Shuru
Apke Nagar Ki App…
श्री पंचमुखी हनुमान देवस्थान सातनवरी ता. कुही येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
रामभाऊ गणेश क्षिरसागर
श्री पंचमुखी हनुमान देवस्थान सातनवरी ता. कुही येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- *रस्त्यावर मोकाट गायी मुळे अपघाताचा धोका...* *सावनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव रस्त्यावर उतरून स्वतः पुढाकार घेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर* सावनेर:-वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मोकाट गायींमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी नगरपरिषद सावनेरच्या संबंधित पथकाला तात्काळ पाचारण केले. नगरपरिषद सावनेरच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मोकाट गायी पकडून त्यांचा ताबा घेतला. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आणि संभाव्य अपघाताचा धोका टळला. यानंतर पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी नगरपरिषद सावनेर येथे जाऊन मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष यांची भेट घेतली. शहरातील मोकाट जनावरांची समस्या, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना, शहरातील पार्किंग व्यवस्था आणि वाढते अतिक्रमण याबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची शिस्त आणि शहर सुस्थितीत राहण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. रस्त्यावर मोकाट जनावरे ही केवळ वाहतुकीची समस्या नसून अनेक गंभीर अपघातांचे कारण ठरू शकतात. त्यामुळे अशा समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना होणे ही काळाची गरज आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्परतेने कार्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव, सावनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी तसेच नगरपरिषद सावनेरच्या पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक कौतुक.पोलीस प्रशासनाकडून सातत्याने पुढाकार घेतला जात असला, तरी नगरपरिषदेकडून अपेक्षित प्रमाणात आणि सातत्यपूर्ण कार्यवाही होताना दिसत नाही. मोकाट जनावरे, अतिक्रमण आणि पार्किंगसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने अधिक प्रभावी आणि नियमित कारवाई करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. :हितेश बनसोड सामाजिक कार्यकर्ते सावनेर1
- ऑरेंज अलर्टमध्येही प्रशिक्षणाची सक्ती? हिंगणघाट हायवेवरील भीषण अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू वर्धा. हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असतानाही प्रशिक्षणासाठी प्रवास करावा लागल्याने एका शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ घडली. या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शिक्षकांमध्ये व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. जोशना खेमनाद रामटेके (नारायणजे), रा. हिंगणघाट या शाळेचे काम पूर्ण करून चिंचोली येथे आयोजित प्रशिक्षणासाठी आपल्या मोपेडने निघाल्या होत्या. हिंगणघाट–चिंचोली मार्गावर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तरीही शिक्षकांना नियमित शाळा पूर्ण करून दुपारी आयोजित शिक्षण परिषद/प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रशिक्षण शहराऐवजी चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आल्याने शिक्षकांना प्रतिकूल हवामानात प्रवास करावा लागल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सौ. रामटेके (नारायणजे) यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांच्या ताणाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांनी तसेच काही शिक्षकांनी प्रतिकूल हवामानात प्रशिक्षणासाठी सक्तीने प्रवास करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ यापूर्वीही अनेक अपघात घडले असून या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.1
- देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी आज देवळी-पुलगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भीडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी राजेश बकाने आमदार यांनी करून शेतकरी बांधव व नागरिकांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, घरांचे व इतर मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी मी बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघातील सर्व प्रभावित गावांचा दौरा करून प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासनाची मदत तातडीने मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकरी किंवा नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत त्वरित मदत प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.1
- विषय : घराची भिंत कोसळल्यामुळे तातडीची मदत, पंचनामा व सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करण्याबाबत मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, काटोल, जि. नागपूर. विषय : घराची भिंत कोसळल्यामुळे तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत व घरकुल योजनेचा लाभ मिळण्याबाबत विनंती. महोदय, मी, ज्ञानेश्वर धनराज जाधव, रा. पुसागोंडी, ता. काटोल, जि. नागपूर, आपणास नम्र विनंती करतो की, आमचे घर लाकूड, माती व कौलांनी बांधलेले असून अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. अलीकडे आमच्या घराची एक भिंत पूर्णपणे कोसळली असून उर्वरित घरही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात आमच्या कुटुंबाच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी मी घराच्या नुकसानीची छायाचित्रे सरपंच यांच्या मार्फत