लोकसहभाग आणि सीसीटीव्ही हीच गुन्हेगारीविरोधातील प्रभावी शस्त्रे : ठाणेदार रामेश्वर चव्हाण.... लोकसहभाग आणि सीसीटीव्ही हीच गुन्हेगारीविरोधातील प्रभावी शस्त्रे : ठाणेदार रामेश्वर चव्हाण रिसोड : रिसोड शहरासह संपूर्ण तालुक्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाला नागरिकांच्या लोकसहभागाची नितांत आवश्यकता आहे. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घरे, दुकाने, व्यावसायिक आस्थापना तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गुन्हेगारीवर निश्चितच प्रभावी आळा बसू शकतो, असे प्रतिपादन रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी केले. रिसोड पोलीस स्टेशनमध्ये 31 जुलै रोजी आयोजित पोलीस–पत्रकार सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणेदार चव्हाण म्हणाले की, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) लागू झाल्यानंतर अनेक नवीन कायदेशीर तरतुदी आणि गुन्ह्यांच्या नव्या श्रेणी अस्तित्वात आल्या आहेत. या कायद्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. पोलीस प्रशासन विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून बीएनएसची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि जागरूक नागरिकांनीही या जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन नवीन कायद्यांविषयी समाजात जागरूकता निर्माण करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना ठाणेदार चव्हाण म्हणाले की, प्रत्येक घटनेच्या ठिकाणी पोलीस तातडीने पोहोचतीलच, असे नेहमी शक्य होत नाही. मात्र, संबंधित परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असल्यास त्यामध्ये कैद झालेल्या दृश्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेणे, त्यांची ओळख पटविणे आणि गुन्ह्याचा जलद उलगडा करणे पोलीस प्रशासनाला अधिक सुलभ होते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आणि समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाधिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस–पत्रकार सुसंवाद कार्यक्रमातून पोलीस आणि प्रसारमाध्यमांमधील समन्वय अधिक दृढ करण्याबरोबरच कायद्याविषयी जनजागृती आणि गुन्हेगारीविरोधातील लोकसहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.
लोकसहभाग आणि सीसीटीव्ही हीच गुन्हेगारीविरोधातील प्रभावी शस्त्रे : ठाणेदार रामेश्वर चव्हाण.... लोकसहभाग आणि सीसीटीव्ही हीच गुन्हेगारीविरोधातील प्रभावी शस्त्रे : ठाणेदार रामेश्वर चव्हाण रिसोड : रिसोड शहरासह संपूर्ण तालुक्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाला नागरिकांच्या लोकसहभागाची नितांत आवश्यकता आहे. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घरे, दुकाने, व्यावसायिक आस्थापना तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गुन्हेगारीवर निश्चितच प्रभावी आळा बसू शकतो, असे प्रतिपादन रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी केले. रिसोड पोलीस स्टेशनमध्ये 31 जुलै रोजी आयोजित पोलीस–पत्रकार सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणेदार चव्हाण म्हणाले की, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) लागू झाल्यानंतर अनेक नवीन कायदेशीर तरतुदी आणि गुन्ह्यांच्या नव्या श्रेणी अस्तित्वात आल्या आहेत. या कायद्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे
आहे. पोलीस प्रशासन विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून बीएनएसची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि जागरूक नागरिकांनीही या जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन नवीन कायद्यांविषयी समाजात जागरूकता निर्माण करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना ठाणेदार चव्हाण म्हणाले की, प्रत्येक घटनेच्या ठिकाणी पोलीस तातडीने पोहोचतीलच, असे नेहमी शक्य होत नाही. मात्र, संबंधित परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असल्यास त्यामध्ये कैद झालेल्या दृश्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेणे, त्यांची ओळख पटविणे आणि गुन्ह्याचा जलद उलगडा करणे पोलीस प्रशासनाला अधिक सुलभ होते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आणि समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाधिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस–पत्रकार सुसंवाद कार्यक्रमातून पोलीस आणि प्रसारमाध्यमांमधील समन्वय अधिक दृढ करण्याबरोबरच कायद्याविषयी जनजागृती आणि गुन्हेगारीविरोधातील लोकसहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.
- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा."आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.1
- लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज1
- बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद मध्ये पावसाचा कहर अनेक शेती पिके व महामार्ग पाण्याखाली पुरस्थीती कायम1