Shuru
Apke Nagar Ki App…
मालवणची नारळी पौर्णिमा ठरली खास; महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेने वेधले लक्ष!
Mahadoot news
मालवणची नारळी पौर्णिमा ठरली खास; महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेने वेधले लक्ष!
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मालवणात समुद्रदेवतेला नारळ अर्पण; मत्स्यव्यवसायाच्या भरभराटीसाठी प्रार्थना1
- रक्षाबंधनासाठी बाजारपेठ सज्ज; राख्यांच्या खरेदीला उत्साहाची झळाळी # **कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा धागा अधिक घट्ट करणाऱ्या **रक्षाबंधनाच्या सणासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.** शहरातील विविध बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी, आकर्षक आणि पारंपरिक राख्यांची दुकाने थाटली असून, राख्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. यंदा बाजारात **अगदी १ रुपयापासून ते ३०० रुपयांपर्यंतच्या राख्या** उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टून आणि विविध आकर्षक डिझाईन्सच्या राख्यांपासून ते मोती, खडे, रुद्राक्ष, चंदन आणि पारंपरिक कलाकुसरीच्या राख्यांपर्यंत मोठी विविधता पाहायला मिळत आहे. मात्र, आधुनिक डिझाईन्सच्या राख्यांची रेलचेल असली तरी अनेक बहिणींची पसंती अजूनही **पारंपरिक राख्यांनाच** असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. साधी, सुंदर आणि प्रेमाची आठवण करून देणारी राखी घेण्यासाठी बहिणींची गर्दी होत आहे. राखी हा केवळ एक धागा नाही; त्यात **बालपणीच्या आठवणी, भावंडांचे भांडण, प्रेम, काळजी आणि आयुष्यभर साथ देण्याचे एक न बोललेले वचन** दडलेले असते. त्यामुळे राखीची किंमत किती आहे यापेक्षा ती बांधताना बहिणीच्या डोळ्यांत दिसणारे प्रेम आणि भावाच्या मनात निर्माण होणारी आपुलकी अधिक मौल्यवान ठरते. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणामुळे भाऊ-बहिणी वेगवेगळ्या शहरांत राहत असले तरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटण्याची ओढ वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत राख्यांसोबतच **भाऊसाठी खास भेटवस्तू आणि गोडधोड पदार्थांच्या खरेदीलाही वेग** आला आहे. यंदाच्या रक्षाबंधनात महागडी भेटवस्तू नको, तर **बहिणीच्या हातातील राखी आणि भावाच्या मनातील प्रेमाचा धागा कायम घट्ट राहावा**, अशीच भावना बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.1
- अभूतपूर्व उत्साहात श्रावण कावड यात्रा संपन्न - एकमुखी श्री दत्त मंदिराचे यशस्वी संयोजन एकमुखी दत्त मंदिर आयोजित श्रावण मास कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न- करवीर मठात अभिवादन - आरती महाप्रसादाने सांगता . कोल्हापूर : पुरातन संदर्भ असलेल्या मंगळवार पेठेतील अंखड धुनी च्या एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने आयोजित श्रावण मास कावड यात्रा प्रंचड भक्तीमय वातावरणात संपन्न झाली . सकाळ च्या मंगलमय वातावरणात पंचगंगा नदी त विधीवत दत्त पादूका जल स्नान - आरती करण्यात आली . त्यानंतर 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ' च्या निनादात स्वामी सेवक मिलिंद धोंड , संजय घाटगे - मामा,पारस ओसवाल फौजी विरेंद्र हारुगले , किशोर घाटगे किरण दुसे प्रसाद जाधव नितीन केरकर आदि मान्यवरांनी मानाच्या कावडी चे पूजन करुन श्रीफळ वाढवले . आणि कावड यात्रेस प्रांरभ झाला . या वेळी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज ' रात्री उशिरा पोलिस प्रशासनाने नियोजित मार्गावर कावड यात्रा नेऊ नका असे कळवले मात्र तमाम भाविकांच्या उत्साहावर त्याचा काही किचिंत ही परिणाम झालेला नाही मात्र प्रशासनाचा मान राखत ही कावड यात्रा करवीर शंकराचार्य मठ मठापर्यंत मठात देण्याचा निर्धार घोषित केला . या नंतर हलगी च्या निनादात ही काव यात्रा सुरु झाली . यामधे गिरनार दत्तभक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्राचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . करवीर निवासिनी श्री अंबाबाई माता व श्री गुरुदत्तात्रेय यांना साक्षी ठेवून श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी शिव परमात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पंचगंगा मातेचे पवित्र जल कावडी अभिवादन करण्याचा उपक्रम भविष्यात करवीरची नवी ओळख ठरेल अशा शब्दात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह भरती यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या . या आध्यात्मिक आनंद सोहळ्यात सर्व गुरुबंधू, दत्तभक्त, दत्तसंप्रदायातील माता-भगिनी तसेच युवकांनी मंदिरा मार्फत दिलेले टी-शर्ट घालून तसेच पिवळ्या आणि भगव्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावड यात्रेची शोभा वाढवली . या कावड यात्रेच्या यशस्वी साठी मठाधिपती गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारस ओसवाल किशोर घाटगे मिलिंद कुलकर्णी राजेंद्र मकोटे संतोष गोसावी अरुण गवळी शिव म बोधे सागर ठाणेकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्ते कार्यरत होते .4
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी उपसभापती आ. नीलमताई गोऱ्हे यांचे फोनवरील संभाषण व्हायरल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी उपसभापती आ. नीलमताई गोऱ्हे यांचे फोनवरील संभाषण1
- नेपाळ मधील आलेल्या महापुरामुळे झालेली विध्वसक दृश्याचा व्हिडीओ1
- बारामती गुन्हेगारी वाढलेली आहे या प्रश्नावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा उत्तर1
- इन्स्टाग्राम रीलसाठी पिस्तूलचा धाक; बाबुर्डी येथील तरुणावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा इन्स्टाग्रामवरील ‘आभासी भाईगिरी’ पडली महागात; सुपा पोलिसांची तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये कारवाई सुपा, बारामती | इन्स्टाग्रामवर रील बनवताना पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन प्रक्षोभक आणि धमकीवजा मजकूर पोस्ट करणाऱ्या तरुणावर सुपा पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. सुपा पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास २४ ऑगस्ट रोजी "prem_jagtap_0295" या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित झाल्याचे आढळले. या व्हिडिओमध्ये बाबुर्डी, ता. बारामती येथील प्रेम प्रताप जगताप याने पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या व्हिडिओवर “आलीशान युवा प्रतिष्ठान” असा मजकूर तसेच “शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानुन भी अपना है” अशा स्वरूपाचा प्रक्षोभक मजकूर वापरण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करून संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५), तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पथकाने केली. पोलिसांनी सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांना स्पष्ट इशारा दिला आहे—रीलच्या माध्यमातून शस्त्रांचे प्रदर्शन करून किंवा दहशत निर्माण करणारा आशय प्रसारित करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ‘रीलसाठी रिअल लाईफ धोक्यात घालू नका’, असा संदेश सुपा पोलिसांनी दिला आहे. AP CRIME NEWS LIVE — जनहितासाठी निर्भीड बातमी, लोकजागृतीसाठी सदैव पुढे.1
- मालवणची नारळी पौर्णिमा ठरली खास; महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेने वेधले लक्ष!1