तातडीच्या गुगल मीटिंगमध्ये सर्वानुमते झालेला निर्णय कोळी बांधवांच्या उपोषणाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे दिनांक 10 मे 2026 रोज रविवारी रात्री आठ वाजता झालेल्या गुगल मीटिंगमध्ये सर्व समाज बांधवांनी एकमुखाने निर्णय घेतला की दिनांक 11 मे रोजी हिंगोली जिल्ह्यातील कोळी महादेव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहायचे आहे आणि त्यापुढील नियोजन ठरवण्यासाठी दिनांक 12 मे 2026 मंगळवारी रोजी मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपोषण स्थळी उपस्थित राहून तेथे उपोषण स्थळावर बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून किमान एक गाडी म्हणजेच किमान दहा माणसे तरी त्यादिवशी उपस्थित राहिले पाहिजेत. त्यामुळे दिनांक 12 मे 2026 मंगळवारी रोजी छत्रपती संभाजी नगर, नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, जालना, हिंगोली जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी युवकांनी, कार्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी, माता-भगिनींनी एक दिवस मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने उपोषण स्थळी उपस्थित राहून बेमुदत अन्नत्याग करणाऱ्या उपोषणार्थींना लढवय्या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ही त्या उपोषण स्थळावरच बैठक घेऊन ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील उपोषण स्थळावरच्या मंडपात उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे. हा निर्णय आजच्या गुगल मीटिंगमध्ये सर्वानुमते घेण्यात आलेला आहे.
तातडीच्या गुगल मीटिंगमध्ये सर्वानुमते झालेला निर्णय कोळी बांधवांच्या उपोषणाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे दिनांक 10 मे 2026 रोज रविवारी रात्री आठ वाजता झालेल्या गुगल मीटिंगमध्ये सर्व समाज बांधवांनी एकमुखाने निर्णय घेतला की दिनांक 11 मे रोजी हिंगोली जिल्ह्यातील कोळी महादेव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहायचे आहे आणि त्यापुढील नियोजन ठरवण्यासाठी दिनांक 12 मे 2026 मंगळवारी रोजी मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपोषण स्थळी उपस्थित राहून तेथे उपोषण स्थळावर बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून किमान एक गाडी म्हणजेच किमान दहा माणसे तरी त्यादिवशी उपस्थित राहिले पाहिजेत. त्यामुळे दिनांक 12 मे 2026 मंगळवारी रोजी छत्रपती संभाजी नगर, नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, जालना, हिंगोली जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी युवकांनी, कार्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी, माता-भगिनींनी एक दिवस मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने उपोषण स्थळी उपस्थित राहून बेमुदत अन्नत्याग करणाऱ्या उपोषणार्थींना लढवय्या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ही त्या उपोषण स्थळावरच बैठक घेऊन ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील उपोषण स्थळावरच्या मंडपात उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे. हा निर्णय आजच्या गुगल मीटिंगमध्ये सर्वानुमते घेण्यात आलेला आहे.
- ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७% दमदार निकाल लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.1
- शक्ती पीठ महामार्ग रद्द करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महामार्गच्या अध्यादेशाची होळी शक्ती पीठ महामार्ग रद्द करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महामार्गच्या अध्यादेशाची होळी1
- Post by नागनाथ ससाने1
- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.1
- नांदेड शहरातील जुना मोंढा बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता अनेक महिन्यांपासून रखडल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि धुळीचा त्रास वाढला आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त असून, व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.1
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने वारकरी संप्रदायातील संतांवर कथित 'प्रतिगामी विचारांच्या घुसखोरी'चा आरोप केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे वारकरी संघटना आणि हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यभर निषेध आंदोलने केली आहेत. आंदोलकांनी प्रवक्त्याची जाहीर माफी आणि तात्काळ अटकेची मागणी केली असून, प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.1