संबंधित तलाठी यांच्याकडे पाठविली होती. मात्र आजपर्यंत तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिलेली नाही, पंचनामा केलेला नाही आणि कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. तरीदेखील आजपर्यंत आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सुरक्षित निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था नाही. म्हणून आपणास नम्र विनंती आहे की : आमच्या घराचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा. शासनाच्या नियमानुसार तातडीची आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी. घरकुल योजनेसाठी आमच्या अर्जाची त्वरित पडताळणी करून पात्रतेनुसार लाभ मंजूर करण्यात यावा. आमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. आपण आमच्या अत्यंत गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती. आपला विश्वासू, ज्ञानेश्वर धनराज जाधव रा. पुसागोंडी, ता. काटोल, जि. नागपूर मोबा. 88053774532
- रोलर नाही… थेट बसच वापरली! आर्वी आगारातील धक्कादायक प्रकार; प्रश्न विचारताच व्यवस्थापकांची उद्धट भाषा?”1
- एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव व जागृतीसाठी एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव व जागृतीसाठी1
- *सडक वाहतुकीने स्थानिक नागरिक त्रस्त,अपघाताला आमंत्रण किती तरी लोकांना जीव गमावला तर काही किरकोळ जखमी झाले. स्थानिक आमदार यांनी दखल घ्यावी ,नगर सेवक हे नागरिकांचे सेवक आहे..* हिंगणा:- येथील विधानसभा आमदार समीर मेघे साहेब आमच्या जिवाची व आमच्या परिसरातिल रहीवासी नागरिकांच्या जिवाची व सुरक्षेची काळजी घ्यावी sdmp कॉलेज च्या मागची जी भिंत आहे ति तोडून रास्ता मोठा करा आणि येथील रहीवासी नागरिकांना येणाऱ्या जाणाऱ्या मार्गातून वाहनांच्या भीतीतून सुटका करा या हॉस्टेल पुढून राजीवनगर,इसासनी आणि महाजनवाडी D-Mart च्या जाणाऱ्या मार्ग असून खुप जास्ती वाहतूक वाढली आहे.. रस्ता लहान असल्यामुळे व हा 80 फिट चा रस्ता छोटा केल्या मुळे अनेक दा इथे अपघात झाले आहेत खर नसेल वाटत तर तुमच्याच् हॉस्पिटल ला अपघाती पेशेंट नागरिक अपघात ग्रस्त रुग्ण सुद्धा भरती झाले आहे..काही वाचले आणि काही मृत्यू सुद्धा झाले.. आपण गेल्या दोन ट्रम पासुन आमच्या हिंगणा विधानसभा चे आमदार असून आणि आमच्या वानडोंगरी हिंगणा चे लाडके आमदार आहात..नगर परिषद ला सुद्धा आता दूसरा ट्रम आणि आपलीच सत्ता आहे वानडोंगरी नगर परिषद झाल्या पासुन 10 वर्ष झाली आहे तरी आता परत तिसर्यांदा सुद्धा स्थानिक आमदार म्हणून तुमची निवड करण्यात आली आहे.. सामाजिक कार्यकर्ता प्रशांत दिवे (बसपा) लोकशाही योद्धा सहकारी मित्र सुरेश कटरे व प्रशांत डुम्बरे व इतर या परिसरातील नागरिक व तेथील परिसरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक वर्ग , शालेय विद्यार्थी, महिला, मॉर्निंग वॉक करिता जाणारे नागरिक या त्रासाला त्रस्त झाले आहे.. BSP(बहुजन समाज पार्टी )शहर अद्ध्यक्ष लोकशाही योद्धा या नात्याने आपणास विनंती पूर्वक मांगणी करतोय या रस्त्याची दखल किंवा जडवाहन प्रतिबंध करण्यासाठी येथील रहीवासी नागरिकांच्या जीव सुरक्षेसाठी लवकर या रस्त्याचा निर्णय घ्या आणि येथील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या त्रासातुन मुक्त करा..1
- मुसळधार पावसाने पिपरीचा संपर्क तुटला; नाल्याला पूर आल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ तासन्तास अडकले वर्धा ..हिंगणघाट काल दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे वर्ध्याच्या गिरड–कोरा मार्गावरील पिपरी बसस्थानकाजवळील दोन नाल्यांना पूर आला. पुलावरून पाणी ओसंडून वाहू लागल्याने पिपरी गावाकडे जाणारा मुख्य मार्ग अनेक तास बंद राहिला. परिणामी शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि प्रवाशांना नाल्याच्या दोन्ही बाजूंना तासन्तास थांबावे लागले, तर काहींना शेजारच्या गावात मुक्काम करण्याची वेळ आली. पिपरी गावासाठी हा एकमेव प्रमुख रस्ता असल्याने दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते. नाल्यावरील पूर तीन ते चार तास कायम राहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. विशेषतः शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, तर ग्रामस्थांनाही दैनंदिन कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी कायमस्वरूपी उंच पुलाची उभारणी करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे केली आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. दरवर्षी जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ येत असल्याने प्रशासनाने तातडीने पूल उभारणीस मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा जोर धरत आहे.1
- पिपरी (देशमुख) परिसरात पाणीच पाण,कोच्ची–मुरसा मार्ग पुरामुळे बंद चंद्रपूर : वर्धा नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या पुरामुळे भद्रावती तालुक्यातील पिपरी (देशमुख) परिसर जलमय झाला असून पिपरी–कोच्ची–मुरसा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पिपरी (देशमुख) गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिपरी येथून कोच्ची–मुरसा मार्गावर दोन्ही नाल्यांना आलेल्या पूरामुळे पुलावर सुमारे पाच फूट पाणी आल्याने हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पूराच्या पाण्यामुळे नाल्यालगतच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून सोयाबीन व कापूस पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. तसेच कोच्ची–घोनाड परिसरातील नाल्यालाही पूर आल्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या हंगामी पिकांवर पाणी फिरल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.1