अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील काही रुग्णालयांच्या कथित बेकायदेशीर इमारतींचा अतिक्रमण विभागामार्फत गोपनीय सर्व्हे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे मनपाच्या नगररचना विभागावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून अशी शंका उपस्थित केली जात आहे की, हा सर्व्हे खरोखरच बेकायदेशीर बांधकामांवर अंकुश आणण्यासाठी आहे की संबंधित पक्षकारांना कारवाईची भीती दाखवून दबावतंत्र वापरण्याचा आणि 'सेटिंग' करण्याचा प्रयत्न आहे. या गोपनीय सर्व्हेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. जर या इमारती बेकायदेशीर होत्या, तर त्या बांधल्या कशा गेल्या आणि बांधकाम पूर्ण होईपर्यंत मनपा प्रशासन झोपेत होते का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. बांधकाम परवानगीपासून ते पूर्णत्वाच्या दाखल्यापर्यंत अनेक टप्प्यांवर महानगरपालिकेच्या विविध विभागांची मंजुरी आवश्यक असते; अशा स्थितीत या इमारतींना परवानग्या कशा मिळाल्या आणि विविध विभागांनी हरकत नसल्याचे दाखले कसे दिले, याची चौकशी होत नाही. शिवाय, नियमबाह्य बांधकाम झाले असल्यास त्यासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असाही प्रश्न विचारला जात आहे. याच्या उलट, सामान्य नागरिक किंवा मध्यमवर्गीय कुटुंबांना बांधकाम परवानगीसाठी असंख्य अडथळे आणि मनपाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात, तर मोठ्या इमारतींच्या बाबतीत नियम अचानक शिथिल कसे होतात, हा प्रश्न अधिकच गडद होत आहे. महानगरपालिका हद्दीतील बेकायदेशीर बांधकामांसाठी नगररचना विभाग आणि संबंधित अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करणे अपेक्षित असताना, त्यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यापूर्वीही बांधकाम परवानगीसंदर्भातील कथित गैरव्यवहार आणि लाचखोरीच्या प्रकरणांमुळे नगररचना विभाग चर्चेत आला होता, तरीही या विभागातील कामकाजाची सखोल चौकशी किंवा जबाबदारी निश्चित करण्याबाबत अपेक्षित हालचाल झालेली नाही. आता अहिल्यानगरकरांचा सरळ प्रश्न आहे की, बेकायदेशीर इमारतींची केवळ यादी तयार करून काय होणार? कारवाई फक्त कागदावरच होणार की जबाबदार अधिकारी आणि संबंधित दोषींवरही कठोर कारवाई होणार? मनपा प्रशासन आणि आयुक्तांनी या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देणे आवश्यक आहे, अन्यथा "बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण आणि सामान्य नागरिकांना त्रास" ही भावना अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील काही रुग्णालयांच्या कथित बेकायदेशीर इमारतींचा अतिक्रमण विभागामार्फत गोपनीय सर्व्हे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे मनपाच्या नगररचना विभागावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून अशी शंका उपस्थित केली जात आहे की, हा सर्व्हे खरोखरच बेकायदेशीर बांधकामांवर अंकुश आणण्यासाठी आहे की संबंधित पक्षकारांना कारवाईची भीती दाखवून दबावतंत्र वापरण्याचा आणि 'सेटिंग' करण्याचा प्रयत्न आहे. या गोपनीय सर्व्हेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. जर या इमारती बेकायदेशीर होत्या, तर त्या बांधल्या कशा गेल्या आणि बांधकाम पूर्ण होईपर्यंत मनपा प्रशासन झोपेत होते का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. बांधकाम परवानगीपासून ते पूर्णत्वाच्या दाखल्यापर्यंत अनेक टप्प्यांवर महानगरपालिकेच्या विविध विभागांची मंजुरी आवश्यक असते; अशा स्थितीत या इमारतींना परवानग्या कशा मिळाल्या आणि विविध विभागांनी हरकत नसल्याचे दाखले कसे दिले, याची चौकशी होत नाही. शिवाय, नियमबाह्य बांधकाम झाले असल्यास त्यासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असाही प्रश्न विचारला जात आहे. याच्या उलट, सामान्य नागरिक किंवा मध्यमवर्गीय कुटुंबांना बांधकाम परवानगीसाठी असंख्य अडथळे आणि मनपाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात, तर मोठ्या इमारतींच्या बाबतीत नियम अचानक शिथिल कसे होतात, हा प्रश्न अधिकच गडद होत आहे. महानगरपालिका हद्दीतील बेकायदेशीर बांधकामांसाठी नगररचना विभाग आणि संबंधित अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करणे अपेक्षित असताना, त्यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यापूर्वीही बांधकाम परवानगीसंदर्भातील कथित गैरव्यवहार आणि लाचखोरीच्या प्रकरणांमुळे नगररचना विभाग चर्चेत आला होता, तरीही या विभागातील कामकाजाची सखोल चौकशी किंवा जबाबदारी निश्चित करण्याबाबत अपेक्षित हालचाल झालेली नाही. आता अहिल्यानगरकरांचा सरळ प्रश्न आहे की, बेकायदेशीर इमारतींची केवळ यादी तयार करून काय होणार? कारवाई फक्त कागदावरच होणार की जबाबदार अधिकारी आणि संबंधित दोषींवरही कठोर कारवाई होणार? मनपा प्रशासन आणि आयुक्तांनी या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देणे आवश्यक आहे, अन्यथा "बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण आणि सामान्य नागरिकांना त्रास" ही भावना अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
