logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आंभोरा पुलावर तीन दिवसांत दुसरी आत्महत्या; नागरिकांमध्ये तीव्र चिंता कुही जि.नागपुर(शरद शहारे) कुही तालुक्यातील आंभोरा येथील पुलावरून उडी घेऊन तीन दिवसांत दुसऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सलग घटनांमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन मुरलीधर ढोबळे (वय ३३, रा. नरसाळा, नागपूर) यांनी घरगुती तणावातून आंभोरा येथील पुलावरून उडी घेत जीवन संपविले. चेतन यांना वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर रेल्वे विभागात नोकरी मिळाली होती. मात्र सुमारे तीन वर्षांपूर्वी पत्नीशी झालेल्या घटस्फोटानंतर ते मानसिक तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य राबवून मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, याच पुलावरून २३ फेब्रुवारी रोजी प्रज्वल सोम ढेंगे (वय २५, रा. परसोडी) या तरुणानेही उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवूनही अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही. सलग दोन घटनांमुळे आंभोरा पुलिया हा आत्महत्येचा ‘स्पॉट’ बनत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुलावर संरक्षक जाळी बसविणे, सतत पोलीस गस्त वाढविणे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

11 hrs ago
user_Sharad shahare
Sharad shahare
कुही, नागपूर, महाराष्ट्र•
11 hrs ago

आंभोरा पुलावर तीन दिवसांत दुसरी आत्महत्या; नागरिकांमध्ये तीव्र चिंता कुही जि.नागपुर(शरद शहारे) कुही तालुक्यातील आंभोरा येथील पुलावरून उडी घेऊन तीन दिवसांत दुसऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सलग घटनांमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन मुरलीधर ढोबळे (वय ३३, रा. नरसाळा, नागपूर) यांनी घरगुती तणावातून आंभोरा येथील पुलावरून उडी घेत जीवन संपविले. चेतन यांना वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर रेल्वे विभागात नोकरी मिळाली होती. मात्र सुमारे तीन वर्षांपूर्वी पत्नीशी झालेल्या घटस्फोटानंतर ते मानसिक तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य राबवून मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, याच पुलावरून २३ फेब्रुवारी रोजी प्रज्वल सोम ढेंगे (वय २५, रा. परसोडी) या तरुणानेही उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवूनही अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही. सलग दोन घटनांमुळे आंभोरा पुलिया हा आत्महत्येचा ‘स्पॉट’ बनत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुलावर संरक्षक जाळी बसविणे, सतत पोलीस गस्त वाढविणे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आंभोरा पुलावर तीन दिवसांत दुसरी आत्महत्या; नागरिकांमध्ये तीव्र चिंता कुही जि.नागपुर(शरद शहारे) कुही तालुक्यातील आंभोरा येथील पुलावरून उडी घेऊन तीन दिवसांत दुसऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सलग घटनांमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन मुरलीधर ढोबळे (वय ३३, रा. नरसाळा, नागपूर) यांनी घरगुती तणावातून आंभोरा येथील पुलावरून उडी घेत जीवन संपविले. चेतन यांना वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर रेल्वे विभागात नोकरी मिळाली होती. मात्र सुमारे तीन वर्षांपूर्वी पत्नीशी झालेल्या घटस्फोटानंतर ते मानसिक तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य राबवून मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, याच पुलावरून २३ फेब्रुवारी रोजी प्रज्वल सोम ढेंगे (वय २५, रा. परसोडी) या तरुणानेही उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवूनही अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही. सलग दोन घटनांमुळे आंभोरा पुलिया हा आत्महत्येचा ‘स्पॉट’ बनत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुलावर संरक्षक जाळी बसविणे, सतत पोलीस गस्त वाढविणे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    आंभोरा पुलावर तीन दिवसांत दुसरी आत्महत्या; नागरिकांमध्ये तीव्र चिंता
कुही जि.नागपुर(शरद शहारे)
कुही तालुक्यातील आंभोरा येथील पुलावरून उडी घेऊन तीन दिवसांत दुसऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सलग घटनांमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन मुरलीधर ढोबळे (वय ३३, रा. नरसाळा, नागपूर) यांनी घरगुती तणावातून आंभोरा येथील पुलावरून उडी घेत जीवन संपविले. चेतन यांना वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर रेल्वे विभागात नोकरी मिळाली होती. मात्र सुमारे तीन वर्षांपूर्वी पत्नीशी झालेल्या घटस्फोटानंतर ते मानसिक तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य राबवून मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, याच पुलावरून २३ फेब्रुवारी रोजी प्रज्वल सोम ढेंगे (वय २५, रा. परसोडी) या तरुणानेही उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवूनही अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही.
