नाशिकच्या उपनगर परिसरात फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून एका पानटपरीवर धाड टाकून कारवाईची भीती दाखवत १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामध्ये तडजोडीअंती ५ लाख रुपयांवर सौदा करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी तीन पुरुष व तीन महिलांसह एकूण सहा जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानटपरी चालक दीपक पोपटराव बोराडे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. सोमवार सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवाजीनगर बसस्टॉपजवळील त्यांच्या ‘शिवनेरी’ पानटपरीवर एमएच ४६ सीयू ८७०६ क्रमांकाच्या कारमधून आलेल्या सहा जणांनी स्वतःला फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी सांगितले. त्यांनी परवानगीशिवाय टपरीत प्रवेश करून तपासणी सुरू केली, तर त्यांच्यापैकी एका व्यक्तीने पत्रकार असल्याचे सांगत कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण सुरू केले. फिर्यादीनुसार, संबंधित व्यक्तींनी बोराडे यांना घेराव घालत कारवाई टाळायची असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. त्यानंतर फोनवर बोलण्याचा बहाणा करत त्यांनी ५ लाख रुपये देण्यास सांगितले. संशय आल्याने बोराडे यांनी परिचित पत्रकाराशी संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली असता, संशयितांनी त्यांची नावे सुनील गजानन मालुसरे (घाटकोपर), शरद रामचंद्र गायकर (दिवा, ठाणे), शरद भगवान पाटील (डोंबिवली), गौरी महेश बर्डे (ठाणे), सरिता संजय मोरे (पूर्व ठाणे) आणि सरला शरद गायकर (दिवा, ठाणे) अशी सांगितली. त्यांनी आपण सामाजिक कार्यकर्ते असल्याचा दावा केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. बनावट अधिकारी असल्याचे भासवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
नाशिकच्या उपनगर परिसरात फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून एका पानटपरीवर धाड टाकून कारवाईची भीती दाखवत १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामध्ये तडजोडीअंती ५ लाख रुपयांवर सौदा करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी तीन पुरुष व तीन महिलांसह एकूण सहा जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानटपरी चालक दीपक पोपटराव बोराडे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. सोमवार सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवाजीनगर बसस्टॉपजवळील त्यांच्या ‘शिवनेरी’ पानटपरीवर एमएच ४६ सीयू ८७०६ क्रमांकाच्या कारमधून आलेल्या सहा जणांनी स्वतःला फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी सांगितले. त्यांनी परवानगीशिवाय टपरीत प्रवेश करून तपासणी सुरू केली, तर त्यांच्यापैकी एका व्यक्तीने पत्रकार असल्याचे सांगत कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण सुरू केले. फिर्यादीनुसार, संबंधित व्यक्तींनी बोराडे यांना घेराव घालत कारवाई टाळायची असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. त्यानंतर फोनवर बोलण्याचा बहाणा करत त्यांनी ५ लाख रुपये देण्यास सांगितले. संशय आल्याने बोराडे यांनी परिचित पत्रकाराशी संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली असता, संशयितांनी त्यांची नावे सुनील गजानन मालुसरे (घाटकोपर), शरद रामचंद्र गायकर (दिवा, ठाणे), शरद भगवान पाटील (डोंबिवली), गौरी महेश बर्डे (ठाणे), सरिता संजय मोरे (पूर्व ठाणे) आणि सरला शरद गायकर (दिवा, ठाणे) अशी सांगितली. त्यांनी आपण सामाजिक कार्यकर्ते असल्याचा दावा केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. बनावट अधिकारी असल्याचे भासवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
- राज्यभर चर्चेत राहिलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गणेश गीते यांचे बंधू असलेल्या गोकुळ गीतेंच्या या विजयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निकाल जाहीर होताच गोकुळ गीते यांनी कार्यकर्त्यांसमवेत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करत आपल्या विजयाचा आनंद व्यक्त केला.1
- भरत तिवारी यांच्या एन्काऊंटरनंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये भरत तिवारी अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात. यासोबतच, ते आपल्या मोबाईल फोनमध्ये असलेले काही महत्त्वाचे 'पुरावे' सुरक्षित ठेवण्याबद्दलही बोलताना दिसतात. भरत तिवारी ज्या पुराव्यांच्या संरक्षणाची मागणी करत होते, ते नेमके कोणते पुरावे होते, आणि त्यांचा संबंध एखाद्या मोठ्या खुलाशाशी होता का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत आणि लोक या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत आहेत.1
- मुदखेड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर पोलिसांनी मोठी आणि प्रभावी कारवाई केली आहे. राष्ट्रीय हरित लवाद (NGT) क्षेत्र घोषित केलेल्या या संवेदनशील भागात गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून पोलिसांनी वाळू माफियांना मोठा धक्का दिला. या कारवाईदरम्यान नदीपात्रात अवैध वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या ११ फायबर बोटी आणि ३ इंजिन बोटी जिलेटिनच्या साहाय्याने जागेवरच उध्वस्त करण्यात आल्या. यातून सुमारे २ कोटी ९० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून, वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोदावरी नदीचा मुदखेड येथील परिसर NGT ने संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला असल्यामुळे, शासनाने या भागात वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर पूर्ण बंदी घातली आहे. तरीही काही वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना यासंदर्भात गुप्त माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी तात्काळ विशेष मोहीम आखण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले. दि. २० जून रोजी शनिवारी पोलिसांनी खुजडा व माळकौठा शिवारातील गोदावरी नदीपात्रात सापळा रचला. छाप्यादरम्यान नदीपात्रात बोटी आणि इंजिनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. मात्र, तांत्रिक