- शिरूरच्या आनंद सोसायटी परिसरात झालेल्या २४ लाख रुपयांच्या घरफोडीचा शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने यशस्वीपणे उलगडा केला आहे. या प्रकरणी, चोराने लंपास केलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसह तब्बल २४ लाख रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करत मुख्य आरोपी नोकराला नांदेड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी नितीन मोतीलाल मुथ्था (रा. आनंद सोसायटी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, त्यांच्या घरात काम करणारे विलास आनंदा खोसडे आणि सारजा विलास खोसडे (दोघेही रा. भायेगाव, जि. नांदेड) यांनी ४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घरातील सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची भांडी आणि अन्य मौल्यवान साहित्य चोरले होते. या गुन्ह्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३०६ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथकाला आरोपींचा आणि चोरीच्या मालाचा शोध घेण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू असताना, मुख्य आरोपी विलास आनंदा खोसडे हा मुखेड तालुक्यातील जांब येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नांदेड जिल्ह्यात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे २४ लाख रुपये किमतीचे ७ किलो १३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व वस्तू तसेच ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांनी चोरीचा जवळपास संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभमकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने पार पाडली. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह अक्षय कळमकर, नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अंबादास थोरे, रविंद्र काळे, दादाराव नागरे आणि अजय पाटील यांनी या यशस्वी कारवाईत सहभाग घेतला.2
- राज्यातील राजकारणात नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राणे यांनी रोहित पवार यांना थेट आव्हान देत म्हटले आहे की, "बिळातून बाहेर यावं". या विधानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न, "रोहित पवार भाजपमध्ये असते तर...?" त्यांच्या या प्रश्नाने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असून, नितेश राणे यांचे हे विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे.1
- जलसंपदा विभागाने आपली १४ कार्यालये नाशिक अहिल्यानगरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मराठवाड्यातून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. प्रदीप चव्हाण यांनी या निर्णयावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, हा मराठवाड्याला वाळवंट करण्याचा डाव आहे.1
- जालना येथील सिंधी बाजारमध्ये रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिवशक्ती-लहूशक्ती-भीमशक्ती अभियानाच्या वतीने मा. आमदार अमितजी गोरखे साहेबांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. तळपत्या ४२ डिग्री तापमानात 'जिगरबाज लहू सैनिकांनी' हा एल्गार पुकारला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण व्हावे, या मागणीसाठी आमदार अमितजी गोरखे शासन दरबारी अभ्यासपूर्ण मांडणी करत असताना, काही समाजकंटक सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करून अपशब्द वापरत असल्याने त्यांच्या संरक्षणाची ही मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान, "आमदार अमित गोरखे आगे बढो-हम तुम्हारे साथ है", "आमदार अमित गोरखे से जो टकरायेगा वह मिट्टी मे मिल जायेगा", आणि "आरक्षण वर्गीकरण झालंच पाहीजे" या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्य समन्वयक रविकांत जगधने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी डॉ. मनोहर जाधव, छगन वाघमारे, देविदास जाधव, सचिन साने, बंडू निकाळजे, दत्ता घोडे, अशोक लोखंडे, प्रकाश काका साळवे, सतीष खंडागळे, नरेश जगधने, शाम खंदारे, सुधाकर तुपसौन्दर, सुदाम दाभाडे, अभिनेते अरुण गाढे, प्रदीप पडूळ, अनिल लोखंडे, रमेश कासार, राहुल गोफने, मनोज बॉबी, सोमेश कांबळे, विजय आठवले यांसह अनेक 'जिगरबाज लहू सैनिकांची' प्रमुख उपस्थिती होती. या प्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.1
- बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी येथे मुलांसाठी शालेय शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षणही सुरू करण्यात आले आहे. या संस्थेमध्ये राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था असून, शाळेत जाण्यासाठी बसची सोय देखील उपलब्ध आहे. संस्थेचे परिसर अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असून, येथे विद्यार्थ्यांना गायन, वादन, हरिपाठ, गीता आणि कीर्तनाचे धडे दिले जातील. श्री संत मिराबाई आईसाहेब संस्थानच्या महंत राधाताई महाराज (आईसाहेब) यांनी ज्या मुलांना प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यासाठी संपर्क क्रमांक 9763980777 आणि विठ्ठल महाराज सांगळे यांचा संपर्क क्रमांक 9403039322 उपलब्ध करून देण्यात आला आहे.1
- मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण कडक उन्हात सुरू ठेवले आहे. त्यांनी मंडप सोडून, बाज वर बसून उपोषण सुरू केले आहे.1
- सांगली जिल्ह्यात पोलिसांनी एका अवैध दारू अड्ड्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने तब्बल ७५० लिटर कच्चा माल जागेवरच नष्ट केला.1
- तिरुप्पूर शहरात जोरदार वाऱ्यामुळे एक बॅनर कोसळले. या घटनेत एका दुचाकीस्वाराची गाडी घसरली, मात्र सुदैवाने दुचाकीचा चालक सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.1