सलग दोन घटनांमुळे आंभोरा पुलिया हा आत्महत्येचा ‘स्पॉट’ बनत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुलावर संरक्षक जाळी बसविणे, सतत पोलीस गस्त वाढविणे  अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ० नियोजन विभागाचा निधी वाटपात असमतोल ० नागरी व अन्नपुरवठा विभागातील गोंधळ ० विकासाच्या घोषणा व जाहीरात बाजी आदि प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडले. उमरेड (प्रतिनिधी ) राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमरेड विधानसभेचे आक्रमक आणि अभ्यासू आमदार संजय मेश्राम यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत सभागृहात जोरदार हल्लाबोल चढवला. मुंबई येथील विधिमंडळात मध्ये पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा आणि नियोजन विभागाच्या कारभारावर थेट आणि कठोर शब्दांत टीका केली. आजच्या कामकाजात तिन्ही विभागांच्या कपात सूचनांवर चर्चा पार पडत असताना आमदार मेश्राम यांनी लेखी स्वरूपात कपात सूचना अध्यक्षांकडे सादर केल्या आपल्या भाषणाची सुरुवात करताना मेश्राम यांनी उमरेड मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप केला. ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची रिक्त पदे औषधांचा तुटवडा उपकरणांची कमतरता रुग्णांना मिळणारी अपुरी सेवा या सर्व मुद्द्यांचा पाढा वाचत त्यांनी सरकारला प्रश्न विचारला “आरोग्य हा मूलभूत हक्क असताना नागरिकांना मूलभूत सुविधा का मिळत नाहीत?” त्यांनी ठामपणे सांगितले की, केवळ कागदोपत्री योजना जाहीर करून जनतेची फसवणूक केली जात आहे. निधी मंजूर होतो, पण प्रत्यक्ष काम मात्र होत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला अन्नधान्य वितरणातील गोंधळ, रेशनकार्डधारकांना वेळेवर धान्य न मिळणे, अपात्रांना लाभ आणि पात्रांना वंचित ठेवण्याच्या तक्रारी यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अन्न व नागरी पुरवठा विभागा सार्वजनिक वितरण व्यवस्थेत, रेशन दुकाने पारदर्शकता नसल्याचा आरोप करत त्यांनी गोर गरीब जनता मोफत धान्य योजनेपासून वंचित राहत आहे.चौकशीची मागणी केली. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली. नियोजन विभागाच्या निधी वाटपातील असमतोल आणि उमरेड मतदारसंघाकडे होणारे दुर्लक्ष यावर मेश्राम यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. या सर्व मुद्द्यांचा उल्लेख करत त्यांनी सरकारला जाब विचारला. “विकासाच्या घोषणा केवळ जाहिरातीपुरत्या आहेत का?” असा सवाल करत त्यांनी सरकारला कठोर शब्दांत सुनावले. सभागृहात तापले वातावरण मेश्राम यांच्या आक्रमक आणि मुद्देसूद भाषणामुळे सभागृहात काही काळ वातावरण तापले. सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या आरोपांना विरोध करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी ठाम भूमिका घेत सरकारकडून ठोस उत्तरांची मागणी केली. त्यांच्या ठाम आणि लढाऊ भूमिकेमुळे उमरेडमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
    1
    ०  नियोजन विभागाचा निधी वाटपात असमतोल
० नागरी व अन्नपुरवठा विभागातील गोंधळ
० विकासाच्या घोषणा व जाहीरात बाजी आदि प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडले.
उमरेड (प्रतिनिधी )
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमरेड विधानसभेचे आक्रमक आणि अभ्यासू आमदार संजय मेश्राम यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत सभागृहात जोरदार हल्लाबोल चढवला. मुंबई येथील विधिमंडळात मध्ये पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा आणि नियोजन विभागाच्या कारभारावर थेट आणि कठोर शब्दांत टीका केली.