अडचणी आणि पर्यावरणीय सुरक्षिततेचा विचार करून, पोलिसांनी जिलेटिन वापरून बोटी जागीच नष्ट करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईत गणेश पाटील उबाळे (रा. मारतळा), भरत ढगे (रा. मारतळा), कचरू जाधव (रा. माळकौठा), कामाजी भरकडे (रा. कौडगाव), माधव सोमवारे (रा. येळी), ज्ञानेश्वर कळसे (रा. वासरी), बबनराव खानसोळे (रा. वासरी) यांच्यासह दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर गौण खनिज उत्खनन, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्यासह दिलीप चक्रधर, गायकवाड, रामकिशन राजेमोड, अर्जुन पवार, दत्ता राजेमोड, पांचाळ, सूर्यवंशी, माणिक पवार आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याबद्दल तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात असल्याने, पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे. या कारवाईनंतर वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.1
- नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात भवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरीनगर येथील विहिरीने तळ गाठला आहे.1
- आज दिनांक २२-०६-२०२६ रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सुसरवाडी येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, जे स्पष्टपणे पहायला मिळाले.1
- पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनाला तात्काळ स्थगिती दिली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून हे लेपन केले जाणार होते. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत, न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे लेपन करण्यास मनाई केली आहे. वारकरी संप्रदाय, श्री. बाळकृष्ण डिंगरे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. पुरुषोत्तम (गणेश) लंके यांनी पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती सोनाली राऊळ यांच्या न्यायालयात हा दावा दाखल केला होता. अधिवक्ता सुधीर रानडे यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मंदिर समितीला वज्रलेप न करण्याविषयी सक्त ताकीद दिली आहे. न्यायालयात मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये, हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्ती ही केवळ दगडी शिल्प नसून त्यात साक्षात देवत्व (प्राण) असते, ज्यामुळे काकड आरतीपासून नैवेद्यापर्यंत सर्व कृती त्याच भावनेतून केल्या जातात. मंदिर समिती 'दगडाची मूर्ती' समजून कृत्रिम आणि अपवित्र रासायनिक पदार्थांचा (उदा. इपॉक्सी) वापर करत आहे, ज्यामुळे मूर्तीचे देवत्व नष्ट होऊ शकते, असा युक्तिवाद करण्यात आला. यापूर्वी चार वेळा रासायनिक लेपन करूनही ते निष्फळ ठरले आहे आणि कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती आतून अधिक ठिसूळ होण्याचा मोठा धोका असल्याचेही सांगितले गेले. 'महाकालेश्वर मंदिर' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा संदर्भही दिला गेला, त्यानुसार भक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही निर्णय प्रशासनाला घेता येणार नाहीत. करवीर पीठाच्या जगद्गुरु शंकराचार्यांनीही या रासायनिक लेपनास स्पष्ट विरोध करणारे पत्र दिले होते, ज्याची न्यायालयाने नोंद घेतली. या निर्णयावर समाधान व्यक्त करताना, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तब्बल २८ युगे विटेवर सुखरूप उभा असणाऱ्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला कोरोना टाळेबंदीच्या काळात खड्डा कसा पडला आणि श्री रुक्मिणीमातेचे पाय का खराब झाले, याचे कोणतेही शास्त्रीय उत्तर अद्याप मंदिर समिती किंवा पुरातत्त्व विभागाला देता आलेले नाही, असे ते म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केवळ मते नोंदवली गेली; मात्र कोणती रसायने वापरणार आणि संवर्धन कसे करणार याची कोणतीही स्पष्ट माहिती प्रशासनाने दिली नाही. अचानक पत्रक काढून मंदिर बंद ठेवत वज्रलेपाचा निर्णय जाहीर केल्याने भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. मूर्ती संवर्धनासाठी 'आयुर्वेदिक वज्रलेप' हा अधिक सुरक्षित आणि परंपरेस अनुरूप असल्याचे न्यायालयात सप्रमाण मांडले आहे. यापुढील काळात तरी मंदिर समिती वारकरी, धर्माचार्य, संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या भावनांचा आदर करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.2
- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहारोली येथील विश्वास दिवा यांनी आपली कन्या प्रसूतकाळासाठी सरकारी रुग्णालय, वाडा येथे दाखल केली होती. मात्र, येथील डॉक्टरांनी रुग्णालयात पुरेशा सुविधा नसल्याचे सांगत रुग्णाला इतरत्र हलवण्यास सांगितले. दिवा यांनी त्यांच्याकडे इतर ठिकाणी जाण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून वाड्याच्या सरकारी रुग्णालयातच प्रसूती करण्याची विनंती केली. त्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना IDL रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आणि तिथे उपचार मोफत होतील असे आश्वासन दिले. त्यानुसार, त्यांनी रुग्णाला IDL रुग्णालयात दाखल केले. परंतु, आता IDL रुग्णालयातील कर्मचारी पैशांची मागणी करत आहेत. विश्वास दिवा यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब असल्याचे म्हटले आहे आणि त्यामुळे त्यांना पैसे भरणे शक्य नाही. विशेष म्हणजे, त्यांच्या रुग्णाकडे आयुष्मान कार्ड असूनही रुग्णालयाने हे कार्ड स्वीकारण्यास नकार दिला आहे, असे सांगत की आयुष्मान योजनेतून उपचार होणार नाही. या गंभीर स्थितीत त्यांनी मदतीची याचना केली आहे.1
- नाशिकमधील कामगार नगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका इमारतीच्या टेरेसवर पोत्यात बंद अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक लोकांनी तपास केला असता, हे भयावह सत्य उघडकीस आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ३ ते ४ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. ही हत्या कोणी केली आणि त्यामागचे नेमके कारण काय आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.1