Shuru
Apke Nagar Ki App…
मोठं संकट? घाबरू नका… किल्ली तुमच्याच हातात आहे! 🔑 छोटा विचार, थोडा संयम आणि आत्मविश्वास — यांनीच मोठी कुलूपं उघडतात.
दैनिक कलमवीर ब्युरो
मोठं संकट? घाबरू नका… किल्ली तुमच्याच हातात आहे! 🔑 छोटा विचार, थोडा संयम आणि आत्मविश्वास — यांनीच मोठी कुलूपं उघडतात.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by वैजनाथ पावडे1
- Post by श्री व्यंकटेश देवराव कदम1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- बुलढाणा जिल्ह्यात इंधन_पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार, सर्व पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच वितरित करणे बंधनकारक असून कॅन, बाटली किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देणे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधित करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.1
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- Post by Sharad Dayedar1
- खामगाव : शहरातील हॉटेल, लॉजेस आणि कॅफेमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध खामगाव पोलिसांनी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. 'ऑपरेशन मिशन परिवर्तन' अंतर्गत शेगाव रोडवरील 'फूड स्टोरी कॅफे' वर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत कॅफे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहरात मागील काही काळापासून संशयास्पद कॅफे आणि हॉटेल्सवर लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अनेक कॅफेमध्ये शाळा-महाविद्यालयातील मुले-मुली गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच अनुषंगाने आज शेगाव रोडवरील 'फूड स्टोरी' कॅफेची झडती घेतली असता, तिथे काही तरुण-तरुणी आक्षेपार्ह स्थितीत मिळून आले. या प्रकरणी कॅफे मालक गौरव गावतरे याच्या विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा किंवा कॉलेज सुटल्यानंतर आपली मुले वेळेवर घरी पोहोचतात की नाही, याची खात्री करावी. तसेच, शहरातील सर्व हॉटेल आणि कॅफे चालकांना स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे की, त्यांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांना थारा देऊ नये.असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. तर पोलिसांनी यापूर्वीच शहरातील सर्व कॅफे आणि हॉटेल्सना कलम 168 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता नुसार नोटिसा बजावल्या होत्या. तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील असा इशारा कॅफे व हॉटेल चालकांना दिला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणिव डीवायएसपी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे.1
- Post by वैजनाथ पावडे1