आजच्या कामकाजात तिन्ही विभागांच्या कपात सूचनांवर चर्चा पार पडत असताना आमदार मेश्राम यांनी लेखी स्वरूपात कपात सूचना अध्यक्षांकडे सादर केल्या
आपल्या भाषणाची सुरुवात करताना मेश्राम यांनी उमरेड मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप केला.
ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची रिक्त पदे
औषधांचा तुटवडा
उपकरणांची कमतरता
रुग्णांना मिळणारी अपुरी सेवा
या सर्व मुद्द्यांचा पाढा वाचत त्यांनी सरकारला प्रश्न विचारला “आरोग्य हा मूलभूत हक्क असताना नागरिकांना मूलभूत सुविधा का मिळत नाहीत?”
त्यांनी ठामपणे सांगितले की, केवळ कागदोपत्री योजना जाहीर करून जनतेची फसवणूक केली जात आहे. निधी मंजूर होतो, पण प्रत्यक्ष काम मात्र होत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला
अन्नधान्य वितरणातील गोंधळ, रेशनकार्डधारकांना वेळेवर धान्य न मिळणे, अपात्रांना लाभ आणि पात्रांना वंचित ठेवण्याच्या तक्रारी यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
अन्न व नागरी पुरवठा विभागा सार्वजनिक वितरण व्यवस्थेत, रेशन दुकाने पारदर्शकता नसल्याचा आरोप करत त्यांनी गोर गरीब जनता मोफत धान्य योजनेपासून वंचित राहत आहे.चौकशीची मागणी केली. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली.
नियोजन विभागाच्या निधी वाटपातील असमतोल आणि उमरेड मतदारसंघाकडे होणारे दुर्लक्ष यावर मेश्राम यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.
या सर्व मुद्द्यांचा उल्लेख करत त्यांनी सरकारला जाब विचारला. “विकासाच्या घोषणा केवळ जाहिरातीपुरत्या आहेत का?” असा सवाल करत त्यांनी सरकारला कठोर शब्दांत सुनावले.
सभागृहात तापले वातावरण
मेश्राम यांच्या आक्रमक आणि मुद्देसूद भाषणामुळे सभागृहात काही काळ वातावरण तापले. सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या आरोपांना विरोध करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी ठाम भूमिका घेत सरकारकडून ठोस उत्तरांची मागणी केली.
त्यांच्या ठाम आणि लढाऊ भूमिकेमुळे उमरेडमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    35 min ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Irshad Alam
    1
    Post by Irshad Alam
    user_Irshad Alam
    Irshad Alam
    Nagpur (Urban), Maharashtra•
    23 hrs ago
  • सध्या गरज आहे राज्याला विचार करण्याची
    1
    सध्या गरज आहे राज्याला विचार करण्याची
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Nitin Yadav
    2
    Post by Nitin Yadav
    user_Nitin Yadav
    Nitin Yadav
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अगामी 28/02/2025 को जजुआर हाई स्कूल के मैदान में बाल बिबाह को लेकर खास आयोजना रखा गया है। #bihar #BiharNews #viralvideo #news #Muzaffarpur #virals #aakashpriyadarshi #worldbiharnews
    1
    अगामी 28/02/2025 को जजुआर हाई स्कूल के मैदान में बाल बिबाह को लेकर खास आयोजना रखा गया है।
