आदर्श ३८ गाव पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू ठेवायची असेल तर पाणीपट्टी वाढ अनिवार्य आहे ; समितीचा निर्णय येवला- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात सुरू असलेली येवला ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही महाराष्ट्रासाठी आदर्श योजना ठरलेली आहे. महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर लोकसहभागातून चालविण्यात येणारी व १५ वर्षानंतरही सुरळीत सुरू असून नफ्यात असणारी ही महाराष्ट्रातली एकमेव योजना आहे. काही लोकांचा ही योजना बंद पडण्याचा डाव आहे. ही योजना बंद झाली तर ५४ गावांपुढे पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे ही योजना यापुढेही सुरळीत चालू ठेवायची असेल तर पाणीपट्टी वाढ अनिवार्य आहे अशी माहिती ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली. अडतीस गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या वतीने आज मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये समितीच्या वतीने योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, सन २०१५ -१६ या आर्थिक वर्षात योजनेच्या पाणीपट्टीमध्ये २५ टक्के वाढ केली होती. त्यानंतर दहा वर्षे समितीने कोणतीही पाणीपट्टी वाढ केलेली नाही. सन २०१५-१६ च्या तुलनेत आज विचार केला तर ५१ टक्के वीज बिल व ५७ टक्के कर्मचारी वेतन यावर अधिकचा भार योजनेवर आलेला आहे. एकंदरीत योजनेला ४२ टक्के खर्चात वाढ झालेली आहे. सुरुवातीच्या काळात या योजनेत फक्त ३८ गावे समाविष्ट होते. परंतु मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अनेक गावे ३८ गाव योजनेचे पाणी मिळावे यासाठी मागणी करत होते. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेवरून समितीने अधिक १६ गावांची वाढ करून आज मितीस ५४ गावांना या योजनेतून पाणीपुरवठा होतो. सोबतच १३ संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सहाजिकच या योजनेला आर्थिक भार आलेला आहे. सन २०१५-१६ मध्ये सरासरी विजेचे बिल वर्षाला साधारण २४ लाख रुपये होते. आज रोजी ते लाईट बिल ५३ लाख रुपये होते आहे. सोलर योजना कार्यान्वित असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो आहे. आज सोलर योजना नसते तर आजच्या विजेच्या भावाप्रमाणे किमान ७५ लाखाहून जास्त वीज बिल वार्षिक आकारले गेले असते. तसेच सन २०१५ -१६ ला विजेचा दर काय होता आणि आता सध्या विजेचा दर काय आहे याचा देखील विचार विरोधकांनी करायला हवा.या वाढलेल्या खर्चामुळे ३० टक्के पाणीपट्टी वाढ करणे समितीला अनिवार्य आहे. त्याचा सामान्य ग्राहकावर कोणताही जास्त अतिरिक्त भार पडणार नाही. साधारणता केवळ १८ ते २० रुपये महिन्याला जास्त आकारले जाणार आहेत. समितीने कदाचित हा पाणीपट्टी वाढीचा निर्णय घेतला नाही तर भविष्यात या योजनेला चालविणे कठीण होईल व येणाऱ्या काही दिवसातच या योजनेतून वीज बिलाअभावी पाणीपुरवठा करणे अशक्य होऊन योजना बंद पडेल असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मार्च २०२६ पासून आज पर्यंत जर सहा महिन्यांचा विचार केला तर सरासरी महिन्याला ११ लाख ४० हजार खर्च येतो आहे व मासिक आकारली जाणारी पाणीपट्टी ही केवळ साधारणता ९ लाख ३० हजार रुपये आहे. त्यामुळे सदरच्या खर्चात दोन लाख पंधरा हजार रुपयाची तूट दिसून येते आहे. आपण भरत असलेला वीज बिलाच्या ५०% परतावा हा जिल्हा परिषद मार्फत शासनाकडून मिळत होता. ती रक्कम साधारणता ७० लाख रुपये होती म्हणजेच शासनाकडून ३५ लाख रुपयांचा परतावा मिळत होता. हा परतावा बंद झाल्याने ग्राहकाकडून वसुली व समितीचा खर्च यातील तूट भरून निघण्यासाठी पाणीपट्टी वाढ हा एकमेव मार्ग असल्याचे समितीने म्हटले आहे. समिती मार्फत गेल्या ४ वर्षात किरकोळ दुरुस्ती मोठी दुरुस्ती किंवा इतर मेंटेनन्स यावर एकही रुपया खर्च झालेला नाही. ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा कारभार हा अतिशय पारदर्शक असून या योजनेतील समाविष्ट असलेल्या ३८ गावांपैकी कोणत्याही सरपंचांनी माहिती मागितल्यास त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. समितीला सर्वात मोठा आर्थिक खर्च हा वीज बिलाचा आहे. वीज बिलाचे युनिटचा भाव हा मोठ्या प्रमाणात वीज मंडळाने वाढवलेला आहे. सोलर चा वापर असून देखील साधारणता ६/७ लाख रुपये पर्यंत मासिक वीज बिलाचा खर्च आहे. वीज बिलाचा ५० टक्के परतावा ही शासनाची योजना बंद झाल्याने समितीवर आर्थिक भार आलेला आहे. त्यामुळे पाणीपट्टी वाढ करणे हे अनिवार्य आहे तरच योजना सुरळीत सुरवात राहील.
आदर्श ३८ गाव पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू ठेवायची असेल तर पाणीपट्टी वाढ अनिवार्य आहे ; समितीचा निर्णय येवला- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात सुरू असलेली येवला ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही महाराष्ट्रासाठी आदर्श योजना ठरलेली आहे. महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर लोकसहभागातून चालविण्यात येणारी व १५ वर्षानंतरही सुरळीत सुरू असून नफ्यात असणारी ही महाराष्ट्रातली एकमेव योजना आहे. काही लोकांचा ही योजना बंद पडण्याचा डाव आहे. ही योजना बंद झाली तर ५४ गावांपुढे पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे ही योजना यापुढेही सुरळीत चालू ठेवायची असेल तर पाणीपट्टी वाढ अनिवार्य आहे अशी माहिती ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली. अडतीस गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या वतीने आज मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये समितीच्या वतीने योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, सन २०१५ -१६ या आर्थिक वर्षात योजनेच्या पाणीपट्टीमध्ये २५ टक्के वाढ केली होती. त्यानंतर दहा वर्षे समितीने कोणतीही पाणीपट्टी वाढ केलेली नाही. सन २०१५-१६ च्या तुलनेत आज विचार केला तर ५१ टक्के वीज बिल व ५७ टक्के कर्मचारी वेतन यावर अधिकचा भार योजनेवर आलेला आहे. एकंदरीत योजनेला ४२ टक्के खर्चात वाढ झालेली आहे. सुरुवातीच्या काळात या योजनेत फक्त ३८ गावे समाविष्ट होते. परंतु मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अनेक गावे ३८ गाव योजनेचे पाणी मिळावे यासाठी मागणी करत होते. