सोलापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. पैगंबर बशीरसाब सय्यद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, काही ग्रामपंचायत हद्दीत अंदाजे २०० ते २५० भटके कुत्रे मुक्तपणे फिरत आहेत. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींवर हल्ल्यांच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय रेबीज सारख्या जीवघेण्या आजाराचा धोका देखील वाढला आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा उपद्रव अधिक वाढत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तातडीने सर्वेक्षण करून कुत्र्यांची संख्या निश्चित करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांच्या जीवित आणि आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदरप्रसंगी युवानेते अमीर शेख,सोमनिंग शेंडगे,बालाजी जाधव,मौलाली शेख आदीजण उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. पैगंबर बशीरसाब सय्यद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, काही ग्रामपंचायत हद्दीत अंदाजे २०० ते २५० भटके कुत्रे मुक्तपणे फिरत आहेत. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींवर हल्ल्यांच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय रेबीज सारख्या जीवघेण्या आजाराचा धोका देखील वाढला आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा उपद्रव अधिक वाढत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तातडीने सर्वेक्षण करून कुत्र्यांची संख्या निश्चित करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांच्या जीवित आणि आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदरप्रसंगी युवानेते अमीर शेख,सोमनिंग शेंडगे,बालाजी जाधव,मौलाली शेख आदीजण उपस्थित होते.
- लातूर शहरात मागील काही दिवसापासून शहरवासीयांच्या नळाला दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्यातरी लातूरकरांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे मनपात सत्तेत असलेक्या काँग्रेस पक्षा ला आणि मनपा प्रशासनाला गांभीर्य नसल्याने लातूर भाजपच्या वतीने आज लातूर महानगरपालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करत, लातूरकरांना स्वच्छ पाणी द्या लातूरकरांच आरोग्य वाचवा , मोफत सिटी बस सेवा पूर्ववत करा म्हणत आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्यात आले.1
- स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा ₹3.75 लाखांचा साठा जप्त, एक आरोपी जेरबंद. लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून सातत्याने कठोर व नियोजनबद्ध कारवाया सुरू असून, त्याच अनुषंगाने दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी चाकूर येथे मोठी धाड टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नानासाहेब देशमुख,पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे यांचा समावेश होता. तसेच कारवाईदरम्यान पोलीस स्टेशन चाकूर येथील बीट अंमलदार बोळंगे यांनी सहकार्य केले. सदर पथकाने स्वामी विवेकानंद चौक परिसरातील “राज कन्फेक्शनरी” दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू साठवून विक्रीसाठी ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकून मारुती राजेंद्र सोमवंशी (वय 33 वर्षे,रा. चाकूर) यास ताब्यात घेतले. गोडाऊनची झडती घेतली असता झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. त्यामध्ये— NO.4101 Premium Chewing Tobacco नावाची 16 पोती, सुगंधी तंबाखूची 6 पोती, Extra Freshness नावाची 3 पोती, असा एकूण ₹3,75,000/- (तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रतिबंधित तंबाखू हा सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारा असून, महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी घातलेली आहे. तरीदेखील आरोपीने स्वतःच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये हा साठा बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. सदर मुद्देमाल पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला असून,या प्रकरणी आरोपी मारुती राजेंद्र सोमवंशी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.2
- ग्रामपंचायत ची घंटा गाडी संपूर्ण गावात फिरते पण हा कचरा कोणालाच दिसेना सगळा कचरा उढून दारात येतोय घरामध्ये लहान 4 महिन्याचं लेकरू आहे3
- Post by AapTak Hindi News Channel1
- (प्रतिनिधी):- राज्यात महापुरुषांच्या नावाखाली अनाधिकृत पुतळे व स्मारके उभारण्याचे प्रकार वाढत असून, त्या मुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शासनाच्या पुतळा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (संभाजीनगर परिक्षेत्र) यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस चऱ्हाटाकर, मुबीन शेख, शिवशक्ती-भीमशक्ती विचार मंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक बीड), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष, विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था, बीड), सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, भिमराव कुटे सह आदी उपस्थित होते. राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता रातोरात महापुरुषांचे पुतळे उभारले जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः वादग्रस्त ठिकाणी उभारण्यात आलेल्या अशा अनाधिकृत स्मारकांमुळे समाजात तणाव निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता वाढते. त्या मुळे अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने २ मे २०१७ रोजी पुतळा धोरणासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, त्या नुसार पुतळा उभारण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची पूर्व परवानगी आवश्यक आहे. तसेच पुतळ्याचे ठिकाण वादग्रस्त नसावे, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, उंची व साहित्याला तांत्रिक मान्यता असावी, तसेच कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन शपथपत्र व ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच पुतळे उभारावेत, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी या वेळी व्यक्त केली.1
- होरो गाडी घेऊ नका गाडी खराब आहेत मुखेडगजानन मोटार मधुन गाडी1
- Post by AapTak Hindi News Channel1
- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा नामांकन अर्ज भरणे पूर्वी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी स्व. अजित पवार यांच्या स्मृति स्थळाचे दर्शन घेतले1
- अखंड हरिनाम सप्ताह मौजे उंद्री प दे ता मुखेड सम्राट कीर्तनकार ह.भ.प. हनमंत महाराज किणीकर1