#bihar #BiharNews #viralvideo #news #Muzaffarpur #virals #aakashpriyadarshi #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ० नागपूर , चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील नागरीक याठिकाणी रविवारी पर्यटनाला येतात ० ० येथे स्वयंपाक करून वन्य भोजना चा अस्वाद घेतात ० ० वनविभागाकडून रविवारला पर्यटका साठी जाण्याची सुविधा मिळते. ० राजु जांभुळे (उमरेड ) भिवापूर पासून १० किमी अंतरावर असलेल्या भंडारा जिल्हयातील पवनी तालुक्यात येणाऱ्या रानाळा हे निसर्गरम्य पर्यटन सहलीचे केंद्र व रानाई माता परिसरतील भाविकांचे श्रध्देचे स्थान आहे. परंतु हे ठिकाण उमरेड - कऱ्हांडला अभयरण्यात येत असल्याने येथे ये -जा करण्यास वनविभागाची मनाई आहे. परंतु शारदीय व चैत्र नवरात्रोत्सवात भाविकांची दर्शना एकच गर्दी पहावयास मिळते. तसेच पर्यटक रविवारला पिकनिक म्हणून हमखास याठिकाणी भेटी देतात. तसेच वन्यभोजन करण्यासाठी हे ठिकाण ओळखले जातात. रनाला म्हणून सर्वदूर परिचित असलेला या परिसराची नोंद राजस्व व वनविभागाच्या दप्तरी जोगीखेडा (हमेशी ) या रिठी गावाच्या नावाने आहे. सदर स्थळ वनविभागाच्या अतर्गत येत असल्याने येथे वन्य प्राण्याचा वावर असल्याने हे पर्यटन स्थळ उपेक्षित होते. परंतु रानाई मातेची जागृत स्थळ बघता काही भाविकांनी एकत्र 2018 ला रानाई माता बहुउद्देशीय सेवा समिती जोगीखेडा ( आमगाव ) ता. पवनी या नावाने ट्रस्ट ची नोंदणी केली असून या माध्यमातून देवस्थानाचा कारभार चालतो. पुर्वी रानाई मातेचे झाडाखाली मुर्ती होती. आता देवस्थान कमेटीच्या वतीने भव्य मंदिराचे स्वरूप देण्यात आले आहे. लगतच अनेक देव देवताच्या दगडी मुर्ती आहेत. परिसरात काही हेक्टर सरकारी तर काही मालगुजारी जंगल आहे. लगतच डॉ. भिवापूरकर यांची वनराई असून आंब्यांचे झाड, चिकू, पेरू, खिरणी चे झाडे होती. रानाळा हे एकेकाळी घनदाट अरण्य होते.
    1
    ० नागपूर , चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील नागरीक याठिकाणी रविवारी पर्यटनाला येतात ०
० येथे स्वयंपाक करून वन्य    भोजना चा अस्वाद घेतात ०
० वनविभागाकडून रविवारला पर्यटका साठी जाण्याची सुविधा मिळते. ०
राजु जांभुळे (उमरेड )
भिवापूर पासून १० किमी अंतरावर असलेल्या भंडारा जिल्हयातील पवनी तालुक्यात येणाऱ्या रानाळा हे निसर्गरम्य पर्यटन सहलीचे
केंद्र व रानाई माता परिसरतील भाविकांचे श्रध्देचे स्थान आहे. परंतु हे ठिकाण उमरेड - कऱ्हांडला अभयरण्यात येत असल्याने येथे ये -जा करण्यास वनविभागाची मनाई आहे. परंतु शारदीय व चैत्र नवरात्रोत्सवात भाविकांची दर्शना एकच गर्दी पहावयास मिळते. तसेच पर्यटक रविवारला पिकनिक म्हणून हमखास याठिकाणी भेटी देतात. तसेच वन्यभोजन करण्यासाठी हे ठिकाण ओळखले जातात.
रनाला म्हणून सर्वदूर परिचित असलेला या परिसराची नोंद राजस्व व वनविभागाच्या दप्तरी जोगीखेडा (हमेशी ) या रिठी गावाच्या नावाने आहे. सदर स्थळ वनविभागाच्या अतर्गत येत असल्याने येथे वन्य प्राण्याचा वावर असल्याने हे पर्यटन स्थळ उपेक्षित होते. परंतु रानाई मातेची जागृत स्थळ बघता काही भाविकांनी एकत्र 2018 ला रानाई माता बहुउद्देशीय सेवा समिती जोगीखेडा ( आमगाव ) ता. पवनी या नावाने ट्रस्ट ची नोंदणी केली असून या माध्यमातून देवस्थानाचा कारभार चालतो.
पुर्वी रानाई मातेचे झाडाखाली मुर्ती होती. आता देवस्थान कमेटीच्या वतीने भव्य मंदिराचे स्वरूप देण्यात आले आहे. लगतच अनेक देव देवताच्या दगडी मुर्ती आहेत. परिसरात काही हेक्टर सरकारी तर काही मालगुजारी जंगल आहे. लगतच डॉ. भिवापूरकर यांची वनराई असून आंब्यांचे झाड, चिकू, पेरू, खिरणी चे झाडे होती. रानाळा हे एकेकाळी घनदाट अरण्य होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.