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेवरून समितीने अधिक १६ गावांची वाढ करून आज मितीस ५४ गावांना या योजनेतून पाणीपुरवठा होतो. सोबतच १३ संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सहाजिकच या योजनेला आर्थिक भार आलेला आहे. सन २०१५-१६ मध्ये सरासरी विजेचे बिल वर्षाला साधारण २४ लाख रुपये होते. आज रोजी ते लाईट बिल ५३ लाख रुपये होते आहे. सोलर योजना कार्यान्वित असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो आहे. आज सोलर योजना नसते तर आजच्या विजेच्या भावाप्रमाणे किमान ७५ लाखाहून जास्त
वीज बिल वार्षिक आकारले गेले असते. तसेच सन २०१५ -१६ ला विजेचा दर काय होता आणि आता सध्या विजेचा दर काय आहे याचा देखील विचार विरोधकांनी करायला हवा.या वाढलेल्या खर्चामुळे ३० टक्के पाणीपट्टी वाढ करणे समितीला अनिवार्य आहे. त्याचा सामान्य ग्राहकावर कोणताही जास्त अतिरिक्त भार पडणार नाही. साधारणता केवळ १८ ते २० रुपये महिन्याला जास्त आकारले जाणार आहेत. समितीने कदाचित हा पाणीपट्टी वाढीचा निर्णय घेतला नाही तर भविष्यात या योजनेला चालविणे कठीण होईल व येणाऱ्या काही दिवसातच या योजनेतून वीज बिलाअभावी पाणीपुरवठा करणे अशक्य होऊन योजना बंद पडेल असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मार्च २०२६ पासून आज पर्यंत जर सहा महिन्यांचा विचार केला तर सरासरी महिन्याला ११ लाख ४० हजार खर्च येतो आहे व मासिक आकारली जाणारी पाणीपट्टी ही केवळ साधारणता ९ लाख ३० हजार रुपये आहे. त्यामुळे सदरच्या खर्चात दोन लाख पंधरा हजार रुपयाची तूट दिसून येते आहे. आपण भरत असलेला वीज बिलाच्या ५०% परतावा हा जिल्हा परिषद मार्फत शासनाकडून मिळत होता. ती रक्कम साधारणता ७० लाख रुपये होती म्हणजेच शासनाकडून ३५ लाख रुपयांचा परतावा मिळत होता. हा परतावा बंद झाल्याने ग्राहकाकडून वसुली व समितीचा खर्च यातील तूट भरून निघण्यासाठी पाणीपट्टी वाढ हा एकमेव मार्ग असल्याचे समितीने म्हटले आहे. समिती मार्फत गेल्या ४ वर्षात किरकोळ दुरुस्ती मोठी दुरुस्ती किंवा इतर मेंटेनन्स यावर एकही रुपया खर्च झालेला नाही. ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा कारभार हा अतिशय पारदर्शक असून या योजनेतील समाविष्ट असलेल्या ३८ गावांपैकी कोणत्याही सरपंचांनी माहिती मागितल्यास त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. समितीला सर्वात मोठा आर्थिक खर्च हा वीज बिलाचा आहे. वीज बिलाचे युनिटचा भाव हा मोठ्या प्रमाणात वीज मंडळाने वाढवलेला आहे. सोलर चा वापर असून देखील साधारणता ६/७ लाख रुपये पर्यंत मासिक वीज बिलाचा खर्च आहे. वीज बिलाचा ५० टक्के परतावा ही शासनाची योजना बंद झाल्याने समितीवर आर्थिक भार आलेला आहे. त्यामुळे पाणीपट्टी वाढ करणे हे अनिवार्य आहे तरच योजना सुरळीत सुरवात राहील.
- नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप लासलगाव (विशेष प्रतिनिधी) : नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) वतीने दिल्लीसाठी रवाना होणाऱ्या मालगाडीमध्ये (कांदा एक्सप्रेस) अत्यंत निकृष्ट, सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह थेट लासलगाव रेल्वे स्थानकाचा मालधक्का गाठून 'कांदा एक्सप्रेस' रोखून धरली. [1, 2, 3] गोण्या उघडून दाखवण्याची मागणी आणि आंदोलन: आधीच विविध सोपस्कार आणि पॅकिंगअभावी सुमारे १६ तास रखडलेली ही मालगाडी बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र, गाडीत भरलेला माल खराब असल्याचा संशय आल्याने गणेश निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा," अशी मागणी करत त्यांनी रेल्वे रुळावर आणि गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हा सडका कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील चांगल्या शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.1
- येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय येवला: येथील प्रसिद्ध श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात भौम प्रदोषानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी श्री भौमनाथ महादेवाची विशेष महापूजा आणि आकर्षक भस्मारती पार पडली. भौम प्रदोषानिमित्त श्री भौमनाथ महादेवांचा मनमोहक शृंगार करण्यात आला होता. भौमनाथ महादेव हे मंगळ देवाचे स्वामी आणि अत्यंत आवडते रूप मानले जातात. महाआरतीनंतर आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्येने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला होता. या सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. दरम्यान, पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंदिर व्यवस्थापनातर्फे विशेष आवाहन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात प्रदोषानिमित्त ज्या भाविकांना मंदिरात महाप्रसादाची (पंगत) सेवा द्यायची असेल, त्यांनी लवकरात लवकर मंदिर समितीशी संपर्क साधावा. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- टिपू सुलतान फोटोवरून पुन्हा वाद ! फोटो काढायला लावणार - दादा भुसे मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.1
- शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..1
- आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रतिनिधी समाधान शिरसाठ मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेतर्फे सन 2003 साली नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाचे कालांतराने ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. सदर कृषी महाविद्यालय हे नुकतेच दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील महाविद्यालयाची मुख्य इमारत, मुलांचे व मुलींचे वसतीगृह अशा तीनही भव्य इमारतींचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होत आहे, अशी माहिती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे व सर्व शिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार आमदार, नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव आणि मविप्र समाज समस्त कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक व विद्यार्थी यांची उपस्थिती असेल. नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्याची कृषी शिक्षणाची गरज व निकड या बाबींचा विचार करून मविप्र संस्थेने १ नोव्हेंबर २००३ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता कृषी शिक्षणाची कवाडे खुली केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा व विद्यार्थ्यांना शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष काम करता यावे, या उद्देशाने शहरातील कृषी महाविद्यालय दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतरित करण्यात आले. तब्बल १४ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या याच प्रशस्त अशा महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तसेच १४ एकर कॅम्पसमध्ये प्रशासकीय इमारत, मुला-मुलींचे सुसज्ज वसतीगृह उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये प्राचार्य कार्यालय, प्रशासकीय विभाग, सुसज्ज असे भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, सर्व १० विभागांच्या सुसज्ज, अद्ययावत परिपूर्ण अशा प्रयोगशाळा व शिक्षण साहित्य साधनांनीयुक्त व्याख्यान कक्ष, स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा, वायफाय व इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. चार वर्षांच्या बीएससी कृषी पदवी असलेल्या या कृषी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता प्रतिवर्ष १२० विद्यार्थी इतकी आहे. याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय व इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयसुद्धा सुरू आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी महाविद्यालयातील सर्व सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता तपासून महाविद्यालयास सन २०२२-२३ मध्ये ‘अ’ दर्जा प्रदान केला आहे. तसेच, सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’ यांच्यातर्फे महाविद्यालयास ‘कृषीभूषण-२०२४’ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ‘KRUSHITHON 2024’ मध्ये ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १० विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक व ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रात संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, यावर महाविद्यालयाचा जास्त भर आहे. शिक्षण संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्व गावांचा कृषी व आर्थिक विकास साधने हेच कृषी महाविद्यालयाचे ध्येय असल्याचे ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.2
- येवला येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसंदर्भात अध्यक्ष सचिन कळमकर आणि उपाध्यक्ष मोहन शेलार यांची पत्रकारपरिषद येवला येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर व उपाध्यक्ष मोहन शेलार यांनी पत्रकार परिषदेत पाणीपट्टी वाढीची घोषणा केली. जिल्हा परिषदेकडून मिळणारे ५०% वीजबिल प्रोत्साहन अनुदान बंद झाल्याने आणि वीज बिल व देखभाल खर्चात प्रचंड वाढ झाल्याने योजनेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून ग्रामपंचायतींसाठी पाणीपट्टीत ३०% तर व्यावसायिक ग्राहकांसाठी २०% वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरानुसार ग्रामपंचायतींना प्रतिलाख लिटरसाठी १६२५ रुपये मोजावे लागतील.1
- बिहार गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है। इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें। S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें। गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है। इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें। S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें।1