Shuru
Apke Nagar Ki App…
आमदार रोहित पाटील यांच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यासाठी माजी सभापती यांचे उपोषण सुरू तासगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाच्या विरोधात माजी सभापती रविंद्र पाटील यांचे तासगावं तहसिलदार ऑफीस समोर उपोषणाला सुरुवात झाली आहे, रवींद्र पाटील यांनी मागील आठवड्यात तहसीलदार यांना निवेदन दिले होते की आमदार रोहित पाटील यांच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर कारवाई करावी पण कारवाई झाली नाही त्यामुळे उपोषणाच्या अस्त्र काढले आहे, उपोषणाच्या ठिकाणी मार्केट कमिटीचे सर्व संचालक, तसेच 69 गावातील कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. अजून कोणताही अधिकारी उपोषण स्थळी आलेला नाही.
EXPRESS NEWS
आमदार रोहित पाटील यांच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यासाठी माजी सभापती यांचे उपोषण सुरू तासगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाच्या विरोधात माजी सभापती रविंद्र पाटील यांचे तासगावं तहसिलदार ऑफीस समोर उपोषणाला सुरुवात झाली आहे, रवींद्र पाटील यांनी मागील आठवड्यात तहसीलदार यांना निवेदन दिले होते की आमदार रोहित पाटील यांच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर कारवाई करावी पण कारवाई झाली नाही त्यामुळे उपोषणाच्या अस्त्र काढले आहे, उपोषणाच्या ठिकाणी मार्केट कमिटीचे सर्व संचालक, तसेच 69 गावातील कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. अजून कोणताही अधिकारी उपोषण स्थळी आलेला नाही.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पलूस येथे १४ ते १७ मे दरम्यान 'यशवंत फेस्टिव्हल २०२६' आयोजित करण्यात आला आहे. गुंडादाजी लॉन, कराड पलूस रोडवर प्रदीप (अप्पा) कदम यांच्यावतीने हा भव्य उत्सव साजरा होणार आहे.1
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांचा अंधश्रद्धेवर बोलणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची विनोदी आणि शैलीदार मांडणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.1
- सांगली: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; विठ्ठरायचीवाडीचा तरुण पिस्टलसह जेरबंद क्रांती न्यूज -सांगली (प्रतिनिधी) किरण देशमुख : सांगली : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सांगली पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) नागठाणे परिसरात सापळा रचून एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. नेमकी घटना काय? सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे आणि गंभीर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी एक विशेष पथक तैनात केले होते. हे पथक भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कनप यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत गुंडा करांडे (वय २४, रा. विठ्ठरायचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) हा नागठाणे फाटा ते वाळवा जाणाऱ्या रोडवरील चोपण रस्ता येथे कमरेला पिस्टल लावून थांबला आहे. पोलिसांचा धाडसी सापळा मिळालेल्या माहितीवरून पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनिकेत करांडे याला पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे: ०१ देशी बनावटीचे पिस्टल ०१ जिवंत काडतूस (राऊंड) मिळून आले. या शस्त्राबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. तपासात धक्कादायक खुलासा अटक करण्यात आलेल्या आरोपीने चौकशीत सांगितले की, त्याने हे पिस्टल आपल्या सुरक्षिततेसाठी अक्षय पाटील (रा. डफळापूर, ता. जत) याच्याकडून विकत घेतले होते. पोलिसांनी पिस्टल आणि काडतूस जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास आता जत कनेक्शनच्या दिशेने सुरू आहे. न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी याप्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, माननीय न्यायालयाने त्याला ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कोळी करत आहेत. "जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे." — स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.2
- सरसकट कर्जमाफीसाठी मनसेचे ‘बळीराजा आक्रोश आंदोलन’; जाचक अटी रद्द करण्याची मागणी कोल्हापूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी ‘बळीराजा आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. शेतकऱ्यांवरील जाचक अटी तात्काळ रद्द करून comprehensive loan waiver जाहीर करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. कर्जबाजारीपणा, नापिकी आणि आर्थिक तणावामुळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे सरकारने कोणत्याही अटींशिवाय सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. या आंदोलनावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी बावनकुळे यांची उपहासात्मक वेशभूषा परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली. बंगला, गाडी किंवा आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे वक्तव्य केल्याचा उल्लेख करत मनसेने सरकारवर टीका केली. “शेतकरी देशाचा अन्नदाता असून तो विविध प्रकारचे कर भरतो. मात्र मदतीच्या वेळी त्याच्यावर अटींचा बोजा टाकला जातो. दुसरीकडे आमदार आणि मंत्र्यांना मानधन व pension देताना कोणतीही अट लावली जात नाही,” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. सरकारने शेतकऱ्यांबाबत दुजाभाव न करता तातडीने सर्वसमावेशक कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, दौलत पाटील, नागेश चौगुले, रवी गोंदकर, राजू पाटील, अभिजित पाटील, संजय चौगुले, राजेंद्र निकम, प्रताप पाटील, स्वाती पाटील, रेश्मा सावंत, प्रिया चंदन, निलेश पाटील, कुमार पुदाले, बाळासाहेब कदम, वैभव भोसले, विश्वजित पाटील, वृषभ आमते, युवराज येडुरे, संजय पाटील, राहुल पाटील, निलेश धुम्मा, भगवंत जांभळे, राजेंद्र चव्हाण, निलेश भिसे, तुषार मालवेकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.2
- आजचे राशीभविष्य आपला दिवस कसा जाईल जाणून घ्या बारा राशीचे राशिफल1
- सांगली जिल्ह्यात एका महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हत्येमागचे कारण अद्याप गूढ आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.1
- पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 'गरज असेल तेव्हाच इंधन वापरा' असे आवाहन केले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचा सल्ला दिला.1
- आमदार सुहास बाबर यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघात 'ट्री आर्मी'च्या मदतीने मोठ्या वृक्षारोपण मोहिमेची घोषणा केली आहे. पिंपळाची व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा त्यांचा संकल्प असून, यात वन विभागाचीही मदत घेतली जाईल.1