवर दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज न्यायालयात प्रत्यक्ष हजर केले जाणार आहे. न्यायालयाने त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावत त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या कृत्यामुळे संतप्त झालेल्या जनतेतून आणि वैद्यकीय क्षेत्रातून संबंधित लोकप्रतिनिधीवर कठोर कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी हुज्जत घालत महिला डॉक्टर डॉ. सृष्टी बाविस्कर यांच्यासह इतर डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. या धक्कादायक घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह विविध सामाजिक आणि राजकीय स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत असून डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या हल्ल्यामुळे पीडित महिला डॉक्टर डॉ. सृष्टी बाविस्कर यांना गंभीर मानसिक धक्का बसला असून त्या अद्याप कामावर रुजू झालेल्या नाहीत. घटनेनंतर त्या अजूनही झोपेतून दचकून जागी होतात आणि 'ते आम्हाला मारतात' असे ओरडतात, अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेची सेवा करण्याऐवजी डॉक्टरांवर हात उचलणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगत त्यांनी रुग्णालयातील सुरक्षारक्षकांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. तसेच आरोपी रमेश म्हात्रे हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्यांना अटक होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन आणि पोलिसांवर दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज न्यायालयात प्रत्यक्ष हजर केले जाणार आहे. न्यायालयाने त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावत त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या कृत्यामुळे संतप्त झालेल्या जनतेतून आणि वैद्यकीय क्षेत्रातून संबंधित लोकप्रतिनिधीवर कठोर कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे.
- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. भिवंडी-वाडा महामार्गालगत मेट ग्रामपंचायत हद्दीतील 'रंगतरंग कमर्शियल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने नैसर्गिक पाण्याचा नाला अडवून त्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या अडथळ्यामुळे अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला आणि पुराचे पाणी विरुद्ध दिशेने शेतांमध्ये शिरल्याने परिसरातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी बालकृष्ण धोंडू घोडविंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही नैसर्गिक नाला अडविल्याबाबत वाडा तहसील कार्यालयात लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून संबंधित कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. आता घोडविंदेपाडा येथील शेतकरी सुनील घोडविंदे, भरत परशुराम घोडविंदे, किरण घोडविंदे, पंडित घोडविंदे आणि बालकृष्ण घोडविंदे यांनी शासनाने तात्काळ शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी संबंधित कंपनीची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नैसर्गिक जलवाहिन्या मोकळ्या कराव्यात, अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.4
- महाराष्ट्रातील एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून खूप पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडर पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. हे थक्क करणारे दृश्य समोर आल्यानंतर, एवढ्या मोठ्या संख्येने सिलेंडर पाण्यात वाहून जाण्यामागचे नेमके काय कारण असू शकते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.1
- पालघर तालुक्यातील कुडण गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी अनिल मोरेश्वर म्हात्रे आणि कल्पेश अशोक म्हात्रे यांच्या शेतातील सुमारे ८०० ते ९०० केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून आंबा, फणस, शेवगा आणि नारळ या फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची दखल घेत तारापूर विभागाचे (पालघर) सहाय्यक कृषी अधिकारी योगेश साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल ठाकूर यांनीही नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. मात्र, गावाचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि इतर स्थानिक सदस्यांनी अजूनही घटनास्थळी भेट दिलेली नाही, अशी तीव्र नाराजी आणि तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.1
- ठाण्यातील हाय स्ट्रीट मॉलमध्ये नदीम मेमन यांच्या वतीने 'हाय स्ट्रीट क्रिएटर स्टुडिओ' या नव्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही नदीम मेमन यांची एक नवी पेशकश आहे.1
- भिवंडी तालुक्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी वीटभट्टी मजूर सविता रावते यांना आरोग्य यंत्रणेच्या कथित निष्काळजीपणामुळे आपले बाळ गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्र विधान परिषदेत गाजली. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा किशोर वाघ यांनी हा गंभीर मुद्दा सभागृहात उपस्थित करून सरकारला जाब विचारला. या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आमदार चित्रा किशोर वाघ यांनी आरोप केला की, २२ एप्रिल रोजी ही घटना घडल्यानंतर आरोग्य विभागाने पूर्णपणे संवेदनाहीन भूमिका घेतली होती. केवळ लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर प्रशासन जागे झाले. तसेच, गर्भधारणेदरम्यान आवश्यक सोनोग्राफी न करणे, आधार कार्डाचे कारण देऊन संदर्भ चिठ्ठी नाकारणे, माता-बालक सुरक्षा कार्डावरील नोंदींबाबत त्रुटी आणि फेटल डॉप्लर उपलब्ध असूनही त्याचा वापर न करणे, अशा गंभीर बाबींवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, मृत बालकाच्या कुटुंबीयांवर विविध मार्गांनी दबाव आणून त्यांच्याकडून सकारात्मक जबाब घेण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित आशा सेविकेला निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले. या संपूर्ण प्रकरणात पीडित कुटुंबाला भेट देऊन पाठपुरावा करणाऱ्या 'भूमिपुत्र एल्गार संघटने'चे अध्यक्ष प्रमोद पवार यांच्या कार्याचा विशेष उल्लेखही चित्रा किशोर वाघ यांनी केला. प्रमोद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना केवळ कारवाई हाच उद्देश नसून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. या प्रकरणामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील माता-बाल आरोग्य सेवांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता चौकशीनंतर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- कल्याण तालुक्यातील खडवली येथून शनिवार संध्याकाळी पडघाकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बसला अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. बस खडवली बसस्थानकापासून अवघ्या एक-दोन मिनिटांच्या अंतरावर पोहोचली असताना, बसमधून धूर आणि आग निघत असल्याचे बाहेरील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याबाबात बस चालक आणि प्रवाशांना सावध केले. माहिती मिळताच चालकाने प्रसंगावधान राखत बस लगेच थांबवली आणि बसमधील सर्व प्रवाशांना त्वरित सुरक्षितपणे बाहेर काढले. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते, मात्र सर्वांना वेळेत बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.1