माणुसकीचा ओलावा: तहानलेल्या मुक्या जीवांना मिळाली तृप्ती | हृदयस्पर्शी घटना माणुसकीचा ओलावा: तहानलेल्या मुक्या जीवांना मिळाली तृप्ती | हृदयस्पर्शी घटना #flowers #everyone #virals #shorts #viral सध्या प्रचंड उष्णतेने संपूर्ण परिसर होरपळून निघत आहे. तापमान ४१ ते ४२ अंशांपर्यंत पोहोचले असून माणसांसह मुक्या प्राण्यांचं जगणंही कठीण झालं आहे. पाण्याच्या एका थेंबासाठी हे जीव वणवण भटकताना दिसत आहेत... जालना जिल्ह्यातील अंबड येथे आज एक हृदयस्पर्शी घटना घडली. दुपारच्या कडक उन्हात ४ ते ५ वानरे आपल्या लहान पिल्लांसह पाण्याच्या शोधात पत्रकार संतोष जिगे यांच्या घरासमोर आली. उन्हामुळे व्याकुळ झालेल्या या वानरांना घरासमोरील पाण्याची टाकी दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिकडे धाव घेतली…यानंतर वानरांनी आणि त्यांच्या पिल्लांनी मनसोक्त पाणी पिऊन तहान भागवली. पाणी प्यायल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेलं समाधान पाहून उपस्थित सर्वांनाच एक वेगळाच आनंद मिळाला. तृप्त होऊन निघताना त्यांनी टाकलेली नजर जणू कृतज्ञतेची शांत भावना व्यक्त करत होती... दरम्यान, राजाभाऊ उगले यांनी २०१६ पासून आपल्या घराजवळ पशुपक्ष्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बसवलेला कळस आजही चिमण्यांसाठी जीवनदायी ठरत आहे... या भीषण उष्णतेत प्रत्येकाने आपल्या घराबाहेर, अंगणात किंवा गच्चीवर पक्षी आणि प्राण्यांसाठी पाण्याची सोय करावी… 🙏 थेंब थेंब पाणी… जीवांना देई जीवन!
माणुसकीचा ओलावा: तहानलेल्या मुक्या जीवांना मिळाली तृप्ती | हृदयस्पर्शी घटना माणुसकीचा ओलावा: तहानलेल्या मुक्या जीवांना मिळाली तृप्ती | हृदयस्पर्शी घटना #flowers #everyone #virals #shorts #viral सध्या प्रचंड उष्णतेने संपूर्ण परिसर होरपळून निघत आहे. तापमान ४१ ते ४२ अंशांपर्यंत पोहोचले असून माणसांसह मुक्या प्राण्यांचं जगणंही कठीण झालं आहे. पाण्याच्या एका थेंबासाठी हे जीव वणवण भटकताना दिसत आहेत... जालना जिल्ह्यातील अंबड येथे आज एक हृदयस्पर्शी घटना घडली. दुपारच्या कडक उन्हात ४ ते ५ वानरे आपल्या लहान पिल्लांसह पाण्याच्या शोधात पत्रकार संतोष जिगे यांच्या घरासमोर आली. उन्हामुळे व्याकुळ झालेल्या या वानरांना घरासमोरील पाण्याची टाकी दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिकडे धाव घेतली…यानंतर वानरांनी आणि त्यांच्या पिल्लांनी मनसोक्त पाणी पिऊन तहान भागवली. पाणी प्यायल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेलं समाधान पाहून उपस्थित सर्वांनाच एक वेगळाच आनंद मिळाला. तृप्त होऊन निघताना त्यांनी टाकलेली नजर जणू कृतज्ञतेची शांत भावना व्यक्त करत होती... दरम्यान, राजाभाऊ उगले यांनी २०१६ पासून आपल्या घराजवळ पशुपक्ष्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बसवलेला कळस आजही चिमण्यांसाठी जीवनदायी ठरत आहे... या भीषण उष्णतेत प्रत्येकाने आपल्या घराबाहेर, अंगणात किंवा गच्चीवर पक्षी आणि प्राण्यांसाठी पाण्याची सोय करावी… 🙏 थेंब थेंब पाणी… जीवांना देई जीवन!
- छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात भीषण आग छत्रपती संभाजीनगरातील विमानतळ परिसरात आज बुधवारी भीषण आग लागली अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत1
- Post by Labour addaa.1
- • 'जनगणना २०२७' अंतर्गत घरयादी व घरगणनेची स्वगणना लातूर : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम व्हिडिओ मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घरी येणाऱ्या प्रगणकांना एकूण ३४ प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे. तसेच, भारत सरकारने या प्रक्रियेत 'स्वगणनेचा' विशेष पर्याय उपलब्ध करून दिला असून महाराष्ट्रासाठी हा कालावधी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ असा राहणार आहे. स्व-गणनासाठी पोर्टलवर नोंदणी करताना एकदा निश्चित केलेले कुटुंब प्रमुखाचे नाव बदलता येणार नाही, तसेच एका मोबाईल क्रमांकावरून केवळ एकाच कुटुंबाची नोंदणी करता येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नोंदणीनंतर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करून आपली भाषा निवडावी आणि जिल्ह्यासह राहत्या ठिकाणचा पिन कोड भरून नकाशावरील लाल मार्करद्वारे घराचे अचूक स्थान निश्चित करावे. पुढील टप्प्यात, पोर्टलवरील मार्गदर्शक सूचनांनुसार घरयादी व घरगणनेची सविस्तर प्रश्नावली भरून सर्व माहितीची पडताळणी करावी आणि माहिती अचूक असल्याची खात्री पटल्यावर ती अंतिम सादर (सबमिट) करावी. एकदा माहिती अंतिम सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही आणि त्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर 'H' या अक्षराने सुरू होणारा ११-अंकी 'SE ID' प्राप्त होईल. जनगणनेची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जेव्हा शासकीय प्रगणक प्रत्यक्ष घराला भेट देतील, तेव्हा त्यांना हा SE ID सांगणे आवश्यक आहे, जेणेकरून डिजिटल माहितीची प्रत्यक्ष पडताळणी होऊन जनगणनेची नोंद यशस्वीरीत्या पूर्ण होईल. तरी सर्व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे देऊन या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.1
- प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत त्यांनी संताप व्यक्त केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद ठेवावे, अशीही मागणी पुढे करण्यात आली. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.1
- रिकवरी एजेंटो की दबंगई, क्रेडिट कार्ड का बिल नहीं दिया तो शख्स को पीटा, 3 गिरफ्तार पुणे के हडपसर इलाके में क्रेडिट कार्ड बकाया वसूली के नाम पर एक व्यक्ति की सरेआम पिटाई करने के मामले में तीन रिकवरी एजेंट गिरफ्तार किए गए हैं. आरोप है कि उन्होंने पीड़ित संदीप जमादार से वास्तविक बकाया से अधिक रकम मांगी और मना करने पर चौराहे पर रोककर हमला किया. घटना का वीडियो वायरल हो गया. पुलिस ने तीनों आरोपियों पर जबरन वसूली और हमला करने की धाराओं में मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है रिकवरी एजेंट की गिरफ्तारी पुलिस के अनुसार, गिरफ्तार आरोपियों की पहचान जय कासर, विनीत कासर और तनिष्क खुडे के रूप में हुई है. ये तीनों एक निजी वित्तीय संस्था के लिए रिकवरी एजेंट के तौर पर काम करते थे.1
- संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीनसंचालक मार्गदर्शन व मैदानी प्रशिक्षण रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकिन रवी जाधव सर मो. 9921982615 बिडकिन.ता पैठण.औरगाबाद shaha social media bidkin1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- धुळे-भुसावळ मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात धुळे-भुसावळ मार्गावर मराठखेड्याजवळ एसटी बसचा आज बुधवारी भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस तब्बल सुमारे ३ किलोमीटरपर्यंत अनियंत्रितपणे धावत राहिली. या दरम्यान बस रस्त्यावरील सुरक्षा कठड्याला जोरात धडकली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या अपघातात सुमारे १५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचे कारण प्राथमिक माहितीनुसार, बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. चालकाने बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वेग जास्त असल्याने अपघात टाळता आला नाही. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.1