जिल्हाधिकारी यांच्या परवानगी विना आधार किट वाटप, डी पी एम जुनेद शेख यांचा कारनामा उघड..... बुलडाणा जिल्ह्यात डीआयटी मार्फत नवीन आधार किट वाटप करण्यासाठी एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्या जाहिरातीनुसार जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या निवड समितीने अंतिम निवड यादी जाहीर केली. त्यानंतर मात्र महा आयटीचे डी पी एम जुनेद शेख यांनी नवीन आधार किट वाटप करताना निवड झालेल्या 45 आधार केंद्र चालकांपैकी केवळ 27 आधार किट जिल्हाधिकारी यांची लेखी परवानगी नसताना वाटप केल्या आहेत. आधार किट वाटप करताना ज्यांच्याकडून आर्थिक आधार मिळाला अशा केंद्र चालकांना आधार किट वाटप करण्यात आल्या आहेत. उर्वरित केंद्र चालकांना आधार किट बाबत सेतू व महाआयटी विभागातील अधिकारी व कर्मचारी हे आज रोजी कोणतीच माहिती देत नाहीत. डिसेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात किट वाटप करण्यात आलेल्या आहेत. आज तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असून इतर निवड झालेल्या केंद्र चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.त्यामुळे संबंधित महाआयटी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या परवानगी विना आधार किट वाटप, डी पी एम जुनेद शेख यांचा कारनामा उघड..... बुलडाणा जिल्ह्यात डीआयटी मार्फत नवीन आधार किट वाटप करण्यासाठी एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्या जाहिरातीनुसार जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या निवड समितीने अंतिम निवड यादी जाहीर केली. त्यानंतर मात्र महा आयटीचे डी पी एम जुनेद शेख यांनी नवीन आधार किट वाटप करताना निवड झालेल्या 45 आधार केंद्र चालकांपैकी केवळ 27 आधार किट जिल्हाधिकारी यांची लेखी परवानगी नसताना वाटप केल्या आहेत. आधार किट वाटप करताना ज्यांच्याकडून आर्थिक आधार मिळाला अशा केंद्र चालकांना आधार किट वाटप करण्यात आल्या आहेत. उर्वरित केंद्र चालकांना आधार किट बाबत सेतू व महाआयटी विभागातील अधिकारी व कर्मचारी हे आज रोजी कोणतीच माहिती देत नाहीत. डिसेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात किट वाटप करण्यात आलेल्या आहेत. आज तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असून इतर निवड झालेल्या केंद्र चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.त्यामुळे संबंधित महाआयटी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
- स्टंटबाजी बेतली जीवावर: सापाच्या दंशाने ख्यातनाम सर्पमित्राचा खामगावात दुर्दैवी मृत्यू.1
- या प्रकरणी कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका चालकाबाबत लेखी तक्रार दिली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बातमी : मिळालेल्या माहितीनुसार, जनुना येथील रहिवासी मंगेश प्रकाश कांबळे यांना ९ मार्च रोजी सकाळी सर्पदंश झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तक्रारीनुसार, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रुग्णाला अकोला येथे नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला. मात्र त्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णवाहिका बोलावण्यात आल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णवाहिका चालकाने अकोला येथे नेण्यासाठी पैशांची मागणी केली. नातेवाईकांनी काही रक्कम तातडीने देऊन उर्वरित रक्कम अकोला येथे देण्याची विनंती केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र पैसे तात्काळ न मिळाल्याने रुग्णवाहिका पुन्हा खामगाव येथील रुग्णालयात परत आणण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर सुमारे एका तासाने मंगेश कांबळे यांचे दुर्दैवी निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान, मयताचे भाऊ सुनील कांबळे यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करत खामगाव शहर पोलीस ठाणे आणि सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली आहे.1
- Post by Shivaji Bhosale1
- #marathi#newsjalna#1
- प्रतिनिधि.... दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.2
- गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.2
- सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..1
- सरपंच पतीवर महिलेचा विनयभंगाचा आरोप बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचे आमरण उपोषण**1