लव्ह जिहाद, बेकायदेशीर अतिक्रमण, महिलांच्या सुरक्षेसह विविध प्रश्न बाबत विश्वहिन्दू परिषद यांचे निवेदन मानोरा :---नाशिक शहरातील काही सामाजिक संघटनांच्या वतीने विविध सामाजिक व कायद्याशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधत विश्वहिन्दू परिषद व बजरंग दल मानोरा शाखाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, कथित जबरदस्ती धर्मांतराच्या घटना, तसेच बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजात अस्वस्थता निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच सार्वजनिक व शासकीय जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसंदर्भात कडक कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदन राष्ट्रपती सह संबंधित प्रशासनाकडे देण्यात आले असून, यावर योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनवर राम हेडा, करण ठाकूर, वैदान तिवारी, अनुपम पद्ममगिरवार, सवाई राजपूत, विवेक रत्नपारखी, प्रथमेश देशमुख, हर्ष ठाकूर, मानव खडसे, आदीच्या स्वाक्षरी आहे.
लव्ह जिहाद, बेकायदेशीर अतिक्रमण, महिलांच्या सुरक्षेसह विविध प्रश्न बाबत विश्वहिन्दू परिषद यांचे निवेदन मानोरा :---नाशिक शहरातील काही सामाजिक संघटनांच्या वतीने विविध सामाजिक व कायद्याशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधत विश्वहिन्दू परिषद व बजरंग दल मानोरा शाखाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, कथित जबरदस्ती धर्मांतराच्या घटना, तसेच बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजात अस्वस्थता निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच सार्वजनिक व शासकीय जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसंदर्भात कडक कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदन राष्ट्रपती सह संबंधित प्रशासनाकडे देण्यात आले असून, यावर योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनवर राम हेडा, करण ठाकूर, वैदान तिवारी, अनुपम पद्ममगिरवार, सवाई राजपूत, विवेक रत्नपारखी, प्रथमेश देशमुख, हर्ष ठाकूर, मानव खडसे, आदीच्या स्वाक्षरी आहे.
- Post by Sharad Dayedar1
- Post by Santosh Dhakulkar1
- Post by Ahem Raza1
- Post by M B B1
- Post by Sk Chand1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Sharad Dayedar1